Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५२

भोग आणि ईश्वर  ४५२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

जल आणि मन यांचं तप्त होण्यातील साम्य आणि फरक पाहण्यासाठी दोघांचा तौलनिक अभ्यास करणं गरजेचं आहे. जल हे उशीरा तप्त होऊन, उशीरा थंड होतं, हे सर्वसामान्य विज्ञान, आपण लहानपणी शिकलो आणि थंडीत वा उन्हाळ्यात याचा प्रत्यय आपण, नैसर्गिक पाणीस्रोत असतात तिथे,घेतो वा अनुभवतो.घरी येणाऱ्या जलाला, तो प्रत्यय तितका सार्थपणे घेता येत नाही. 

कारण घरचं पाणी अनेक माध्यमातून पोचत असतं. जसं, पाण्याच्या वाहिन्या, ज्या बहुतेक धातूच्या असतात आणि ज्या टाक्यांमध्ये ते साठवलं जातं,त्या सिमेंटच्या असतात. त्यामुळे घरात येणाऱ्या जलाच्या तांपमानवर, त्या माध्यमांचा प्रभाव असतो. पण सर्वसाधारणपणे जलाचं तापमान उशिरा चढतं आणि उशिरा उतरतं. त्या जलाला उष्ण करणारा घटक, म्हणजे सूर्याची उष्णता. ती उष्णता जशी चढत जाईल, तसतसं जलाचं तापमान चढत जातं. पण  सूर्य मावळल्यानंतरही, ते उष्ण असतं आणि उशिरा थंड होतं. 

देहात जवळजवळ सत्तर टक्के पाणी असल्यामुळे, वास्तविक ते देह बुद्धी व मन, हे या नियमानेच, उशिरा कोप पावून, उशिरा शांत होणं गरजेचं आहे. पण तसं प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही. याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे देहातील रक्त या घटकाला तापवून,क्रोध निर्माण करणारं माध्यम म्हणजे, मन. जे अवकाश तत्वा नुसार कार्य करतं. अवकाश तत्व हे वायू व अग्नी या दोन्ही तत्त्वांनी प्रभावित होतं वा होऊ शकतं. 

म्हणजे वायू तत्वाने युक्त मन, अधिक चंचल, अधिक प्रवाही, अधिक उतावीळ, अधिक अनियंत्रित वा बाह्य तत्त्वांनी सहजी नियंत्रित होऊ शकणारं असतं. अश्या व्यक्ती दोलायमान, अनियमित आणि अनियंत्रित, अति उत्साही, अतिनिराश होणाऱ्या अश्या विरुद्ध टोकाच्या असू शकतात. अग्नीतत्वाने युक्त मनाच्या व्यक्ती, कोपिष्ट वा राग येणाऱ्या किंवा पटकन संतुलन गमावणाऱ्या असतात. 

यामध्ये अनेक समीकरणं शक्य आहेत.ज्याला permutations व combinations म्हणता येईल, ती होऊ शकतात. म्हणजे वायुतत्व आणि अग्नीतत्व यांनी युक्त व्यक्तित्व, ही शीघ्रकोपी व अतिरागिट असू शकतात. पण ती तितकीच जलद शांत होणारी असू शकतात. आता या समीकरणामध्ये देहातील जलतत्वाची सुदधा भर पडते, याचं कारण की देहाच्या आतमध्ये वायू अग्नी जल ही तत्व एकत्रच नांदत आहेत. 

त्यामुळे या समिकरणाची व्याप्ती, किती असू शकेल, हे गणिताची माहिती असणाऱ्यांना सहज लक्षात येईल. पण हीच व्याप्ती N म्हणजे अमर्यादित होते,जेंव्हा आपण पाचही तत्वांच्या देहातील पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व जल यांच्या एकत्रित समिकरणाचा विचार करतो.  या अमर्यादित व्याप्तीमुळेच आपण व्यक्ती तितक्या प्रकृती असं संबोधतो. पण यातील व्यक्ती या शब्दातच या समीकरणाचं गमक दडलेलं आहे. पण त्याचा उद्या विचार करूया.  त्याचबरोबर या समिकरणाला नियंत्रित करण्याचा  प्रयत्न न करता, neutralise म्हणजे प्रभावहीन करणारं उत्तर सुद्धा पाहूया. पण तोपर्यंत नाम हेची सार, ह्यावर विश्वास ठेवून, नाम घेत राहूनच, क्षण अन क्षण घालवूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...