Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

भोग आणि ईश्वर १२२

भोग आणि ईश्वर  १२२   आपण कित्येकदा एखाद्याच्या बोलण्याने व्यथित वा नाराज अथवा निराश होतो.  कारण सकृतदर्शनी ते बोल विनाकारण  ऐकावे लागलेले असतात. त्यात आपली काही चूक असते वा नसते. उदाहरणार्थ एखाद्यावेळी आपण चांगल्या मनाने व उद्देशाने, एखादा वाद वा विसंवाद सोडवायला जातो आणि आपल्यालाच चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. किंवा कधी कधी आपण कशातही नसताना आपल्या प्रतिमेबद्दल वा स्वभावाबद्दल चुकीचं बोललं जातं वा वागणुकीतील नसलेले दोष दाखवले जातात. या किंवा अश्या प्रसंगात दोन गोष्टी शांतपणे मनात विश्लेषित करायच्या. सर्वात प्रथम, नेहमी आपला सद्सद्विवेक जागा ठेवायचा आणि त्यासाठी आपलं डोकं, बुद्धी आणि मन, अशी गोष्ट वा वाक्य  ऐकत असताना वा ऐकल्यावर, शांत ठेवायचा प्रयत्न करायचा. इथेच नाम क्षणमात्र का होईना पण उत्तम कार्य करतं. दहा आकडे मोजण्यापेक्षा दहावेळा नाम घेतलेलं सर्वात उत्तम.  जर आपण शांत राहिलो आणि आपला विवेक जागा राहिला, तर एक गोष्ट मनात स्वतःला विचारायची की, या व्यक्तीने आता माझ्याबद्दल जे बोल बोलले त्याप्रमाणे मी आहे का. उत्तर हो असेल, तर मग ती व्यक्ती सत्य कथन करत आ...

भोग आणि ईश्वर १२१

भोग आणि ईश्वर  १२१   मनाला बांध घालणं हे अशक्य आहे. पण शास्त्र सांगतं की,ज्या गोष्टीला बांध घालता येत नाही त्या गोष्टीचा, शक्तीचा,ऊर्जेचा प्रवाह वळवून तिला कार्यार्थ वापरता येऊ शकतं. याच तत्वाचा वापर आपण करणार आहोत. अनिष्ट गोष्टीत, अविचारात आणि मायामोहाच्या जाळ्यात वाया जाणाऱ्या मनाच्या अतिरिक्त उर्जेला, शक्तीला आणि अवकाश अर्थात नको त्या गोष्टी साठवणाऱ्या स्पेसला आपण सद्विचारार्थ वापरणार आहोत. ज्या गोष्टीकडे मन जास्त आकर्षित होतं, त्या गोष्टीत वा विचारात, नामाचा विचार आणायचा आणि त्या विचाराचा माग न धरता, नामाचा विचार करायला सुरुवात करायची. मनाची एक सवय असते. त्याला दोन विचार दिले की पहिला विचार की दुसरा विचार या द्विधा स्थितीत ते जातं. याच गोष्टीचा फायदा घेऊन सद्सद्विवेक जागा करायचा किंवा जागाच ठेवायचा. ज्यायोगे मनातील अनिष्ट, अविचार इत्यादीचा वेग मंदावेल. एकदा वेग मंदावला की, त्या विचारांना लागणारी अतिरिक्त ऊर्जा आपल्या कार्यार्थ वळवून घ्यायची. हे थोडं नाजूक काम आहे, पण प्रयत्न केल्यास जमू शकेल. यात अजून काही सकारात्मक  गोष्टींचा वापर करू शकता. जसं, चांगली धार्मिक व वैचा...

भोग आणि ईश्वर १२०

भोग आणि ईश्वर  १२०   आज सलग १२० दिवस एकच विचार धरून त्यावर रोज एक लेख लिहून हा उपक्रम चालू आहे. सलग १२० दिवस अर्थात चार महिने लिहिणं हा अद्भुत योग सद्गुरुंच्या कृपेने आणि सेवा म्हणून साध्य झाला. सद्गुरु कृपेने अखंड १२० दिवस हा योग जुळून आलाय. ही कृपा अशीच अखंड राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.  काल म्हटल्याप्रमाणे, आज आपण मनाच्या अवकाशातील unwanted अर्थात अतिरिक्त व गरज नसलेल्या फाईल्स अर्थात अविचार, काळज्या, चिंता, अनिष्ट विचार आणि त्रासदायक, वेदनादायक अनुभव, आपल्यासह इतरांवरील असलेला राग, क्रोध,मत्सर व द्वेष कसा काढून टाकायचा यावर विचार करूया.  पण त्याआधी एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा काय आणि निचरा कसा करायचा ते लक्षात येईल. निचरा या शब्दाचा विग्रह दोन प्रकारे करता येईल. चरा म्हणजे खा अर्थात खाण्यास योग्य असे सर्व खा. त्यामुळे निचरा म्हणजे जे चरण्यास अयोग्य , जे त्याज्य ते खाऊ नका. दुसऱ्या अर्थाने चर म्हणजे आचरणास योग्य असे आत्मसात करा, वापरात आणा आणि मनात साठवून त्याचा योग्यवेळी वापर करा. त्यामुळे अर्थातच निचरा म्हणजे जे आचरणास अयोग्य,  जे उपयोगाचे नाही, ज्यान...

