Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

भोग आणि ईश्वर ५१६

भोग आणि ईश्वर  ५१६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  या संपूर्ण जगतावर असलेलं मायेचं आच्छादन, अनेक गोष्टी असाध्य करतं किंवा अनेक गोष्टीत बाधा निर्माण करतं. या मायेमुळेच, भ्रम व विस्मृती होते की, हा देह, काही काळा साठीच असून, त्या काळात वा त्या जन्मात, काय साधायचं आहे,याची मुळात  कल्पना, जडजीवाच्या मनाला स्पर्षच करत नाही की, आपण का आलोय, याचा आधी शोध घ्यावा. हा प्रश्न पडतच नाही की, मी खरा कोण आहे, आतील आत्मा वा चैतन्य, जो देह चालवतो किंवा देह, ज्यायोगे आत्मा काही साध्य करू शकतो.  मुळात हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे त्यावाचून काही अडतच नाही. हा प्रश्न आयुष्यात एकदाही न पडलेले अनंत जिवात्मे, करोडो वर्ष, या जगतात, जन्मो जन्मीचं दुःख, भोग, उपभोग, सुख, त्रास, आनंद हे सर्व, अनंत जन्म मागील पानां वरून पुढे असं निष्फळ आयुष्य जगतात. देहात येतात, मायेत गुंततात आणि पुन्हा विदेही होऊन, या जगतात परत परत येण्या साठी पुढील देह मिळण्याची वाट पहात राहतात.  ज्यावेळी आपली बुद्धी चालत नाही, त्यावेळी, आपण आपल्या पेक्षा बुद्धिमान, विचारी जनांची मदत घेतो. अर्थात ज्यांना त्या विषयात...

भोग आणि ईश्वर ५१५

भोग आणि ईश्वर  ५१५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  अर्पण या शब्दाचा आज जरा सखोल विचार करूया. अर्पण या शब्दाचा मराठीत अर्थ होतो सुपूर्द वा स्वाधीन करणे किंवा इंग्लिशमध्ये to assign. म्हणजे एखाद्याला हक्क वा जबाब दारी किंवा काही कर्तव्य देऊ करणं, म्हणजे अर्पण करणे किंवा स्वाधीन करणे. स्वाधीन करणे म्हणजे स्वतःला त्याच्या आधीन करणे. आता आधीन करणे म्हणजे आपल्या जबाबदारीतून काही भाग वा हिस्सा दुसऱ्याला करायला देणे.  आता व्यवहारात आपण अनेकदा, बाहेरगावी जाताना काही चीजवस्तू किंवा कार्यालयात कामाचं वाटप करताना कामाचं नियोजन व आखणी करून, त्यातील काही भाग, हाताखालच्या किंवा आपल्याच पातळीवर नवीन खात्याकडे सुपूर्द करतो. या व्यावहारिक गोष्टीत, जबाबदारीसोबत काही प्रमाणात हक्काचं सुद्धा विभाजन होऊन, त्याचंसुद्धा वाटप केलं जातं. आता या मध्ये सुपूर्द करणे किंवा स्वाधीन करणे हा भाग व्यावहारिक अर्थाने येतो.  म्हणजेच देणारा आणि घेणारा यांना एकमेकांना कामाच्या स्थिती बाबत अहवाल वा स्थितीचा वृत्तांत पोचवणं वा मागून घेणं, हे क्रमप्राप्त असतं. तरच देणार्याने जे कार्य सुपूर्द केलं आहे, ते ...

भोग आणि ईश्वर ५१४

भोग आणि ईश्वर  ५१४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  खरंतर आपल्यापेक्षा वयाने, मानाने, कर्तृत्वाने मोठ्या व्यक्तीं समोर नतमस्तक व्हायला, त्यांच्या पाया पडायला, त्यांचा आशीर्वाद घेण्यात एकप्रकारे वेगळाच आनंद मिळतो. यात शास्त्रीयदृष्ट्या महत्वाची गोष्ट म्हणजे नमस्कारानंतर  त्यांच्या मनातून निघालेल्या, सकारात्मक उच्च प्रतीच्या लहरी, आपल्या देह व मन याभोवती एक तर्हेचं सुरक्षा कवच निर्माण करतात.  या सुरक्षा कवचाचा लाभ आपल्या मनातील सकारात्मकता टिकून, त्यात वृद्धी होण्यात होतो. म्हणून अश्या ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती ज्या सकारात्मक विचारांनी भरलेल्या असतात, त्यांचा आशीर्वाद हा कायम लाभदायक ठरतो. यात कोणतीही अतिशयोक्ती वा अवास्तव काहीच नाही. हे जर वैज्ञानिक आधारावर सत्य।आहे की, आपल्या मनातून बाहेर पडणाऱ्या लहरींचा वातावरणावर इष्ट व अनिष्ट परिणाम होत असतो. जसा तो वातावरण प्रदूषित करणाऱ्या घटकांचासुद्धा होतो.  आपण कधी अनुभव घेतला असेल की, सर्व सकारात्मक माणसं जमलेली असताना, त्यात जर एखादा नकारात्मक वा अनिष्ट विचारांचा असेल तर, त्या एकट्याच्या नकारात्मक विचारांचा परिणाम ए...

भोग आणि ईश्वर ५१३

भोग आणि ईश्वर  ५१३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता कर्म करून विसरायचं म्हटलं, तरीही त्यात दोन प्रकारच्या व्यक्तींची  शक्यता सांगता येते. एक म्हणजे कर्म करून चिंता न करणारे आणि दोन म्हणजे कर्म करून चिंता करणारे. दोन्ही प्रकारात पापी आणि पुण्य वान असे दोन्ही प्रकारचे लोक येतात. म्हणजे आपण पाप करत आहोत हे माहीत असूनही आणि माहीत असल्या मुळे, पण त्याचे निश्चित परिणाम कधी समोर येतील, तेंव्हा बघू, असं म्हणणारे किंवा आपलं कर्म कुकर्म, दुष्कर्म वा पापकर्म या सदरात न येणारं आहे, हे जाणणारे आणि त्यामुळे भयमुक्त असलेले.  दोन म्हणजे आपलं कर्म पुण्यकर्म वा पापकर्म हे जाणता येत नसलेले, अजाण,अज्ञानी  आणि त्यामुळे चिंता करणारे आणि दुसरे म्हणजे आपण परिस्थितीवश पाप कर्म वा वाममार्ग धरला आहे, असा भ्रम धरून, त्याबद्दल चिंता बाळगणारे. आता या चारही प्रकारच्या लोकांचा विचार करूया. मुळात एक निष्कर्ष काल आपण काढला त्याचा एकवार विचार करूया.  तो निष्कर्ष म्हणजे मनुष्य हा फक्त कर्माचा धनी आहे. आज यावर विचार करूया.  यात खूप मोठं सार दडलेलं आहे एक म्हणजे आपण फक्त कर्मच करू शक...

