Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २६

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २६

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | 
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | 
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

आत्म्याच्या अनुभूतीद्वारे स्व-रूपाचा विकास होऊन, विकारांचं उच्चाटन झाल्यानन्तर तो मनुष्य बौद्धिक विकास साधेल. हे जितक्या कमी वयात घडेल तितकी मारुतीस्तोत्रा द्वारे शरीर, बुद्धी  यांची कार्यक्षमता वाढून प्रबळ व शुद्ध मनाची अनुभूती झाल्यावर आत्म्याची उन्नती साधता येईल. जीवन कृतकृत्य होईल. त्यानंतर असा जीव बौद्धिक विकासाद्वारे उत्तम विद्या प्राप्त करून धनधान्य, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त करेल. 

पशुधन वाढीस लागेल, पुत्र पौत्र यांचाही उद्धार त्याद्वारे साधता येईल. समग्रही मध्ये इतर सर्व विकास असा अर्थ समर्थांना अभिप्रेत आहे. इतर सर्व म्हणजे आर्थिक, सामाजिक इत्यादी. यासाठी खूप लहान वयात मुलांना या स्तोत्राच्या पठणाची सवय लावणं गरजेचं आहे. कारण जे लाभ या स्तोत्राद्वारे अपेक्षित आहेत, ते आध्यात्मिक नसून, शास्त्रीय, वैज्ञानिक स्वरूपाचे पठणाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीमुळे होणारे लाभ आहेत. 

या स्तोत्राच्या नित्य पठणातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास व त्याद्वारे सुलभता आणि सुबत्ता देखील येईल अशी फलश्रुती समर्थांनी व्यक्त केली आहे. पण त्यापलीकडे जाऊन समर्थ सांगतात की या स्तोत्ररूपात महारुद्र मारुतीच्या नित्य दर्शनाने भूतप्रेत समंध इत्यादी विकार वा बाधा होत नाही. इथे या बाधांची थोडी ओळख करून घेऊ. 

मुळात या गोष्टी वस्तुतः मानसिक स्वरूपात असतात आणि त्यांचा संबंध हा मन व आत्मा यांच्याशी जास्त असतो. मारुतीस्तोत्र माणसाला निर्भीड, निर्भय बनवत असल्यामुळे, मनाने कणखर करत असल्यामुळे अश्या मनुष्याला इतर कोणत्याही प्रकारचे, मन कमजोर करणारे विचार येत नाहीत. कारण अश्या बाधा कमजोर मनात घर करतात. यात प्रत्यक्ष की काल्पनिक हा तात्विक वाद बाजूला ठेवला तरीही मनाचा कमकुवतपणा हा मुख्य आधार असतो अश्या सर्व बाधेला. 

पण मारुतीस्तोत्र पठण कणखर मनाची माणसं घडवत असल्यामुळे या मानसिक बाधांची भीती राहणार नाही असा सार्थ विश्वास समर्थ व्यक्त करतात. त्याचबरोबर सुदृढ शरीराला कोणत्याही रोगाची बाधा देखील रहात नाही. कोणताही रोग व्याधी यांचं देखील भय कणखर मन व सुदृढ शरीर यांना रहात नाही. 

सशक्त मनाला चिंता या त्रास देत नाहीत. कारण शांत व सशक्त मनाची माणसं समस्येतून योग्य विचारांती मार्ग काढून समस्येचं निराकरण करतात. नासती म्हणजे नष्ट होतात, पण योग्य उपाययोजना केल्याने आणि तुटती म्हणजे अडवल्या जातात. अर्थात काही धोके आधीच बुद्धीच्याद्वारे ज्ञात होऊन काही चिंता, समस्या  निर्माण होण्याआधी संपवता येतात, योग्य वेळी उपाययोजना करून. 

यासर्वांसाठी स्तोत्ररूपातील मारुतीचं नित्य पठणरूप दर्शन करत राहणे गरजेचं आहे हे देखील समर्थ सांगायला विसरत नाहीत. हे सर्व मनापासून, आनंदाने कोणत्याही दडपणाशिवाय प्रसन्न मनाने करणे गरजेचं आहे. आनंदे भीमदर्शने म्हणजे प्रसन्न मनाने या स्तोत्राचं पठण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. ही मनाची प्रसन्नता व आत्म्याचा आनंद नित्य पठणाच्या वेळी माणसाला आवश्यक आहे व पठण करत गेल्याने साधता येतो. भीमरूप हनुमंत हा त्याच्या नित्य स्तुतीने साधकाला इप्सितापर्यंत घेऊन जाईल असा सार्थ विश्वास समर्थांना आहे. तोच विश्वास आपण श्रद्धारूपात मनात बाळगावा.

क्रमशः भाग २६..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२७/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...