Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४

भोग आणि ईश्वर  ३४
   
आतापर्यंत केलेल्या विवेचनात आपल्याला काही गोष्टी कळल्या असतील, काही वळायला लागल्या असतील. तरी काही हळू हळू पचनी पडतील. मुळात या जगात आपलं येणं हे दोन कारणांसाठी आहे, हे आधी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला जन्मतः प्राप्त झालेल्या संचितातील भाग भोगून वा उपभोगून संपवण्यासाठी आणि त्याचबरोबर पुढील कर्मफल योग्य व्हावे याची तजवीज आता करावी यासाठी. 

मुळात आपण यात जो गोंधळ करतो तो ध्यानात घेतला पाहिजे. आपण आज जे चांगलं कर्म करतो त्याची आणि आज जे भोग भोगतो त्यांना एकत्र करून समीकरण मांडण्याचा प्रयत्न करतो वा मांडतो. गडबड तिथेच होते. साधं उदाहरण देतो.तुमचं आधीचं कर्ज बाकी आहे, ते भरत असताना सध्याच्या गरजा कमी करून ते फेडावं लागेल. त्यामुळे आताची मिळकत जास्त असूनसुद्धा ती पुरणार नाही किंवा पुरली तर हाती काही उरणार नाही.

अश्या वेळी आपण सध्याच्या मिळकतीला दोष देऊ का. तर नाही देणार. मग आपण तो दोष आधीच्या शिल्लक कर्जाला देऊ आणि ते फेडू न शकलेल्या स्वतःला. यावर व्यवहारात एकच उपाय सध्याची मिळकत वाढवून आधीचं कर्ज फेडून टाकणं. म्हणजे मिळकतीवरील तो भार दूर करणं. पण हे करत असताना नवीन कर्ज होणार नाही याची दक्षता घेणं.

जे व्यवहारात शक्य आहे ते पारमार्थिक जीवनात शक्य आहे का. तर हो शक्य आहे. प्रथम संचितातील भोग आणि माझं आजचं सदवर्तन यांचा गोंधळ बंद करणं. तदनंतर आधीच्या कर्मभोगांना मिटवून नवीन कर्मभोग तयार होणार नाहीत यासाठी उपाय करणं. तोच उपाय म्हणजे मन पुढील वाटचालीवर स्थिर करून हे मर्म मनात पक्के करणं की, मी आजपासून जे करतोय त्याने माझं पुढील प्रारब्ध हळूहळू सुधारेल पण तोपर्यंत जे भोग येतील ते मला सहन करुनच पुढे जाणं गरजेचं आहे. कारण एका क्षणात काही बदल संभवेल हे शक्य नाही. 

एक उदाहरण देतो, एखाद्या कोरड्या वा नवीन बांधलेल्या भिंतीवर पाणी मारताना सुरवातीला पाणी प्रत्येक वीट अन वीट शोषून घेते. त्यानंतर मग ते पाणी इतर कोरड्या भागाकडे प्रसारित करते. आपण आज सुरू केलेलं वा आजपर्यंत केलेलं नामस्मरण वा साधन हे त्या कोरड्या भिंतीवर मारत असलेल्या पाण्यासम आहे. ती कोरडी भिंत म्हणजे संचित. ते संचित संपायला  वा भिंत भिजायला लागणारं पाणी हे जास्त असेल, म्हणजेच नामाचा जोर हा कायम ठेवून हळूहळू वाढवावा लागेल. 

तो किती व कितीकालपर्यंत हे तुमचे सद्गुरू ठरवतील. गुरुकृपा व गुरुमहिमा ही अशी गुरुकिल्ली आहे की जी, या भिंतीवर मारत असलेल्या पाण्याच्या नळाप्रमाणे आहे. त्याचा प्रवाह जितका जास्त तितकी भिंत लवकर भिजेल. म्हणजेच गुरुकृपा जितकी लवकर तितका प्रारब्धाचा जमाखर्च लवकर भरून निघेल. 

विचार करा.  पुढील भागात बघूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...