भोग आणि ईश्वर ५१२

भोग आणि ईश्वर  ५१२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता एक गोष्ट समजली असेल की, मृत्यूआधीची कोणतीही गोष्ट वा कर्म, पुढील जन्मात आठवत नाही, हे विधात्याने जडजीवावर किती उपकार केले आहेत. त्यातून एक निष्कर्ष नक्की काढता येईल,की विधात्याच्या या व्यवस्थेचा सरळसरळ अर्थ असा आहे, जेणेकरून या भूलोकी,जडदेहात वावरताना, आधीच्या कोणत्याही कर्माचा कोणताही लेखाजोखा मर्त्य मानवाने लक्षात ठेवण्याची गरज नाही.ते कार्य कर्मफल तत्वाला अनुसरून, आपलं कर्म आणि त्यासाठीची विधात्याची विश्वरूप व्यवस्था लक्षात ठेवेल.  बरं ही व्यवस्था आजपर्यंत कधी ढासळली किंवा त्यात कधी बाधा आली वा न्यून आलं, असं एकही उदाहरण नाही. यातून अजून एक निघणारा निष्कर्ष म्हणजे, ही कर्माच्या फलांची व्यवस्था संचित रुपात प्रारब्धात मांडून, ईश्वराने तेसुद्धा काम चोख केलंय. म्हणजे मानवाला काही लक्षात राहो वा न राहो, ईश्वरी कर्मफल संचित व्यवस्थेत,एका क्षणाचासुद्धा, कोणताही अडथळा येत नाही. म्हणजे आपण मनात, बुद्धीत जी विचारांची यादी किंवा षड्रिपुंची बीजं रुजवून वाढवतो, ती निरर्थक ठरतात. याच संचितात या जन्मात आपण केलेली कर्मसुद्धा भर...

भोग आणि ईश्वर ५११

भोग आणि ईश्वर  ५११  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालचाच विषय पुढे नेऊया. वास्तविक कर्मातून निवृत्ती ही आपल्याला भगवंताने एका वरदानाच्या स्वरूपात बहाल केली आहे. म्हणजे कसं तर, जन्ममरण शृंखला तयार करून. म्हणजे एका जन्मातून अर्थात त्या देहातून मुक्ती देऊन किंवा मुक्त करून पुढे कर्मफलानुसार नवीन।देह देऊन, मागील जन्मांच्या विस्मृतीचं वरदान दिलं आहे. विचार करा, जर जन्ममरण नसतं किंवा जन्ममरणोपरांत विस्मृती नसती तर, काय काय अघटित, आक्रीत घडलं असतं देवच जाणे.  याचसाठी मृत्यू पुन्हा जन्म यामधून आत्मा फिरत राहून, आधीच्या जन्मांतील कर्माचा विसर पडून, नवीन जन्मात नवीन कर्म व पुन्हा त्याची नवीन कर्मसाखळी, असा एक अद्भुत खेळ विधात्याने रचला. आता यातून काही गोष्टी अपरिहार्य आहेत, हे नक्कीच. जसं संचित, फल प्रारब्ध यातून सुटका नाही. म्हणजे कर्म विसरली तरी त्यांची फलं आपला पाठलाग करतातच. पण आधीचे भोग भोगताना आपण जसा खूप विचारमंथन करतो, की हे माझ्या वाट्याला का.  पण, तसा विचार दैवयोगाने, उपभोग, सुखप्राप्ती झाली तरी त्यावेळी, त्याचा  विचार करत नाही, किंवा तसा विचारही मनाला स्पर्...

भोग आणि ईश्वर ५१०

भोग आणि ईश्वर  ५१०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  विरक्ती ही मुळात मनाचं वासनेतून, क्रोधातून, कामातून, विवंचनेतून, निवृत्ती आहे. मुळात सर्वसंगपरित्याग म्हणजे विरक्ती हा थोडा संकुचित अर्थ आहे, असं माझं मत आहे. कारण सर्वसंगपरित्याग म्हणजे फक्त देहाची निवृत्ती नव्हे तर मनाला सर्व प्रकारच्या मोहातून, वासनेतून क्रोधातून विचारपूर्वक व विवेकाने निवृत्त करणं. म्हणजे मनाला मनापासून मोहात,मायेत,वासनेच्या फेऱ्यात अडकण्याचा मोह न होणं म्हणजे खरी निवृत्ती  याच निवृत्तीची पुढची पायरी म्हणजे विरक्त. विरक्त माणूस संसारपासून, त्यातील तापापासून, प्रपंचापासून लांबच असला पाहिजे हा गैरसमज आहे. विरक्त मनुष्य संसारात व प्रपंचात राहूनसुद्धा मनाने संयमी, निग्रही आणि विरक्त असू शकतो. याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे नाथमहाराज अर्थात शांतीब्रह्म श्रीएकनाथ महाराज. जे प्रपंचात असूनही मनाने निवृत्त, वृत्तीने विरक्त होते. अर्थातच ही विरक्तवृत्ती, हा देखील एका तपाचा साधनेचा आणि एकाग्रतेचा परिणाम असतो.  म्हणजे आधी मनाची निवृत्ती, मग त्यातून विरक्ती साध्य करण्या साठी, तपसाधना मनाचा संयम, निग्रह, लक्ष ...

भोग आणि ईश्वर ५०९

भोग आणि ईश्वर  ५०९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  विरक्ती म्हणजे अनासक्ती. पण अनासक्ती ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन प्रकारची असते.परिस्थिती व जबाबदारी मुळे, लादली गेल्यामुळे जर अनासक्ती आली असेल तर, त्या अनासक्तीला अनैच्छिक अनासक्ती म्हणावं लागेल. म्हणजे एखादी गोष्ट, वस्तू मला हवी आहे, पण परिस्थिती मुळे मला माझी ती इच्छा मारून, जगावं लागतं.  म्हणजे मग खरी विरक्ती कशात आहे किंवा कशाला म्हणता येईल. मुळात  खरी विरक्ती यायला आणि आसक्ती जायला, माणसाला खऱ्या ज्ञानाची गरज आहे.खरं ज्ञान म्हणजे लौकिक जगताचं ज्ञान सोडून पारलौकिक जगताचं, विश्वाच्या नियंत्याचं, कर्माचं, कर्मफलाचं, आत्मतत्वाचं, देहाच्या प्राप्तीचं आणि मानव जन्माचं. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, जीवनाकडे, गरजांकडे, इच्छांकडे, आसक्तीकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोन बदलून जातो.  ज्याचा सदर दृष्टिकोन बदलला आहे, त्याला खऱ्या गरजा व खरी आसक्ती, खरी इच्छा व वासना यांमधला फरक ज्ञात होतो. त्या ज्ञानाने, चर्मचक्षूंच्या पलीकडे असलेल्या, मनःचक्षुना दृष्टी प्राप्त होते किंवा असलेली उघडली जाते. माणूस अंतर्मुख होऊन, माझ्यातील खर...

