Skip to main content

मुरली - ३३

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ३३


प्रत्येक राजप्रासाद हा दिमाखदार आणि अनेक वैशिष्टयानी युक्त होता. इतका सगळा फेरफटका मारल्यानंतर व द्वारका बघून झाल्यानन्तर आता उत्सुकता आहे की, इतकी सुंदर द्वारका उभी केलेल्या कारागिरांनी राजप्रासाद कसे बांधले असतील. आता जाऊ राजप्रासादाकडे.

राजप्रासादातील प्रत्येक राजवाडा हा स्थापत्यकला, वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला अश्या चौसष्ठ कलांचा अद्भुत संगम होता. प्रत्येक वाडा हा भव्य, विस्तीर्ण परिसर असलेला , वनराई, फळांची व विविधरंगी फुलांची  विविध गंधित झाडे, वेली, लता यांनी परिपूर्ण असे होता. त्याचं बांधकाम हे पाहताक्षणीच मनात भरत होत, बांधकामशैली ही त्या काळातील अत्युत्तम अशीच होती. नव्हे तसा खास आग्रह कृष्णाने धरला होता आणि झालेलं काम हे त्या अपेक्षांच्याही पलीकडे होत.

मूलतः सर्व राजप्रासाद हे एका विशिष्ट पद्धतीने उभे करण्यात आले होते. धनुष्याकृती आकारात राजप्रासाद उभे करण्यात आले होते. त्यातील मुख्य प्रासाद कृष्ण बलराम यांचे धनुष्याचा मध्य होता . त्याबाजूने धनुष्याकृती आकारात देवी रेवती यांचा प्रासाद बलराम दादा यांच्या उजव्या बाजूला, देवी रुक्मिणी यांचा कृष्णप्रासादाच्या डाव्या बाहुला , त्या शेजारी देवी सत्यभामा, देवी जांबुवंती या क्रमाने कृष्णाच्या आठही राण्यांचे स्वतंत्र प्रासाद धनुष्याच्या आकारात उभे होते, जेणेकरून देवी रेवती यांच्या प्रासादाशेजारी शेवटच्या राणीचा प्रासाद, धनुष्याची प्रत्यंचा पूर्ण करण्यासाठी. 

कृष्ण व बलराम यांच्या मिळून नऊ राण्यांच्या प्रासादाचे रंग हे इंद्रधनूच्या रंगक्रमाने होते. ज्यामुळे अवकाशातून द्वारकेत इंद्रधनू उतरलं आहे असाच भास होत असे. श्रीकृष्णाच्या प्रासादाचा आकार अर्थातच मोरासम आणि रंग हुबेहूब मोराप्रमाणे होता. त्यामुळे तो अत्यन्त विलोभनीय दिसत आहे. जणू प्रत्यक्ष एखादा महाकाय  मोर स्वतः पिसारा फुलवून उभा राहून नाचतोय, कृष्ण दर्शनाच्या आनंदात. दादांचा प्रासाद हा एखाद्या उत्तुंग आणि भीमकाय गदेच्या आकाराचा भासत होता, ज्या कलेचे ते जगद्गुरू आहेत.

देवी रेवती यांच्या प्रसादाचा आकार , हा त्यांच्या खास आग्रहावरून आपले पाचही फणे उभारून सज्ज असलेल्या शेषाच्या आकाराचा होता.  देवी रुक्मिणी यांना त्यांच्या आग्रहानुसार कृष्णाच्या लोचनांचा आकार असलेला भव्य प्रसाद बांधून देण्यात आला होता. कारण त्यांना कृष्णाची मनमोहक नजर आणि त्याचे लोचन अत्यन्त प्रिय आहेत.

देवी सत्यभामा यांचा प्रासाद खास कृष्णाच्या मोरपीसासम आणि त्याच रंगांचा होता. त्याच कारण म्हणजे कृष्णाचा प्रासाद मोरासम म्हणून माझा त्याच मोराच एक पीस, अस त्यांनीच खास कृष्णाला आग्रहाने , नव्हे तर हट्टाने सांगितले होते.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...