Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

भोग आणि ईश्वर ३६६

भोग आणि ईश्वर  ३६६  काल आपण पाहिलं त्यानुसार, व्यावहारिक चिंता ह्या व्यावहारिक गुंता वाढवतात. कारण त्या चिंता जीवाला नित्य व कायम बद्ध ठेवतात. जीव त्याच चक्रात अडकत जातो आणि कर्मफलाच्या त्याच साखळीतून कधीही बाहेर पडण्याचा विचार करत नाही.कारण ज्या प्रकारच्या समस्या, त्याच प्रकारचा मार्ग निवडला जातो.  म्हणून असे जीव, महाराज, स्वामी, सिद्धपुरुष यांना, याच सांसारिक व व्यावहारिक चिंता व समस्यांचा मार्ग विचारतात. यामध्ये साधनेचा जसा जोर असेल आणि ज्याप्रकारे नाम स्मरणाचा नित्य अभ्यास असेल त्यानुसार थोड्याफार प्रमाणात, याचा उपयोग, या समस्येवर उपाय वा औषध म्हणून होतो.  पूर्णतः रोग समूळ नष्ट व्हावा यासाठी असलेलं पारंपरिक औषधी शास्त्र, आयुर्वेद, या तत्वानुसार, रोग हा पूर्ण नष्ट होणं, हा त्या शास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि असतो. पण सांसारिक रोग,चिंता व समस्या, यांवर अश्या सिद्ध पुरुषांकडून प्रार्थनारूप आर्जव केल्यानंतर, नक्कीच थोड्याफार प्रमाणात उपाय वा उपयोग होतो, हे नक्कीच. परंतु त्यातून बरेचवेळा, मूळ समस्या या कायमस्वरूपी सुटत नाहीत.  कारण जोपर्यंत आसक्ती आणि ओढ शिल्लक ...

भोग आणि ईश्वर ३६५ लेखमालेची वर्षपूर्ती) 🌷🌹

भोग आणि ईश्वर  ३६५ लेखमालेची वर्षपूर्ती) 🌷🌹  ही लेखमाला सुरू करून आज ३६५ दिवस अर्थात एक वर्ष पूर्ण झालं. संपूर्ण ३६५ दिवस रोज एक लेख, ही एक विलक्षण अनुभूती होती. संपूर्ण ३६५ दिवस विनाखंड रोज एक लेख लिहून तो पोस्ट करणं, हे एक अद्भुत कार्य, माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी करवून  घेतलं.  इतक्या गहन विषयावर इतक्या सोप्प्या भाषेत लिहिता येणं, हे सद्गुरू प्रेरणेशिवाय अशक्य आहे.  त्याबद्दल मी त्यांचा जन्मोजन्मी ऋणी राहीन. त्याचप्रमाणे वाचकांनी मला प्रोत्साहित करून, लिहितं ठेवलं, त्याबद्दल वाचकांचासुद्धा आजन्म ऋणी राहीन. हे दोन्ही ऋण फिटू नयेत, ही इच्छा आहे, ज्यामुळे पाय जमिनीवर राहतील आणि असंच कार्य हातून होत राहील.  १ डिसेंबर, २०२० या दिवशी "भोग आणि ईश्वर" या शिर्षकाने मी, ही लेखमाला लिहायला घेतली. ही मालिका इतकी प्रसिद्धी मिळवेल असं, गेल्यावर्षी, लिहायला सुरुवात केली तेंव्हा,  खरच वाटलं नव्हतं. पण या मालिकेचं शीर्षक हा या मालिकेला प्रसिद्ध करण्यात खूप महत्वाचा दुवा ठरला.  या मालिकेच्या शिर्षकाबद्दल आज विस्ताराने लिहावे असा विचार ...

भोग आणि ईश्वर ३६४

भोग आणि ईश्वर  ३६४  उद्या या लेखमालेला एक वर्ष अर्थात ३६५ दिवस पूर्ण होतील. सलग ३६५ दिवस ३६५ लेख, म्हणजेच रोज एक लेख याप्रमाणे इतकी प्रदीर्घ चालणारी लेखमाला लिहिण्याचा सराव वा अनुभव  नसतानाही हे कार्य हातून घडत आहे, त्याबद्दल मी मातापिता,सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, ईश्वर व या मालिकेच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अश्या सर्व वाचकांचा ऋणी आहे. त्या ऋणातच मी राहू इच्छितो,कारण तरच अजून अश्या प्रकारचं लेखन कार्य सद्गुरू माझ्याकडून करवून घेतली.  कालचाच विषय पुढे नेताना, एक गोष्ट जाणवते की, माणूस अनुभवातून फार कमी शिकतो आणि बरेचवेळा चुकांची पुनरावृत्ती करत पुढे जातो. हा अनुभव अगदी घरातून सुरू होतो तो शाळेत,नन्तर कार्यालयात, म्हणजे व्यवहारात नित्य येतो. एखाद्या चुकीबद्दल किंवा अनावधानाने घडलेल्या कर्माबद्दल विधाता वेगवेगळ्या स्वरूपात कर्मफल देऊन, एकप्रकारे संकेतच देतो.  पण तरीही आपण ते संकेत एकतर लक्षात घेत नाही किंवा ते आपल्या लक्षातच येत नाहीत. नियती नावाची विधात्याच्या कार्यालयातील व्यवस्था ही आपलं काम चोख करत असते.  पण तरीही ईश्वरकृपा त्या आधी आपल्य...

