Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १८

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १८

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | 
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

एखादी व्यक्ती नेटकी असते म्हणजे नक्की कशी. तर टापटीप, स्वच्छ, कपडे, जे असतील ते व्यवस्थित स्वच्छ धुतलेले, शिस्तशीर, वक्तशीर, मनाने प्रसन्न, खिन्न उदास कधीही दिसणार नाही,  कधीही जवळपास अशी व्यक्ती आली तरी मन प्रफुल्लित आणि ताजतवानं होतं. अश्या व्यक्तीच्या कामात सुद्धा नेटकेपणा हा गुण आणि परिणाम दिसून येतो. अशी माणसं फार अघळपघळ बोलणार नाहीत, उगाच इथे तिथे फिरत, थांबत, तिष्ठत बसणार वा उभी राहणार नाहीत, अशी असतात. 

मारुती हा नेटका म्हणजे शिस्तशीर, वक्तशीर आणि इंग्रजीत ज्याला वेल ऑर्गनाईझड म्हणतो तसा आहे. शिस्तशीर आहे म्हणूनच श्रीरामांचं सीताशोधन हे महतकार्य  हनुमंत करू शकला. वक्तशीर होता म्हणूनच संजीवनी प्रसंगी द्रोणागिरी सह ठरलेल्या वेळेत घेऊन आला. त्याचा कामाचा प्राधान्यक्रम ठरलेला होता, योजनाबद्ध पद्धतीने काम करण्याची सवय व तयारी केलेला होता. कोणत्याही कार्याला सुरवात करण्याआधी त्याबद्दल पूर्ण विचार केलेला होता आणि आणीबाणीची स्थिती आली तरीही न डगमगता त्यातून शांत डोक्याने, विचारपूर्वक तरीही वेळेत निर्णय घेऊन कृतीत आणणारा होता.अश्या व्यक्तींच्या कार्याला नेहमी यश प्राप्त होतं. कारण त्यांना उत्तम सुरवात, योग्य आखणी, योजनाबद्ध कृती आणि योग्य समाप्ती या सर्वांची उत्तम जाण असते. 

असा विविध पद्धतीने कार्यकुशल, शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करून, श्रीरामांची मर्जी सांभाळून, सतत त्यांच्या चरणांशी लीन राहून, त्यांना प्रसन्न करून घेतलेला, हनुमंत हा नेटका होता. नेटका हा शब्द नीटनेटका असा म्हटला जातो आणि समर्थांना तोच शब्द अभिप्रेत आहे. नीट म्हणजे योग्य पद्धतीने राहणारा. इंग्रजीत ज्याला प्रेझेंटेबल म्हणतात तसा. 
हनुमान नेटका आणि नीट असाच आहे. हनुमंताचं गबाळं रूप कधीही दृष्टीस पडणार नाही किंवा तशी त्याची एकही प्रतिमा सापडणार नाही. 

सडपातळ या शब्दाचा वास्तविक अर्थ बारीक काटकुळा असा आहे. पण सडपातळ म्हणजे रोडवलेला नाही. पण मग समर्थांनी हा शब्द का वापरला ते बघूया. सडसडीत बांधा असलेली व्यक्ती अंगाने फार धष्टपुष्ट नसली तरी, शरीराच्या सर्व अवयवांची योग्य ती वाढ आणि बांध्याला म्हणजेच शरीराच्या आकार, उंची, ठेवण या परिमाणाना साजेशी असते. म्हणून त्या अर्थाने समर्थ हनुमंताच्या देहाची कल्पना यावी म्हणून सांगतात की ज्यावेळी तो सहज अवस्थेत असतो .त्यावेळी त्याच्या शरीराची ठेवण सामान्यतः त्या अवस्थेला अनुसरून असते.  म्हणजेच बरेचदा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचा कमरेवरील भाग आणि कमरेखालील भाग हा योग्य प्रमाणात नसतो. 

म्हणूनच समर्थ सांगतात की, हनुमंताची उंचीप्रमाणे रुंदी शरीराची ठेवण इत्यादी सर्व आहे आणि ज्यावेळी हा देह महाकायरुपात परिवर्तित होतो, त्यावेळी त्या आकाराला साजेसे सर्व अवयव व एकूणच देह परिवर्तित होतो. असा त्याचा अर्थ असावा. म्हणजेच सामान्यतः त्याच्या वज्ररूपाची कल्पना प्रथमदर्शनी बघणाऱ्याला येत नाही. याचा एक फायदा असा की ही व्यक्ती किती ताकदीची आहे हे न समजल्यामुळे असुर वृत्तीचे मुद्दाम छेड काढून मग स्वतःची फसगत करून घेत असतील. 

सडपातळ म्हणजे खरतर तर सुडौल या अर्थी सुद्धा समर्थांना म्हणायचं असू शकेल. कारण मोठंमोठ्या, बलाढ्य असुरांना सहजी लोळवणारा हनुमंत सडपातळ या शब्दाप्रमाणे असेल असं समर्थदेखील म्हणतील हे संभवत नाही. म्हणूनच खूपदा शब्दाच्या वास्तविक अर्थापेक्षा अभिप्रेत असलेला अर्थ हा वेगळा असू शकतो आणि तो अर्थ, शब्द लिहिणारी व्यक्ती,ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं आहे ती आणि दोन्ही  काळाचे संदर्भ यावर अवलंबून असतं. त्याव्यतिरिक्त पुढच्या शब्दाच्या अनुषंगाने हाच अर्थ अभिप्रेत होतो. त्याबद्दल उद्याच्या भागात पाहू.

क्रमशः भाग १८..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१९/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...