ज्ञानेश्वरी भावार्थ ८

ज्ञानेश्वरी भावार्थ ८  अध्याय ६ ओवी १३७  देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ॥६-१३७॥  या अध्यायात या टप्प्यावर माऊली अर्जुनाचं गुणगान करण्यात मग्न आहेत. माऊली स्वतः म्हणतात सुद्धा की, मला आता का कुणास ठाऊक पण भगवंतापेक्षा, गीते पेक्षा किंवा त्या युद्ध प्रसंगात भगवंतांनी गीता कथन केलं, यापेक्षाही, भगवंताच्या या परम भक्ताचं कौतुक आणि प्रेम जास्त वाटतं. हे म्हणणारे स्वतः माऊली कृष्णवतार मानले जातात.  मला याचं कारण असं वाटतं, की कृष्णवतारात गीता सांगताना, कदाचित अर्जुनाचं वाटणारं कौतुक किंवा अर्जुनाबद्दल वाटणारा जिव्हाळा व प्रेम तो स्नेह, प्रसंगो पात अर्थात प्रसंगाच्या गंभीर्यामुळे, भगवंत व्यक्त करू शकले नसावेत. अर्जुनाबद्दल असलेला हा भाव अव्यक्त राहिला आणि भगवान श्रीकृष्ण यांचं हे अव्यक्त प्रेम, व्यक्त करण्याची आतुर इच्छा, अनावर झाल्यामुळे, माऊली अवतारात, त्याच श्रीकृष्णाने,सहाव्या अवतारात, अनेक श्लोकात, ते प्रेम ते कौतुक, तो अव्यक्त भाव मनसोक्त व्यक्त केलाय. अर्जुनाचं विशेष कौतुक माऊली व्यक्त करताना सांगतात  तैसा अर्जुनचि...

भोग आणि ईश्वर ५०८

भोग आणि ईश्वर  ५०८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  वैराग्य या शब्दाचा खूप मर्यादित आणि संकुचित अर्थ, आपण कायम बघत वाचत आलेलो आहोत  वैराग्य आणि संन्यास यांचा परस्परांशी संबंध लावला जातो, पण तो पूर्ण अर्थ ध्वनित करत नाही. याचं कारण वैराग्य म्हणजे संसार प्रपंच सर्व सोडून, जीवनाकडे फक्त अध्यात्मिक अंगाने आणि त्याच उद्देशासाठी पाहून, भक्तीरस सोडून जीवनातील बाकी सर्व रस शुष्क करणे म्हणजे वैराग्य असा अर्थ कायम गृहीत धरला जातो.  वैराग्य म्हणजे सर्वसंगपरित्याग करून राहावं, असा याचा अर्थ आपण गृहीत धरलाय. एका अर्थाने ते योग्य असलं तरी, त्याने वैराग्य वृत्ती  म्हणजे काय हे ध्वनित व अधो रेखित होत नाही. वैराग्य या शब्दाचा संधीविग्रह केल्यास  तो शब्द वि + राग या शब्दाचा बनलेला आहे. शब्दशः अर्थ आहे, रागापासून विलग होणं. पण व्यापक अर्थाने मनाला ग्रासणाऱ्या रोगांपासून स्वतःला  विलग करणं. म्हणजेच मनाला नियंत्रित करणारे किंवा करू शकणारे असे जे भवरोग आहेत, त्यांपासून मनाला मुक्त करणं. मुक्त म्हणजे विलग करणं म्हणजेच वैराग्य.  पण हा व्यापक अर्थाने अभिप्रेत असलेला अर्...

भोग आणि ईश्वर ५०७

भोग आणि ईश्वर  ५०७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मोह लोभ द्वेष क्रोध हे सर्व काही मर्यादेत असल्यास,त्या जीवनात आनंद निर्माण करतात. यातील सर्व रिपू या साठी आहेत की, यांच्या प्रभावात आलेला मनुष्य, आपलं संतुलन कधी हरवून बसेल ते सांगता येणार नाही. पण यांचा सत्कार्या साठी किंवा सद् हेतूने उपयोग, काही कारणास्तव करता येऊ शकतो. पण ही मर्यादा पाळणं किंवा त्याचं उल्लंघन होऊ न देणं, हे समजायला आणि जमायला तेवढाच निग्रह आणि स्वनियंत्रण अत्यंत महत्वाचं आहे.  उदाहरणार्थ शत्रूंशी वागताना किंवा त्यांच्याशी युद्ध प्रसंगात त्या शत्रूबद्दल क्रोध आणि द्वेष असावा,ज्यायोगे आपल्या सैनिकांना त्वेषाने त्या शत्रूवर तुटून पडता येईल आणि शत्रूचा निःपात करता येईल. पण हा क्रोध व द्वेष इतकाच असावा की, तो आपल्या नियंत्रणात असेल. म्हणजेच मर्यादा हा या जगतात सुखाचं जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे.याचा प्रत्यय सद्यस्थितीत आपल्याला येतो आहेच.  विशेषतः इंटरनेट, समाज माध्यमं, त्यावर वावर, अनेक फसव्या साईट्स वगैरेंचा येणारा अनुभव या सर्वात आणि आताच्या धकाधकीच्या जीवनात एकूणच वागण्यातील, बोलण्यातील, खाण्याती...

भोग आणि ईश्वर ५०६

भोग आणि ईश्वर  ५०६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मायेबद्दल आपण बरंच चिंतन केलं, आज, मायेची अपरिहार्यता का यावर चिंतन करूया. मायेच्या प्रभावात जगाचे सर्व व्यवहार अव्याहतपणे सुरू आहेत. किंबहुना माया नसेल तर हे जगत कसं असेल आणि कसं चालेल याची कल्पना करता येणार नाही, इतकी माया चहुबाजूंनी विश्वाला व्यापून आहे. भगवंता नंतर विश्व व्यापून उरलेली दुसरी गोष्ट म्हणजे माया.माया म्हणजे विश्वरूप चैतन्याचा तो आविष्कार, ज्यामुळे विश्वाला गती, चालना आणि चैतन्य प्राप्त होतं.  विश्वातील प्रत्येक वस्तूला प्रेरणा देऊन कर्म करण्याची बुद्धी, इच्छा निर्माण करते. म्हणजे विश्वाचा कार्यकारण भाव माया आहे. मय शव्दाचा अर्थ व्याप्त व्यापणे. जसं ब्रह्ममय,ज्ञानमय, विज्ञानमय. म्हणजेच माया ही जगताला व्याप्त करणारी ती शक्ती आहे, जिच्यामुळे या विश्वाचा खेळ, भगवंत खेळत आहेत. म्हणून जिथे भगवंत तिथे माया आहे. याचाच दुसरा अर्थ होतो की, जिथे माया आहे, तिथे तिच्या जवळ भगवंत असतात किंवा असणारच.   म्हणजेच यातून ध्वनित होणारा अजून एक गहन अर्थ हा आहे की, माया ही बुद्धी व मन यांसह सर्व चराचर व्यापून आहे....