भोग आणि ईश्वर ११९

भोग आणि ईश्वर  ११९   मनाच्या अमर्याद शक्तीचा आणि अवकाशाचा प्रत्यय तेंव्हा येतो, ज्यावेळी आपला कठीण काळ सुरू असतो. त्यावेळी आपल्या भोगांचा काळ असतो. त्यातही मागच्या एका भागात  पाहिल्याप्रमाणे संकटंसुद्धा किंवा अडचणीसुद्धा एकाचवेळी येतात.  याचं कारण आहे. जोपर्यंत घरावरचं छत वा आच्छादन हे मजबूत असतं, तोपर्यंत, कितीही सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस आला, तरीही एक थेंबसुद्धा आत येत नाही. म्हणजेच, ज्यावेळी आपल्या पुण्याईच्या कर्मांची फल, आपण उपभोगत असतो, त्यावेळी त्या पुण्याईच्या छतामुळे काही काही संकटं, परस्पर येऊन, धडका देऊन, निघून गेलेली, आपल्याला कळतसुद्धा नाही. पण याउलट ज्यावेळी दुःख, संकटं आणि भोग यांचा काळ येतो, त्या काळात पूर्व पुण्याईचा जोर ओसरलेला असल्यामुळे, अर्थात त्याचं छत थोडं सैलसर झाल्यामुळे किंवा निघून गेल्यामुळे, आपल्या भोगाच्या फलाची पक्वता परिपूर्ण होऊन ती आपल्यापर्यंत पोचायला लागतात.  याच काळात मनाचा संयम, शांतता, सात्विकता राखून, धैर्य धरून ठेवण्याची, नितांत आवश्यकता असते. पण याच काळात ज्यांना साधनेची सवय नसते किंवा आधीपासून साधना करत नाहीत, ते ...

भोग आणि ईश्वर ११८

भोग आणि ईश्वर  ११८   मागे आपण कल्पनानादशक्तीचा उपयोग करून नाम कसं घ्यायचं किंवा एकाग्रता कशी साधायची हे पाहिलं. कल्पने तील किंवा मनातील नामाचा नाद ऐकण्याचा अभ्यास करत करत मनाची शक्ती वाढवण्याचा हा प्रयोग आहे. त्याची थोडी उजळणी करू आणि पुढील पायरी बघूया. वैखरीत जप करताना डोळे मिटून आपला आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा.  हे जमतंय असं वाटलं की, टप्प्याटप्प्याने आवाज कमी कमी करत करत, त्याचा ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करायचा. एका विशिष्ट वेळी वा दिवशी आपला आवाज पूर्ण बंद होईल आणि जप फक्त जिव्हा हलत सुरू राहील. तो ऐकण्याचा प्रयत्न करायचा. त्या नादाला धरून, पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा.  त्यांनतर जिव्हा हलवणं बंद करून, फक्त मनात जप करायचा आणि त्याचा ध्वनी वा त्याचा  साद वा त्याची  कंपनं ऐकण्याचा प्रयत्न करायचा. या पायरीला येईपर्यंत आपण एकाग्रतेचा चांगल्याप्रकारे अभ्यास केला असेल किंवा घडला असेल. या मनात किंवा कल्पनेत घडणाऱ्या नामाचा नाद ऐकायचा प्रयत्न म्हणजे कल्पनानादशक्तीचा ध्वनी ऐकणं. आता इथे आल्यानंतर आपण शांतपणे आत अर्थात मनात व मनोमार्गे देहात जाण्याचा प्रयत्न करूया. ...

भोग आणि ईश्वर ११७

भोग आणि ईश्वर  ११७   परवाच्या आमी कालच्या विवेचनात एक लक्षात येईल की, प्रत्येक गोष्ट,घटना अगदी क्षण क्षण जे घडतं, त्यामागे, आपल्याच, मागील विचारांची प्रेरणा वा कर्मफलाची शक्ती कार्यरत असते. म्हणजेच अगदी क्षणक्षण आपण स्वतः केलेल्या कर्माने प्रेरित असतो. पण मग विचार येतो की,काळ आणि ईश्वर यांची सत्ता असते कुठे, जर माझ्या आयुष्यात घडणारं सर्व मीच ठरवतो.  इथे पुन्हा गीतेतील एका चरणाचा विचार करावा लागेल. आपल्या प्रत्येक कर्मावर आपली सत्ता आहे अर्थात सत्ता म्हणजे कर्म करण्याची वा न करण्याची मुभा. पण त्यातून निर्माण होणाऱ्या फलावर आपला अधिकार नाही. अर्थात ते फल जरी आपल्यालाच प्राप्त होऊन आपल्यालाच भोगावं लागणार असेल तरी त्या फलाचा पक्व होण्याच्या क्रियेवर आपलं नियंत्रण नाही. त्याची वेळ आपण कर्म करताना निश्चित केलेली आहे. म्हणजेच जर एखाद्याचं सहेतुक वाईट केलं, अगदी नुसती मनात तसा विचार जरी आला, तरी त्या घडलेल्या कर्माचं फल तुम्हालाच प्राप्त होणार आहे. कारण आपण काया वाचा व मन तिन्ही मार्गांनी कर्मरत असतो. पण मग ही अशी कर्म कधी पक्व होऊन फलप्राप्ती होते. याचं निश्चित कोष्टक विधातासु...