भोग आणि ईश्वर ३६३

भोग आणि ईश्वर  ३६३  खरतर भोगांच्या काळात माणसाची बुद्धी व लक्ष हे पूर्ण पणे त्या काळावर वा त्यातून बाहेर पडण्यावर केंद्रित असतं. खूपवेळा आपण, ज्या घटनेने हा भोगांचा काळ सुरू झाला, त्या घटनेच्या धक्क्यामुळे, विचारहीन होऊन, त्या दुःखाच्या वाऱ्याबरोबर मती व मनसुद्धा भरकटवू देतो. अनेकदा आपण देव, दैव, नशीब, प्रारब्ध यांना दोष देऊन देवाच्या अस्तित्वावरसुद्धा मनातल्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतो.  इथे मुळातच दृढपणे मनात धरण्याची एक गोष्ट म्हणजे आपल्या जन्माआधी जग होतं आणि आपल्या जन्मानंतर सुद्धा जग असणार, जसं ते आपल्या पूर्वजांच्या गमना नंतरसुद्धा सुरळीत सुरू आहे. म्हणजे या जगाला चालवणारा कोणी, मानव नक्कीच नाही अन्यथा इतके घातक असुर येऊनसुद्धा या जगाचं कोणीही काहीही वाकडं करू शकलेलं नाही आणि इतक्या मानवी पिढ्या येऊन गेल्या तरीही हे जग सुरूच आहे.  म्हणजे जर तसा कोणी आहे, जो हे जग चालवत आहे आणि त्याची काही विशिष्ट नियमावली आहे, ज्यावर आधारित हे जग, सुत्रबद्धतेने चाललेलं आहे, तर मग या सुत्रांना वा तत्वांना किंवा नियमांना धरूनच सर्व गोष्टी होणार. दुसरं असं की, समस्त ब्रह्मांड...

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ ३

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ ३  श्रीगणेशाय नमः !! श्रीज्ञानेश्वर माऊली नमोनमः !! श्रीसद्गुरुमाऊली नमोस्तुते  !!  सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ २.१८ ॥  हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २.२८ ॥  श्रीमद्भागवद्गीतेतील, ज्या मूळ ओवीवरून माऊलींनी वरील ओवी घेतली आहे ती खालीलप्रमाणे  क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥२.३॥ श्रीकृष्ण परमात्मा पुरुषोत्तम समस्त जगताचे निर्माते, प्रत्येक प्राणीमात्र हा त्यांचाच जणू पुत्र. अश्या स्थितीत त्यांनी शेवटपर्यंत हे महाभारत युद्ध होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. अगदी पाच गावं घेऊन, पांडवांना शांती प्रस्ताव आपण मान्य करायला लावू, हे वचन, त्यांनी हस्तिनापूरच्या राज्यसभेत, शेवटचा प्रयत्न म्हणून, देऊन पाहिलं. यामागे खरंतर दोन कारणं होती.  एक म्हणजे आपण जे करू त्यावर पांडवांचा पूर्ण विश्वास आहे याची श्रीकृष्णांना खात्री होती आणि आपल्यावर त्यांची प्राणापलीकडे श्रद्धा आहे हे भगवंतां...

भोग आणि ईश्वर ३६२

भोग आणि ईश्वर  ३६२ सद्गुरुंच्या प्रगल्भ जाणीवा, दुसऱ्या पातळीवरील ज्ञानेंद्रियांचा पूर्ण क्षमतेने विकास व सदुपयोग करण्याची वृत्ती, ज्ञानाच्या आणि जाणिवांच्या रुंदावलेल्या कक्षा, या सर्वांसह विश्वाचं फक्त कल्याण व्हावं आणि साधनेतून सद्हेतूने प्रेरित झालेलं आत्मबल, या सर्वांमुळे सद्गुरूंनी काय करणं अपेक्षित आहे, हे त्यांना पूर्ण ज्ञात असतं. त्यामुळे, कोणत्या साधकाला कशाप्रकारे प्राथमिक स्तरावरून, उच्च स्तरावर न्यायचं आणि त्यासाठी काय करायचं, याचं सद्गुरूंचं आकलन आणि कार्य हे ठरलेलं असतं.  मुख्य समस्या कुठे येते, तर, आपण भावनिक बळावर, साधनेच्या शक्तीच्या माध्यमातून व गैर इच्छा व अपेक्षा यांमधून, प्राथमिक स्तरावरील ज्ञान व जाणीवा यांच्या पूर्ततेसाठी, सद्गुरूंना आवाहन करतो आणि त्याची त्यांनी पूर्तता करावी, अशी व्यावहारिक, पण अध्यात्मिक उन्नतीत बाधा आणणारी अवास्तव अपेक्षा करतो. कर्म धर्मसंयोगाने व काही प्रमाणात सद्गुरुकृपेने आपल्या काही अपेक्षा पूर्ण होतात आणि इथेच खरी आपली परीक्षा सुरू होते.  आपली परीक्षा यासाठी की, जसजशी इच्छापूर्ती वा अपेक्षापूर्ती होत जाते, तसतशी आपली अपेक्...

भोग आणि ईश्वर ३६१

भोग आणि ईश्वर  ३६१ ज्ञानाच्या प्राथमिक स्तरावरील माणूस हा चार पायी जनावराची फक्त दोन पायी आवृत्ती असतो. कारण वासनेचे, मायेचे, मोहाचे क्षण टिपत, त्या ज्ञानातून, देहसुख अनुभवत त्याच पातळीवर जन्मोजन्मी स्थिर राहणं, हे फक्त श्वास आहेत आणि देहाच्या गरजांची जाणीव अतिजागृत आहे आणि मनाला ओढ आहे म्हणून क्षणक्षण त्याच आनंदात राहण्यासाठी जगणं, हे खूपच प्राथमिक पातळीवरील जगणं आहे.  मुळात प्राणी हा ज्ञानाच्या प्राथमिक स्तरावरच असतो. तिथे भोगांचं परिमार्जन होऊन गेलं की, मानवी योनीत जन्म ही ईश्वरी व्यवस्थेने सहज घडणारी गोष्ट आहे.  म्हणजे नित्य असे असंख्य जीव, लक्षलक्ष प्राणी योनी तील भोग भोगून,मानवी पातळीवर जन्म घेत असतीलच. हे कालचक्र आहे, नित्य सुरू असलेलं. परंतु एकदा मानवी योनीत जन्म घेतल्यावर, हळूहळू उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणं, हे भगवंतांना अपेक्षित आहे.  याचसाठी आणि या आत्मोन्नतीच्या कार्यात इच्छाशक्तीला उचित पाठबळ देऊन, भोगात आणि उपभोगातसुद्धा उच्च जाणीवा जागृत राहून, प्राथमिक स्तरावरून दुसऱ्या उन्नत स्तराकडे वाटचाल सुरू व्हावी व सुरू असलेली कायम राहावी, यासाठी मार्गदर्शनाचे,...