भोग आणि ईश्वर ५०५

भोग आणि ईश्वर  ५०५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  माया म्हणजे या जगतात जीवाला बांधून ठेवणारी, सर्व खेळ करवून घेणारी आणि तरीही कधीही  मानवाच्या आवाक्यात नसणारी अशी अद्भुत शक्ती आहे. जिच्या निर्मितीचं कारण स्वतः प्रभू आहेत, म्हणजे त्यामागे त्यांचा काहीतरी साकार7 उद्देश असणार. म्हणूनच त्यांना मायापतीसुद्धा म्हटलं जातं. अशी ही माया कालच्या इंटरनेट, त्यावरील समाजमाध्यमं, इंटरनेटवरील वेगवेगळे खेळ, या सर्व जंजाळात तुम्हाला गुंतवून, आपण नफा कमावणार्या कंपन्यांच्या तटस्थतेप्रमाणे असते.  माया कधीही कुठे गुंतत नाही.  पण जीवाला बद्ध करणारी व्यवस्था आहे. माणसाला एखाद्या खेळात गुंतवून, त्यातून, त्या जीवाला जन्ममरण फेऱ्यात फिरत ठेवणं, हे मायेचं कार्य. पण ते सर्वार्थाने, जीवाच्या विरुद्ध किंवा जडजीवाला बद्ध करणारं असतं असं नाही. म्हणजे जीवनाला मानवाला कार्यरत वा कर्मरत ठेवण्याचं काम सुद्धा माया करते.  मायेला पूर्ण चांगलं किंवा वाईट असं प्रमाण देता येणार नाही. म्हणजे सद्यस्थितीत समाजमाध्यमं व इंटरनेट सारखं, त्या मायेचं स्वरूप आहे. जरा खोलात जाऊन विचार केला तर, विकासाच्य...

भोग आणि ईश्वर ५०४

भोग आणि ईश्वर  ५०४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  माया म्हणजे काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. मुळात माया ही चांगली वा वाईट असा काहीही प्रकार नाही. कारण खेळ माया खेळते, तेंव्हा मती आपलीच कार्य करते. कारण तो खेळ, आपण स्वमनाने किंवा समोहनाने खेळतो. पण यात सहभागी कोण होतं हे ठरवणं, थोडं क्लिष्ट आहे. सध्याच्या काळातील एखादं उदाहरण घेऊया, म्हणजे आपल्याला कदाचित काही सापडतं का ते समजेल.  सध्या इंटरनेट, मोबाईल या काळात, मोबाईलवर अनेक समाजमाध्यमं कार्यरत आहेत आणि अनेक खेळांच्या साईट्स सुद्धा आहेत. हे सर्व अनेक मार्गानी आपल्याला प्रलोभनांचं आणि आकर्षक जाहिरातींचं वेष्टन गुंडाळून, मोह आपल्यापुढे मांडतात. ही झाली माया. इथे ती काही व्यावसायिक कंपन्यांसाठी कार्य करते. उद्देश तुम्हाला गुंतवून, तुमचा वेळ घेऊन, तुमच्या महिन्याच्या इंटरनेट पॅक मधील काही भाग, त्यांना हवा असतो. तो कसा मिळतो, तर कार्य सहजसोप्प आहे.  तुम्ही जितका वेळ एखाद्या साईटवर किंवा समाज माध्यमावर असाल, तितका तुमच्या इंटरनेट वापराच्या वेळावर अवलंबून पैसे, तुमच्या इंटरनेट पॅकमधून सदर गेम कंपनी, समाज माध्यमाची...

भोग आणि ईश्वर ५०३

भोग आणि ईश्वर  ५०३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आपण जास्त गोंधळात तेंव्हा पडतो, जेंव्हा आपण विरोधा भासाचा अनुभव घेतो.म्हणजे आपण चांगलं कर्म करणारी,  सन्मार्गी माणसं, दीर्घकाळ भोग भोगताना आणि वाईट विचारांची आणि वाईट मार्गातील व्यक्ती सुखासीन आयुष्य जगताना दिसतात. हे दोन्ही विरोधा भास आपण सद्यस्थितीत पाहतो,अनुभवतो आणि आश्चर्यचकित होतो. याचं कारण आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकली वा वाचली आहे की, चांगलं वागलेल्याचे परिणाम चांगले होतात.  किंवा चांगल्या कर्माची फळं चांगली मिळतात. पण याबद्दल पूर्ण ज्ञान आपल्याला दिलं जात नाही की, सर्व कर्मांची फळं ही भोगावीच लागतात आणि त्यातून सुटका होत नाही. त्यामुळे आपण करत असलेली सर्व कर्म, आधीच्या केलेल्या कर्मांच्या क्रमात कधी व कितवी आहेत. त्यांच्या फलरूप होण्याचा क्रम कसा आहे आणि ती कधी व कशी आपल्याला भोगावी लागणार हे कोणालाही सांगता येणार नाही.  यामध्ये संचितातील ठेव किती आहे व ती जमा कर्मांची आहे की खर्चाच्या बाकीतील आहे, हे विधाता सोडून कोणीही जाणत नाही. इतक्या सर्व गोंधळात आपलं वर्तमानातील कर्म आणि त्या कर्माची फलीतं, या...