भोग आणि ईश्वर ११६

भोग आणि ईश्वर  ११६   कालच्या भागात योग म्हणजे काय आणि आयुष्यातील योग म्हणजे काय हे पाहिलं. कर्माधिष्टीत सर्व गोष्टी असल्या कारणाने प्रत्येक क्षण हा एका सुकृताला धरून, संचितातील फल घेऊन आणि त्याला जोडून पुढे जात असतो आणि पुढे नेत असतो. मग आपल्या हातात काय आहे. फक्त कर्म करणं. म्हणजेच गीतेत श्रीवासुदेवांनी हेच म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या या थोडक्यात सांगण्याचा मतितार्थ आज लक्षात येत असेल.  जर घडणारं प्रत्येक कर्म फल घेऊन येईल हे नक्की, कधी येईल ते माहीत नाही, तर मग माझ्या हाती फक्त कर्म करणं शिल्लक राहतं. त्यामुळे तेवढंच मी करणं विधात्याला, ईश्वराला व माझ्या संचिताला अपेक्षित आहे. विधात्याने प्रत्येक गोष्टीला एक ऊर्जा आणि शक्ती दिली आहे आणि ती त्या त्या गोष्टीची प्रेरक आहे वा असते.  याचाच अर्थ प्रत्येक कर्मफल हे, ती गोष्ट वा व्यक्ती वा कर्मफल पक्व झाल्यानंतर, आपल्याला प्राप्त होण्यासाठी वा आपल्याप्रत किंवा आपल्याकडे येण्यासाठी, त्या त्या गोष्टीला प्रेरित करून आपल्याकडे घेऊन येतं किंवा आपल्याला त्या वस्तू, गोष्टी वा व्यक्तीकडे घेऊन जातं.  किंवा दोन्हीकडे समान बल...

भोग आणि ईश्वर ११५

भोग आणि ईश्वर  ११५   सांसारिक तापाचा, भोगांचा परिणाम बरेच वेळा मानसिक जडणघडण होण्यात होतो.  प्रत्येकाच्या प्रारब्ध आणि संचितानुसार त्याची भोगण्याची शक्ती, त्याला प्राप्त होते.  संचितातील पुण्याई आत्मबलशक्ती जन्मतः देते आणि या जन्मातील पुण्यकर्म, साधना वा नकारात्मक कर्म हे, त्यामध्ये वाढ वा घट करतं.  आपण जर बघितलं असेल किंवा माणसं वाचण्याची कला प्राप्त असेल, किंवा बुद्धीची दारं उघडी असतील तर लक्षात येईल की,काही काही माणसं कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाहीत, हार जात नाहीत किंवा मानसिकदृष्ट्या खचून जात नाहीत. उलट अश्या परिस्थितीतील सदर व्यक्तीला, आपण जर धीर द्यायला गेलो तर, ते त्यांना आवडत नाही वा त्याची त्यांना काही गरज नसते. ही आत्मिक शक्ती मूलतः पूर्वसुकृताने प्राप्त होते. अश्या धीरोदात्त माणसांच्या, मागील जन्मांमधील पुण्याईचं फलस्वरुप, या जन्मात ही वृत्ती त्यांना जन्मतः वारसा म्हणून मिळालेली असते. अनेक जन्मांच्या पुण्य कारक कर्मांचा योग जुळून आला की अश्या व्यक्ती जन्माला येतात. म्हणजेच काही शुभकारक, सकारात्मक कर्म करत गेल्यास अशी वृत्ती प्राप्त होते आणि असे योग ज...

भोग आणि ईश्वर ११४

भोग आणि ईश्वर  ११४   कालचा विषय पुढे नेऊया.  अनुभवाने सांगतो की, जिथे आपण चुकणार वा आयुष्यात भरकटणार, पदभ्रष्ट होणार, भोगामुळे मानसिक दृष्ट्या खचणार, निश्चयापासून ढळणार, असं सद्गुरुंना वाटेल, त्यावेळी किंवा त्या त्या वेळी, ते नक्कीच आपणहून सहाय्य करायला येतीलच, त्या नवीन चालायला शिकत असलेल्या मुलाच्या पालकांप्रमाणे. पण, कोणत्याही सद्गुरूंना सतत व अवाजवी आणि विनाकारण धावा करणारे साधक कसे आवडतील. तुम्ही तुमच्या अध्यात्मिक वाटचालीत स्वकष्टाने, स्वानुभवाने आणि साधनेची पराकाष्ठा करत पुढे जात आहात, ही त्यांना सर्वात जास्त सुखावणारी गोष्ट आहे. तुमच्या सांसारिक जीवनात ईश्वर अथवा सद्गुरू कधीही ढवळाढवळ करत नाहीत, करणार नाहीत. जे भोग तुमच्या क्षमतेनुसार आहेत आणि कर्माधिष्टीत योग्य आहेत, ते भोग सहन करण्याचं सामर्थ्य सद्गुरू नेहमी देतात.  ज्या ठिकाणी आपली शारीरिक, मानसिक व आत्मिक शक्ती कमी पडते वा कमकुवत होते आणि तरीही त्या काळात आपण लढतो, सहन करतो आणि कोलमडून पडत नाही, त्यावेळी हे नक्की जाणावं की हे अधिकचं मिळालेलं बळ, हे त्यांच्याकडून व त्यांच्या प्रेरणेने प्राप्त झालेलं होतं. ...