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ २

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ २  श्रीगणेशाय नमः !! श्रीज्ञानेश्वर माऊली नमोनमः !! श्रीसद्गुरुमाऊली नमोस्तुते  !!  सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ २.१८ ॥  हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २.२८ ॥  श्रीमद्भागवद्गीतेतील, ज्या मूळ ओवीवरून माऊलींनी वरील ओवी घेतली आहे ती खालीलप्रमाणे  क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥२.३॥  गीता भगवंतांनी प्राप्त परिस्थितीत अर्जुनाला युद्धप्रसंगी ऐकवून, युद्धासाठी तयार करवून घेतलं आणि युद्ध पार पडलं. मुळात भगवतगीता ही जीवनातील अनेक पातळी वर, अनेक प्रसंगी, अनेक ठिकाणी, नित्य उपयोगाची आहे. परंतु तिच्याकडे पाहण्याचा जनेतरांचा दृष्टिकोन, हजारो वर्षांच्या कालखंडात संकुचित झाला होता. एक उच्च अध्यात्मिक प्रबोधन, इतकाच श्रीमद्भगवद्गीता बघण्याचा दूषित दृष्टिकोन तयार झाला होता. त्याला छेद देऊन, अध्यात्म ते व्यवहार अश्या सर्व पातळीवर गीतेचा उपयोग आहे व तसा तो व्हावा, हे जाणून, भगवंत स्वत...

भोग आणि ईश्वर ३६०

भोग आणि ईश्वर  ३६० ज्ञान ग्रहण करून, त्यातून अनेक प्रकारच्या गरजा व भूक भागवणं ही मानवी देहासाठी उपकारस्वरूप देणगी ईश्वराने दिली आहे. किंबहुना काल म्हटल्याप्रमाणे, या द्विस्तरीय व्यवस्थेने देहाची भूक वाढवणं, वाढता वाढता भागवत जाणं ब आणि त्याद्वारे मायेच्या व वासनेच्या गुंत्यात स्वतःला अडकवून, पापाचं धनी होऊन, नन्तरच्या आयुष्यात किंवा नन्तरच्या जन्मात, ते भोगस्वरूपात भोगत जन्मोजन्म घालवणं, हा एक मार्ग, पहिल्या स्तरातील ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, ईश्वराने मानवाला दिला आहे.  किंवा दुसऱ्या स्तरातील ज्ञानेंद्रियांना अतिउच्च, शुद्ध, पवित्र, सात्विक पातळीवर नेऊन, त्याद्वारे, ईश्वरीय परब्रम्हाच्या चराचरातील अस्तित्वाची साक्ष आत्मतत्वाला पटवून देऊन, त्या मार्गाने ईश्वराकडे मार्गक्रमण करणे, हा दुसरा मार्गसुद्धा ईश्वराने, मानवालाच उपलब्ध करून दिला आहे.  कारण बाकी सर्व योनी, निःसंदेह फक्त भोगयोनी असल्या मुळे तिथे संचितातील भोग, त्या त्या प्राणीदेहात भोगणे आणि एक स्तरीय व्यवस्थेनुसार, फक्त वासना व भूक यासाठी देहाला झिजवून घेणं हा एकच मार्ग उपलब्ध आहे. अनेकानेक जन्मा नन्तर, ज्यावेळ...

भोग आणि ईश्वर निमित्ताने आलेला कृपायोग अनुभव

भोग आणि ईश्वर निमित्ताने आलेला कृपायोग अनुभव !  धन्यवाद, सर्वांचे आभार,  मुलीच्या लग्नाच्या भावभावनेतून बाहेर येण्याची ऊर्जा महाराज देतील, पण जे मुलीचे वडील आहेत, ते या भावना समजून घेऊ शकतील. लग्नसोहळा उत्तमरीत्या पार पडला, सर्व उपस्थित आनंदी आणि समाधानी झाले हा विशेष उपहार मिळाला. कदाचित काही जणांना अनावधानाने आमंत्रण राहिलं असेल, तर त्याबद्दल मी।क्षमा प्रार्थी आहे. मुलीला सासर उत्तम मिळालं, ही महाराजांची अद्भुत कृपा. मी गमतीने तिला महाराजांची नात म्हणतो. पण त्याप्रमाणे महाराजांनी कृपाछत्र तिच्यावर धरलं. ही प्रेरणा आणि हे चैतन्य महाराजांची कृपा आहे.  थोडं भोग आणि ईश्वरबद्दल  भोग आणि ईश्वरचं १ डिसेंबर, २०२१ रोजी सुरू केलेलं चिंतन आज सलग ३५८ दिवस लिहीत आहे. लवकरच ३० नोव्हेंबरला ही लेखमाला ३६५ दिवस पूर्ण करेल. यामध्ये सर्वात आश्चर्याची वा चमत्काराची गोष्ट म्हणजे लग्नाच्या या तयारीत आणि विशेष करून १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या ५ दिवसातसुद्धा भाग ३५१ ते ३५५ हे भाग,  सर्व गडबडीतसुद्धा, लिहू शकलो, ही शक्ती महाराजांनीच दिली. हे पाचही भाग बहुतेक  करून रात्री १२ न...

