Skip to main content

भोग आणि ईश्वर ४३४

भोग आणि ईश्वर  ४३४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कालचाच विषय पुढे सुरू करू. 

म्हणजेच आत्मविश्वास आल्यानंतर आपण आपल्या देह, बुद्धी व मन या माध्यमातून, सवयीचा भाग म्हणून प्रयासाने हे ठरवू शकतो की, जरी माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांच्या विचारांवर, उच्चार व आचार यांवर माझं नियंत्रण नसेल, तरी त्यातील कोणते स्वीकारायचे आणि कोणते त्यागायचे हे मीच ठरवू शकतो. 

म्हणजे जरी श्रवणात असे त्याज्य विचार उच्चार आले तरी, त्यातील कोणते बुद्धिपर्यंत व कोणते मनापर्यंत जाऊ द्यायचे, हे मीच ठरवू शकतो. यासाठी आत्मविश्वास आणि आत्मचिंतन हे खूप सहाय्यक ठरतात. आत्म चिंतनी व्यक्ती आपल्या विचारांच्या त्रिज्येत मग्न असतो. ज्यामुळे, इतर गोष्टी ऐकायला व करायला त्याला वेळ वा विचार असतच नाहीत. म्हणून सरतेशेवटी आपण आत्मचिंतनाकडे येतो,जे सर्व गोष्टींच्या मुळाशी आहे. 

दुसऱ्याचं किती व काय, आपल्या बुद्धी आणि मन यापर्यंत जाऊ द्यायचं,हे आपणच ठरवू शकतो, ही संकल्पना किंवा हा विचार सकृत दर्शनी अव्यवहार्य वाटतो किंवा अप्रस्तुत वाटतो.पण खोलात जाऊन विचार केल्यास लक्षात येईल की, आपण अश्या प्रकारचं वर्तन, बरेचदा अनावधानाने वा नकळत करतो.पण ते आपसूक घडतं. त्यामुळे आपल्याला, अशी काही गोष्ट मुद्दामहून करता येते, हे वाटत नाही किंवा जाणवत नाही. म्हणजेच जे अजाणता करतो, तेच जाणूनबुजून वा ठरवून करत मनाला सवयींचे करायचं. 

आपण बरेचवेळा, आपल्या कामात मग्न असतो तेंव्हा, आपल्या बाजूच्या व्यक्तींचं, आपल्याशी चाललेलं हित गुज वा संवाद, दुर्लक्षित करतो. करतो म्हणण्यापेक्षा, मी म्हणेन चुकून, एखाद्या कामातील किंवा सध्याच्या काळातील मोबाईलवर गर्क असल्या मुळे, तसं घडतं. समोरच्या व्यक्तीने, त्याची जाणीव साध्या किंवा रागात करून दिल्यावर, आपण भानावर येतो. म्हणजे भान हरपून एखादं कार्य नकळतपणे का होईना पण आपण करू शकतो. 

यातील नक्की प्रक्रिया काय असते, ते जाणून, तेच तंत्र, आपण, दुसऱ्याकडून येणाऱ्या नकारात्मक गोष्टी, टाळण्यासाठी वा दुर्लक्षित करण्यासाठी वापरू शकतो. ही प्रक्रिया म्हणजे, आपलं मन त्यावेळी, त्या कामात, मोबाईलमध्ये किंवा संगणकीय कामात गुंतलेलं असतं. ज्यामुळे आपलं अनावधानाने एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजेच आपण,आपलं मन,एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावरून काढून, दुसरीकडे वळवू शकतो. 

ते साध्य करण्यासाठी दोनच गोष्टी करायच्या, एकतर मनाला त्या क्षणी, आपण करत असलेल्या कामात पुन्हा गुंतवायचे किंवा जर काहीच काम हातात नसेल, तर एखाद्या साधनेत वा जप मंत्र इत्यादी मध्ये गुंतवून, मग्न करायचे. अगदी गेलाबाजार, तेदेखील नाही जमल्यास, ते बोलणे आपल्यासाठी नाहीच, अशी सहज संकल्पना मनात आणायची. जेणेकरून मन त्याकडे दुर्लक्ष करेल. 

यामधील काहीच शक्य नसेल तर, सरतेशेवटी सर्व ऐकून न ऐकल्यासारखे करून, शांतपणे पाहून, त्याला निरुत्तर करायचं. कारण तुमची काहीच तिक्रिया न देण्याची कृती, तीन गोष्टी साधतील. सर्वात प्रथम, मन आपोआप त्रयस्थ होईल. दुसरं म्हणजे  असं समोरच्या व्यक्तींचं ऐकूनही दुर्लक्षित करता येतं, हे मनाला जाणवेल आणि मनाला त्याची सवय जडेल. तिसरं म्हणजे समोरच्या व्यक्तीला योग्य संदेश जाईल. कदाचित आपल्या कृतीने त्याला पोचलेला संदेश, त्याच्या मध्ये योग्य बदल घडवू शकेल. 

यावरील पुढील चिंतन उद्या सुरू ठेवू. तोपर्यंत नामसाधन सुरूच ठेवू. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...