Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १ 

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम उय जयराम ||

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक श्रीरघूनंदन अर्थात श्रीराम यांना प्रथम प्रणाम करून त्यांचा सेवक , दास व भक्तशिरोमणी श्रीवीरहनुमान यांच्या शक्ती आणि भक्तीचा लाभ संपूर्ण समाजाला व्हावा याकरता श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेल्या मारुती स्तोत्राचं विवेचन करण्याचा प्रयत्न करतोय. श्रीरामरक्षेचं विवेचन नुकतंच पूर्ण झालं. श्रीरामाच्या स्तोत्रानंतर मारुतीरायाला आठवावं असा पायंडा आहे. त्याला अनुसरून ही विवेचनमालिका सुरू करतो.

खरतर चिरंजीव हनुमंत हा अनेक कारणांने आणि अनेक अर्थाने सर्वकाळी आणि सर्ववेळी पूजनीय, स्मरणीय आणि वंदनीय आहे. शक्तीसह बुद्धी, युक्ती, ज्ञान, आरोग्य, वैराग्य, परमार्थ, भक्तीवेदांत, दास्यत्व यासर्वात अतुलनीय स्थान निर्माण केलेला कपिश्रेष्ठ कपिंद्र या अर्थाने अवर्णनीय आहे. 

कलियुगात ज्या दैवतांचं महत्व अनन्यसाधारण आहे, त्यात गुरुतत्वामध्ये मूलतत्त्व श्रीदत्तात्रेय आणि भक्तीतत्त्वामध्ये श्रीहनुमान अर्थात मारुतीराया यांचं स्थान अढळ आहे. मारुतीरायाला तसा वर, आशीर्वाद आणि जबाबदारी प्रत्यक्ष श्रीराम यांनीच सोपवली आहे. कलियुगी ज्या ज्यावेळी धर्मावरील भगवंतावरील श्रद्धा संकटात येईल आणि भक्ती शक्तीहीन भासेल त्या त्यावेळी हनुमंताने येऊन हे सर्व सुरळीत करायचं आणि हनुमंत प्रभूंच्या या आज्ञेला नित्य जागतोच असा त्याचा लौकिक आहे. 

याच कारणाने अनेक रूपं वा अनेक जन्म घेऊन हे सत्कार्य कलियुगाच्या अंतापर्यंत हनुमंत करत राहणार अशी दृढ श्रद्धा ठेवा. समर्थांना प्रत्यक्ष हनुमंताचा अवतार मानलं जातं. त्यांचं कार्य अलौकिक आहे आणि शक्ती अजोड. प्रत्यक्ष प्रभू श्रीराम यांना प्रसन्न करून त्यांचं दर्शन प्राप्त केलेले थोर संत श्रीरामदासस्वामी यांनी सनातन धर्म , त्यातील उपासना त्या टिकण्यासाठी बळाचं महत्व ओळखून मारुतीची उपासना आणि बलसंवर्धन यांचा संपूर्ण आयुष्यभर प्रसार केला. त्यासाठी हनुमंताच्या देवळांची व समर्थ मठांची स्थापना करून समाजाला विशेषतः तरुण वर्गाला यात सहभागी करून घेतलं. 

अश्याच अनेक प्रयत्नात त्यांनी विपुल लेखन केलं. माणसाच्या मनाला नियंत्रित करून त्याला आणि त्यायोगे देहाला सन्मार्गाला वळवण्यासाठी मनाचे श्लोक हे अद्वितीय लेखन समर्थांनी केलं. एखाद्या मानसोपचार तज्ञाला लाजवेल  अश्या तोडीचं लेखन करून मनाला सकारात्मक, सक्रिय व सतर्क राखण्यासाठी विशेष मार्गदर्शन त्यांनी केलं. जे सर्वकाळी आणि मनाच्या सर्व अवस्थांमध्ये उपयोगी आहे. त्याचप्रमाणे दासबोधासारखा अद्वितीय ग्रंथ लिहून, मानवाचा पूर्ण जन्म पुरेल इतकं महान तत्वज्ञान सहज सोप्प्या भाषेत सांगितलं. 

२० दशकं, प्रत्येक दशकात १० समास, त्यात एक एक विषय घेऊन तो नीट समजावून उत्तम मानव कसा घडवावा याचा वस्तुनिष्ठ पाठ, सुमारे ७८०० ओव्यांमध्ये शब्दबद्ध करून, घालून दिला. इतकं समाजावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या महान विभूतींनी त्या बदल्यात कधीही साध्या स्तुतीची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही. आपलं अलौकिक कार्य करून प्रस्थान केलं. यातील थोडफार जरी आचरणात आणलं तर उत्तम समाजनिर्मिती होऊ शकेल.

त्यांनीच लिहिलेल्या हनुमंताच्या शक्ती भक्ती युक्ती व कार्य यांचा गौरव करणारं मनाला दृढ श्रद्धा विश्वास निर्भयता कणखरपणा देणाऱ्या मारुतीस्तोत्राचं  विवेचन आता पुढील भागापासून सुरवात करूया. 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०२/११/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...