भोग आणि ईश्वर ३५९

भोग आणि ईश्वर  ३५९  एक समज आहे की, निर्गुणाची उपासना म्हणजे अप्रकट चैतन्यशक्तीची उपासना. पण खोलात जाऊन याचा गुह्यार्थ पाहिला तर, वास्तविक जे अप्रकट वाटतं ते प्रकट आहेच. कारण चर्मचक्षुना जे दिसत नाही ते नाहीच, हे प्रमेय म्हणजे एक प्रकारे माया आहे किंवा आभास अथवा illusion आहे. कारण चर्मचक्षुना न दिसणाऱ्या आणि देहातील ज्ञानेंद्रियांना न जाणवणाऱ्या अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत, हे नक्की.  ज्ञान  आणि ज्ञान ग्रहणाची इंद्रियव्यवस्था देताना विधात्याने द्विस्तरीय व्यवस्था केली आहे. ही द्विस्तरीय व्यवस्था म्हणजे काय. देहातील ज्ञानेंद्रियांना सगुण ज्ञान ग्रहणाची शक्ती प्रदान करून, देह आहे तोपर्यंत ज्ञानार्जन व ग्रहणाची शक्ती कार्य करेल याची व्यवस्था विधात्याने केली. हे सर्व ग्रहण केलेलं ज्ञान मेंदूत व मनात साठवून ठेवण्याची व्यवस्था केली.  मेंदूतील ज्ञान हे मृत्यूपर्यंत राहील याची व्यवस्था करून, विधात्याने त्या त्या भावनेची बीजं, मनातील शक्तिकेंद्रात निर्माण केली आहेत. म्हणजे दृश्य वा प्रसंग ज्ञानेंद्रियांना दिसतं वा जाणवतं, पण भाव आणि भावना मनातून व्यक्त होतात. आता या ठिकाण...

भोग आणि ईश्वर ३५८

भोग आणि ईश्वर  ३५८  सगुण आणि निर्गुण हे प्रकट व अप्रकट याचंच रूप आहे. मुळात निर्गुणत्व हे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे आहे पण दिसत नाही. त्याला आकार नाही, उकार नाही, रंग नाही की रूप नाही. पण ते प्रकट नाही याचा अर्थ ते नाहीच असा होत नाही. मुळात चैतन्य हे निर्गुण आहे, कारण त्याला निश्चित आकार उकार नाही आणि भगवंतांनी स्वतः निरूपण केल्याप्रमाणे ते अस्त्र शस्त्र यांनी मारता, तोडता येत नाही, भिजवता वा वाऱ्याने सुकवता येत.  हाच निर्गुणाचा महिमा. पण सर्व संसार प्रपंच आणि आध्यात्मिक उन्नती व उद्धार हा फक्त सगुणातूनच साध्य होऊ शकत असल्यामुळे, चैतन्याला सगुणात यावच लागतं. परब्रम्ह हे अप्रकट स्वरूपात आहे, तोपर्यंत परम ईश्वराचं वास्तविक अस्तित्व लक्षात येत नाही.  याला कारण म्हणजे देहधारी जीव, जे समोर दिसेल अर्थातच जे प्रकट आहे किंवा सगुणात आहे, त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याला सत्य मानतो. मुळातच निर्गुण असलेलं परब्रम्ह हे प्रकट झालं आणि त्याला सगुणत्व प्राप्त झालं. सगुणत्व म्हणजे जे कल्पनातीत आहे, त्याचं प्रत्यक्षात येणं. जे अस्तित्वहीन आहे त्याला अस्तित्व प्राप्त होणं.  म्हणजे म...

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ. १

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ. १ श्रीज्ञानेश्वर माऊली नमोनमः  श्रीसद्गुरुमाऊली नमोस्तुते  सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ २.१८ ॥  माझे स्नेही श्रीनितीन भानुशाली यांच्याशी परवा चर्चा करताना, त्यांच्या बोलण्यात या ओवीचा उल्लेख आला. श्रीज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील ही अठरावी ओवी आहे. अर्जुनविषादयोग पहिल्या अध्यायात आल्या नंतर,दुसऱ्या सांख्ययोग या अध्यायात ही ओवी आपल्या समोर येते. याचा भावार्थ माझ्या आकलना नुसार मांडण्याचा प्रयत्न करतो.  भगवंतांनी द्वापारयुगामध्ये, युगांत होताना, झालेल्या महाभारत युद्धामध्ये, अचानकपणे हताश व निराश झालेल्या अर्जुनाला समजावून सांगून, युद्धाला पुन्हा सज्ज करण्यासाठी वेद शास्त्र यांचं सार काढून, त्याला अमृतपान करवून, त्या ज्ञानरसाच्या पेल्यातून, युद्धासाठी पुनः उभं केलं.  खरंतर हे महदकार्य होतं. कारण युद्धआधीच, हताश व निराश झालेल्या योध्याला पुनः उभा करून, त्याला कर्तव्याची जाणीव देऊन, शस्त्रसज्ज होण्यासाठी तयार करताना, वास्तविक मोजकं आणि मर्यादित ज्ञान देऊन, किंवा योगामायेने त्याची बुद्धी प...

