Skip to main content

भोग आणि ईश्वर ४३६

भोग आणि ईश्वर  ४३६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

आपण विचार या घटकावर चिंतन करत आहोत. काल पर्यंत आपण विचारांचा मनावर परिणाम, त्यांची नकारात्मक व सकारात्मक बाजू पाहिली. त्या सर्वांचा विचार करता, या निष्कर्षाला आलो की, नकारात्मक, अनिष्ट आणि अप्रस्तुत विचार जमा होत गेल्यास, त्याने देहाप्रमाणे मनातसुद्धा अविचार, वासना, गैर इच्छा वा अप्रस्तुत व त्याज्य विचार बलिष्ठ होतात वा होऊ शकतात. 

मुळात आपण संन्यस्त वा स्थितप्रज्ञ नाही. चांगले वा वाईट, चुकीचे, बरोबर व गैर असे अनेक प्रकारचे विचार मनात, बुद्धीत येतच राहणार. आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा.पण सुप्त मन ही एक अद्भुत गोष्ट आहे. त्यामुळे, बाह्य मनाने त्याज्य समजलेल्या अनेक गोष्टी, नकळतपणे त्या सुप्त मनामध्ये साठवल्या जातात. म्हणजे आपल्याला जाणीव नसतानाही, काही चुकीचे विचार व नकारात्मक गोष्टी, हे मनातून सुप्त मनापर्यंत झिरपतं. 

याचं मुख्य कारण, साध्या फडक्यातूनसुद्धा द्रवपदार्थ गाळताना काही बारीक बारीक कण झिरपून, खालच्या पातेल्यात, द्रव पदार्थांबरोबर जाऊच शकतं. मग मन व लहरीस्वरूपात असलेले विचार वा घटना,आठवणी दुःख  निराशाजनक गोष्टी, या इतक्या सूक्ष्म स्वरूपात असतात की, त्या नक्कीच मनातून झिरपत सुप्त मनात जमत जातात. त्या जागृत जाणिवेच्या पलीकडे असल्यातरी, त्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष रित्या होऊन, आपल्याला त्यांचा त्रास हा होऊ शकतो. 

म्हणून अश्या जागृत किंवा सुप्त मनातील नकारात्मक, त्याज्य लहरींचा निचरा करण्यासाठी, काही करणं आवश्यक आहे. मुळात लहरी या श्वासामार्गे देह बुद्धी व मन असा प्रवास करतात.त्यामुळे त्यांचा निचरा करण्याचा उपाय हा श्वासांशी निगडीतच असावा किंवा असला पाहिजे. म्हणूनच सहजासनात कोणत्याही शांत जागी बसून, डोळे मिटून, श्वासांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. 

सुरवातीला यात काही अडचणी जाणवतील म्हणजे एरवी नॉर्मल गतीत असणारा श्वास, नेमक्या याच वेळी जलद गतीने वा क्वचित तीव्र गतीने होत असल्याचे जाणवेल. पण याचं मुख्य कारण म्हणजे आपण श्वासांवर मन एकाग्र करत असल्यामुळे श्वास आणि मन यांच्या एकाग्रतेचा प्रयास, यांच्या असंतुलनातून, श्वासांच्या गतीचा हा खेळ काही काळ सुरू असतो. पण हळूहळू त्यातून मन आणि श्वास यांचं संतुलन होऊन, श्वास धीम्या, योग्य गतीने होत आहे आणि मन त्याच तालावर डोलत, त्या गतीचा आनंद घेत असल्याचे जाणवेल. 

या ठिकाणी काही क्षण, ते काही मिनिटं थांबून, या क्षणांचा व या संतुलनाचा आनंद घ्यावा. या क्षणी मन पूर्ण स्थिर होण्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती,जोर वा मुद्दामहून कोणतेही अतिरिक्त प्रयास करू नये. एकाग्रता ही देह बुद्धी व मन या तिन्हींच्या समन्वयातून साधली जाणारी गोष्ट असल्यामुळे, ती साधायला व्यक्तिपरत्वे वेगवेगळा कालावधी लागू शकतो. 

यामध्ये एखाद्याला पटकन सांधलं असं वाटलं तरी ते फसवं असू शकतं. कारण एकाग्रता ही मनाच्या, बुद्धीच्या व देहाच्या त्या त्या वेळच्या स्थितीवरसुद्धा अवलंबून असल्यामुळे, एखाद्या वेळेला, देह बुद्धी व मन कमी श्रमलेलं अथवा मूलतः सकारात्मक लहरींनी भरलेलं असल्यास, एकाग्रता सहज साधू शकेल. पण त्याच व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या वेळेस, मन अनेक विचारांनी भारलेलं असल्यास, ते तितक्याच सहज साधेल असं नाही. म्हणून सुरवातीला फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयास करावा. 

यापुढील क्रिया उद्याच्या भागात पाहू, पण तोपर्यंत श्वासांचा मागोवा घेण्याचा हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...