भोग आणि ईश्वर ११३

भोग आणि ईश्वर  ११३   सर्वसामान्य जीवांना ईश्वराकडे जाण्याचा किंवा पुण्याच्याही पलीकडे पोचण्याच,  एक अत्यंत सोप्पा मार्ग म्हणजे ईश्वर स्मरण अर्थात नामस्मरण. आपण बसल्या जागी, सुरवातीला देहाने अर्थात जिव्हेने सुरवात करून, नंतर त्यात मन व बुद्धी गुंतवून, नित्य निरंतर फक्त ईश्वर नामाचे स्मरण करत जायचं. जिव्हेने सुरवात करून वैखरी अर्थात वाणीने म्हणजेच कंठाने नाम घ्यायची सवय जडवायची.  सुरवातीला हे उपचार म्हणून म्हणायला लागल्यावर, हळूहळू त्याची धार बुद्धी व मन इथपर्यंत पोचते. म्हणजे आधी जिव्हा, मग कंठ, त्याद्वारे श्वासातून, जिथे श्वास सर्वात प्रथम पोचतात त्या फुफ्फुसात, तिथून, सर्वात जास्त श्वास जिथे गरजेचा आहे त्या मेंदू आणि हृदय इथंपर्यंत, मेंदूद्वारे बुद्धीच्या पेशींना चेतवून त्याद्वारे मज्जा संस्था, मज्जासंस्थेमार्फत प्रत्येक नसेतून देहाच्या प्रत्येक स्नायूपर्यंत, हृदयातून धमन्या व रक्तवाहिन्याद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत आणि मनाच्या चक्षु, नसा वा मनाच्या  सर्व जाणिवांद्वारे संपूर्ण देह व आत्मा असा हा नामाचा प्रवास व्हावा अशी शास्त्र, वेद, ऋषीमुनी, संतमहात्मे यांचा उद...

भोग आणि ईश्वर ११२

भोग आणि ईश्वर  ११२   कालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आत्म्यावर व मनावर  वासना, माया, मोह आणि कर्मफलितांचा असलेला, जन्मानु जन्माचा पडदा, हा प्रत्येक जन्मात इतका दाट आणि गडद होत जातो की, त्यायोगे मनःचक्षूंना, वास्तव चित्र दिसत नाही. त्यामुळे जे दिसतं ते चुकीचं असतं, दिशाहीन करणारं आणि वादळात सापडलेल्या नावेप्रमाणे असतं. त्यामुळेच आपण दुःखात, भोगात, विपरीत परिस्थितीत ईश्वराला दोष देतो, नशिबाला दोष देतो आणि आपलं समाधान करून घेतो. खरतर हे आपल्याच अनेकानेक जन्मांच्या कर्माचं फलस्वरुप आहे आणि असतं. ईश्वर कधीही कोणाच्याही प्रारब्धात अकारण आणि अहेतुक ढवळाढवळ करत नाही. किंबहुना त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीच्या आणि कर्म व संचित सिद्धांताप्रमाणे तसा अधिकार, ईश्वराने स्वतः जवळ ठेवलाच नाही.  मुळ निर्गुण रुपात एकतत्वात रत व ध्यानस्थ ईश्वराला, सृष्टीतील त्रिगुणांनी, सगुणात आणलं. या सगुण साकार रुपाला प्रत्येकाने, आपल्या दृष्टिनुसार, नामाभिधानं दिली. निर्गुण निराकार तेजाला, ज्यावेळी ज्यांनी ज्यांनी आपल्या साधना तपसामर्थ्य व पुण्यकर्म या द्वारे पाहिलं, त्यावेळी त्या निर्गुण रुपाला, त्...

भोग आणि ईश्वर १११

भोग आणि ईश्वर  १११   खूपदा एक प्रश्न येतो की, नामात प्रेम येत नाही किंवा प्रेमभाव उतरत नाही, त्यासाठी काय करावं. विश्वाची निर्मिती करणारा  ईश्वर, खरतर सर्वव्यापी आणि सर्वात्मक आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव, मनःचक्षूंना आणि आत्मलोचनांना व्हावी किंवा असायला हवी. ती जाणीव छोट्या छोट्या प्रसंगातून, अनुभवांतून जागे होते, मनाला आणि आत्म्याला त्याची खूण खरतर पटते. पण संसाराच्या रगाड्यात ते विसरायला होतं.  अनेकदा ती उणीव भोगाच्या, दुःखाच्या काळात जास्त प्रकर्षाने जाणवते. त्यावेळी वाटतं की देवाचं माझ्याकडे लक्ष नाही. मला एकट्याला भोग भोगायला लावून कुठे दडी मारून बसलाय काय माहीत, असा एक सहज स्वभावीभाव उत्पन्न होतो. सहजस्वभाव यासाठी म्हटलं की, आपल्याला अश्या काळात वाटतं, संकटं माझ्या झोळीत टाकून सुख वाटायला शेजारीपाजारी गेला बहुतेक देव. मुळात देव, हा तुमच्या सर्वात समीप म्हणजे अगदी हृदयात अंतरात्म्यात नित्य विराजमान आहे. आपण त्याला जाणून, दिवसातून एकवेळातरी, त्या अंतरात्म्यातील देवाला, वंदन करण्याचा प्रघात वा प्रथा अथवा नेम सुरू केला पाहिजे. म्हणूनच, ज्यावेळी आपण अहंकार, द्वे...

