Skip to main content

भोग आणि ईश्वर ५०

भोग आणि ईश्वर  ५०
  
ज्ञानाचा विचार करताना मुख्यतः खर ज्ञान हे जीवनाचं, ते जगण्याचं, जीवनातील अनेक गुंते सोडवण्याचं, त्याला यथार्थ आकार देण्याचं, या जगात आपल्या येण्याचा आणि इथून यशस्वीपणे पुढील पायरीवर जात जात प्रगती करत करत अंतिम पदावर जाण्याचा मार्ग दाखवणारे आणि नुसता मार्गच न दाखवता त्यावर चालण्याची इच्छा, क्षमता आणि त्याची सिद्धता देणारे ज्ञान हे खरे ज्ञान.

ज्या ज्ञानाच्या प्राप्तीनंतर काहीही प्राप्त करण्यासारखे उरत नाही, अर्थात ज्यामुळे सर्व काही प्राप्त झाल्याचा आनंद व समाधान मिळते, त्याला वेद पुराण, उपनिषद, शास्त्रं यांनी परम ईश्वरी ज्ञान म्हणून संबोधले आहे. जे ज्ञान मुक्ती व मोक्षप्राप्ती साध्य करण्यासाठीची पायरी तयार करून देते ते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान होय. परमार्थ किंवा पारमार्थिक ज्ञान हे भौतिक जगातील ज्ञानाच्या पलीकडे नेणारं व जगण्याचा खरा व यथोचित अर्थ प्राप्त करून देणारं आहे. 

या ज्ञानाच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. ते प्राप्त करणारा, ज्यावेळी सर्व जगत, परम ईश्वर, यांचा संबंध, माया, मायेचे खेळ या सर्वांना जाणतो, त्यावेळी, तो या सर्वातून अलिप्त होऊन, एका तटस्थ व त्रयस्थ नजरेने, या सर्वांकडे पाहतो. ब्रम्ह सत्य आणि जगत मिथ्या ही एक धारणा मायेच्या पाशातून मुक्त होण्यासाठी ज्ञानी माणूस मनात धरतो. 

याच धारणेच्या अधीन राहून, सर्व जगत हे मायकार समजून, त्यातून पूर्ण उदास होऊन, तो ईश्वराला पाहतो आणि ते एकच अंतिम सत्य ग्राह्य धरून, पूर्ण निर्विकार अवस्थेला प्राप्त होतो. या अवस्थेप्रत गेलेला ज्ञानी माणूस जगात सर्वत्र मायारुप ब्रम्ह पाहून, मायारहीत परब्रम्ह परम ईश्वर या एकमेव सत्याचा स्वीकार करतो. यातून स्वाभाविक उदासीनता प्राप्त होते. एकच ध्येय आणि त्या एकाच ध्येयाची प्राप्ती हे एकच जीवनकार्य त्याच्यासाठी उरते. 

परंतु असं उदासीनता देणारं ज्ञान खूप वेळा एक प्रकारचा अहं निर्माण वा जागृत करतं. कारण असा ज्ञानी मनुष्य, तुच्छ जीवनात सुख, दुःख, प्रेम लोभ, मोह माया यात अडकलेले मनुष्यादी प्राणी आणि आपण स्वतः यात एक भेद बघायला लागतो. अर्थात ज्ञानप्राप्तीनन्तर येणारी विनम्रता लोप पावून तिची जागा अहं वा अहंकार घेण्याची शक्यता असते. कारण ज्ञान प्राप्त होऊन जगाप्रती उदासीन झालेला मी, हा, जग आणि मी यात भिन्नता मानून स्व वाढवतो. ज्याची परिणती अहं बळकट होण्यात होऊ शकते.

इथे ज्ञानी मनुष्य ईश्वरप्राप्ती हे  ध्येय विसरून ज्ञानप्राप्ती हेच अंतिम ध्येय मानून मोकळा होतो. किंबहुना ज्ञानप्राप्ती हेच आपलं ध्येय होतं आणि आता ते साध्य झाल्यामुळे ईश्वरप्राप्ती ही वेगळी प्राप्त करून घेण्याची गरज नाही. मला अंतिम गुह्य ज्ञान प्राप्त झालंय आणि आता माझं जीवन इप्सित साध्य व सिद्ध झालंय ,या धारणेच्या आहारी जाऊन कर्म फल भोग भाग्य हे सामान्य अथवा विचार न करण्या सारखं समजू लागण्याची शक्यता असते. 

हीच ज्ञानी माणसाच्या अधोगतीची पायरी वा सुरवात असते. किंबहुना हा धोका जाणूनच सर्व ज्ञानप्राप्त उद्धवाला, श्रीकृष्ण, तू ज्ञान मिळवूनसुद्धा किती रिता वा रिक्त आहेस हे अनुभवण्यासाठीच, गोकुळात, गौळणीना तेच ज्ञान देण्यासाठी पाठवतो. त्या यात्रेला व ज्ञानाच्या गर्वात प्रत्यक्ष श्रीकृष्णाला ज्ञानोपदेश देणारा उद्धव आणि यात्रेनंतर परत येऊन श्रीकृष्ण चरणरज प्राप्त करण्यासाठी आतुर उद्धव यातील बदल म्हणजे ज्ञानप्राप्तीचा अहंकार आणि सर्वसमर्पण भावाने केलेली प्रेमभक्ती यातील भेद यांचं उदाहरण. 

त्या यात्रेची परिणती म्हणजे उद्धवाला ज्ञान, ज्ञानयुक्त अहंकार, ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञान हा एक टप्पा वा एक मार्ग आहे, पण ते ज्ञानप्राप्ती म्हणजे ईश्वर नाही हे आणि अप्राप्य अशी हेतूरहीत, निर्लेप, निष्काम  भक्ती, प्रेम यांचा झालेला साक्षात्कार  आणि जीवनातील तापत्रय अनुभवत असताना, त्यांच्या मायेपासून प्रभावहीन राहून, फक्त ईश्वरावर प्रेम करण्याची सगुणात्मक निर्गुणता कशी जपावी, वाढवावी आणि फक्त ईश्वराच्या चिरंतन रुपाला वाहून, काहीही प्राप्त न करता, फक्त भक्ती कशी करावी, याचं जिवंत उदाहरण पाहायला व अनुभवायला मिळालं.

यावर  विचार करूया उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...