Skip to main content

भोग आणि ईश्वर ३७८

भोग आणि ईश्वर  ३७८ 

खरतर एखाद्या आदर्शाला शरण गेलं की काम पूर्ण झालं असं म्हटलं जातं. पण त्याने काय साध्य होतं. तर आपण आपल्यातील अहंकार, गर्व मोह क्रोध काम इत्यादींना नियंत्रीत करू शकतो. कसं याकडे आपण आता वळूया. मुळात माणसाचं मन हे अतिचंचल अवकाश आहे. अवकाश म्हटलं की त्याला अथांगता व विशालता ओघानेच आली. अश्या या विशाल अवकाशात एखादी लकेर वा नाद किंवा आसूड चटकन घुमून आपल्या अस्तित्वाने पूर्ण अवकाश व्यापून टाकतो. 

याचं कारण की, ते अवकाश रिक्त असतं. पण मनाचं तसं नाही. कारण ते रिक्त नसून सतत प्रवाही आहे. सतत वाहत राहणं हा त्याचा स्थायीभाव आहे. खरतर स्थायी म्हणजे स्थिर किंवा static पण इथे तर चंचलता हा स्थायी म्हणजे स्थिरभाव आहे. मुळात हेच एक विचित्र कोडं आहे. 

बरं अश्या या चंचलतेला अविचार, क्रोध अविवेक अशी अनेक मित्रमंडळी असतील तर , मग काय अश्या देहाला अनेक व्यापातून जावंच लागतं. पण मग अश्या जन्मो जन्मी फिरत असलेल्या व कोणताही ठावठिकाणा माहीत नसलेल्या आणि कर्माचा गुंता करून ठेवलेल्या सर्व सामान्य जीवाला फक्त जन्म मृत्यू या चक्रातून फिरत राहणं हा एकच पर्याय उरतो का. 

वास्तविक पाहता,अर्जुनासारख्या प्रखर बुद्धी, आत्म संयम, विद्वत्ता असलेल्या महापुरुषाला थोडसं ज्ञान प्रदान करून, भगवंत युद्धासाठी तयार करू शकले नसते का. त्याला इतकं मोठं, विस्तारित, सर्व विषयांना व्यापून उरणारं महाज्ञान समजावून सांगायचं काय कारण होतं. त्रिकालज्ञानी ईश्वर जाणून होते की, पुढे येणारं युग हे कलियुग आहे. आपण काळाच्या अश्या चरणसीमेवर आहोत जिथे द्वापारयुग समाप्त व्हायला आलं आहे. 

मग अश्या परिस्थितीत आपण स्वतः पुन्हा कलियुगात येऊ न येऊ आणि अर्जुनासारखा सच्चा सखा व मोहाच्या, विशादाच्या, गोंधळाच्या उंबरठ्यावर उभा असलेला अर्जुन,  कलियुगातील प्रातिनिधिक सामान्य मानासासारखाच आहे. कलियुगात पदोपदी युद्धसदृश परिस्थिती असणार, नित्य नवीन संग्राम आणि त्यात प्रत्येक जीव भरडला जाणार. 

अश्या कठीण परिस्थितीत आणि भगवंताप्रति आस्था कमी कमी होत जाणाऱ्या काळात, जर काही साधा सोपा कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध नसेल, तर लोकांची धर्मा वरील व धर्ममार्गावरील निष्ठा कमी होत जाईल. त्यामुळे अशी निष्ठा भक्ती प्रेम आदर, विश्वास व श्रद्धा टिकून राहणारा व कमी श्रम, बल लागणारा, ईश्वरप्राप्तीचा मार्ग उपलब्ध असणं व त्याबद्दल आताच बोलणं उचित आहे. 

म्हणून  ईश्वराने या शरण व स्मरण योगाची महती गीतेच्या शेवटी विषद केली. उद्या यावर सविस्तर चिंतन करूया. पण नामाचं चक्र अव्याहत सुरू ठेवून. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१३/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...