भोग आणि ईश्वर ५०२

भोग आणि ईश्वर  ५०२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)       .  ईश्वर हा, म्हटलं तर चराचरात आहे, म्हटलं तर जगताच्या पार आहे, असं आपण अनेकदा वाचलं असेल. त्याचा अर्थ खोलात जाणून घेऊया.हे जगत निर्मिलं ते, ईश्वराच्या नाभीकमळातून जमलेल्या ब्रम्हदेव यांनी. सप्तलोक, सप्तपाताळ, सप्तस्वर्ग असे तीन लोक निर्माण करून, श्रीजगदीश्वर यांच्या मनोसंकल्पाचं रूपांतरण सत्यात आणलं. पण हे सत्यात आलेलं जगत शेवटी कधीतरी नष्ट होणार आणि पुन्हा नवनिर्मिती होणार. अर्थात आपल्या परिमाणात त्याला कित्येक कोटी वर्ष किंवा कित्येक युगं लोटणार.  म्हणजे आपल्या दृष्टीने ते वास्तव आहे. कारण आपण आहोत देहधारी जीव. देहधारी जीवांना अनेक मर्यादांचं बंधन आणि सीमा आहेत. मुख्य सीमा आहे ती जन्माची. म्हणजे ज्या जन्मात आपण आहोत, त्याच जन्माचं आपल्याला जास्तीतजास्त स्मरण होतं किंवा राहातं. त्यातही देहाच्या तीन अवस्थांचं बंधन आहेच. म्हणजे जे बालपणी असेल ते तरुणपणी नसेल, जे तरुणपणी असेल ते वृद्धअवस्थेत नसेल. म्हणजे मर्यादा हा एक प्रकारे शाप दिलाय असं म्हटलं तरी चालेल.  अजून एक मर्यादा म्हणजे माया व षड...

भोग आणि ईश्वर ५०१

भोग आणि ईश्वर  ५०१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)       खरंतर ईश्वराची इच्छा आणि सदिच्छा लहरी या पूर्ण शुद्ध, अतिसात्विक आणि सकारात्मक असतात. फक्त आणि फक्त जगताचं कल्याण आणि विश्वातील प्रत्येक जीवाची उन्नती आणि मुक्ती, ही एकमेव गोष्ट विश्व नियंत्याच्या मनात, हृदयात आणि परमांशस्वरूपातील आत्मतेजात आहे. खरतर या जगतात आलेला प्रत्येक जीव हा आनंदी असावा, उल्हसित असावा, सकारात्मक भावात असावा आणि षड्रिपूंप्रमाणे निराशा कधीही कोणत्याही जीवाला स्पर्श करता कामा नये, यासाठी कोमल हृदय  ईश्वर नेहमी चिंतनात असतो.  ईश्वराने अखंड ध्यानग्रस्त असताना सुद्धा, या जगताच्या कल्याणार्थ, एकसूत्री व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. त्यामाध्यमातून स्वतः ईश्वर या जगताचं नियंत्रण, संचालन व प्रशासन करत असतो. म्हणजे असं म्हणता येईल की, ब्रम्हादी अनेक स्वरूपं ही या ईश्वराची प्रतिरूपं आहेत. किंवा ईश्वराच्या अवलोकनाचे, नियमनाचे, संचालनाचे व नियंत्रणाचे कर, दृष्टी आणि ज्ञान यांची इंद्रियं आहेत असं म्हटल्यास, ते योग्य ठरेल. या अनेक ज्ञान व कर्म करण्याच्या इंद्रियांनी, ईश्वर कर्म करतच ...

भोग आणि ईश्वर ५००

भोग आणि ईश्वर  ५००  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)       आज या ।मालिकेला ५०० दिवस पूर्ण झाले. सलग ५०० दिवसात सलग ५०० लेख (रोज एक या प्रमाणे) लिहिणं  आणि तो रोजच्या रोज पोस्ट करणं, ही किमया फक्त माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पूर्ण कृपेने साध्य झाली. त्यांच्या अलौकिक सान्निध्याची जाणीव नित्य मला माझ्या आयुष्यातील अनेक घटनांमध्ये जाणवली आहे आणि जाणवते आहे. त्यामुळे या ५०० दिवस व ५०० लेख याचं पूर्ण श्रेय मी माझ्या सद्गुरूंना देईन.  पण या मालिकेला यशस्वी करण्यात तितकाच महत्वाचा वाटा माझ्या हजारो वाचकांचा आहे. मी त्यांचासुद्धा आजन्म ऋणी राहीन. आज ही मालिका ऑडिओ माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोचते आहे आणि जवळजवळ ३५० भागांचं ऑडिओ पूर्ण होऊन ते व्हाट्सऍप माध्यमातून सर्वांपर्यंत पोचत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या मालिकेवर एक पूर्ण लेख लवकरच पोस्ट करीन. त्यांना पुन्हा एकदा वंदन करून आजच्या भागाला सुरवात करूया. भोगांच्या आपत्तीला सुरवात खरंतर कर्माचं फल यास्वरूपातच होते. पण ते आपल्या आयुष्यात येण्याचा, आपल्या दृष्टीने काळ चुकलेला ...

भोग आणि ईश्वर ४९९

भोग आणि ईश्वर  ४९९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)       स्मरण आणि शरण याबद्दल इतकं दीर्घ विवेचन झाल्यावर खरंतर मनाला सहजी याकडे वळवता आलं पाहिजे. पण असं होत नाही. याचं कारण मन हे समजून घेण्यास आणि त्या मनाला समजावून सांगणं अत्यंत कठीणआहे कारण मन हे स्वयंचलित व स्वयंप्रेरीत इंद्रिय आहे. मुळात त्याची समजून घेण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची तयारी, ही त्याच्या लवचिकतेवर अवलंबून आहे. ती लवचिकता वा elasticity ही मनातील अहं, दंभ क्रोध, लोभ इत्यादी असुरांवर अवलंबून आहे.  मनातील हे असुर,नेहमी अश्यावेळी डोकं वर काढतात, ज्यावेळी मनाला स्थिर करण्याची जास्त गरज असते. अश्यावेळी मुळात मनाला काही समजत नाही किंवा समजलं तर उमजत नाही. पण हे न उमजणं आपण स्वीकारून पुढे जातो आणि मग तो आपल्या वृत्तीचा, स्वभावाचा व वागणुकीचा भाग होतो.  मग यावर काय उपाय करावा, जेणेकरून आपल्याला मनाला नित्य, ईश्वर स्मरणात व शरणात ठेवता येईल.  आपण ऑफिसमध्ये काम करताना, वेगवेगळ्या कामांचे तपशील नोंदवून, त्यांची रोजनिशीत किंवा दैनंदिनीत, कामाच्या त्या त्या दिवशी नोंद करून ठेवतो आणि ते रोज...

