(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४१
देवर्षी यादवनरेशांच्या महालापर्यंत पोहोचतात. बाहेरच उभे आहेत. श्रीकृष्णाची पाठमोरी आकृती देवर्षी पाहात आहेत. पुढे जाण्याचं धैर्य त्यांना होत नाहीये. कृष्ण विचारमग्न स्थितीत उभा आहे. कार्याच्या पूर्ततेसाठी देहाची सिद्धता झाली आहे, पण मनाचं काय ते अजूनही तिथेच आहे, त्या वृंदावनात , न झालेल्या भेटीत जीव ,आत्मा अजून गुंतला आहे.
एक काळ होता जेंव्हा राधेला कधीही , मनास वाटेल तेंव्हा, वाटेल त्या वेळी, त्या क्षणी भेटू शकत होतो आपण. काही जबाबदारी नव्हती. अल्लडपणा, अवखळपणा असलेल्या त्या वयात एक छान नात मैत्रीच, विश्वासाचं , भावबंधाच्या पलीकडील, निरपेक्ष, निष्कलंक , निस्पृह निर्माण झालं, कायमचं. अश्या राधेचं मन पूर्ण जाणणारा मी. तिच्या मनात माझ्याबद्दलचे भाव, तीचं प्रेम , तिची भक्ती, त्या भक्तीची माझी अनुभूती मीच जाणतो. तिचा प्रत्येक श्वास फक्त आणि फक्त माझ्या एका दर्शनासाठी, मी एक झलक दिसावं याचसाठी आहे. मी जाणतो की हे नातं, ही भक्ती, हे प्रेम युगानुयुगे , जन्मोजन्मी मिळवण्यासाठी अनेक युगातून फिरून इथपर्यंत आलोय. याचसाठी का ही मानवी देहातील अगतिकता, हा नाईलाज.
राधेच्या आठवणीत , विरहात आणि ते प्रेम पुन्हा पाहण्या साठी तिला भेटण्यासाठी उत्सुक असलेला कृष्ण आता द्वाराकेच्या चक्रात अडकला होता, जे चक्र त्याने स्वतःच राजकीय कारणाने तयार केलं होतं. कृष्णाच्या अनेक रंगरूपांपैकी ते एक रूप होतं, राजकीय. पण त्याने आतील भावनाना पार खोल गर्तेत ढकलून दिल होतं. अर्थात जेंव्हा जेंव्हा एकांत मिळत असे, तेंव्हा तेंव्हा या भावना, हा विरह , ही भक्तीची ओढ राधेप्रत नेऊन ठेवत होती, कृष्णाला , पुन्हा पुन्हा तेच स्मरून जाळण्यासाठी, अगतिकतेच्या, असहाय्यतेच्या अग्नीत.
श्रीकृष्णाच्या मनातील ही चल बिचल जाणूनच देवर्षी कृष्णाजवळ पोहोचले. सर्व धीर एकवटून पुन्हा एक प्रयत्न करण्यासाठी हिम्मत बांधली खरी. पण मन साथ देईना. पुन्हा चलबिचल झाली आणि देवर्षी तिथून बाहेर पडले. त्यांना आशंका होती की, जर भगवंत राग विसरले नसतील तर , तर पुन्हा मनस्ताप होईल त्यांना. म्हणून दुसरा उपाय काही योजता आला तर बघूया. या विचाराने ते महालाबाहेर पडले.
अश्याच विचारमग्न स्थितीत त्यांना देवी रेवती दिसल्या. त्यांच्याशी बोलून बघावं म्हणून नारदांनी त्यांना साद दिली.
" नारायण नारायण. देवी प्रणाम स्वीकार करावा , या विष्णुभक्ताचा. "
" प्रणाम देवर्षी. आज इकडे काही खास कारणास्तव की कार्याची महती जाणून हा सोहळा स्वनेत्रे पहावा म्हणून आला आहात."
" उद्देश्य तसा आहे पण आणि नाही पण."
" म्हणजे आम्ही नाही समजलो."
" म्हटलं तर तस काही खास नाही आणि म्हटलं तर खास आहे. आपली अनुमती असेल तर कथन करू का ?"
" हो हो बोलावं. जर आपल्याला वाटत असेल की आम्ही काही मदत करू शकतो तर नक्कीच आपण सांगावं."
" नारायण नारायण. आपण जाणता की द्वारकेस प्रस्थाना आधी यदुवीर वृंदावनात कोणालातरी भेटण्यास गेले होते. "
" हो बहुधा राधेला, असा आमचा कयास आहे."
" बरोबर आहे आपला कयास"
" त्याच काय"
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment