Skip to main content

भोग आणि ईश्वर भाग ६५५

भोग आणि ईश्वर भाग ६५५

©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 

सूक्ष्म देह आणि स्थूल देह या दोन्हींनी कर्म होतात हे आपण पाहिलं. पण प्रत्यक्षात सूक्ष्म देह इच्छा, वासना, क्रोध, इत्यादी. भाव निर्माण करतो. पण त्यांचं शमन हे स्थूल देहा मार्फतच होतं. त्या अर्थाने सर्व कर्म ही स्थूल देहाने केलेली असल्यामुळे, खरंतर फलरूप शिक्षा किंवा बक्षीस हे त्या देहालाच व्हायला हवंय. पण प्रत्यक्षात जी कर्म फलरूपाला पक्व होत नाहीत ती, संचित रूपात गंगाजळीत शिल्लक राहतात. 

हिशोबाच्या भाषेत सांगायचं झालं तर, करंट म्हणजे चालू काळाची व संचितातील परिपक्व फळांची देणी व घेणी चालू काळात वसूल होऊन, ते चालू काळात (अर्थात सध्याच्या जन्मात) भोग व उपभोग रूपात समोर येतात. त्याचं नफातोटा पत्रक म्हणजे आपलं या देहातील, या जन्मातील जीवन. जे भोगून होणार नाही किंवा अपूर्ण अथवा अपरिपक्व फल असेल ते पुढील जन्मासाठी संचित स्वरूपात ताळेबंदात शिल्लक राहील. 

ते सूक्ष्म देहात साठवून आत्मा, शरीर सोडताना पुढील जन्मासाठी घेऊन जाईल. आता प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो की, जर सर्व भाव भावना सूक्ष्म देहातील मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांच्या मार्फत उत्पन्न होतात आणि शरीर फक्त माध्यम आहे तर शिल्लक संचितातील अपरिपक्व कर्मांचा हिशोब पुढील जन्मातील स्थूल देहाला का भोगावा लागतो. 

इथे एक लक्षात घ्या की, स्थूल देहच सूक्ष्म देहाच्या वासना, भावना शमन करण्याचं साधन आहे. सूक्ष्म देहच सर्व गोष्टींचा मुख्य कर्ता आहे. त्यामुळे खरतर ही सर्व बेरीज वजाबाकीची गणितं, सूक्ष्म देहासाठी असतात. पण त्रिमिती, स्थूल देह, यांच्या मर्यादा यामुळे, स्थूल देह हाच सर्व आहे, तोच संसार करतो, तोच एक कर्ता, या भावनेला देह चिकटून आयुष्यभर याच समजात वावरतात.

जे देहासमोर आहे, जे ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय यांना ज्ञात होतं, जे स्थूल मानाने मोजता येतं, ज्याला प्रमाणाने सिद्ध करता येतं, जे दृष्टीला दिसतं तेच एक सत्य, हा भाव वैज्ञानिक दृष्टी म्हणून आपण मानतो. बुद्धी, मन, अहंकार हे दाखवता न येणारे घटक आहेत. त्यांना प्रमाण मानलं किंवा नाही तरीही आयुष्यात काहीही फरक पडत नाही, अशी एक सर्वसाधारण धारणा असते. 

त्यामुळे जे दृष्टीला दिसत नाही, ऐकायला येत नाही ते नाही, अशी भावना निर्माण होऊ शकते. अर्थात प्रयोगाने विज्ञानाने सुद्धा काही दृष्टीपलीकडील गोष्टी स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ God's particle अर्थात देवकण हा नुकत्याच करण्यात आलेल्या, जागतिक पातळीवरिल एका वैज्ञानिक प्रयोगात, शास्त्रज्ञानीच प्रयोगाअंती काढलेला हा निष्कर्ष आहे. असो. 

मुळात सूक्ष्म देह हाच सर्व भावांचा कर्ता अर्थात initiater आहे आणि स्थूल देह हा सर्वांचा आज्ञा पालनकर्ता अर्थात instrument आहे. आत्मा फक्त power and energy source आहे. त्यामुळे वास्तविक अर्थाने सर्व सचित कर्म ही सूक्ष्म देहाचे assets आणि liabilities असतात. म्हणून सर्व संचित ही सूक्ष्म देहाची प्राप्ती आणि जबाबदारी असते. म्हणूनच एक देह गेल्यावर सूक्ष्म देह नवीन देह प्राप्तीसाठी अखंड धडपडत असतो.

त्याच्या पोतडीतील अपरिपक्व कर्माच्या बिजातून सर्वात बलवान कर्म परिपक्व होईल त्यावेळी, त्या सूक्ष्म देहाला, स्थूल देह प्राप्तीसाठी पोषक वातावरण आणि निर्मिती व्यवस्था तयार मिळते. एकदा ही स्थिती आली की, प्राप्त अनुकूल स्थितीचा लाभ घेऊन, सूक्ष्म देह, स्थूल देहात प्रवेश करतो. आत्मा त्यासोबत आपोआप येतो. आता त्या सूक्ष्म देहाला सचितात शिल्लक असलेल्या कर्माच्या हिशोबाची पूर्तता करण्यासाठी आणि नवीन कियमाण निर्माण करण्यासाठी नवीन देह मिळतो.

विषय अजून सखोल आहे, म्हणून पुढच्या भागात चर्चा पुढे नेऊया. पण नामाचा हात सोडू नये, हीच नम्र विनंती. 

तोपर्यंत जय श्रीराम!! 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/१०/२०२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...