भोग आणि ईश्वर ४९८

भोग आणि ईश्वर  ४९८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)       ही मालिका आता आटोपती घ्यावी असा विचार येत आहे. शक्य असेल तिथपर्यंत लिहिणं सुरू ठेवीन. पण या मालिकेला निवृत्ती द्यावी असा विचार येत आहे. निर्णय श्रीमहाराज घेतील.  सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।  यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  स्मरण आणि शरण या दोन अलौकिक भावातून, विश्वास, श्रद्धा हा भाव आपोआप प्रकट होऊन, प्राणीमात्रांना त्यांच्या कर्मातून मुक्त होता यावं, यासाठीच वरील दोन श्लोक प्रभुवचन आहे. प्रभुवचन यासाठी की, एक स्वतः भगवंतांनी स्वमुखे कथित केलं आहे, दुसरं व्यासांच्या माध्यमातून मांडलं आहे. पण दोन्ही भगवत् वचन यासाठी की व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे हे देखील सहस्रनामात मांडण्यात आलेलं सत्य आहे.  त्यामुळे दोन्ही वचनं एकत्रीत वाचून, त्यांचा मतितार्थ लावणं गरजेचं आहे. बरं ही वचनं का दिलीत, तर जगतकल्याणार्थ. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर भक्तीची, योगाची काहीही अंगं आली ना...

भोग आणि ईश्वर ४९७

भोग आणि ईश्वर  ४९७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     शरण, स्मरण श्रद्धा यांची एकत्रित नितांत आवश्यकता असते. श्रद्धा किती महत्वाची ते आपण गेल्या दोन तीन भागात पाहिलं. स्मरण आणि शरण हे एकत्रित का असावेत यासाठी गीतेतील आणि विष्णूसहस्त्रनामतील एक एक अश्या दोन श्लोकाचा आधार घेऊन, त्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ते दोन श्लोक पूढीलप्रमाणे :  सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।  यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  एक श्लोक म्हणजे भगवंताचं स्वतःचं वचन आहे. ज्यामध्ये ते आग्रहाने मांडतात की, सर्व धर्मांचा म्हणजे सर्व कर्म,कर्मफल, कर्तव्य यांचा त्याग करून, मला एकट्याला शरण ये. आता त्यज्य म्हणजे त्यागणे. पण त्याच गीतेत अर्जुनाला, भगवंत स्वतः सांगतात की, धर्माचा त्याग करणं हे महापाप आहे. मग याची सांगड कशी घालायची. मुळात धर्माचा त्याग करणे म्हणजे इतिकर्तव्यता करताना, त्याच्या फलावर असलेला आपला मूलभूत अधिकार, आपली आसक्ती, आपल्या वासना, इत्यादींचा मोह त्यागणं. ...

भोग आणि ईश्वर ४९५

भोग आणि ईश्वर  ४९५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  ईश्वर हा वास्तविक अर्थाने आणि जगताचा, ब्रह्मांडाचा निर्माता अर्थात जन्मदाता या अर्थानेसुद्धा, मायमाऊली आहे.  ईश्वराच्या हृदयात, जगासाठी ब्रह्मांडातील चराचरा साठी निर्मळ आणि शुद्ध प्रेम आहे आणि असतं. प्रत्येक चल जीव व अचल वस्तू यांना भगवंत एक पुत्र म्हणूनच पाहतो आणि वागवतो. कर्माचा लेखाजोखा जो आपणच लिहितो, तो कर्मातील दोषांमुळे चुकीचा किंवा अनिष्ट घडतो आहे, हे पाहून, सर्वात जास्त वाईट, मायमाऊली या नात्याने, ईश्वराला वाटतं.  ईश्वराचं हे अलौकिक आणि नित्य प्रेम प्रत्येक प्राणी मात्राला प्राप्त व्हावं अशी ईश्वराची स्वतःचीसुद्धा इच्छा असते. परंतु आसमंतात विहरणाऱ्या या ईश्वरी प्रेमाच्या लहरी, प्राप्त करून, त्याच्या कृपेची पात्रता प्राप्त करणं हे फक्त जीवाच्या हातात आहे. त्याचसाठी नित्य त्या ईश्वरी शक्तीचं स्मरण आणि।त्या शक्तीला शरण जाण्यासोबतच त्या शक्तीवर, त्याच्या सामर्थ्यावर आणि त्याच्या निरंतर कृपा लहरीवर पूर्ण श्रद्धा असणं, ह...

भोग आणि ईश्वर ४९४

भोग आणि ईश्वर  ४९४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  स्मरणे म्हणजे एखाद्या गोष्टीला,क्रियेला, व्यक्तीला स्मरणात ठेवणे. म्हणजे विस्मरण होऊ न देणे. यामध्ये बुद्धी, मन आणि या दोन्हीना जोडणारा देह या तिन्हींचा सहभाग अपेक्षित आहे. एखादी गोष्ट विस्मृतीत जाऊ नये किंवा मुद्दाम लक्षात राहावी म्हणून व्यवहारात आपण खास उपाय करतो. आजकाल तर आपण स्मरणात राहण्यासाठी reminders set करतो. अगदी संगणक, भ्रमणध्वनी यामध्ये विशेष सोयी करून घेतो.  त्यानुसार त्या त्या वेळी आपल्याला यंत्रणेकडून आठवण करून दिली जाते आणि आपण त्या गोष्टी वा ती क्रिया करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे महत्वाचं आहे ते विसरून जाऊ नये यासाठी आपण विशेष जागरूक असतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे एकतर ती गोष्ट करण्यात आपला काही लाभ होणार असतो किंवा न करण्यात काही हानी होणार असते. म्हणजे लाभ आणि हानी यांच्याशी आपल्याला काही देणंघेणं असतं, तिथेच आपण जागरूक असतो, असं सर्वसामान्यपणे म्हणता येईल.  काही लाभ हानी हे व्यावहारिक व प्रापंचिक अस...

भोग आणि ईश्वर ४९३

भोग आणि ईश्वर  ४९३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  आपण ज्या विषयासंदर्भात चिंतन करत आहोत, त्या शरणागती बाबत मनात अनेक विकल्प उभे राहतात. त्या विकल्पातून, शंकाकुशंका, इष्ट अनिष्ट विचार येतात. याचं कारण म्हणजे मनात सकार  व नकार भरलेला आहे. तो मनातून तो आत्म्याला देखील ग्रासून उरतो. सर्व शंका, संशय, संदिग्धता या मनातूनच उत्पन्न होतात. मुळात त्या तिथे असतात, फक्त काहींच्या बाबतीत, ते भाव विशेष प्रकट होऊन, मनावर राज्य करतात.  या व्यक्तींना अंशतः ते संपूर्ण अश्या वेगवेगळ्या प्रमाणात, या शंका, संशय व संदिग्धता या भावांनी ग्रासलेलं असतं. ग्रासणं या शब्दातच,ते भाव मनाचा घास घेतात हे अध्याहृत आहे. पण हे ग्रासणं कायमस्वरूपी, तेंव्हा असेल ज्यावेळी ते, संपूर्णपणे मनाला ताब्यात घेतं. हे भाव मनात हळूहळू ते अतिजलद पसरतात. त्यामागचा तर्क किंवा कारण असं आहे की, मनाच्या कुवतीवर यांचं प्रवेशणं ते प्रसारित होणं अवलंबून आहे.  कुवत म्हणजे मनाची स्वतःची शक्ती, बल व ऊर्जा. म्हणजे जर मनाच...

