Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५०

भोग आणि ईश्वर  ४५०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

अहं हा एक प्रकारचा नकारात्मक, ऋणभारित भाव आहे, जो मनात जन्मतः रुजतो आणि देहाबरोबर वाढतो. सरतेशेवटी तो मृत्यूला तात्पुरता विश्राम घेतो, पण मनबकोषातून तो आत्म्यासह, चैतन्यावस्थेत विहरत राहून, आत्मा ज्यावेळी, पुनः एखाद्या गर्भात प्रवेश करतो, त्यासमयी मनकोषात स्थापित होतो. स्थापित होतो म्हणण्यापेक्षा, जो चेतानावस्थेत अर्थात निर्गुणावस्थेत असतो, त्याला मूर्त अर्थात सगुणरूप प्राप्त होतं. 

देह गर्भातून बाहेर येताच, पूर्वजन्मातील संस्कारानुसार, हा पुनः कार्यरत होतो. म्हणून याला बाहेर काढायचं म्हटलं तर, त्याची मुळी इतकी खोलवर गेलेली असते, की मोठं कठीण काम होऊन बसतं. कारण ती मुळी एका जन्माची नसून, अनेक जन्मांतून वाढत आलेली, वटवृक्षा सम  घट्ट रुजलेली मुळी असते. वटवृक्षाच्या पारंब्यां प्रमाणे, याला अनेक अंग आणि प्रत्यंग असतात आणि त्या सर्वांची आपापली अंतरंगंसुद्धा असतात. 

म्हणून याला काढण्यासाठी सर्वात प्रथम,लीनता अर्थात विनम्रता, हा सद्गुण अंगी धरला पाहिजे. विनयशील व्यक्तीला यश आणि अपयश दोन्ही सहजी पचवता येतं. पंचवणं म्हणजे यशाची हवा डोक्यात जाऊ न देणं आणि अपयशाने नैराश्य येऊ न देणं. म्हणूनच म्हटलंय की, विद्या विनयेन शोभते. इथे विद्या याचा अर्थ फक्त ज्ञान वा शिक्षण असा मर्यादित न घेता,यश,कीर्ती,सन्मान पदोन्नती इत्यादी अनेक अर्थ अभिप्रेत आहेत. या सर्वांचा व्यापक अर्थाने विचार करता, यशप्राप्तीला, किंवा यशाच्या पायऱ्या चढत असताना, झालेला अहं, हा आत्मनाशाला कारणीभूत ठरतो. 

म्हणजेच अहं टाळायचा किंवा त्याचा ज्वर मनावर येऊ न देण्याचा विचार सतत करावा. स्वकर्तृत्वाने जरी यशप्राप्ती झाली असेल, तरीही एक गोष्ट ध्यानात घ्यावी की, यशाच्या लहरी ज्यावेळी मनातून बाहेर पडतात, त्या अनेक नकारात्मक, निराश व अनिष्ट लहरींचा मारा सहन करतात. जर त्यांच्यासोबत अहं या नकारात्मक भावाच्या लहरी सोबत असतील तर, मनातून ऋण भारित लहरी बाहेर पडतात आणि बाहेरील  तश्याच प्रकारच्या ऋणभारित लहरींशी संयोग करतात. 

त्यानंतर त्या कर्मफलस्वरूपात, पुन्हा मूळ जागी येऊन, मनातील अहंरुपी, ऋणभार वृद्धिंगत करतात. अर्थातच असा वाढत जाणारा अहं आत्मघातकी असतो. किंवा दुसऱ्या अर्थाने, बाहेरील ऋणभारित लहरी, आतील अहंच्या ऋणभारित लहरींशी संयोग पावून, मनात अतिरिक्त ऋणभार निर्माण करतात. म्हणून या ऋण भाराला प्रभावहीन करण्यासाठी, विनम्रता हा अत्यंत उपयुक्त व धनभारित सद्गुण धारण करावा. जेणेकरून अहंरूपातील ऋणभारित अणू विनम्रतेच्या धनभारित अणूसमोर प्रभावहीन होऊन, बाहेरील ऋणभारित अणूंना आकर्षित करणार नाहीत. पण ही विनम्रता सतत, कायम स्वरूपी मनावर आधीन झाली पाहिजे किंवा तो मनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. 

अजूनही चिंतन अपेक्षित आहे, या विषयावर, ते उद्याच्या भागात करूया. पण नामाने प्राप्त होणारी विनम्रतेची धनभारीत ऊर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...