(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ३५
संपूर्ण द्वारका नगरी आपापल्या सुशोभित, नूतन वास्तूत प्रवेशाच्या तयारीत धामधुमीत गर्क होऊन जाते.
अंतरीक्षातून नारद हे सर्व बघत आहेत.
"नारायण नारायण. या समस्त ब्रह्मांडात द्वारकेच सौन्दर्य पाहून, भूलोकीचा स्वर्ग अशी साजेशी उपमा द्यायचा मोह होतोय. पण देवेंद्राच्या कोपापासून भय वाटतय. अन्यथा तंतोतंत स्वर्गच. किंबहुना त्याहून देखील उत्तम घडवली आहे द्वारका यदुनाथानी. पण या सर्वात माझं वचन आणि भगवंतांची राधेशी भेट हे कस शक्य आहे. याच गोष्टीचा ध्यास मनाने घेतला आहे आणि तोच विचार सदोदित सुरू आहे. जे घडल्यावरच योगनिद्रा लागू शकते अन्यथा चित्त एकाग्र होणं केवळ अशक्य दिसतंय. भगवंता मला राधेचा विरह आणि त्या विरहातील दुःख पाहणं असह्य झालंय., आधी द्वारकेला जावं की राधेच्या मनमंदिरात. जिथे चंचुप्रवेश हा अशक्यप्राय होता , आपण वचन देऊन तो प्राप्त केलाय खरा. पण
राधारमणावीण राधा कशी ही
पाहू शके ना मन नारदाचे
अशी स्थिती काय झाली देवा
सांगा तुम्हावीण कैसे हो राधेचे
उजळीत येई स्वये सूर्यनारायण
फिरुनी शिरे क्षितिजी लुप्त होई
राधा सखी वैभवी वाढली तरी
हरीविण हृदयी न दुजे असे काही
मनीषा माझी राधेस पाहुनिया
कैसी घडावी तिज भेट हरीची
माया निवारी मोहन मुरलीधर
युक्ती काही ऐसी ती करसी
युक्ती काही ऐसी ती करसी
अस म्हटलं नारदांनी आणि एक कल्पना मनात येऊन देवर्षीचा चेहरा खुलला. पण लगेच श्रीकृष्णाचा रुष्ट चेहरा डोळ्यापुढे आला आणि नारद जरा द्विधा मनःस्थितीत गेले. पण मनात एक विचार आला की , अस करून बघूया का. ? मनात काही योजून देवर्षी अंतरीक्षातून अंतर्धान पावतात आणि राणी सत्यभामेच्या महाली प्रकट होतात. देवी सत्यभामेला नमन करून म्हणतात.
" नारायण नारायण. देवी संकटात सापडलेल्या हरिभक्ताला फक्त देवीचाच आधार असतो. अस माझा अनुभव सांगतो आणि हरिभक्तानी तस ब्रीद घालून दिलंय. तेंव्हा देवी आपणच काही उपाय सुचवावा आणि मला भगवंताच भय वाटतय, त्या चिंतेत योगनिद्रा सुद्धा लागत नाहीये वा चित्त एकाग्र होत नाहीये आणि मर्त्यलोक सोडून जाववतसुद्धा नाहीये. या समस्येचं निराकरण झाल्याखेरीज. "
" परंतु देवर्षी आपण अस काय केलंत ज्यामुळे मधुसूदन आपल्यावर रुष्ट झालेत. आपण काही आगळीक तर केली नाहीत ना ? तस जर असेल तर मग माझ्याकडून सहाय्याची अपेक्षा न केलीत तर बरं. "
"नारायण नारायण. देवी आपणच जर अस म्हटलत तर या भूतलावर असा कोण आहे जो मला वाचवू शकेल, यदुवीरांच्या रागातून ?"
"काय झालंय ते तरी सांगा. तद्नंतर विचार करता येईल."
"देवी मी त्यांच्याशी गोकुळ ते द्वारका प्रवासादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरील न दिसणाऱ्या चिंतेमुळे सहज विचारलं की हे भगवंता आपण गोकुळच्या विरहामुळे थोडे नरम दिसता मनात, जरी आपण चेहऱ्यावर तस दाखवत नसाल तरीही."
"त्यावर काय म्हणाले यदुनाथ "
" त्यावर भगवान म्हणाले की अस कशावरून म्हणता"
" मी म्हटलं की, ते तर सहाजिक आहे. कारण सर्व बालपणीचे साथी, संगती, सखे सोबती , बालपणीचे मैतर जे आपल्या मनात खोलवर स्थान मिळवून आहेत, ते सोबत आले नाहीत वा येऊ शकले नाहीत. तर मग त्यांना तुमची आणि तुम्हाला त्यांची सय येतच असेल आणि येईल जीवनभर. तेंव्हा त्यांना पुन्हा भेटण्याची काही योजना आहे का नजीकच्या भविष्यात."
"बर मग "
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment