Skip to main content

भोग आणि ईश्वर ३९४

भोग आणि ईश्वर  ३९४ 

वास्तविक आज ३९३ व्या भागाचा विषय पुढे न्यायचा आहे. परंतु आज माझे सद्गुरू, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस असल्यामुळे, त्यांना प्रिय असलेले नाम, या विषयावर आज चिंतन करूया आणि ३९३ भागाचा विषय, उद्या ३९५ भागात पुन्हा सुरू करूया.  महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य, फक्त एक नाम या विषयासाठी वाहिलं. देहत्यागापश्चात सुद्धा, चैतन्यमय स्वरूपात, त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती, आजही साधकांना येते. 

मुळात नाम का घ्यावं, याचं एक महत्वाचं संयुक्तिक कारण म्हणजे जीवाची गती काय आहे आणि कर्म फलाचा व्याप किती आहे, हे ईश्वर व सद्गुरू दोघेच जाणतात. प्रारब्ध व संचितातील जमा पुंजी, हा आपणच जमा केलेला पसारा आहे. त्यामध्ये विषयात राहून केलेल्या कर्माची बीजं, किती व सत्कृत्याची बीजं किती, हे काळाला ज्ञात आहे. पण ते फलस्वरूपात समोर येईल त्यावेळी, आपण अत्यंत हर्षभरीत किंवा अतिशय दुःखी होऊ. 

वास्तविक दोन्ही स्थिती या चुकीच्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून, आपण त्या आनंदात वा दुःखात सद्यस्थितीचं कर्म हरवून बसतो. म्हणजेच वर्तमान कर्म करताना, भोगत असलेल्या कर्मफलाचा परिणाम, सध्याच्या कर्मावर होऊन, पुन्हा नवीन कर्मबंधन निर्माण होतं. मग पुन्हा पुन्हा तोच नित्याचा खेळ व चक्र तयार होतं. त्या सर्व कर्मासाठी पुन्हा एक वा अनेक जन्मातून जाऊन, कर्मफल भोगण्याची शृंखला तयार होते. 

या सर्वांतून बाहेर पडण्याचा व ही मालिका तोडण्याचा सर्वात  उत्तम उपाय, जो श्रीमद्भगवद्गीतेत, प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णु अवतारी, श्रीकृष्ण, यांनी सांगितला आहे. तो सहज साधा उपाय म्हणजे ईश्वरस्मरण करत प्रत्येक कर्म करत जाणं. अर्थात नित्य नामस्मरण करत , प्रत्येक क्षण त्याला अर्पण करणं. कारण कर्म न करता कोणताही जीव क्षणाचा सूक्ष्म अंशमात्रसुद्धा राहू शकत नाही. 

ज्याप्रमाणे प्रत्येक क्षण जोडत जोडत, त्या प्रत्येक क्षणाची एक साखळी निर्माण होते, जे आपलं आयुष्य असतं. म्हणजेच अश्या प्रत्येक क्षणातील, प्रत्येक कर्म, ईश्वरचरणी अर्पण करण्यासाठी, त्याच्या नित्य, क्षणक्षण स्मरणाची साखळी तयार होत जाणं, आवश्यक आहे. अश्या नित्य, सतत,संततधारेसम होत जाणाऱ्या स्मरणात, आपण आपलं प्रत्येक कर्म त्या नामाला, अर्थातच नामाच्या मालकाला, म्हणजेच आपल्या आतील आत्म्याच्या धन्याला स्मरत व अर्पण करत जातो.  

यात एक महत्वाचा मुद्दा जो ध्यानात घ्यायचा की, सहेतुक अर्थात काही साध्य मनात धरून केलेलं नाम हे स्मरण नसून, आपल्या मनातील इच्छेला व त्या इच्छेमागील हेतूंना, आकांक्षाना खाद्य पुरवण्यासम आहे. जे पुन्हा नवीन बंधनांना जन्म देतं. म्हणजेच हेतुपूर्वक घेतलेलं नाम हे बंधनात अडकवतं. म्हणून ते एकप्रकारे अहित कारक आहे. दुसरं कारण म्हणजे, जर हेतू साध्य झाला नाही, तर मन निराश होऊ शकतं. 

अश्या नैराश्यातून, एकतर नाम मनापासून घेतलं जाणार नाही, किंवा ते सुटण्याची शक्यता आहे. तद्नंतर प्राणी आपलंच अहित करून घेईल. म्हणजेच हेतुपूर्वक घेतलेल्या नामातून अहित साधेल. जर अश्या नामातून योगायोगाने हेतू सफल झाला तर ते त्या नामावरील श्रद्धा,  हेतुसाध्यासाठी दृढ करेल. पण त्यातून पुन्हा, हेतुपूर्वक नाम घेण्याची, नवीन साखळी तयार होईल. म्हणजे पुन्हा अहितच होईल. 

कारण जो ईश्वर जन्ममृत्य बंधनातून मुक्त करण्यास सक्षम आहे, त्याला, जन्ममृत्यूबंधनात अडकवण्याची प्रार्थना करणं, हे अजूनच गैर आहे. त्याचप्रमाणे सहेतुक नामात, नामावरील निष्ठा ही त्यातून अपेक्षित फल प्राप्तीच्या प्रमाणात असेल. म्हणजेच ती खरी निष्ठा नसेल. खरी निष्ठा ही साधनेवर असते, जी हेतूंच्या पलीकडे असली पाहिजे. ज्याला जाज्वल्य निष्ठा म्हणतात. यामध्ये प्राणी प्राप्तीच्या पलीकडे जाऊन, निष्ठेने अहेतुक साधना करतो. 

म्हणूनच निष्ठेने, अहेतुक व प्रत्येक क्षण ईश्वराचं स्मरण करणं हेच अंतिमतः हितकारक आहे. अर्थातच कोणतंही साध्य मनात न धरता अहेतुक नाम घ्या आणि नाममार्गात पुढे पुढे जात रहा. कारण तेच तारक आहे. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२९/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...