Skip to main content

भोग आणि ईश्वर ३८०

भोग आणि ईश्वर  ३८० 

खरंतर कलियुगातील परिस्थिती ही इतर तीन युगातील परिस्थितीहून भिन्न आहे अशातला भाग नाही. सुरासूर संग्राम, चांगल्या वाईटाची लढाई हा युगानुयुगे चालू असलेला संघर्ष आहे. पण प्रत्येक युगागणिक यात होत असलेला बदल हा भागवंतांसाठी  चिंतेचा मोठा विषय होता, आहे आणि असेल. याचं महत्वाचं कारण म्हणजे पहिल्या तीन युगात असलेली ही भिन्न देहातील लढाई या युगात एकाच देहात सूर व असुर रूप धारण करून आली आहे. 

आतापर्यंतच्या युगात वेगवेगळे असलेले सुष्ट व दुष्ट असे हे दोन गुण, एकाच देहातील चित्तात विराजित होऊन आले आहेत. हाच या युगातील कलीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे विकारांना वश होऊन, त्यांच्या विळख्यात अडकताना, ते तटस्थपणे निरखून त्यावर नियंत्रण मिळवणं हे खूप मोठं कसब आत्मसात असणं आवश्यक आहे. यात भलेभले अनियंत्रित होऊन, मायेसोबत कलीच्या फेऱ्यात कधी अडकतात त्यांचं त्यांनाही कळत नाही. 

याबद्दल पुराणातील एक गोष्ट आठवते. सृष्टीच्या आरंभी, एकदा स्वर्गात ब्रह्मदेवांच्या सभागृहात, सर्व सुरगण, यक्ष, गंधर्व आणि इंद्रादी देव उपस्थित असताना, प्रत्येक युगाला आपली महती सांगण्याची संधी देण्यात. सत्य, त्रेता व द्वापार या तीनही युगांनी आपली आपली महती व आपल्या प्रभावाचं गुह्य सांगून झाल्यानंतर कलीची वेळ आली. त्यावेळी कली नग्नावस्थेत एका हाताने आपलं लिंग व दुसऱ्या हाताने आपली जिव्हा धरून ब्रह्मदेवांसमोर आला. 

यामध्ये एकतर या युगात मानवी मनाला लज्जेची नसलेली चाड व्यक्त झाली. अर्थात माणूस मनाने किती निर्लज्ज होणार त्याचं प्रतीक कलीने प्रकट केलं. तरीही ब्रह्मदेवांनी कलीला अश्या प्रकारे येण्याचं कारण विचारताच कलीने खूप मोठं गुह्य प्रकट केलं. 

कली ब्रह्मदेवांना म्हणाला हे सृष्टी रचयिता श्रीब्रम्हाजी मी अश्या प्रकारे येण्याचं कारण आहे, ते म्हणजे,  माझ्या प्रभावात मानव मनाचे सर्व ताळतंत्र सोडून निर्लज्ज होणार आहे. नीतीचे, न्यायाचे, नियमांचे असे कोणतेही बंध वा धरबंध माझ्या प्रभावात राहणार नाही. आजपर्यंत या तिन्ही युगात मानवाची हळूहळू होत असलेली घसरण, माझ्या काळात पूर्णपणे नीच पातळीला जाईल. चाल चलन, वागणूक, धर्म याबाबत कोणतेही नियम शास्त्र यांचा विधिनिषेध राहणार नाही. 

भक्ती, धर्मपालन, याबाबत दांभिकता आपला जोर टिकवून असेल. न्याय हा मिळणार नाही तर तो मिळवावा लागेल. सदाचारी प्रजेवर, दुराचारी शासक अत्यंत निर्दय पणे राज्य करतील. भगवतभक्त हे कायम प्रभावहीन व निस्तेज भासतील,दुर्जन दुराचारी हे मुक्तपणे जीवन जगतील, त्या त्या काळातील सर्व सुखोपभोग, अनीती अनाचार दुरव्यवहार यामुळे, त्यांच्या पायाशी लोळण घेतील. जो जो या युगात अधर्म, अनीती, अनाचार, असत्य यांच्या मार्गाने जाईल, त्या सर्वांना या युगातील भूलोकातील त्या त्या काळातील, सर्व भौतिक सुखं प्राप्त होतील. या भूलोकी अश्या लोकांची चलती असेल. सर्व गोष्टी, व्यक्ती, शास्त्र, नीती न्याय, नाती हे भ्रष्ट होईल. 

यावर ब्रह्मदेवांनी विचारलं की, पण हे लिंग व जिव्हा हातात धरण्याचं प्रयोजन काय आणि हे कली तुझ्या कार्यकाळातील या युगात कोणीही या प्रभावातून वाचणार नाही का आणि धर्म न्याय नीती या मार्गावर चालणारे खरे भक्त कसे काय या प्रभावातून वाचू शकतील. 

याचं कलीने दिलेलं उत्तर आपण उद्याच्या भागात पाहूया. तो पर्यंत आपण नाममय राहण्याचा प्रयत्न करत राहूया. सद्गुरु कृपेने ते साध्य होईल अशी आशा करूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...