काव्यांजली
तव स्वरांनी आमुच्या
सुख मिळाले मनाला
कर्ण मन हृदयही माझे
सुखावते त्या समयाला
लिहितीलही गीत सारे
आपुल्या यश कीर्तीचे
तरीही मन माझे म्हणते
अंगाई आईसम भासते
प्रेमगीत वा युगुलगीत
गायले प्रियेने वाटे
विरह दुःख हे भावही
त्या त्या गीतातून प्रकटे
इतुकेच आता शेवटी
उरला लतास्वर तो
त्या गंधर्वकन्येचा
आचंद्रसूर्य निनादो
© कवी : प्रसन्न आठवले
०६/०२/२०२२
१९:२३
Comments
Post a Comment