भोग आणि ईश्वर ५१६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) या संपूर्ण जगतावर असलेलं मायेचं आच्छादन, अनेक गोष्टी असाध्य करतं किंवा अनेक गोष्टीत बाधा निर्माण करतं. या मायेमुळेच, भ्रम व विस्मृती होते की, हा देह, काही काळा साठीच असून, त्या काळात वा त्या जन्मात, काय साधायचं आहे,याची मुळात कल्पना, जडजीवाच्या मनाला स्पर्षच करत नाही की, आपण का आलोय, याचा आधी शोध घ्यावा. हा प्रश्न पडतच नाही की, मी खरा कोण आहे, आतील आत्मा वा चैतन्य, जो देह चालवतो किंवा देह, ज्यायोगे आत्मा काही साध्य करू शकतो. मुळात हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे त्यावाचून काही अडतच नाही. हा प्रश्न आयुष्यात एकदाही न पडलेले अनंत जिवात्मे, करोडो वर्ष, या जगतात, जन्मो जन्मीचं दुःख, भोग, उपभोग, सुख, त्रास, आनंद हे सर्व, अनंत जन्म मागील पानां वरून पुढे असं निष्फळ आयुष्य जगतात. देहात येतात, मायेत गुंततात आणि पुन्हा विदेही होऊन, या जगतात परत परत येण्या साठी पुढील देह मिळण्याची वाट पहात राहतात. ज्यावेळी आपली बुद्धी चालत नाही, त्यावेळी, आपण आपल्या पेक्षा बुद्धिमान, विचारी जनांची मदत घेतो. अर्थात ज्यांना त्या विषयात...