भोग आणि ईश्वर ४९२

भोग आणि ईश्वर  ४९२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  काल म्हटल्याप्रमाणे, शरणागती म्हणजे, उत्तर शून्य धरूनच सर्व गणित सोडवायचं असतं. म्हणजे शून्य उत्तर गृहीत धरून, ते शून्य उत्तर प्राप्त करण्यासाठी,कर्मफल, अपेक्षा  इच्छा, आकांक्षा, भावभावना, म्हणजेच जिथे जिथे मनाची गुंतवणूक होऊ शकेल वा होण्याची शक्यता आहे, ते सर्व सोडून देणं. मनाची गुंतवणूक म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी, शून्य म्हणजे काय याचा विचार करूया.  शून्य म्हणजे जिथून आलो, ते स्थान वा स्थिती. ती स्थिती वा ते स्थान म्हणजे, ईश्वरी परम अंशात अर्थात महा शून्यात विलीन होणं. ज्याला मुक्त होणं सुद्धा म्हटलं जातं. पण हे शून्य प्राप्त करण्यासाठी, या शून्यात डोकावून बघावं लागेल. या शून्यात आत्मतत्त्व शुद्ध स्वरूपात अस्तित्वात आहे. याचाच अर्थ आधी आत्म्याची शुद्धता प्राप्त करून, मग मोक्ष वा मुक्तीचा विचार करावा लागेल. आत्मशुद्ध होण्यायासाठी, मन बुद्धी यांना शुद्ध करणं गरजेचं आहे.  चित्तशुद्धीचे  अनेक मार्ग आहेत आणि त्या ...

भोग आणि ईश्वर ४९१

भोग आणि ईश्वर  ४९१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  शरणागती किंवा शरण जाणं, यावर आपण चिंतन करत आहोत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की हे भगवंताचं ब्रीद आहे की,शरण आलेल्याला,ते कायम तारतात. म्हणजे शरण आलेला जीव हा दयेस पात्र असतो. अर्थातच ईश्वराची दया म्हणजे अलौकिकच असणार. शरण जाण्याची काही परिमाणं आहेत का किंवा काही व्याख्या करता येईल का. तर नक्कीच करता येईल.  सर्वात प्रथम म्हणजे शरणागती ही बिनशर्त असते, म्हणजेच unconditional असते किंवा असलीच पाहिजे. कारण काही अटीशर्ती घालून केली जाते ती शरणागती नसते तर, निव्वळ व्यवहार असतो. अर्थातच ईश्वर सर्व व्यावहारिक व सांसारिक गोष्टींच्या पलीकडे असलेली, या जगताला नियंत्रित करणारी शक्ती आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अटी ठेवून, शरण जाऊ शकत नाही.  बर अटी नाहीत, पण निदान काही अपेक्षा मागणी वा निदान इच्छा तरी असावी का. तर अजिबात नाही. कोणत्याही इच्छेला वा मागणीला शरणागतीत स्थान नाही. काही विशिष्ट हेतू मनात धरून, आपण ईश्वर चरणी शरण जाऊ शकतो...

भोग आणि ईश्वर ४९०

भोग आणि ईश्वर  ४९०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  शरण शब्दाच्या अर्थात आपण आपल्या मनातील सर्व भाव समर्पित करणं अपेक्षित आहे. किंबहुना खऱ्या अर्थाने शरण जाणं, हे समर्पण भावाशिवाय अशक्य आहे.  शरण जाणं म्हणजे मनातील।सर्व किंतु, परंतु, हेतू वा इतर सर्व भाव, त्यागून, मात्र, ज्याला आपण शरण गेलो आहोत, त्याच्या इच्छा आकांक्षा, या आपल्या मानून त्यानुसार व त्यासाठी कार्य करणे. व्यवहारात, आपण अडचणीत आलो, कंटाळलो किंवा मेटा कुटीला आलो की आपल्याला मदत करू शकणाऱ्या व्यक्तीला आपण समर्पण भावाने शरण जाऊन, मदतीची याचना करतो.  यामध्ये, त्याचं श्रेष्ठत्व आणि आपलं कनिष्ठत्व हे आपण एकप्रकारे मान्यच केलेलं असतं. पण ते काही कारणा साठी किंवा अपेक्षेने शरण जाणं म्हणता येईल. म्हणजे आपल्या आयुष्यात काही गोष्टी अनपेक्षित घडत असल्या मुळे, आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी वा आपली गरज भागवता यावी म्हणून, आपण एखाद्या ज्येष्ठ वा परिस्थितीने श्रेष्ठ असलेल्या, व्यक्तीला आपलं गाऱ्हाणं मांडून, मदतीची अपेक्...

भोग आणि ईश्वर ४८९

भोग आणि ईश्वर  ४८९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  काल आपण अंतिम आणि तरीही सर्वात श्रेष्ठ असा शरणागती हा उपाय पाहिला. त्यावर पुढे चर्चा करण्या आधी इतर बाबींबद्दल बोलूया. मनाला शरण जाणं ही गोष्ट शिकवावी तेंव्हा लागेल, जेंव्हा त्या मनाला शरण जाण्याची सवयच नसेल. म्हणजे ज्यावेळी  एखादी गोष्ट करण्याची मनाला किंवा देहाला सवय नसेल. कारण सवय नसलेली किंवा अति प्रयासाने प्राप्त कराव्या लागणाऱ्या गोष्टीसाठी मन सहज तयार होत नाही.  याचं कारण मन हे नेहमी सहज जमणाऱ्या किंवा सवयीच्या असलेल्या कर्मांनाच प्रथम प्राधान्य देतो. त्यानंतर नाईलाजाने किंवा निरुपाय झालाच तर इतर मार्ग शोधण्यासाठी विचार आणि गरजेनुसार कृती करतं. हा मानवी स्वभाव आहे. म्हणजेच मनाची ही वृत्ती आहे किंवा मनातील अहं असेल किंवा अज्ञान असेल की, जी गोष्ट सहज चालीत सहजरीत्या प्राप्त होईल किंवा होते, त्या गोष्टी, कर्म करायची आणि चाकोरी सहसा मोडायची नाही.  व्यवहारातसुद्धा आपण पाहिलं असेल की, बहुतांश लोकं आजच्या पानावरु...