भोग आणि ईश्वर ११०

भोग आणि ईश्वर  ११०   खरतर भोग भोगणाऱ्या माणसाला सल्ला देणं, म्हणजे नदीत बुडणाऱ्याला काठावर बसून वाचवण्याचा प्रयत्न आहे, असं कुठेतरी वाटत राहतं. पण अश्या काळात आणि गर्तेत अडकलेल्याना काही मार्ग सापडावा किंवा कुठेतरी, त्यांच्या भोगांचं कारण, त्यांच्याच गतजन्मांत आहे आणि ते त्यांना जाणवून, त्या जाणिवेतून काही सकारात्मक व्हावं, हा उद्देश प्रत्येक मार्गदर्शक, सद्गुरू, संत महंत व स्वतः ईश्वर या सर्वांचा असतो.  ही जाणीव जागृत होऊन, आपल्या घडलेल्या, पण ज्ञात अज्ञात असलेल्या, कर्माचं परिमार्जन करून,  त्या भोगातून आत्मपरीक्षण व्हावं, हाच उद्देश विधात्याचा आहे आणि असतो. अन्यथा मनुष्य सोडून इतर प्राणीयोनीतील जीवां प्रमाणे फक्त एक भोगयोनी निर्माण करून ईश्वर स्वस्थ बसू शकला असता. पण या सर्वाचा विचार करायला लागणारी बुद्धी मन आणि आत्म तत्वाची जाग येण्यासाठी, जाणीव नावाचं सर्वात महत्वाचं माध्यम, विधात्याने निर्माणच केलं नसतं. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करता, माणूस काय होऊ शकला असता आणि काय झाला आहे, हे आपोआप लक्षात येईल. सर्व उपकरणं, तंत्रज्ञान, लहरींवर कार्य करणारं आणि अमर्याद ...

भोग आणि ईश्वर १०९

भोग आणि ईश्वर  १०९   खरतर नाम हे ह्या जन्मासह, पुढील अनेक जन्म साध्य व सिद्ध करण्याचं अलौकिक साधन आहे. नित्य नामस्मरण करत गेल्याने मनाची व बुद्धीची स्थिरता, विचारांचा समतोल, साधला जाऊन, माणूस कोणत्याही परिस्थितीला, खंबीरपणे तोंड देऊन, त्यातून स्वतःला बाहेर काढतो. म्हणजेच नाम हे ते माध्यम वा उपकरण आहे ज्याच्या उपयोगाने आत्मरूपा तील ही देहधारी गाडी, मनाच्या चार स्थिर चाकांवर, बुद्धीच्या सुकाणूच्या सहाय्याने, सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सुरळीतपणे चालू शकते.  म्हणजेच नाम रस्त्यांची सुलभता देत नाही, पण आयुष्य कोणत्याही प्रकारच्या काळातून, मार्गावरून आणि सुखदुःख अश्या कोणत्याही कसोटीतून जात असताना मन बुद्धी व त्यायोगे देहाला त्या सर्व कसोट्यांवर घासून सिद्ध करते. नाम मुळात आपल्याला भगवंताच्या समीप नेते. भगवंत आणि आपण यात माया वास करते तिला निष्प्रभ व शक्तीहीन करते.  या कलियुगात मायेचा प्रभाव वाढवणारी व्यवधानं, प्रलोभनं, साधनं व आव्हानं ही शतपटीने वाढली आहेत वा माणसाने प्रगतीच्या वळणाने वा अडवळणाने त्यात वाढ केली आहे आणि त्यात नित्य निरंतर वाढ होत आहे. म्हणूनच मनाला मोहवणारी...

भोग आणि ईश्वर १०८

भोग आणि ईश्वर  १०८   आयुष्यात एक गोष्ट नेहमी मनाशी खूणगाठ म्हणून बांधून ठेवली पाहिजे की, कोणतीही स्थिती  स्थिर रहात नाही. सुख आणि दुःख दोन्हीही कायमस्वरूपी नाही. पण तुमच्या गतकर्माची शिल्लक, अधिक या जन्मातील कर्माची त्यात पडत असलेली भर, वजा तुम्ही भोगत असलेलं दुःख व उपभोगत असलेलं सुख, याचं जे उत्तर येईल ते म्हणजे आयुष्य. पण हे गणित प्रत्येक क्षण बदलत असतं. समीकरण व सूत्र हेच, पण मधले आकडे क्षणोक्षणी बदलत जातात.  कदाचित भोगाचा काळ हा प्रमाणाबाहेर जास्त असू शकेल किंवा असेल, तरीही सूत्र तेच राहणार. फक्त याचा अर्थ असा होतो की, गतजन्मांत किंवा या जन्मी गतकाळात, आपण असं काही कर्म वा कुकर्म केलं असणार, ज्यामुळे ते कर्मफल संपल्याशिवाय भोगांचा उतारा नाही. तोच नियम सुखाचा काळ उपभोगताना लागू होतो. म्हणून माणसाची मानसिकता आणि साधना दोन्ही काळात मनाचा समतोल राखणारी व मनाला संतोष देणारी असावी. कारण दुसऱ्यांच्या कर्माचं फल कधीही मला भोगावं लागत नाही. (या मुद्द्यावर विस्तृत विवेचन उद्याच्या भागात). भोगाच्या काळात, बरेचवेळा वा बराच काळ असं होतं की, कोणताही उपाय काम करत नाही किंवा कोण...
श्रीगणेशाय नमः पुस्तक : भोग आणि ईश्वर भाग १ बद्दल. अत्युच्च दर्जाचं अध्यात्मिक ज्ञान व गहन प्रश्नांची उकल आणि आपल्या आयुष्यातील भोग, चिंता, काळजी यांवर सहजनसोप्या भाषेत प्रकाश टाकून त्याची कारणं व परिमार्जन यावर भाष्य करणारं, मी स्वतः लिहिलेलं पुस्तक , "भोग आणि ईश्वर भाग १" म्हणून प्रकाशित होणार आहे. गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल. ज्यांना स्वतः घेऊन जाणं शक्य आहे, त्यांच्यासाठी पुणे , मुंबई (खार) , डोंबिवली व बदलापूर येथे पुस्तक उपलब्ध करून देण्यात येईल व त्यांना पोस्टेज/कुरियर खर्च आकारला जाणार नाही. पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809 वर त्याचा तपशील पाठवावा. ज्यांचे व्हाट्सऍप क्रमांक आहेत, त्यांना ही पोस...

