Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५४

भोग आणि ईश्वर  ४५४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

प्रत्येक पंचमहाभूतरुप देहात, पाच शक्तींमधील, कोणती तरी एक किंवा अधिक शक्ती, त्या देहात, प्रारब्धवश, बलशाली असते. ती शक्ती मनाचा, बुद्धीचा आणि देहातील इंद्रियांचा ताबा, घेऊन, त्यातील मन, बुद्धी याना आयुष्यभर ग्रस्त करून, त्या मानवाचा स्वभाव वा वृत्ती ठरवते. म्हणून एखादी व्यक्ती लहानपणापासून शांत, एखादी धीरगंभीर, एखादी व्यक्ती उथळ, एखादी व्यक्ती बलशाली, एखादी विकृत असते. 

अश्याप्रकारे विविध शक्तींच्या प्रभावाने मन आणि मनाचे खेळ चालतात. अर्थात त्या व्यक्तीचं बाह्यांगी व्यक्त झालेलं मन म्हणजे त्याचं व्यक्तित्व असतं. म्हणजे बाहेर जगताला दिसणारं व्यक्तित्व पाचातील एखाद्या स्वरूपाचं प्रकट रूप आहे आणि तो त्याच्या वृत्तीचा व स्वभावाचा भाग आहे. याबाबत आपण, दोन प्रकारे बघू शकतो. 

एक म्हणजे, जर तो दोषपूर्ण स्वभाव व वृत्ती समोरच्या व्यक्तीचा वा आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचा असेल तर, आपण सर्वात प्रथम, स्वतःला त्या लहरींच्या प्रभावा पासून, दूर ठेवण्याच्या प्रयत्न करूया. दुसरं त्याच्या दोषांना जाणून आपण स्वतःत आणि त्या व्यक्तीच्या स्वभावात उपयुक्त बदल घडवण्याचा प्रयत्न करू शकतो.  याठिकाणी, मी माझा अनुभव कथन करतो. अशी व्यक्ती संपर्कात आली तर, प्रथम मी स्वतःला त्या प्रसंगात, तटस्थ करतो. 

जेणेकरून, त्यातील योग्य व अयोग्य याचा तटस्थपणे विचार करायला मन मोकळं असेल.दुसरं,त्या नकारात्मक प्रभावाचा आपल्यावर परिणाम होणार नाही. तिसरं, क्रोधीत व्यक्ती प्रत्येकवेळी चूकच असते असं नसतं. बरेचवेळा असं घडतं की, त्या व्यक्तीला आपला मुद्दा योग्य असूनही, रागामुळे, तो मांडणं जमत नाही. म्हणजे चवथा मुद्दा आपण स्वतःला तटस्थ करू शकलो की, आपण त्या प्रसंगाने अकारण प्रभावित होत नाही. 

हा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन आपण तेंव्हाच विचारात आणि कृतीत आणू शकतो, जेंव्हा आपण स्वतःच्या मनावर तेवढं नियंत्रण ठेवू शकलो आणि स्वतःच्या मनाला मार्गदर्शन करू शकलो तर. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मनाला, स्वभावाला ओळखून त्याला बदलून, तटस्थपणा शिकवणं गरजेचं आहे. यासाठी आपण स्वतःशी चिंतनरुपात संवाद करून आपलाच अभ्यास करून, आपल्याला तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करावा. 

मनाचं असं आत्मनिरीक्षण करत असताना, आपला तटस्थपणा आपल्याला जाणवत जातो. कारण एखाद्या प्रसंगात आपण, त्या प्रसंगात न गुंतून जाता, स्वतःला एक प्रेक्षक मानून, घडणाऱ्या घटना वा प्रसंग, यांना पाहणं किंवा त्याचं निरीक्षण करण्याचा आनंद घेऊन बघायला हरकत नाही. असा तटस्थपणा जमायला लागल्यानंतर, आपण कोणत्याही स्वभावाची व्यक्ती समोर आल्यानंतर त्या व्यक्तीचा वा त्याच्या स्वभावाचा अभ्यास करू शकतो. 

अश्या अभ्यासातून एक म्हणजे आपण प्रत्येकाच्या मनात बुद्धीत कोणत्या तत्वाचा प्रभाव आहे, याचा तटस्थपणे अभ्यास करू शकतो. यातून काही गोष्टी लक्षात येतील की, ज्या तत्वाचा प्रभाव असेल, त्याप्रकारचा स्वभाव बनतो व वृत्ती प्राप्त होते. म्हणजे जल तत्वाचा प्रभाव असणारी व्यक्ती, कोणत्याही प्रसंगाशी, व्यक्तींशी, घटनांशी व आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींशी सहज मिसळून व जुळवून घेऊन जातात. म्हणजे जलतत्व प्रभावित व्यक्ती कोणत्याही एका वृत्तीला वा भावाला चिकटून न राहता, जसा प्रसंग असेल त्यानुसार स्वतःला तयार करून घेऊ शकते. 

याप्रमाणे प्रत्येक तत्वांच्या व्यक्तीचा अभ्यास करून, त्याचा उपयोग, आत्मशक्ती वाढवून घेण्यासाठी कसा करून घ्यायचा, त्याचं चिंतन उद्या करूया, अर्थातच नामाच्या अभ्यासात राहूनच. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...