Skip to main content

भोग आणि ईश्वर ३८३

भोग आणि ईश्वर  ३८३ 

कलीच्या, कलियुगातील भयंकर उत्पादांच्या नुसत्या कल्पनेने सृष्टीरचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित सर्वजण अचंबित व भयकंपित झाले होते. कलीने आपले कथन पुढे सुरू ठेवले. 

उत्तेजकता हाच सामूहिक मूलमंत्र होईल. काळानुरूप व हळूहळू अग्रेषित होत जाणारा हा प्रवाह सामूहिक स्वरूप धारण करत जाईल. थोर वृद्ध वयस्कर व अनुभवी लोकांना बाजूला सारण्यात येईल. प्रत्येक एकेका पिढीनंतर अहं स्व व अहंकार हा दृढ होत जाईल. निर्जीव वस्तूंप्रमाणे सजीव गोष्टीसुद्धा तुच्छ व त्याज्य ठरवण्यात येतील. किंबहुना प्राणी व मानव यांच्यातील फक्त देहाचे भेद शिल्लक राहतील. स्वतंत्रपणा हा स्थायीभाव होईल. आज्ञापालन व आज्ञाधारकपणा हा सद्गुण मनातून हद्दपार होऊन, त्याची जागा अहंकार अपमान, तिरस्कार व तुच्छता घेईल. 

अहंकार इतका पराकोटीला जाईल की, त्या नादात स्वतःला किंवा दुसऱ्याला संपवणं, माणूस सहज सध्या करेल. मानवी मन हे विचित्र गुंता होऊन जाईल. सरळ साध्या निरलस निरपेक्ष या स्वभावाच्या माणसांची वानवा होईल. सर्व प्रकारच्या हत्या या सहजी करायला मानवी मन निर्ढावेल. कोणतीही बंधन व त्यांच्या मर्यादा यांची जाणीव व त्यांचं पालन हे हळूहळू मागे पडत जाईल. वासना व त्याचं विष यांचं सार्वत्रिकीकरण होऊन त्यातून भ्रष्ट आचरण हा अवगुण न राहता जीवन जगण्याची पद्धत होईल. दुसऱ्याला नाडून त्याच्याकडून आपलं काम करवून घेणं, हा उत्तम जीवन जगण्याचा महामंत्र होईल.


कली पुढे म्हणाला की, आता आपल्या दोन्ही प्रश्नांकडे पुन्हा एकदा सारस्वरूपात येतो, सभाजनहो चित्त धरून ऐका. 
मी आधी सांगितल्याप्रमाणे सेवन श्वसन याबरोबर वासना ज्याला नियंत्रित करता येतील, तो माझ्यावरती, या युगात राज्य करेल. अर्थात त्याला त्रास देऊन छळ करण्यासाठी आणि त्याला कलियुगातील महामार्गावर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मी करेनच. पण यातून तावून सुलाखून निघणारे आत्मे, हे नक्कीच पुढील काळात वा पुढील प्रवासात नंतर येणाऱ्या परिवर्तनाचे व युगांतरात, सत्ययुगाची खरे पात्रता प्राप्त करणारे ठरतील. 

देवेन्द्र मधेच कलीला विचारणा करतात. पण मग सत्य शांतीप्रेमी व  पुण्यवान आत्म्यांना या युगात काहीही आधार किंवा सहाय्य भूत तत्व किंवा ईश्वराला भजण्याचा मार्ग आणि प्रेरणादायी गोष्टी नसतील का. 

सर्वात महत्वाच्या या प्रश्नावर श्रीब्रम्हाजीसह समस्त श्रोतृवर्ग अतिप्रसन्न जाहले. या गहन योगाची माहिती देताना कली थोडा खिन्न झाला. पण श्रीब्रम्हाजी व देवेन्द्र यांसह सर्वांना पुन्हा एकदा पाहून कली म्हणाला. त्रेतायुगापर्यंत असणारा सर्व देवांचा प्रभाव कलियुगात पार ओसरून जाईल. ईश्वरभक्तीची अनेक साधनं, माध्यमं व मार्ग आपल्या प्रभावास आपत्र ठरतील. परंतु सर्वकाळात आपला प्रभाव टिकवून राहिलेलं आणि असीम कृपेचा झरा असलेली सद्गुरुत्वाची अखंडता या युगात मानवाला तारण्यास पूर्ण सक्षम असेल. खऱ्या गुरूंचा महिमा अपरंपार असेल. 

गुरुभक्ती, गुरुसेवा ही एक मोक्षदायी फलदायी व प्रेरणादायी असेल. किंबहुना सद्गुरूतत्वाची, परमेश्वराची निर्मिती ही कदाचित या युगात धर्ममार्गी, कर्ममार्गी जनांना, तृषार्ताला मिळणाऱ्या जलासमान असेल. माऊली ज्याप्रकारे आपल्या पुत्रांना प्रेम देते, त्यांना आधार देते, प्रेरणा देते, त्याप्रमाणे सद्गुरू ही विश्वाची माऊली असेल. 

पण ही , सद्गुरुभक्तीची कृपा साधण्यासाठी काही स्वाभाविक गोष्टी साधणं जरूर असेल का, सभेतून एक प्रश्न आला. कलीने त्या दिशेने पाहून, बोलायला सुरुवात केली. 

अखंडलीनता, अखंडशरण व अखंडस्मरण ही त्रयी ज्याला साध्य होईल आणि ईश्वर नामाचं शिंपण जो आपल्या मनात सतत करत राहील, त्याला या कृपेची पात्रता सद्गुरुत्वाकडून प्राप्त होईल. पण यात काही धोके जरूर आहेत. मुख्य व महत्वाचा धोका, देहाच्या उच्चतम प्राथमिकतेमुळे, संकुचित दृष्टीने व फक्त एका जन्माची जाण असलेलें जन,  त्याबाबतीत सुद्धा मात्र विषय, विकार व विकृती यांनी ग्रस्त होऊन आपल्या सांसारिक गरजा व आवश्यकता यांसाठीच भक्तीच्या माध्यमाचा वापर करतील. 

त्यांची स्थिती व कलीचं पुढील कथन आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत आपल्या जीवनाचा स सद्गुरुकृपेचा आधार असलेलं आपलं नाम घेत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...