भोग आणि ईश्वर ३५७

भोग आणि ईश्वर  ३५७ जसं मन बुद्धी हे अंतर्मनात जातं तसतसं माणूस ज्ञानी समाधानी व शांत होत जातो. कारण त्यातून ज्ञान प्रकट होत आणि हे ज्ञान माणसाला प्रगल्भ करून, मूळ स्वरूपाची ओळख पटवून देतं. ही प्रगल्भता निरभ्र आकाशासारखी असते. मनाची खोलीसुद्धा प्रगाढ होत जाते. अनेक चुकीच्या गोष्टी उमगत जातात. ज्ञान हे अष्टकमलाप्रमाणे उलगडत जातं.  हे ज्ञान वैश्विक, ब्रह्मांडापलीकडील अलौकिक, अद्वितीय असल्यामुळे, अष्टकमलाच्या प्रत्येक पाकळीत अलौकिक गोष्टी ब्रह्मज्ञान, असतं. ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडातील आपलं जग आणि त्या जगातील आपलं अस्तित्व याची जाण झाल्यावर, अनेक शंकाकुशंका, प्रश्न यांची परस्पर उत्तरं प्राप्त होतात. काही प्रश्न निकाली निघतात. काही प्रश्नांचा फोलपणा जाणवतो. काही प्रश्न हे प्रश्न न राहता, त्यांचं उत्तरात रूपांतर होऊन जातं.  वैश्विक ज्ञान उलगडत जाताना अलौकिक अनुभव असतो.  जन्मोजन्मीच्या चुका, अपराध, प्रमाद यांचा उलगडा होत जातो. विश्वातील अनेक रहस्ये, गूढ गोष्टी, गुह्य ज्ञान प्राप्त होतं. खरतर विश्वाची रचना ही मुळातच सगुण आणि निर्गुण यांचं मिलन आहे हे लक्षात येतं. म्हणजे जे ...

भोग आणि ईश्वर ३५४

भोग आणि ईश्वर  ३५४  आत्मबुद्धी व आत्मनेत्र ही,  मन आणि आत्मा यांच्या संयोगा तून किंवा दृढ संबंधातून प्राप्त झालेली देणगी आहे. हा समसमा संयोग महदभाग्याचा योग आहे. योग म्हटल्यावर त्यामागे काही कर्म, प्रयत्न, प्रयास, साधना, तप इत्यादी असणारच. कारण योग हे कर्माशिवाय प्राप्त होत नाही आणि प्रयासाशिवाय शक्य होत नाही.  योग: कर्मसु कौशलम हे भगवद्गीतेत स्वतः भगवंतांनी सांगितलं आहे. ज्याचा अर्थ, योग म्हणजे कर्मातील कौशल्य. म्हणजेच कोणत्याही कर्मात जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक कौशल्याने केलेलं कर्म म्हणजेच योग आहे. त्यामुळे आत्मबुद्धी जागृत होण्यासाठी निश्चित कर्म व प्रयास अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे साधना वा तप आचरण हा याचा प्राण आहे.  इथे एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की आत्म बुद्धी ही जागृत व्हावी लागते, याचा अर्थ ती असते. कारण जागृती वा जाग त्याच गोष्टीला येऊ शकते जी, मुळात अस्तित्वात आहे. कारण जागृत तीच गोष्ट होऊ शकते जी निद्रिस्त आहे, पण मुळात आहे. म्हणजेच आत्मबुद्धी ही आत्मा अस्तित्वात येतो किंवा परमांशा पासून विलग होतो त्यावेळीच, आत्मतत्वाचा तो अविभाज्य भाग असत...

भोग आणि ईश्वर ३५३

भोग आणि ईश्वर  ३५३  आत्मबुद्धी म्हणजे काय हे जरी आपण पाहिलं तरी प्रत्यक्षात आत्मबुद्धीची जाणीव वा जाग येणं हे भाग्याचं लक्षण आहे. अतींद्रिय शक्तीची जाणीव होणं, अनेक गोष्टी मनात न सांगता उलगडत जाणं, आत्मज्ञानाची जाणीव येणं म्हणजे जगताच्या पसाऱ्याबाहेरील अनेक गोष्टी जाणणं हे आत्मबुद्धी असल्याचं लक्षण आहे.  आत्मबुद्धीची जाणीव होण्यासाठी आत्मनेत्र वा आत्मचक्षु जागृत होणं अत्यंत जरुरी आहे. कारण ज्याप्रमाणे चर्मचक्षुना चलचित्र दिसल्यावर, त्याचं ज्ञान बुद्धी व मन यांना होऊन, त्या चित्राची वा दृश्याची किंवा व्यक्तीची ओळख आपल्याला पटते. ओळख पटल्यावर आपण त्यानुसार कृती वा कर्म करत जातो. त्यानंतर ती व्यक्ती वा ते दृश्य पुन्हा पाहिल्यावर आपण त्याच्या ओळखीची स्वीकृती मनात देऊन, त्या व्यक्तीला त्यानुसार साद घालतो किंवा ओळख दाखवून प्रतिसाद देतो.  हे एक उदाहरण झालं. म्हणजे त्यानुसार मन देह व बुद्धी क्रिया वा प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देतात. आता देहा बाबत ही व्यक्तीची ओळख वा ओळखीचं दृश्य, जर या जन्मात पाहिलेली व्यक्ती वा दृश्य असेल तरच खूण पटते. पण आत्मा ज्यावेळी एखादी गोष्ट वा व्यक...

