Skip to main content

भोग आणि ईश्वर ३७९

भोग आणि ईश्वर  ३७९ 

भगवंत हृदयातून पाझरणाऱ्या प्रेममय लहरी प्राप्त करून, ईश्वरी कृपेच्या छायेचा लाभ घेण्याचा अधिकार, सर्व जीवांना आहे, अगदी सर्व जीवांना. प्रभू आपल्या कृपाप्रसादाने प्रत्येक जीवाला जीवनमुक्त  करण्यासाठी अत्यंत आतुर आहेत आणि सदैव असतात. प्रश्न त्या कृपेच्या झऱ्यात न्हाऊन निघण्यासाठी जीव आतुर असणं आवश्यक आहे. ती आत्मीयता, ती कळकळ, ती जाणीव,जीवांच्या हृदयात जागृत होणं आवश्यक आहे. ती जागृतता येण्यासाठी भगवंत सदैव उत्सुक असतात, हे ध्यानात राहुद्या. 

याचसाठी, अत्यंत कृपाळू ईश्वराने, जो जीव या मार्गाकडे वाटचाल करून, मार्गक्रमण करेल, त्या प्रत्येकाला, आत्म साक्षात्कार देऊन, आत्मसंतुष्ट करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. हे विविध वेळी, विविध काळी आणि विविध उदाहरणं व शास्त्र पुराणं यातून अनेकदा सांगितलेलं आत्मज्ञान पुन्हा एकदा कलियुगाच्या वेशीवर व द्वापार युगाच्या समाप्तीच्या काही काळ आधी, अर्जुनाला व महाभारत युद्धाच्या समारंगणाला निमित्त करून व साक्षी ठेवून, स्वमुखे कथन केलं. 

याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे कलियुगात निर्माण होणारी भ्रांत, संशय, भ्रष्ट व्यवस्था, धर्माप्रति अनास्था, तिरस्कार व निंदनीय स्थिती या सर्वात खरा धर्मप्रेमी गोंधळून जाणार, या वातावरणाच्या मोहात, मायेच्या मोहिनीत, धर्मापालनाचं मुख्य कार्य विसरून, मानव अनेक इतर व्यवधानात व्यस्त होऊन जाणार. ते हेदेखील जाणत होते की, वरील सर्व नकारात्मक मार्गी, निरिच्छ, नास्तिक, तिरस्कार करणारे सर्व, धर्मचारी व्यक्तींची येथेच्छ निंदानालस्ती करणार. 

धर्ममार्तंड म्हणवणारे, धर्मभ्रष्ट पदभ्रष्ट व विकारग्रस्त होताना दिसतील. अश्या परिस्थितीत आस्था असलेले, पारंपारिक मार्गाने धर्म व मोक्ष या पुरुषार्थाचं पालन करण्यास, घाबरू शकतात वा शंकाग्रस्त आणि भयग्रस्त होऊ शकतात. मग त्यांनी धर्मपालन व मोक्षमार्गावर वाटचाल कशी करायची, हा खूप गहन व सर्वव्यापी प्रश्न उभा राहू शकतो. कदाचित कलियुगातील असुर व्यवस्था इतकी, भेसूर, भयानक व भयाकरी असेल की,त्या त्या सांप्रत काळात उपलब्ध तांत्रिक साधनांमुळे, प्रत्यक्ष व्यक्तिगत धर्मपालनावरसुदधा बंधनं व नियंत्रण लादलं जाऊ शकतं व गंडांतर येऊ शकतं. 

कर्मफल नियमानुसार भगवंत स्वतः त्यावर , त्या त्यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण व नियमन ठेवू शकणार नाहीत. अश्यावेळी, धर्मपालन, पुरुषार्थ प्राप्ती ही अशक्य गोष्ट होऊन बसेल. कलीच्या या सत्ता व्यवस्थेत,अगदी स्वगृही सुद्धा ईश्वर प्राप्तीसाठी कर्म व धर्म करणं दुरापास्त होईल. कदाचित मानवाच्या मनावरसुद्धा त्याचा स्वतःचा अधिकार किंवा स्वनियंत्रण राहू शकणार नाही. इतकी विपरीत, विचित्र व टोकाची शोचनीय स्थिती येऊ शकेल. 

अश्या स्थितीत, धर्मपालन, कर्मपालन व ईश्वरीय भक्तीची अर्चना प्रार्थना, वंदना ही देखील कठीण व अशक्य होऊ शकते. पण मग ईश्वराची इच्छा असलेल्या मोक्षप्राप्ती या मूलभूत अधिकारा साठी भक्तांना, मुमुक्षुना काहीही करता येणं शक्य नाही का. 

याचं उत्तर भगवंतांनी स्वमुखे, स्ववाणीने व स्वमतीने हजारो वर्षांपूर्वी दिलं आहे, त्याचं चिंतन उद्या करूया आणि नाममंत्राची मात्रा नित्य घेत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...