भोग आणि ईश्वर १०७

भोग आणि ईश्वर  १०७   आपण खूपवेळा असं वाचतो किंवा म्हणतोसुद्धा की, सद्गुरू वा पुण्यात्मे हे चैतन्यशक्तीच्या रुपात वावरत असतात. मुळात याचा अर्थ समजावून घेऊ. मूळ आत्मा हा परम आत्म्या पासून अंशरूपात या ब्रह्मांडात येऊन पंचमहाभूतरुप देह धारण करून जगाच्या, संसाराच्या जंजाळात गुंतला वा ओढला जातो. जसजसे त्यावर या मर्त्यलोकातील संस्कार होत जातात, मायेचे पाश पडत जातात, विचार, विकार आणि आचार यांनी तो दूषित होत जातो, तसतशी आत्म्याची शुद्धता ही कमीकमी होत जाते. त्याच श्रेणीनुसार वा पायरीनुसार आत्मा आपली शक्ती गमावून बसतो आणि शुद्ध स्वरूपात परमात्म्याने ब्रह्मांडात घडलेला हा आत्मा शरीर, मन व बुद्धी यांच्या व्यापारातून आणि या तिघांनी केलेल्या कर्मफलाच्या साखळीत अडकत जातो व सुरू होतो जन्मजन्मांची शृंखला. हीच शुंखला जीवाला अनंत यातना, भोग, पाप व दुष्ट कर्माची फळं भोगायला भाग पाडतो. आपण या जन्मात अनंत जन्मांची फळं भोग वा उपभोग या रुपात ग्रहण करतो.  त्यामुळे मुळात सुखात व दुःखात हे लक्षात ठेवलच पाहिजे की, हे आपण आपल्याच कर्माचं फलित ग्रहण करतो आहोत. सुखात चांगल्या कर्माची फळं आणि दुःखात आपल...

भोग आणि ईश्वर १०६

भोग आणि ईश्वर  १०६   थोडंस कालच्या मुद्द्यावर. एक मत असं आलं की, गुरू करायचा नसतो, तर गुरूंनी शिष्य म्हणून तुम्हाला स्वीकारावं लागतं. यावर माझं मत मी विस्ताराने मांडतो. मुळात शास्त्रा प्रमाणे हा मुद्दा योग्य असला, तरीही काळाच्या कसोटीवर तो घासून व पडताळून पाहणं गरजेचं आहे. याचं महत्वाचं कारण असं की, धर्म आणि शास्त्र यांच्या मूळ चौकटी जरी कायमस्वरूपी असल्यातरी, काळानुरूप त्यात आवश्यक बदल होत जातात किंवा करावे लागतात. तरच धर्म प्रवाही राहून काळाच्या ओघात टिकू शकतो.  जसं युद्ध व राजनीतीमध्ये श्रीराम व श्रीकृष्ण यांनी काळा प्रमाणे अपेक्षित बदल, नीतीमध्ये आणि प्रत्यक्ष अंमल बजावणी मध्ये केले. जे त्यांच्या व्यक्तित्वातील भेददेखील स्पष्ट करतात. भगवंतानी सहावा अवतार भगवान परशुराम हा धारण करून, त्यावेळी आपला मूळ उद्देश विसरलेल्या क्षत्रियांना, दंडीत केलं. पण पुढील दोन अवतार क्षत्रिय धारण केले. कारण त्यावेळी असलेल्या राक्षस व कूट शत्रूंना भेदण्या साठी व वधण्यासाठी क्षत्रियत्व धारण करणं, ही काळाची गरज होती. आता विषयासंदर्भात बोलताना असं म्हणता येईल की, सद्गुरू करणं नाही तर, प्राप्त ...

भोग आणि ईश्वर १०५

भोग आणि ईश्वर  १०५   कालच्या चर्चेतून हे लक्षात येईल की अनेक संत, महंत, महान आत्मे, सत्पुरुष, साधू, संन्यासी, अगदी अवतारी पुरुष यांनीसुद्धा सद्गुरू चरणातूनच अध्यात्मिक अधिकार, मुक्ती, मोक्ष इत्यादी सर्व प्राप्ती केली. म्हणजेच अध्यात्मिक उन्नती, साधनेत अत्युच्च प्रगती, गती हे सर्व गुरुकृपेचे फलित आहे.  श्रीकृष्णाने मुक्ती, मोक्ष याचे मुख्य मार्ग कर्म, ज्ञान व भक्ती हे गीतेत सांगितले आहेत. अर्थात या तिन्हींमध्ये अर्पण वा समर्पण किंवा शरणागती हा सर्वश्रेष्ठ आचार सांगितला आहे. कारण काही न जमल्यास मामेकम् शरणं व्रज. म्हणजेच मला शरण ये आणि मला शरण आल्यास बाकी योगक्षेम मी वाहीन. म्हणजेच तुझा भार मी वाहीन.  अर्थातच इथे भार वाहीन म्हणजे भौतिक जगतातील नसून अध्यात्मिक, मुक्ती व मोक्ष या वाटचालीतील तुझा भार, तुझ्या अडचणी, त्यातील अडथळे हे मी पाहीन. पण शरणागती म्हणजे कुठेतरी त्या परम आत्म्याला श्रेष्ठ कल्पून चरण धरणे व शरण जाणे म्हणजे एकप्रकारे गुरुच मानणे क्रमप्राप्त आहे.  गुरुपौर्णिमा ज्यांच्या नावाने साजरी केली जाते ते महर्षी श्रीवेदव्यास यांचा एकदा विचार करू. भूमितीच्या ...

