Skip to main content

भोग आणि ईश्वर ४३२

भोग आणि ईश्वर  ४३२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

जसं आपण संपर्कात असलेल्या, व्यक्तींच्या नकारात्मक लहरी आपल्यावर परिणाम करतात,त्याचप्रमाणे,आपल्या स्वतःच्या नकारात्मक विचारांच्या लहरी आपलं, मन बुद्धी व देह अर्थात शारीरिक,बौद्धिक व मानसिक पातळीवर हानी करतातच. पण आपल्या संपर्कात असलेल्या लोकांनासुद्धा, याचा त्रास होतो किंवा होऊ शकतो. म्हणूनच यासर्वांचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. 

एक साधं आणि आताचंच उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा लगेच लक्षात येईल. सध्याच्या, अर्थात गेल्या दोन वर्षातील करोनाच्या प्रकोपानंतर, आपण या गोष्टीचा व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर अनुभव घेतला आहे. आपण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर, आपणही बाधित होतो किंवा आपण बाधित असताना, इतर कोणी किंवा जे जे आपल्या संपर्कात येतील,त्यांनासुद्धा,आपण बाधित करतो वा करू शकतो. 

यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या ठरतात. आपण स्वतः याबाबत स्वच्छता, सुरक्षित अंतर व तोंड आणि नाक हे झाकल्यास, आपण बाधित असुनही, दुसऱ्यांना याची बाधा होणार नाही. दुसरं म्हणजे, अशी काळजी घेतल्या वर, बाधित व्यक्तींकडून, आपण बाधित होण्याची शक्यता कमी. तिसरं म्हणजे या सर्वांशी लढण्याची आणि बाधित न होण्यासाठीची प्रतिकार शक्ती आपल्या मध्ये निर्माण करणं आणि असेल तर ती कायम राहील,  याची काळजी घेणं. 

जे करोना काळात देहाबाबत आपण केलं किंवा करत आहोत, तेच कायमस्वरूपी, नकारात्मक, अनिष्ट व त्याज्य विचारांबाबत, आपण स्वतः साठी करणार आहोत किंवा करणं अपेक्षित आहे. सर्वात प्रथम आपल्यामध्ये असलेली ज्ञात वा अज्ञात नकारात्मकता शोधून, ती नष्ट करणं किंवा त्यागणं. कारण करोना विषाणूंप्रमाणेच, ही नकारात्मक विचार, आचार व उच्चार यांची बाधा कधीही होऊ शकते. त्याचप्रमाणे ती सुक्ष्माती सूक्ष्म आहे. म्हणजे लक्षातसुद्धा येत नाही आणि बाधा झाल्यावर समजतं, परिणामस्वरूपात. 

म्हणून नेहमी जागरूकता अर्थात जाणीव म्हणजेच सावधानता किंवा alertness, खबरदारी अर्थात precaution, सक्षमता अर्थात competence आणि मानसिक ऊर्जा व शक्ती अर्थात power and energy या चतुःसूत्रीने काम करणं, गरजेचं आहे. म्हणजे नक्की काय, याचा विचार करूया. जागरूक असणं म्हणजे काय हे बघू. ही जागरूकता दोन पातळीवर असली पाहिजे. एक स्वतःबाबत सतत जागरूक असणं. म्हणजे काय, तर स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल, मनात, बुद्धीने, वाचेने वा कृतीने, नकारात्मक, अनिष्ट व चुकीचं काही करत नाही ना, या विचाराचा तपासनीस मनात व विचारात असणं गरजेचं आहे. 

असा तपासनीस मनात व विचारात असेल, तर अशी चूक घडताना किंवा घडल्या घडल्या लगेच आपल्या विचारांचा अँटिना जाग आणेल. त्यामुळे दुसरा पहारेकरी अर्थात खबरदारी म्हणजे precaution हा आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडले. म्हणजे सुरवातीला घडल्या नन्तर लक्षात आलं की आणि नंतर विवेक जागृत झाल्या वर,  घडण्याआधी आपण सावध होऊन खबरदारीने वागू आणि आपलीच होणारी किंवा आपणच करू शकणारी हानी आपण टाळू शकू. 

हा झाला स्वतःबाबतची सावधानता आणि खबरदारी. पण इतरांकडून होऊ शकणारी बाधा व त्यापुढच्या दोन मुद्द्यांवर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत नाममार्गी राहून, या सर्वांचा विचार करण्याचा विवेक अंगी येऊ दे अशी प्रार्थना सद्गुरूंना करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...