भोग आणि ईश्वर ३५२

भोग आणि ईश्वर  ३५२  आत्मबुद्धी आणि आत्मनेत्र यावर विचार करताना, त्यांचा अर्थ समजावून घेणं महत्वाचं आहे. मनाकडून देहबुद्धीला काही गोष्टी ज्ञात होतात, ज्या सहसा भौतिक जगता बाबत असतात. त्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील सजीव व निर्जीव गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे शात्रीय वैज्ञानिक गोष्टी, अनेक गोष्टींचा तौलनिक अभ्यास, जगताचा पसारा, व्यक्ती व समाज याबद्दल आणि यांसह इतर सर्व गोष्टी, ज्या भौतिक वा बाह्य बुद्धीला जाणवतात किंवा ज्ञात होतात आणि मेंदूत साठवून ठेवता येतात, त्यांचा समावेश यात होतो.  पण आत्मबुद्धी या संज्ञेचा अर्थ या जगतातील नव्हे तर पार लौकिक, पारमार्थिक गोष्टी, ज्याचं ज्ञान, होण्यासाठी व त्यांना जाणण्यासाठी देहबुद्धी उपयोगाची नाही, त्या गोष्टींचं  ज्ञान होणं. म्हणजेच काही ज्ञान अश्या श्रेणीत येतं, जे जाणण्यासाठी देहबुद्धीला मर्यादा असतात आणि त्यामुळे त्यांना जाणून, त्यांचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी काही अंतर्ज्ञान असणं जरुरी असतं.  पण असं ज्ञान प्राप्त करण्यासाठी वा होण्यासाठी, काही विशिष्ट घटकांची गरज असते. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट अर्थातच पूर्वपुण्याई अ...

भोग आणि ईश्वर ३५६

भोग आणि ईश्वर  ३५६ संगणकीय आज्ञावलीनुसार चालणाऱ्या प्रोग्रॅमप्रमाणे संगणकाचं कार्य चालतं आणि एका साचेबद्ध पद्धतीने सर्व कार्य होऊन, इच्छित काम संगणक पूर्ण करून देतो. मानवी मन हा या देहातील बुद्धिशी निगडित आणि आत्म्याला उन्नत करणारा एक खूप मोठा घटक आहे. मानवी देह बुद्धी मन आणि आत्मा यांची संगणकाशी तुलना करताना एक प्रश्न मनात येईल की, संगणका प्रमाणे या व्यवस्थेत आज्ञावली आहे का.  ज्ञान जाणिवांची जागृती हे सर्व या देहात मनात कशाप्रकारे येतं, वाढतं आणि माणसाला कशाप्रकारे सहाय्यभूत होतं हे जाणून घेण्याआधी देहाच्या संगणकाचा पूर्ण अभ्यास करूया. या देहाला, बुद्धीला, मनाला व प्रत्येक कर्माला आज्ञावली कामाला लावून, सर्व कर्म पार पडतील याची व्यवस्था विधात्याने कर्मफल स्वरूपात करून ठेवली आहे. म्हणजे आज घडणाऱ्या सर्व गोष्टी या आपणच आपल्या आधीच्या कर्माने ठरवून दिलेल्या असतात.  म्हणजे आज भेटणारी माणसं, त्यांच्याशी आपले होणारे शारीरिक, बौद्धिक व मानसिक व्यवहार, त्यावर आपल्या प्रतिक्रियेने निर्माण होणारी भविष्यातील कर्मबंधनं हे सर्व काही आपल्या कर्मानुसार आपणच ठरवून दिलेलं असतं. म्हणजे म...

भोग आणि ईश्वर ३५५

भोग आणि ईश्वर  ३५५ या ठिकाणी आता आपण जागृती जाणीव इत्यादी गोष्टीबद्दलचं ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. मुळात जाणीव शब्दात जाण येणं वा जाणणं अपेक्षित आहे. जाणणं म्हणजे काय तर एखाद्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होणं आणि ते प्राप्त झाल्याचं उमगणं वा समजणं. म्हणजेच मी एखाद्या वक्त्याला वा प्रवचनकार यांना ऐकायला गेलो, पण माझं तिथे लक्ष नसेल तर, देहाने किंवा श्रवणेंद्रियाने आपलं काम चोख करूनही, मेंदू व मन यांनी त्या गोष्टींची नोंद न घेताच त्या गोष्टींचं आकलन होणार नाही.  आता इथे ज्ञान म्हणजे एखादी गोष्ट ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त झालेली माहिती वा दृश्य , बुद्धी मन यांनी एकत्रितपणे ग्रहण करून, त्याचा अर्थबोध, मनःपटलावर उमटून तो उमगणं. म्हणजे बुद्धी मन यांचं एकत्रित कार्य आहेच, पण त्याही पलीकडे अर्थबोध होणं ही खरतर, artificial intellegence च्या पलीकडील गोष्ट आहे. म्हणजे जाण, ज्ञान, उमज हे कुठेतरी मनाच्या आभासी पटलावर तरंग निर्माण करून, त्या लहरीतून जो नाद उमटेल तो नाद जाणत जाणं.  म्हणजे ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहेच पण, ती मनाच्या आणि बुद्धीच्या पटलावर, एकत्रितपणे उमटून येते आणि तरच त्...

भोग आणि ईश्वर ३५१

भोग आणि ईश्वर  ३५१  संचितातील ठेव वा कर्ज जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मानव किंवा कोणताही जीव, या भूतलावर जन्म घेण्यास बाध्य आहे. संचिताच्या भारातील एक  एक गोष्ट वसूल होत नाही किंवा फेडली जात नाही तोपर्यंत, इथे जन्म घेऊन त्याची भरपाई करण्याची जबाबदारी आत्म्यावर असते. म्हणजे देह जरी काही कर्म करतो, तरी त्याची मुख्य जबाबदारी ही आत्म्याची असते.  आत्मा या तत्वाला अविनाशी म्हटलं आहे, त्याची दोन प्रयोजन आहेत. एक म्हणजे जोपर्यंत देहाने केलेल्या कर्माचं मोल चुकवलं जात नाही, तोपर्यंत आत्मा अनेक देह धारण करत, नित्य या जगतात ये जा करत राहणार. म्हणजे जरी एका देहातून आत्मा बाहेर पडून, अंतराळात मार्गक्रमण करत असेल तरीही, त्या कर्माच्या अपूर्ण फलांची बाकी अथवा ओझं, आत्म्याच्या शिरावर नित्य असतं.  दुसऱ्या अर्थाने, आत्मतत्त्व हे त्या परम तत्वाचा अंश असल्या कारणाने, ज्याप्रमाणे परम अंश हा अविनाशी आहे, त्याच न्यायाने, त्याचा अंशरूप आत्मा हा अविनाशी आहे. विनाश पावणं म्हणजे नष्ट होणं. हा गुणधर्म या जगतातील प्रत्येक गोष्टीचा स्थायीभाव आहे. त्यामुळे निर्माण होऊन नष्ट होणं हादेखील,जगता...

