Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५

भोग आणि ईश्वर  ४५
  
प्रत्येक जन्मात कर्माचा तोल सांभाळत फार भोग अर्जित न करता, आत्मा उन्नत्ती करत करत पुढील प्रत्येक जन्मात सुधारत, एक एक पायरी चढत पुढे जातो. यात काही चूक झाली वा प्रमाद झाला तर पुन्हा आत्म्याची अवन्नत्ती होऊन पुन्हा आत्मा काही पायऱ्या मागे जातो. पुन्हा नवीन जन्मात झालेल्या चुका वा घडलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त केल्या शिवाय पुढे जाता येत नाही. अश्या प्रकारे अवन्नत्ती होऊन मागे आलेल्या देहधारी आत्म्यांना योगभ्रष्ट जीव म्हणतात.

अश्या जीवांचा जन्म फक्त भोग भोगून आपल्या घडलेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाण्यासाठीच असतो. आपण खूपदा अशी कुटुंब वा व्यक्ती बघतो, जी आयुष्यभर फक्त सहन करण्यासाठीच जन्माला आलेली असतात. त्यांना कितीही सहन करावं लागलं, तरी ते तक्रार करत नाहीत वा कुणालाही उणंदुणं बोलणार नाहीत, मुकाट्याने सर्व भोग, जाच, त्रास सहन करून आयुष्य जगतात. बरेचदा त्यांचे हाल, कष्ट, काळज्या, भोग बघून आपल्यालालाच वाईट वाटतं. प्रसंगी आपणच त्याबद्दल हळहळ, राग, चिंता व्यक्त करतो. 

त्यांना अनेक बाबतीत अपयश येतं, अनेक अडचणींनी त्याची कामं होतात, एका खेपेत कोणतही काम होत नाही, यांच्याकडून अनेकांना पैसे उसने दिले जातात, त्यातील कित्येक येणी बुडतात आणि आपणच यांना समजावून पाहतो, पण हे कधी त्यापासून बोध घेताना दिसत नाहीत. व्यवहारात आणि व्यवहाराच्या दृष्टीने ही मंडळी शून्य असतात, जगाच्या व्यापात ही मंडळी कायम मागे असतात, कोणत्याही वाईट गोष्टीचा हिशोब ही मंडळी ठेवताना दिसत नाहीत आणि यांना फसवलेल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल यांना जराही राग, आकस वा तत्सम कोणतीही नकारात्मक भाव नसतात. 

परंतु अश्या व्यक्तीचं मुख पाहिलं की इतरांचं काम होतं, इतरांना लाभ होतो, इतरांची तुंबलेली व थकलेली कामं होतात. इतरांना यांच्या असण्यानेसुद्धा फायदा होतो आणि याबाबतीतही ही लोकं वापरून घेतली जातात. आत्म्याच्या प्रवासातील हा यांचा फक्त आणि फक्त भोगून संपवण्याचा जन्म असतो. अशी माणसं जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना जरूर मदत करावी, त्यातून आपलाच फायदा होऊ शकतो. 

कारण या जन्मी ही लोकं ऋण फेडण्यासाठी जन्माला आलेली असतात. सहनशीलतेची परमोच्च शक्ती यांच्या गतजन्मापर्यंतच्या पुण्याईमुळे यांच्या मुदलात प्राप्त झालेली असते. तक्रार न करता, जे येईल त्याला, सामोरे जात आयुष्य जगणं, हेच यांना माहीत असतं. तुम्ही त्यांना कितीही समजावलं, तरी या सर्व जगाच्या वा इतरांच्या त्यांना मिळणाऱ्या वागणुकीचं त्यांना फारसं काही वाटत नाही. सोयर, सुतक, सुखदुःख, राग लोभ, चिंता काळज्या या सर्वांच्या पलीकडे गेलेली ही मंडळी एकप्रकारे जगण्याचा वेगळाच आदर्श खरतर घालून देतात. 

परंतु प्रसिद्धीची कोणतीही हौस त्यांना स्पर्शत नाही. खूप वेळा अश्या माणसांना अव्यवहारी म्हणून हिणवलं जातं. तरीही जगात अनेक टक्केटोणपे खाल्लेले हे, अनेक बाबतीत निर्विकार, निरिच्छ, निरागस व निस्पृह असतात. यांना फक्त दुसऱ्यासाठी करणं आणि आपल्याकडे येईल ते सहन करणं इतकंच माहीत असतं. त्यांच्या आत्म्याची उन्नत्ती, इतर सर्व गोष्टींबाबत उच्च असल्यामुळे, जगातील कोणत्याच मोह व मायेचं कौतुक यांना नसतं आणि दुःखाने डगमगून जाण्याइतके कमकुवतसुद्धा हे नसतात. 

जगातील कोणत्याही परिस्थितीत स्थिर बुद्धी राहून जगाला कोणताही फारसा त्रास न देता परंतु होता होईल तितकी सर्वांना मदत करणं इतकंच यांच्या लेखी विधात्याने लिहिलेलं असतं, अर्थात यांच्याच एखाद्या कर्माचा भोग, त्यांना हे सर्व करायला भाग पाडतो. परंतु यांची मागील पुण्याई त्यांना हे सर्व सहजी करायला मदत करते. 

म्हणूनच असे पुण्यात्मे आपल्या आजूबाजूला जवळपास वा नात्यात असतील तर त्यांना प्रणाम जरूर करा,कारण या जन्मानंतर त्यांची उन्नत्ती होऊन उच्च अवस्था प्राप्त करून घेण्याइतकी पुण्याई जोडूनच हे पुढील प्रवासासाठी जातात. 
अश्या सर्वांना माझा नमस्कार. 

हा विषय अजून खोलात जाऊन बघूया पुढील भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...