Skip to main content

भोग आणि ईश्वर ४४४

भोग आणि ईश्वर  ४४४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

आता ह्या तीन भुकांचा जो त्रिकोण आहे, ती या भूतलाची त्रिमिती आहे. कारण या भूलोकाबाहेर, या तिन्ही प्रकारच्या भुका नाहीत. त्यामुळे त्यासाठीची आसक्ती, अतृप्ती, ओढ इत्यादी काहीही नाही. म्हणजे तिथे वासना नाही त्यामुळे वासनांमागे पळणारी बुद्धी, पाळणारा देह व पळणारं मन नाही.म्हणजे देह तो, बुद्धी ती आणि मन ते, असे तिन्ही सामान्य जन नाहीत. 

म्हणजेच कोणत्याही प्रकारची भूकच जर अस्तित्वात नाही, तर मग त्यासाठीची धडपड, ओढ, मनाचा व देहाचा संबंध व त्यासाठी बुद्धीची धावपळ नाही व मनाची ओढाताण नाही. याचा अर्थ असा होतो की, जिथे अशी शून्यवस्था येते किंवा सुख, दुःखं लाभ हानी, भोग उपभोग याबाबत उदासीनता येते, तिथे स्थितप्रज्ञावस्था प्राप्त होते. कारण तिथे बुद्धीला मनाला स्थिरता येते. 

स्थिरता कशी, तर कोणत्याही प्रकारच्या भावनेचा, तरंगांचा, कर्माच्या कसल्याही गोष्टीचा, दुःखाचा वा सुखाच्या बारीक ते मोठ्या आघाताचा काहीही परिणाम होत नाही किंवा त्याने मनाचा तोल कणभरसुद्धा ढळत नाही. कारण तिथे कर्म करण्याचा आपला अधिकार, ज्ञानाने मान्य झालेला असतो. 

मन आणि आत्मतत्त्व हे सर्व जाणिवांनी युक्त झालेलं असल्यामुळे, प्रत्येक छोट्या ते मोठया गोष्टींची कारण मीमांसा ही आपल्याच कर्माशी येऊन पोचते याची जाण येत, ज्यामुळे, मिळालेल्या सुखाचा आणि भोगाव्या लागणाऱ्या दुःखाचा परिणाम, अश्या व्यक्तीच्या मनावर शून्य असतो. 

देहाची मनाची व बुद्धीची भूक, जी अनेक प्रकारांनी, अनेक इंद्रियातून व्यक्त होते आणि ती भागवण्यासाठी, धडपडणारा देह, व देहातील मन व त्यामागे जीव, या भुकांमागे ओढला जातो. म्हणजे या भुकांचा आवाका जसा व जितका जास्त त्याप्रमाणे, जीवाची जन्मजन्मांची धडपड जास्त. म्हणजे आपण करत असलेली प्रत्येक कर्माची सुरवात आणि त्याचा शेवट हा, या भुकेप्रत येऊन पोचतो. 

म्हणजेच जसजसा माणूस या भुकेच्या आधीन होत जाईल, तसतशी कर्माची प्रत कमी कमी होत जाईल. यावरच एक उपाय म्हणून उपास वा उपवास ही प्रथा, खरतर तर देह, मन बुद्धी याद्वारे आत्म्याला, या अवाजवी भुकेतून, काहीकाळ मुक्त ठेवण्यासाठी, पडली. म्हणजे या उपवासाच्या माध्यमातून, मी देह ते मी आत्मा हा प्रवास किंवा या प्रवासाचं चिंतन करता यावं किंवा केलं जावं, अश्या अपेक्षेने, ही व्यवस्था पूर्वजांनी करून ठेवली. 

या सर्वाचा तपशीलवार विचार आणि चिंतन उद्याच्या भागात पाहूया. पण तोपर्यंत आपण नामाने, मनातील खऱ्या ईश्वराच्या समीप जाण्याचा प्रयत्न करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...