Skip to main content

मय्या मी न खाई नवनीत


गोकुळाष्टमी काल साजरी झाली. आज दहीकाला त्यानिमित्ताने संतकवी सुरदास यानी लिहुन अजरमार केलेल्या गीताला मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केलाय. "मय्या मोरी मै नही माखन खायौ "


का घेसी आळ मजवरी
मय्या मी का तुझा वैरी 
मी न खाई नवनीत
मय्या मी न खाई नवनीत

भल्या पहाटे हाती देसी
लाठी घोंगडी नाजूक हाती
धाडसी वनी गोधनासंगे
तिथे पावा उरतो हाती 
सांजेला घरी येई परत 
खाई कधी नवनीत 
मय्या मी न खाई नवनीत

बालक मी किती ग सानुला
नाजूक हात कसे पोचती
शिंक्यावर मैय्या तू ठेवसी
गवळीबाळे बळेच देती
मुखी घालीती घास 
मी न खाई ग नवनीत
मय्या मी न खाई नवनीत

मय्या तुझ्या मनी काय ग  
सांगती जन जे विश्वासे तु 
त्यांच्या वचनावर विसंबुन
मज जाणसी का परका तु
तुला पाहुनी भोळी जननी
काहीही गवळीणी सांगतात 
परी मय्या मी न खाई नवनीत 
मय्या मी न खाई नवनीत

असा तुझ्या मनी भेद असता
फुकाचे मी काम का करावे
ही घे लाठी अन घोंगडी
गोधन चरण्या कुणाही द्यावे
मजला हे ना रुचे वागणे
मय्या का खाईन मी नवनीत 
मय्या मी न खाई नवनीत

© ® कवी ः प्रसन्न आठवले

१२/०८/२०२०

०३ः३७

दहीहंडी दिनानिमित्त 












Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...