भोग आणि ईश्वर १०४

भोग आणि ईश्वर  १०४   काही जणांच्या मनात शंका असते की आम्ही गुरू केला नाही,  मग आम्ही करत असलेल्या नामस्मरणाचं काय. म्हणजे आम्ही करतो ते योग्य की अयोग्य. याबाबत काही उदाहरणं घेऊ म्हणजे विषय लक्षात येईल. माझ्या माहिती प्रमाणे,  यात तीन प्रकारचे लोक असतात. एक ज्यांनी अनुग्रह घेऊन गुरूंची त्यांच्या चैतन्यमय अस्तित्वातील समाधीवर, मस्तक ठेवून अनुग्रह घेतला असेल असे. ही पद्धत काही सद्गुरुंकडे परंपरेने चालत आलेली आहे.  दुसरा प्रकार म्हणजे ज्या सद्गुरुंच्या मठात वा आश्रमात वा गादीवर अशी पद्धत नाही, तिथे आपण स्वतःहून जायला सुरवात करून, आपल्या मनाने, त्यांना गुरुस्थानी मानलं, असे लोक. तिसरे म्हणजे ज्यांनी कोणालाही सद्गुरू न मानता, आपणहून कोणत्यातरी नामाचा स्वीकार करून, त्या नामाची साधना सुरू केली आणि भक्तिभावाने व श्रद्धेने ते, तो जाप करतात. यात साशंकता तिसऱ्या श्रेणीतील लोकांच्या मनात साहजिक असते, की आपण योग्य मार्गात आहोत का, आपली साधना योग्य आहे का, इत्यादी अनेक शंका व प्रश्न त्यांच्या मनात सतत येत असतात. त्यातील काही माझ्या मनात योजून व काही माझ्यापर्यंत आलेले प्रश्न ग...

गीत विश्लेषण : विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले

गीत विश्लेषण : विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले   रचना – संत ज्ञानेश्वर संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – लता मंगेशकर विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले । अवघेचि जालें देह ब्रह्म ॥१॥ आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें । नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥ बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला । हृदयीं नीटावला ब्रह्माकारें ॥३॥ ज्ञानोबा माऊलींचा विलक्षण आणि गहन अर्थ असलेला हा अभंग आज विचारार्थ घेतलाय. माऊलींची आर्तता, उमाळा त्यांनी मोजक्या आणि सार्थ शब्दात मांडली आहे. आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया.  माऊली म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा कलियुगातील अवतार.  माऊलींचा काळ म्हणजे ज्ञानाचा सागर काही मोजक्या हातात बद्ध होऊन कुंठित झालेला. अवघ्या विश्वाचा आधार , चेतना, प्रेरणा, शक्ती, बुद्धी, तेज, ओज जे भगवंतांनी स्वमुखे अर्जुनाला सांगितलं, ते गीतेतील अमूल्य,  विश्वात्मक ज्ञान, वेदव्यासांकरवी विश्वासाठी खुलं करून दिलेलं. कल्पना अशी होती की,हे हस्ते परहस्ते पुढे पुढे जात भोग भोगत, दुःखात, अज्ञानात आणि अज्ञानाच्या अंधःकारात पिचत असलेल्या सामान्य जनांसाठी खुलं करून दिलं जाईल आणि त्या...

भोग आणि ईश्वर १०३

भोग आणि ईश्वर  १०३   काल आपण चर्चा संपवताना जाणीव या शब्दावर  थांबलो आणि आज त्यावर चर्चा करूया. एखाद्या गोष्टीची जाण असणं म्हणजे ती गोष्ट माहीत असणं नाही. कारण माहिती,  ज्ञान ह्या बुद्धीच्या अवस्था आहेत. म्हणजे भौतिक दृष्टीने म्हणूया. पण जाण असणं म्हणजे त्या गोष्टीचं मनाला  आकलन होणं किंवा मन त्याबद्दल जागरूक होणं किंवा मनाला उमगणं. इंगजीमध्ये ज्याला knowledge आणि awareness ह्यामधील जो फरक आहे, तोच ज्ञान आणि जाणीव यात आहे.  उदाहरण घेऊ. आपल्याला नोकरी सुरू केल्यावर ज्ञात असतं की, एक ठराविक वय झालं की आपण निवृत्त होणार. परंतु त्याची जाणीव मनाला त्यावेळी होते, ज्यावेळी खरच निवृत्तीचं वय उंबरठ्यावर येऊन ठेपतं. किंवा एखादी गोष्ट आपण उद्या बघू किंवा नंतर विचार करू, म्हणून आपल्या सोयीच्या दृष्टीने लांबणीवर टाकतो. पण त्याची जाण ती वेळ येते किंवा तो क्षण जवळ येतो, त्यावेळी आपल्याला होते.  भौतिक जगातील अनेक गोष्टींबद्दलच्या जाणिवा या त्या त्या समयी जागृत होऊन, ते ते भाव, त्या त्यावेळी वा क्षणी निर्माण होऊन, मन त्याप्रमाणे देहाला कार्यरत व्हायला प्रवृत्त करतं किं...

