Skip to main content

मुरली - २०

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - २०

जगनियंत्याची सत्त्वपरीक्षा. वचनपूर्ती पर्यंत मुरलीवादन पूर्ण बंद. कारण तीन महत्वाचे सूर गंधार, पंचम आणि धैवत राधेकडे बद्ध राहणार .कृष्णाला कल्पना पण नव्हती आणि अचानक सर्व घडून गेलं. एकदा मानवी देह धारण केल्यानंतर त्या अनुशंगे येणारे भावभावनांचे  सर्व चढउतार आणि भोग भोगण्याची मानसिक तयारी करणं, हे अवघड कार्य,  नियंत्याला करायचं होतं. कल्पनातीत धीरज धरून फक्त वाट पाहणं आणि काळाचा मागोवा घेत पुढे जाणं इतकंच हातात होतं कृष्णाच्या.

त्यामुळे संपूर्ण यात्रेत यंत्रवत कार्य करून लक्ष फक्त राधेच्या भेटीकडे आणि दिलेल्या वचनाच्या पूर्तीकडे लागलं होतं, कृष्णाचं. या अवस्थेत कृष्णाला एक शास्त्रवचन आठवलं "भावनेच्या भरात कधीही कोणालाही वचन देऊ नये आणि दिल्यास पाळावे. " कृष्णाच्या हातातून बाण तर सुटला होता. आता फक्त दिलेला शब्द पाळून राधेची भेटीची मनीषा पूर्ण करून,  राधेकडे ठेवलेले तीन स्वर परत मिळवणं हे एक महत्तम कार्य होतं आणि ते लवकर होणं कठीण दिसत होतं.

इकडे राधेला या गोष्टीची कल्पना देखील नाही. कारण जे घडलं ते स्वप्नात घडलं, पण सत्यात उतरलं होतं. कृष्णाचे तीन स्वर तिने स्वये स्वप्नात मागितले होते आणि कृष्णाने ते अलगद आणि सहजभावाने राधेला दिले होते. स्वप्नात घडलेली ही बाब राधेच्या , जी कृष्णाचं सुप्त मन होती, तिच्या प्रत्यक्ष जीवनात म्हणजेच जागृतावस्थेत विस्मृतीत गेली. कारण मानवी देहात सुद्धा परमेश्वरी ज्ञान योगामायेने जाणून असणारे, पण तरीही मानवी देहाच्या मर्यादा सांभाळून असलेले, भगवंताचे पूर्णावतार पुरुषोत्तम श्रीकृष्ण, जाणत होते , राधा जाणत नव्हती.

कदाचित मधुसूदनाची हीच लीला असावी. मायाबद्ध होऊन मायातीत अवस्थेत विश्वाचा खेळ खेळायचा. त्याचा आनंद सहजावस्था आणि परामावस्था या दोन्ही स्थितीत लुटण्या साठी कृष्ण जन्म असावा. अन्यथा मायाकाराला मायेचा पाश पडेल हीच कल्पना मुळात अकल्पित वाटते. म्हणूनच राधारुपात  फक्त  विरहात जळण. पण कृष्णरुपात विरह , वचन आणि त्या वचनाची पूर्तता करण्याची चिंता या तीनही अवस्थेत जळण होत. मोक्षापार गेलेला ईश्वरी अंश अश्या विचित्र स्थितीत सापडलेला  ब्रम्हर्षी नारद पाहू शकले  नाहीत आणि अवकाशस्थ प्रकट होऊन कृष्णाला विचारतात

" भगवान पुरुषोत्तम मी आपली ही अवस्था पाहू शकत नाही आणि पाहू इच्छितही नाही. हा मी आता जातो आणि राधेला आपली ही अवस्था सांगून आपल्याला वाचनातून मुक्त करण्यास सांगतो. आपण फक्त आज्ञा द्यावी भगवन"

यावर कृष्ण म्हणाला

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...