Skip to main content

भोग आणि ईश्वर ४३

भोग आणि ईश्वर  ४३
 
खरतर भोग आणि ईश्वर या शिर्षकाचा धागा गीतेत सापडतो. या शिर्षका मागील संदर्भ आणि त्याचा अर्थ जरा जाणून घेऊ. भोग हे आपल्या पूर्वकर्माची फलरूप प्राप्ती आहे हे आता नक्की ठसलं असेल. यात मुख्यतः भोग म्हटलं तरी सुखोपभोग हे देखील यात आले. म्हणजे यातून एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे ज्याप्रमाणे भोग अथवा दुःख हे पूर्वसुकृत व पूर्वसंचित यांचा परिणाम आहेत, त्याचप्रमाणे सुख वा आनंद हे देखील आपल्याच पूर्वकर्मानुसार प्राप्त होते.

म्हणजेच दोन्ही आपल्याच कर्मफलानुसार योग्य वेळी समोर येतं. ते समोर येतं, त्यावेळी आपण त्यात हरवून जातो. विशेषतः आनंद वा सुख उपभोगताना आपण त्यात हरवून जातो. हे भोग वा दुःखाच्या काळाविरुद्ध असतं. यात मुख्यतः कारण मानसिक असतं. मनाला वाटतं, सतत आनंदी सुखी असावं असं वाटतं. दुःख भोग हे त्या मानसिकतेत व्यत्यय आणतात. व्यथा, चिंता, क्लेश, काळज्या या आपल्याला आनंदी मानसिकतेतून बाहेर आणून वास्तवात आणतात.

म्हणून आपल्याला तो काळ येऊच नये वा आल्यास लवकर जावा असच वाटतं. अर्थात दुःख हे अपरिहार्यतेने वा नाईलाजाने माणूस स्वीकारून पुढे जातो, ते दिवस कसेतरी ढकलून. यात मुख्यतः दुःख हे वियोगाचं, नुकसानीचं, अनिष्ट संबंधांचं आणि त्यामुळे येणाऱ्या विवंचना यांचं असतं, अर्थातच प्रापंचिक समस्यांमधून येणारं. या तीन प्रकारात बहुतेक सर्व समस्या, व्यथा, काळज्या येतात. यातील काही प्रत्यक्ष परिणामस्वरूप असतात, दिसतात वा समजतात. जसं नुकसान होणं हे बहुदा चुकीच्या निर्णयावर वा अनपेक्षित घडणाऱ्या नकारात्मक घटनांवर अवलंबून असतं. ज्या सकृतदर्शनी आपल्या नियंत्रणाच्या व नियोजनाच्या बाहेरच्या वाटू शकतात.

परंतु सूक्ष्म विचार केला तर, लक्षात येतं की, काही निर्णय हे सेमारेषेवरील निर्णय असतात. ज्यात असं म्हटलं जातं की, धोका असतोच. तो पत्करून पुढे गेल्यास दोन मार्ग असतात नफा वा नुकसान. दोन्हीसाठी,  खरतर, निर्णय घेताना जोखीम ही असतेच. अश्यावेळी आपण घेतलेला निर्णय हा प्राप्त परिस्थितीनुसार व प्राप्त माहितीनुसार असला तरी घेतलेला निर्णय हा आपला असतो व त्यानुसार केलेली कृतीसुद्धा . पण त्यापुढील परिस्थिती व घटना या आपल्या नियंत्रणात नसतात. 

तरीही खूप वेळा निर्णय हे योग्य होतात वा होत जातात. याचं खूप महत्वाचं कारण हे दृढ इच्छाशक्ती. जी बरेच वेळा अनियंत्रित घटनांना नियंत्रित करून योग्य परिणाम घडवून आणते. यात सकारात्मक मानसिकता आणि त्यानुसार केलेली कृती योग्य परिणाम घडवून आणू शकते. मागे म्हटलं त्याप्रमाणे इच्छाशक्ती ही एक ऊर्जा आहे आणि कोणतीही ऊर्जा ही बाह्य व अंतर्गत तरंगांना सुनियंत्रीत करू शकते.

अर्थात त्यात कर्म, प्रयत्न व चिकाटी यांचं महत्व कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. पण बरेचदा कर्म, कष्ट घेऊनही इच्छित प्राप्ती होत नाही. यात कुठेतरी दृढ इच्छाशक्तीची कमतरता थोड्याफार प्रमाणात असू शकते. इच्छाशक्ती ही चेतनाशक्तीला आणि चेतनाशक्ती ही कर्माच्या पुर्ततेला मदत करते. 

चैतन्यशक्ती ही आपल्या अंतरात वसलेली चेतना जी अमानवी वा ईश्वरी असून ती एखाद्या अणू वा परमाणूसम आहे, ज्याची तुलना विश्वातल्या उर्जेशी करता येऊ शकते. 

आपल्यात वसलेली चैतन्यशक्ती व परमचैतन्यशक्ती बघूया पुढील भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...