Skip to main content

भोग आणि ईश्वर ४३५

भोग आणि ईश्वर  ४३५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

आपण विचारांवर विचार करत आहोत. म्हणजेच मनाची ऊर्जा व शक्ती यांना क्षती पोचवणाऱ्या किंवा त्यांची शक्ती कमी करणाऱ्या गोष्टी,नकारात्मक,अनिष्ट अप्रस्तुत विचार आचार व उच्चार कसे टाळावेत आणि त्यायोगे मनातील ऊर्जा व शक्ती यांचा क्षय कसा रोखवा, हे पाहिलं. मुळात अप्रस्तुत या शब्दात सर्व सार आलं आहे.म्हणजे ते विचार आपल्या दृष्टीने, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध किंवा नकारात्मक असल्यामुळे अनावश्यक असतात, ते अप्रस्तुत. म्हणून ते स्वीकारणं हे मुळातच टाळायचं. 

आता हे झालं आपण न करण्याच्या किंवा टाळण्याच्या गोष्टी वा मुद्दे. पण यातून पन्नास टक्के काम होईल. म्हणजे जसं घट किंवा क्षती होऊ नये, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, त्याच प्रमाणे. पण त्यात वाढ होऊन, मनाची ऊर्जा व शक्ती कायम उत्तम पातळीवर राहील यासाठी विचारांच्या माध्यमातून काय करता येईल, हे आता पाहू. म्हणजे या विषयाचा अभ्यास परिपूर्ण होईल. 

मनाची ऊर्जा व शक्ती सकारात्मक व उच्च राखण्यासाठी उत्तम, सकस, शुद्ध आणि सात्विक विचार ऐकणं आणि तसेच वा त्या प्रकारचे विचार कानावर, कानातून बुद्धी व त्या मार्गे मनात पोचतील, याची काळजी घेणं हे आपलं नित्य कर्तव्य आहे. दृष्टी, श्रवण या दोन मुख्य ज्ञानेंद्रियांनी आपण विचार ग्रहण करून, ते देहाच्या माध्यमातून मना पर्यंत पोचतात वा पोचवले जातात. 

म्हणजे वाचन व श्रवण यातून जे आत जाईल, ते ज्ञानाची, चिंतनाची, विचारांची भूक भागवणारं असावं, लन देहाची भूक वाढवणारं नसावं. त्याचप्रमाणे जसं उत्तम देहासाठी, जीवन सत्त्वयुक्त व शुद्ध आणि सकस आहार, गरजेचा आहे,त्याच प्रमाणे मनाला असेच विचार मिळाले पाहिजेत म्हणून तश्या प्रकारचे विचार आचार पाहायला व ऐकायला मिळावेत, याची काळजी घेणं, हे देह राखण्या इतकच महत्वाचं आहे. 

यामध्ये अजून एक मुद्दा ध्यानात घेण्यासारखा आहे. शरीरात, ज्याप्रमाणे, काही अशुद्ध किंवा त्याज्य द्रव्य जातात, सर्व साधारणपणे शरीरांतर्गत प्रक्रिया, त्यांचा योग्य त्या पद्धतीने निचरा करून, देहशुद्धी राखण्याचा आटोकाट प्रयत्न करते. तशी व्यवस्था वास्तविक मनात निर्माण करण्यात आली आहे. फक्त ती आपल्याला कशी वापरायची हे ज्ञात नसतं आणि समजत नाही. 

ज्यावेळी मन अस्वस्थ, अविचारी, गोंधळलेलं, निराश, नकारात्मक वा कमजोर वाटतं, त्यावेळी हे नक्की लक्षात ठेवा की कोणत्यातरी घटनेने, दृश्याने, विचाराने वा श्रवणाने, मनात अनिष्ट, नकारात्मक, अप्रस्तुत अश्या अनेकानेक विचारांचा गोतावळा जमला आहे वा घालमेल झाली आहे आणि तो बाहेर काढून, मनाला स्वच्छ व शुद्ध करणं गरजेचं आहे. म्हणजेच शरीरात जमा होणाऱ्या अनावश्यक त्याज्य घटकांचा, जसा नित्य निचरा होतो, तसा मनातील त्याज्य अप्रस्तुत विचारांचा सुद्धा निचरा होणं आवश्यक नव्हे तर अतिआवश्यक आहे. 

यावर पुढील भागात विचार करूया. पण तोपर्यंत नामाचा रियाज जो नित्य आवश्यक आहे, तो करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...