भोग आणि ईश्वर ३५०

भोग आणि ईश्वर  ३५०  ईश्वराने सर्व व्यवस्था केली आणि जगताचा गाडा सुरू झाला.  ईश्वराचा मुख्य उद्देश, या जगतातून, जीव मोक्ष, मुक्ती या मार्गा कडे जावा. कारण जगतात जीवाला पाठवण्याचा, विधात्याचा उद्देश, जीवाला आत्मज्ञानाची प्रचिती यावी, जाणीव व्हावी,  जगण्याचा अर्थ उमगावा, मुळात जगतपिता व आपण यांचा संबंध समजावा, या सर्वांचं ज्ञान होऊन, त्या मार्गाने व त्या मार्गाकडे, आत्मा वळावा, हा आहे.  खरतर, हे ज्ञान जीवाला, या जगतात येताना असतंच. परंतु, ज्यावेळी आत्मा भूलोकात किंवा मर्त्यलोकांत आल्यावर, येथील माया, पंचमहाभूतरुप देहावर असलेला इतर सर्व शक्ती व शत्रू, जे याच जगताचा भाग आहेत, यांचा प्रभाव जसजसा वाढत जातो, तसतसा प्रत्येक आत्मा मूळ ज्ञानापासून दूर दूर जाऊन, या जगताच्या फेऱ्यात पूर्ण विसरून जातो.  जगताची जी ओळख जन्मतः मानवी मनाला, बुद्धीला करून दिली जाते, त्यामुळे, युगानुयुगे व जन्मोजन्मी आत्मसात केलेलं ज्ञान, जाणीवा हे सर्व मागे पडत जातं. किंबहुना ते सुप्त मनात कोंडलं जातं. कर्म, कर्माची गणितं, फलांची बेरीजवजाबाकी यात अडकत जाऊन तोच जगण्याचा भाग होऊन जातो. जन्म झाल...

भोग आणि ईश्वर ३५२

भोग आणि ईश्वर  ३५२  आत्मबुद्धी आणि आत्मनेत्र यावर विचार करताना, त्यांचा अर्थ समजावून घेणं महत्वाचं आहे. मनाकडून देहबुद्धीला काही गोष्टी ज्ञात होतात, ज्या सहसा भौतिक जगता बाबत असतात. त्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील सजीव व निर्जीव गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे शात्रीय वैज्ञानिक गोष्टी, अनेक गोष्टींचा तौलनिक अभ्यास, जगताचा पसारा, व्यक्ती व समाज याबद्दल आणि यांसह इतर सर्व गोष्टी, ज्या भौतिक वा बाह्य बुद्धीला जाणवतात किंवा ज्ञात होतात आणि मेंदूत साठवून ठेवता येतात, त्यांचा समावेश यात होतो.  पण आत्मबुद्धी या संज्ञेचा अर्थ या जगतातील नव्हे तर पार लौकिक, पारमार्थिक गोष्टी, ज्याचं ज्ञान, होण्यासाठी व त्यांना जाणण्यासाठी देहबुद्धी उपयोगाची नाही, त्या गोष्टींचं  ज्ञान होणं. म्हणजेच काही ज्ञान अश्या श्रेणीत येतं, जे जाणण्यासाठी देहबुद्धीला मर्यादा असतात आणि त्यामुळे त्यांना जाणून, त्यांचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी काही अंतर्ज्ञान असणं जरुरी असतं.  पण असं ज्ञान प्राप्त करण्यासाठी वा होण्यासाठी, काही विशिष्ट घटकांची गरज असते. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट अर्थातच पूर्वपुण्याई अ...

भोग आणि ईश्वर ३४९

भोग आणि ईश्वर  ३४९  कर्माचं परावलंबित्व आपण जाणलं, त्यातून सुटका नाही, हे देखील जाणलं. म्हणजे कर्म न करता राहता येत नाही आणि कर्म करतानाच, प्रारब्धाचे भोग, चटके यांचे कडू घोट सुद्धा प्यावे लागतात, हे देखील आपण जाणलं. म्हणजे गीतेमध्ये भगवंत सांगतात तो एकप्रकारे तिढाच आहे. म्हणजे या जगतात आपल्यावर practical problem ज्याला म्हणता येईल अशी ही द्विधा स्थिती आहे.  म्हणजे कर्म तर करायचं, न करता राहायचं नाही. कर्म करताना, त्याचं फल कधी मिळेल हे ईश्वर जाणे आणि त्या ईश्वराची विधाता नामक व्यवस्था जाणते. इथे एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते की, विधाता आणि ईश्वर या दोन भिन्न व्यवस्था आहेत, अस माझं मत आहे. कारण ज्या व्यवस्थेने हे ब्रम्ह, ब्रह्मांड, जगत, जीव, कर्माची व्यवस्था हे इतकं सर्व निर्माण करून, ते सुरळीत चालावं आणि प्रत्येक नियमाला बांधील असलेली ती ती व्यवस्था, नीट कर्म पार पाडत रहावी यासाठी, त्या सर्वांचा कारभार असलेली व्यवस्था म्हणजे विधाता.  म्हणजे ईश्वराच्या विधानाचा कारभार पाहणारी व्यवस्था. ईश्वराचं विधान काय, तर जगताच्या निर्मितीचा संकल्प, हे ते विधान. ही व्यवस्था ईश्...