भोग आणि ईश्वर १०१

भोग आणि ईश्वर  १०१   काल आपण मनातील भावांचं निर्गुण आणि सगुण रूप याबद्दल बोललो. हे निर्गुणातून सगुणात भावनांचं प्रकटीकरण हे एखाद्या घटनेच्या, प्रसंगाच्या, आठवणींच्या इत्यादींच्या स्पर्शाने होतं. पण आपण त्या त्या प्रत्येक गोष्टीशी एकरूप होतो वा तादात्म्य पावतो म्हणून तो भाव सगुण रूपात बाहेर येतो. पण बरेचदा आपण वेगळ्याच गडबडीत, कामात, विचारात असतो, त्यावेळी कळलेली, समजलेली वा ऐकलेली एखादी गोष्ट कोणताही परिणाम न करता निघून जाते. आठवून बघा, तुम्ही खूप त्रस्त आहात वा कुठल्यातरी विचारांचं गारुड मनावर आहे आणि अशावेळी कुणी एखादा विनोद वा चुटकुला सांगितला, तर आपण न हसता त्या व्यक्तीला म्हणतो अरे इकडे मी टेन्शनमध्ये आहे आणि तूला विनोद सुचतोय. म्हणजेच त्या भावनेची किल्ली, त्या व्यक्तीने वापरूनसुद्धा, तो भाव प्रकट झाला नाही. पण तो नव्हता असं नाही. तरीही तो अप्रकट वा निर्गुणच राहिला.  म्हणजेच ज्यावेळी मनावर एखाद्या विचारांचं वा समस्येचं किंवा इतर कोणतंही गारुड वा भार वा आच्छादन असतं, तेंव्हा इतर कोणत्याही भावनांचं प्रकटीकरण होऊ शकत नाही. आता कल्पना करा की आपण सतत स्वतःला एखाद्या चांगल...

भोग आणि ईश्वर १०२

भोग आणि ईश्वर  १०२   स्वतःच्या मनात व देहात आणि त्यायोगे आयुष्यात घडणाऱ्या अनिष्ट, अहितकारक, गोष्टी टाळण्यासाठी मनाचा समतोल साधून, मनाला एका नियमाची, सूत्राची व समत्वाची जाणीव देणारा, सवय लावणारा अत्यंत साधा व सोप्पा उपाय नामस्मरण हा मनापर्यंत व त्याद्वारे आत्म्यापर्यंत नेण्याच्या प्रयत्नातील पाच पायऱ्या आपण पाहिल्या. त्यांचा नित्य अभ्यास करून आपण काही प्रयास केले असतील असं समजून मी आज सहावी पायरी सांगणार आहे.  तुमचं नित्याचं नामस्मरण करून हा प्रयोग करायचा आहे हे आधी ध्यानात ठेवा. आता तुम्ही मूकपणे मनात जप करून तो साद वा नाद मनाने ऐकत आहात. या स्थितीला आपण आलो आहोत. परंतु ज्यांनी आधीचे भाग वाचले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा एकवार गोषवारा, अर्थात संक्षिप्त स्वरूपात. प्रथम नाम घेताना डोळे मिटून आपला वैखरीतील आवाज आपणच आपल्या कानाने ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत.  प्रयत्नाने हे जमायला लागेल. त्यानंतर आपला वैखरीतील आवाज हळूहळू पायरी पायरीने कमी कमी करत तो कमी कमी होत असताना ऐकत आहोत याचं भान ठेवायचं आहे. यानंतर वैखरीतील जप वा आवाज पूर्ण बंद करून जप मनात म्हणून त्याचा नाद ऐकण...

भोग आणि ईश्वर १०० (लेखमालेचा शतकोत्सव)

भोग आणि ईश्वर  १०० (लेखमालेचा शतकोत्सव)   आज सलग शंभर दिवस लिहिताना, इतके सर्व विचार, इतक्या सलगपणे, एखाद्या माळेत गुंफून, त्यांना लिखित स्वरूपात, तेसुद्धा सोप्प्या भाषेत व शैलीत, मांडणं, हे खरतर सद्गुरूकृपेशिवाय अशक्य अशी गोष्ट आहे. त्यासाठी प्रथम माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा, मी जन्मोजन्मी ऋणी राहीन आणि हे ऋण कधीही फिटू नयेत अशी प्रार्थना करीन. कारण त्या ऋणाच्या उपकाराच्या संचितामुळे अनेक जन्म हे पुण्यकारक कर्म हातून होत राहील. त्यानंतर मी समस्त वाचकवर्गाचे आभार मानतो. मला ज्ञात आहे त्याप्रमाणे, अनेक ज्ञात व अज्ञात ग्रुप्सवर ही लेखमाला फिरत आहे.  मला येणाऱ्या फोनकॉल्स व प्राप्त संदेशांवरून हे लक्षात येतं, की अनेकांना ही मालिका पुस्तकरूपाने हवी आहे. म्हणूनच प्रथम किडल/अमेझॉन वर ई पुस्तकरूपात, भाग १ म्हणून, ती उपलब्ध करून देण्यात आली आणि आता लवकरच छापील स्वरूपात ती उपलब्ध होईल. अनेकांनी नाव  नोंदणी केली आहे,त्यांच्याशी लवकरच संपर्क साधला जाईल. लवकरच त्यासाठीचं बुकिंग पेमेंट स्वीकारायला सुरवात करीन आणि गूगल पे, पेटीएम, बँक ट्रान्सफर इत्यादी सर्...