भोग आणि ईश्वर ४९६

भोग आणि ईश्वर  ४९६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  आपण काल पाहिलं की श्रद्धा ही विश्वासाची परिसीमा आहे. म्हणजेच विश्वास हा जेंव्हा शतशः असतो किंवा संपूर्ण असतो, त्यावेळी तो श्रद्धेचं रूप घेतो. वास्तविक अर्थाने आपण एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा पूजनीय व्यक्तित्व आपल्या अस्तित्वापेक्षाही परम सत्य मानतो, त्यावेळी तिला श्रद्धा म्हटलं जातं. आपण श्रद्धेच्या माध्यमातून आपल्या आराध्याला आपल्याहून भिन्न मानत नाही, त्यावेळी श्रद्धा दृढ झाली आणि मी व आराध्य यात काही अंतर उरलं नाही, अशी दृढता व विश्वास त्यात निर्माण होतो.  अनेकांना या गोष्टीचा वा भावाचा प्रत्यय त्यावेळी येईल किंवा येतो, जेंव्हा श्रद्धेचा भाव मनातील इतर सर्व भावांना व्यापून उरतो. त्यावेळी श्रद्धा मनातील सर्व केंद्रांवर वा शक्तीस्थानांवर विराजित होते. अर्थात आपल्यातील इतर सर्व भाव, त्या एकाच भावात लुप्त होऊन, एक अलौकिक भाव तयार होतो. अश्या स्थितीला मानव येण्यासाठी स्मरण, शरण व श्रद्धा या त्रिसूत्रीचा दृढतेने अवलंब अत्यंत महत्वाच...

श्रीविष्णुसहस्रनाम श्लोक १२-२

 दुसऱ्या ओळीचा अर्थ आज पाहूया.  श्रीविष्णुसहस्रनाम श्लोक १२  अनादि निधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरम् । लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्व दुःखातिगो भवेत् ॥ १२ ॥  लोकाध्यक्ष म्हणजे समस्त लोकांचा अर्थात ब्रह्मांडातील सर्व सात लोक आणि त्या सात लोकांमधील सर्व जिवा त्मक जीवित व चैतन्यमय अर्थात देहधारी आणि देहरहित अश्या सर्व लोकांचा अधीक्षक अर्थात प्रमुख पुरुष असलेल्या श्रीविष्णूंचं स्तवन, अर्थात पूजा अर्चना बाह्यांगी आणि अंतरंगी नित्य स्मरण ध्यान जप केल्याने प्राणी सर्व प्रकारच्या दुःखातून पार होतो. सर्व दुःख म्हणजे देहिक, दैविक आणि अध्यात्मिक अश्या तीनही प्रकारच्या दुःखातून जीव मुक्ती मिळवतो.  इथे मुक्ती या शब्दाचे दोन।अर्थ अभिप्रेत आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष दुःखमुक्ती म्हणजे व्याधी, ताप रहित होणं. व्याधी अर्थात शारीरिक आणि ताप अर्थात बौद्धिक मानसिक व आत्मिक. दुसऱ्या अर्थाने मनुष्य येणाऱ्या सर्व दुःख ताप यांच्या परिणामातून भयमुक्त होतो आणि फक्त श्रीविष्णुपूजन भजन यातच पूर्णतः रममाण होऊन, देहाच्या, मनाच्या बुद्धीच्या आणि आत्मिक तापांना विसरून जातो, त्यांचा दाह देह व मन यां...

श्रीविष्णुसहस्रनाम श्लोक १२-१

श्रीविष्णुसहस्रनाम श्लोक १२ - पहिली ओळ  अनादि निधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरम् । लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्व दुःखातिगो भवेत् ॥ १२ ॥  पहिल्या ओळीचा अर्थ जाणून घेऊया.  अनादी म्हणजे ज्याला आदी आणि अंत नाही असा. म्हणजेच जो सृष्टीच्या उत्पत्ती आधी अस्तित्वात होता आणि सृष्टीच्या लया नंतरसुद्धा ज्याचं अस्तित्व असणार आहे असा.  अनादी याचा अजून एक अर्थ म्हणजे ज्याच्यापासून अनाहत नाद उत्पन्न होतो किंवा कुंडलिनी तील चवथ्या चक्रात अर्थात अनाहत चक्रात  कायम विराजित असलेला आणि देहापश्चात तेथून गमन करणारा, पण नष्ट न होणारा.  अनादिनिधनं याचा एक अर्थ म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय अर्थात जन्माला येणं, वाढ होणं, परिवर्तन होणं, क्षय होणं, वृद्धावस्था येणं आणि नष्ट होणं अर्थात मृत्यू होणं, या सहा विकारांच्या जो पलीकडे आहे असा.  विष्णू म्हणजे सर्व व्यापणारा आणि सर्व व्यापून पुनः उरलेला अर्थात सर्वत्र भरून राहिलेला असा सर्वव्यापक, सर्वव्यापी. विश्व व्यापी असा जो अणू तो विष्णू.  सर्वलोकं महेश्वरम म्हणजे सर्व लोकांचा महान ईश्वर अर्थात सर्वस्व असलेला. ईश्वर म्हणजे त्राता ...

भोग आणि ईश्वर ४८८

भोग आणि ईश्वर  ४८८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  काल आपण पाहिलेल्या तीनही उदाहरणात एक समान सूत्र आहे. त्या आधी त्यांचं वैशिष्ट्य पाहूया. भोवरा खाली निमुळता होत जातो आणि मोठ्या परिघाकडून अर्थात वरून वस्तू खाली लहान परिघाकडे, खेचून नेतो. म्हणजे गुरुत्वाकर्षण दिशेने. वावटळ खाली निमुळती असते आणि वर आकाशाकडे तिचा परीघ वाढत जातो.वस्तू कमी परिघाकडून मोठ्या परिघाकडे जाऊन बाहेर फेकली जाते. कृष्णविवर हे आडवं असतं. वस्तू कृष्ण विवरात जाऊन नष्ट केली जाते.  या तीनही उदाहरणातील भेद पाहिल्यावर आता समानता पाहूया. तिन्हींची वस्तू खेचण्याची क्षमता अलौकिक असते. तीनही वस्तू नष्ट करतात किंवा गिळंकृत करतात. तीनही अर्थातच आपल्या चैतन्यात, बाहेरून आलेल्या वस्तुचं चैतन्य लुप्त करतात किंवा समाविष्ट करतात.  आता या तीनही गोष्टीतून वाचण्याचा किंवा तारून जाण्याचा उपाय काय.  एकच उपाय आहे, तो म्हणजे तीनही शक्तींना शरण जाणं. या तीनही शक्तींची ऊर्जा आणि बल अभूतपूर्व असतं. खालून म्हणजे पाण्याकडू...