भोग आणि ईश्वर ३४८

भोग आणि ईश्वर  ३४८  कालच्या चिंतनावरून, कर्माची बंधनं म्हणणं, जास्त संयुक्तिक  ठरेल, अस मला वाटतं. कर्म करण्याचं स्वातंत्र्य म्हणणं हे व्यावहारिक होणार नाही, तर त्यात अपरिहार्यता जास्त आहे. म्हणूनच श्रीमद्भगवद्गीतेत स्वतः श्रीयोगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे, कर्म न करता कोणताही जीव या जगात राहू शकत नाही. पण म्हणून ते परावलंबित्व अपरिहार्यता म्हणून स्वीकारून, त्याला नाईलाजाने सामोरे जाण्यापेक्षा, त्याला जीवन जगण्याचा एक उन्नत मार्ग समजून व  स्वीकारून पुढे पुढे जाणं हा एक उत्तम मंत्र आहे.  कारण कर्महीन राहू न शकणं, हे नाईलाजाने स्वीकारण्या पेक्षा त्यातून आत्मोन्नती व आत्मोद्धार साधता आला तर त्यासाठी प्रयत्न करून, पुढील जन्मांसाठीची व्यवस्था करता आली, तर त्याचा विचार प्रत्येक क्षण करत जावा. कारण पहिली गोष्ट काही करायचं हे प्रत्येक क्षण आहेच, म्हणजे अपरिहार्यता म्हणूया. त्याच कर्मातून पुढची फलनिष्पत्ती होणार आहे. म्हणजे अस्वीकारार्ह अपरिहार्यता. त्यामुळे आज सकर्म करणं हे आपल्याला अपरिहार्य आहे.  मनाचं एक वैशिष्ट्य आहे की, अस्वीकृत काम जर मनाकडून करून घेण...

भोग आणि ईश्वर ३४७

भोग आणि ईश्वर  ३४७ कर्माचं अर्थात कर्म करण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला, त्याच्या त्याच्या संपूर्ण आयुष्यात, प्रत्येक क्षण उपलब्ध आहे आणि असतं. पण हे स्वावलंबित्व अनेक चक्राकार क्षणांतून जातं. म्हणजे असं की, तुम्ही एखादं कर्म, जे कोणत्याही कर्माशी निगडित नाही,  ते तुमच्या हातून घडत आहे. आता हे कर्म कोणताही माणूस, मशीनप्रमाणे घडणारं काम या सदरात येत नाही आणि होणारही नाही.  कारण प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत दोन महत्वाच्या गोष्टी सोबत घेऊन फिरत असतो. एक म्हणजे प्रारब्ध आणि संचित, त्याचप्रमाणे मन. या दोन गोष्टींच्या संयोगा तून मनाचे विविध बंध भाव भावना,मायेचा खेळ, षड्रिपुंचे रंग,भवरोग,भोग आणि उपभोग यांसह आयुष्यात आलेले अनुभव त्यांचं मनावर असलेलं ओझं,प्रभाव आणि बंधनं, या सर्वांतून मनाची झालेली जडणघडण, त्यातून तयार झालेला स्वभाव, वागणूक, वर्तणूक, वृत्तींचा फेरा  या सर्वात जीवनातील सर्व घटना, प्रसंग यांचा प्रभाव, याचा संचय म्हणजे मन. याशिवाय प्रारब्धाचे मनावर घडलेले संस्कार. असं हे मन माणसाच्या सतत सोबत असतं. त्याशिवाय माणूस ही संकल्पना अशक्य. त्यामुळे प्रारब्धात घडणाऱ्या...

भोग आणि ईश्वर ३४६

भोग आणि ईश्वर  ३४६ ईश्वराच्या या संपूर्ण खेळात प्रत्येक जीव हा म्हटलं तर परावलंबी आणि म्हटलं तर स्वावलंबी आहे. स्वावलंबी यासाठी की प्रत्येक जीव कर्मसिद्धांताप्रमाणे फक्त आणि फक्त स्वतःच्याच कर्मा साठी बद्ध होतो आणि असतो. म्हणजे यातून निघू शकणारा सर्वात पहिला निष्कर्ष हा की, त्याच्या आयुष्यात,प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे, घडणारी सुक्ष्मातील सूक्ष्म व मोठ्यातील मोठी कोणतीही गोष्ट, घटना वा प्रसंग, सुख व दुःख,भोग व उपभोग, रोग, आजार, उत्तम आरोग्य इत्यादी सर्व त्याच्याच पूर्वकर्मा तील फलानुसार घडतं आणि घडणार.  हा खरतर वैश्विक सिद्धांत आहे आणि यात एका अणूचाही बदल विधाता किंवा ईश्वर करू शकत नाही आणि करत नाही. स्वतः ईश्वरसुद्धा याच नियमाने बद्ध असल्याने, सर्व लीलासुद्धा या नियमाला व सिद्धांताला धरूनच होतात वा घडतात. म्हणजे वालीच्या अकारण वधाचा आक्षेप, श्रीराम जन्मात अंगावर घेऊन, श्रीकृष्ण जन्म समाप्त करण्याचं कारण, ईश्वरालासुद्धा तयार करावं लागलं.  त्याचप्रमाणे एका कथेनुसार कश्यप ऋषींची द्वितीय  पत्नी दिती यांनी, देवासुर संग्रामात असुरांना आश्रय दिल्याच्या प्रमादाची शिक्षा म्...