Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २०

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २०

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
 
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | 
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||

आपला देह महाकाय करत, वज्रबाहूंच्या बळाने आणि रावण,  राक्षस , असुर, सीतामातेला छलकपट करून पळवून नेलं, त्याचा प्रभूंना झालेला त्रास आणि लक्ष्मणाची मूर्च्छा आणि आपल्या हाती उरलेला वेळ यांच्या आठवाने क्रोधयुक्त अंतःकरणाने  हनुमंताने क्षणार्धात मंदार पर्वतासम विराट असा द्रोणागिरी पर्वत लीलया उचलून डाव्या  हातात तोलून धरला. 

उजव्या हातात गदा धरून जय श्रीरामच्या घोषात पुन्हा दक्षिणेकडे उड्डाण करत लंकेच्या दिशेने प्रयाण केले.  शांततेच्या काळात व पर्वात शांत राहून रामनाम जप हाच जीवन उद्देश मानणारा हनुमंत युद्धजन्य परिस्थितीत आणि प्रभू आदेशान्वये आपल्या अंतःकरणातील  क्रोधाग्नि असुरांवर दानवांवर आगीप्रमाणे बरसत होता. म्हणून यमदूतसुद्धा या रुपाने भयभीत झाले होते. तोच क्रोध पर्वत उचलताना कामी आला.

आता हा भीमपराक्रम आताच्या माजमोपात मांडता येतो का बघूया. श्रीलंका ते हिमाचल हवाई अंतर साधारण २४०० कि. मी. आहे म्हणजे जाऊन पर्वत उचलून यायला ४८००कि. मी. झाले. संध्याकाळी युद्धसमाप्तीच्या सुमारास इंद्रजीतच्या अस्त्राने सौमित्र अर्थात लक्ष्मण  मूर्च्छित झाला. वेळ साधारण ६ ६३० असेल. त्यांनतर सर्वजण जमून विभीषणाला सुचलं त्याने सुशेणाबद्दल सांगितलं.  हनुमंत त्यांना घेऊन आला. वैद्यराजांनी संजीवनीबद्दल सांगितलं. या सर्वात दोन ते अडीच तास म्हणजेच एक प्रहर गेला असेल. 

म्हणजे अंदाजे समजुया की रात्री ९ ला जाऊन ५३० ते ६ ला आला अस गृहीत धरलं तर साधारण 9तास होतात. त्यातही भरतभेट व इतर एक दोन ठिकाणी मिळून एखाद तास सहज गेला असेल. म्हणजेच श्रीलंका ते हिमालय जाऊन, संजीवनी शोधून, ती न ओळखता आल्यामुळे पूर्ण पर्वत उचलून, पुन्हा हिमालय ते लंका हे ४८०० कि. मी. अंतर ८ तासात पार केलं. म्हणजे अंदाजे ६८६ कि. मी. प्रतितास वेगाने हनुमंताने हे प्रयाण आणि पुनरागमन केलं. 

विमानाचा सरासरी वेग हा ताशी ७४० ते ९३० कि. मी. प्रतितास असतो, आताच्या काळात. म्हणजे हनुमंताच्या भीमपराक्रमाची आपल्याला कल्पना येईल. यातसुद्धा ८ तास हे मी अंदाजे लिहिलय. प्रत्यक्षात हा वेळ अजून कमी असू शकेल. एखाद्या जेट विमानाच्या वेगात त्या काळात हनुमंत हा सर्व पराक्रम करूनही, भक्तवत्सल हनुमंत, आपल्या स्वामींच्या चरणांवर हा पराक्रम वाहतो, हा विनम्रपणा अतुलनीय आहे. आता या सर्व माहितीच्या आधारावर समर्थांनी जे लिहिलय त्याचं विश्लेषण करूया.

आणीला मागुती नेला म्हणजे पर्वत घेऊन आला आणि कार्यपूर्तीनन्तर पुनः तो पर्वत हिमालयात त्या स्थानी ठेऊन परत आला. आला गेला मनोगती. या वाक्यावरून एक बोध होतो की, मी काढलेला ८ तासांचा अंदाजसुद्धा जास्त आहे. म्हणजे त्यापेक्षाही कमी वेळात हे कार्य हनुमंताने केलं असणार, ज्या अर्थी समर्थ त्याच्या वेगाची तुलना मनाच्या वेगाशी केली आहे. कारण मनाचा वेग हा प्रकाश आणि ध्वनी या वेगापेक्षा जास्त आहे. हनुमंत त्यापेक्षाही वेगवान आहे. त्यामुळे त्याच्या वेगाची तुलना कोणत्याही वेगाशी होऊच शकणार नाही हा अर्थ गतीशी तुळणा नसे या वाक्यात आहे. हा होऊच शकत नाही मधला च म्हणजे हनुमंताचा वेग. 

अश्या भीमपराक्रमी हनुमंताला आज शनिवारी साष्टांग दंडवत. 🙏🙏🌷🚩🚩

क्रमशः भाग २०..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२१/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...