Skip to main content

भोग आणि ईश्वर ५६

भोग आणि ईश्वर  ५६
   
ईश्वरी कृपेची प्राप्ती करण्यासाठी आणि त्याची जाणीव जागृत करण्यासाठी, काय काय करावं हे पाहूया. या लहरीस्वरूपात असलेल्या कृपेची प्राप्ती, हा म्हटलं तर सोप्पा म्हटलं तर अवघड प्रश्न आहे. मुळात या लहरी, अर्थात सिग्नल्स अखंड, अनंतात विहरत असतात. कारण क्षीरसागरी शेषशायी असलेल्या भगवान श्रीविष्णुचं पूर्ण लक्ष, समाधी व ध्यानअवस्थेत सुद्धा अखिल ब्रह्मांडाच्या, चरचरातील प्रत्येक कणाकणावर असतं, यात कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही.

त्यामुळे, त्यांच्या हृदयातून पाझरणाऱ्या प्रेमलहरी, नादमय व ब्रह्ममय अवस्थेत, निरंतन, जगताच्या, प्रत्येक प्राणीमात्रा पर्यंत, येतच असतात. त्या आपल्याला जाणवत नाहीत, कारण आपण त्यासाठी तयार नसतो. मुळात हा देह एक यंत्रस्वरूप आहे, जो स्वयंपूर्ण स्वयं चलित यंत्रमानवासमान आहे. जे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही लहरी आणि तरंग यांसाठी पुरेसं सक्षम आहे आणि कालातीत आहे. 

एक कल्पना करा की घरात एक यंत्र आहे, पण आपल्याला त्याची कळ अर्थात बटण आणि त्याला चालवण्याचं तंत्र व वापरण्याची पद्धत त्याचप्रमाणे,  नीट ठेवण्याची पद्धत माहित नाही. ती फक्त काही तज्ञ लोकांना अवगत आहे. त्यांनी त्यासाठीचं प्रशिक्षण घेतलं आहे. अश्या परिस्थितीत आपण त्याचा काहीच वापर करू शकणार नाही. इथे एक किस्सा अर्थात विनोदी किस्सा आठवला.  एका खेड्यातील घरात शितकपाट अर्थात फ्रीज आला. पण त्याचं तंत्र व त्याचा उपयोग माहीत नसल्यामुळे घरातल्या लोकांनी त्याचा उपयोग सरळपणे कोठी अथवा साधं कपाट म्हणून केला. 

आपलं तसं झालं आहे. मुळात ह्या शरीराला ईश्वरी लहरींना प्राप्त करून घेण्याची पद्धती माहीत नाही. ज्यांना ती माहीत आहे वा होती, त्यांनी ती शास्त्रीय परिभाषेत वेद, पुराण, शास्त्र यात नोंदवून ठेवली. ती योगयाग, आयुर्वेद, पूजाविधी, प्रार्थना, ध्यान धारणा, नवविधा भक्ती इत्यादी अनेक मार्गांनी आपण आचरून त्या लहरींना प्राप्त करून त्याचा सदुपयोग आपल्या जीवनाच्या उत्कर्षासाठी व आध्यात्मिक प्रगतीसाठी करून घेऊ शकतो.  

म्हणजेच हा देह ज्याकारणांसाठी ईश्वराने घडवला आहे त्या यंत्ररूप देहाच्या यंत्राचं तंत्र जाणून आपण त्याला, ईश्वर कृपेच्या अनंत व अखंड येणाऱ्या लहरींसाठी सिद्ध करू शकतो. एखाद्या रेडिओ वा टीव्ही अथवा मोबाईल सारखंच लहरी अर्थात सिग्नल प्राप्तीची व्यवस्था या देहात आहे. पण अज्ञातात ते ज्ञान आहे अशातला भाग नाही, पण आपण त्यासाठी शरीराला तयार केलं नाही. 

या प्राप्तीसाठीचे बरेचसे उपाय हे तांत्रिक प्रशिक्षण यासारखे आहे. जसं कारखान्यातील यंत्रव्यवस्था सुसूत्रपणे चालवून उत्पादन प्राप्तीसाठी प्रशिक्षित व्यवस्था लागते, तशीच यातील बऱ्याच उपायांची अवस्था आहे. मग यावर उपाय काय, हे पुढील भागात पाहूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...