Skip to main content

भोग आणि ईश्वर ३८८

भोग आणि ईश्वर  ३८८ 

श्रीब्रह्मदेव आपलं कथन करत असताना श्रोत्यांकडे लक्षपूर्वक पाहून त्यांच्या प्रतिक्रिया निरखत होते. त्रिकाल दर्शी व त्रिकाल ज्ञानी श्रीब्रम्हाजी हे जाणून होते की,  जे देव सुरवर आणि जमलेले सर्वच, सात्विकतेच्या परम उंचीवर पोहोचलेले पुण्यवान आहेत. त्यामुळे, कलियुगा बद्दल,ज्या गोष्टी, मी सांगत आहे किंवा कलियुगात काळाच्या उदरात दडलेल्या रहस्यातील अतिगृह्य भाग, जो कलीने कथन केला, तोसुद्धा, मात्र कल्पनेने उमजून येणं महाकठीण आहे. 

म्हणून त्यांनी अजून सखोलपणे विश्लेषित करताना सांगायला सुरुवात केली. आज ज्या गोष्टी अकल्पनिय वाटतात आणि ज्यांच्या घडण्याबद्दल अजूनही सभागृह साशंक आहे, त्यामुळे, त्यावर अजून प्रकाश टाकणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, भाऊ भाऊ एकमेकांचे वैरी होऊन, त्यातून वाद ते महायुद्ध ही वैचारिक व नैतिक अधोगती, कलियुगाच्या आधीच विश्वाला पहायला मिळेल. 

त्यामुळे तद्नंतर नैतिक, वैचारिक, ज्ञान विज्ञान, निष्ठा, श्रद्धा, विश्वास, परमार्थ, परोपकार, सत्य इत्यादी सर्वच पातळीवर, अकल्पनिय अधोगती होत जाईल. असं समजा की, पाण्यात अशुद्धता मिसळल्यावर, ज्याप्रमाणे पाण्यातील कोणताही जीव जंतू हे शुद्ध राहू शकत नाहीत.  त्याप्रमाणे शुद्ध सात्विक, सज्जन जनांना, अश्या अशुद्ध पाण्यात, अर्थात अश्या वाता वरणात आपली शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी, किती महत्प्रयास करावे लागतील , याची कल्पना प्रत्यक्ष त्या युगात वावरतानाच येऊ शकेल. 

अपराध, हत्या, चौर्यकर्म, शीलहरण हे सर्वसामान्य प्रमाद समजले जातील. यातच अपराधी तत्वांची बाजू बलशाली असल्यामुळे, पापभिरू व ईश्वरमार्गी जन हे तुलनेने बल हीन असतील. यामुळे अपराधी जन निरपराधी जनांवर राज्य करतील. त्यामुळे राज्यकर्ते आपले नियम व नीती आखताना, अपराधी सुटतील आणि निरपराधी बंदिवान होतील, अश्या प्रकारे आखतील. सत्ता ही सत्याचा आवाज दाबण्यासाठी राबवली जाईल. 

देह हाच सर्वतोपरी श्रेष्ठ समजला जाईल.त्यामुळे जीवाचा संसाराचा, संसारातील पाशांचा अंकुश सर्वांच्या मनावर आरूढ होईल. त्यामुळे पत, प्रतिष्ठा, पैसा, यांच्या भयाने, न्याय, सत्य हे निर्विवादपणे जनसामान्यांच्या बाजूला असूनही, असत्य, दंभ, असुरवृत्ती, द्वेष, मत्सर हे सर्वथा श्रेष्ठ भासतील. त्यांचं दडपण इतकं प्रखर व बलशाली असेल की, सत्य वाचेने तर अतिदुर राहिलं, पण मनामध्ये सत्याचा उच्चार करायलासुद्धा सामान्य जन धजवणार नाहीत. 

हा प्रभाव जसजसा वाढत जाईल त्याप्रमाणे अहंकार, क्रोध व काम आपली पकड हळूहळू वाढवून, जास्तीत जास्त जीवांना क्षतिग्रस्त करेल. वास्तविक बाकीच्या युगात, देव, धर्म, न्याय, नीती हे बलशाली असल्यामुळे, ज्या शक्ती प्रभावहीन, निस्तेज व भयग्रस्त असतील,त्याच शक्ती कलियुगात आपलं उच्चस्थान टिकवून असतील. इतर युगात, आचार विचार व उच्चार यांना असलेल्या मर्यादा, कलियुगात अंतर्धान पावतील. परिणामी आचार, विचार व उच्चार हे भ्रष्ट, दूषित होत जातील. 

श्रीब्रम्हाजी आपलं, कलियुगाबाबतचं विश्लेषण सभेपुढे मांडत आहेत आणि सभा अकल्पनिय भयाने प्रभावित होत आहे. यावर आपण पुढील भागात चिंतन सुरू ठेवू. पण आपली नामाची आहुती जीवनयज्ञात देत राहूनच. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...