Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६

भोग आणि ईश्वर  ३६
 
भगवान श्रीविष्णूंच्या कल्पनेतून विश्वाची निर्मिती झाली आणि त्यांच्या हुंकारातून माया निर्माण झाली.   जगताला व्यापून उरलेली आहे ती माया. माया म्हणजे काय तर जगतावर व जगतातील प्राणीमात्रांवर  आपल्या पाशाने प्रभुत्व गाजवते ती माया. 

माया जे नाही ते दाखवून , भासवून संभ्रम निर्माण करून बुद्धीभ्रंश घडवते. माया ही मोह निर्माण करते. सर्व अनिष्ट, नकारात्मक, गोष्टी मायेच्या आधीन आहेतच पण सकारात्मक चित्ररूप निर्माण करून, प्रसंगी त्यांचा वापरसुद्धा माया, जगताला संभ्रमित करण्यासाठी करते. 

मायेला निश्चित आकार नाही. ती एक शक्ती आहे. ती स्वयंस्फूर्त असली तरी भगवंताच्या अधीन आहे आणि भगवंताच्या अधीन राहून ती आपला कार्यभाग साधते. अनेकवेळा कानांनी ऐकलेलं आणि डोळ्यांनी पाहिलेलंसुद्धा प्रसंगी खोटं असू शकतं हे आपण प्रत्यक्षातसुद्धा पाहतो. परंतु काही काळ संभ्रम निर्माण होतो, बुद्धीला टाळं लागतं. पण हे सर्व आपल्या हातूनच घडतं. आपण स्वतः विचार करतो की, मी असा कसा वागलो त्यावेळी, किंवा माझी बुद्धी गहाण कशी पडली कळत नाही. 
 
मायेला स्थळ काळ यापैकी कशाचंही बंधन नाही. प्रत्येक प्राणिमात्रांच्या ठायी राहून त्याला मार्गभ्रष्ट, पथभ्रष्ट करून जन्मजन्मांतरीच्या बंधनात अडकवून माया मृत्यूसमयी पसार होते.  पुन्हा जीव देहात बद्ध झाला की मायेचं कार्य सुरू होतं. 
जीवाला जगात गुंतवून ठेवणं आणि भौतिक जगताच्या बाहेर न पडू देणं हे कार्य माया अनिर्बंधपणे करत असते. 

बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की, जग निर्माण करताना माया निर्माण का केली. याचं उत्तर देण्यासाठी एक उदाहरण घेऊ. शाळा महाविद्यालयात शिकवल्यानंतर परीक्षा का घेतली जाते. फक्त खेळ खेळून किंवा शिकवून पुढे ढकलून द्यायला हरकत काय. मग याचं उत्तर दोन तीन प्रकारे देता येईल.

पहिली गोष्ट हे जगत भगवंताच्या इच्छेनुसार निर्माण झालं आणि माया हा त्यांच्या इच्छेचाच भाग आहे. आपल्याला मान्य असो वा नसो, पण जगताच्या पसाऱ्यात व व्यवहारात टिकून राहण्यासाठी आपण शिकतो, परीक्षा देतो पुढे त्या जोरावर नोकरी व्यवसाय करतो, मान्य असो वा नसो. म्हणजे जो योग्य आहे जो हुशार आहे, जो नियमाने नेटाने अभ्यास करेल, जो जगताच्या पसाऱ्यात न अडकता पुढे जात राहील, लौकिकार्थाने व व्यवहाराने तो पुढे जाईल. एवढ्या सर्व गोष्टी परीक्षा या प्रकारावर अवलंबून आहे.

जगत निर्माण केल्यानंतर भगवंतानी माया , पाश, मोह, लोभ, आदि परीक्षेच्या पायऱ्या वा फेऱ्या निर्माण केल्या. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार, बुद्धिनुसार, कुवतीनुसार, तयारीनुसार यातून जावं लागतं. जो आपल्या कर्म ज्ञान व भक्ती यांच्याद्वारे यातून पुढे जातो तो परीक्षेच्या एक एक फेरीतून पुढे जातो आणि अंती ईश्वराला प्राप्त करतो. 

जर व्यवहारात परीक्षा नसतील तर कोणीही शिकणारच नाही असं नाही पण अनेक गोष्टी बिघडून जातील. जगण्याची लय राहणार नाही. कारण काहीच मिळवायचं नाही तर काही गमावण्याचा प्रश्नच येणार नाही. शाश्वत अशाश्वत , संदेह निःसंदेह, चांगलं वाईट, बल बलहीन काहीच उरणार नाही. 
माणसाला लागणारी, शारीरिक, मानसिक, षड्रिपुंची भूक हा त्या मायेचाच भाग आहे. जर भूकच नसती तर माणूस जगण्याच्या फंदात व  धंद्यात पडला नसता.  कदाचित माणूस अजूनही जंगलातच राहिला असता. 

पण हे सर्व सुरू आहे, जगाचं रहाटगाडगं सुरू आहे ते निव्वळ जगत आणि जगतावर राज्य करणारी माया निर्माण झाली म्हणून. माया ही गोलाकार आहे. त्यामुळे तिची कधीही एकच बाजू आपल्याला दिसते, जी मुख्यतः नकारात्मक असू शकते. पण माया सर्व जगत चालवते. 

माया नसती तर कृष्ण भगवान कारागृहातून सुखरूप गोकुळी गेले नसते आणि पुढील महाभारत घडलं नसतं. पण माया भगवंता आधीन असल्यामुळे या इथे भगवंतांना सहाय्यार्थ अर्थात जगतकल्याणार्थ माया उपयोगाला आली. 

 पुढील भागात बघूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...