भोग आणि ईश्वर ३६६ काल आपण पाहिलं त्यानुसार, व्यावहारिक चिंता ह्या व्यावहारिक गुंता वाढवतात. कारण त्या चिंता जीवाला नित्य व कायम बद्ध ठेवतात. जीव त्याच चक्रात अडकत जातो आणि कर्मफलाच्या त्याच साखळीतून कधीही बाहेर पडण्याचा विचार करत नाही.कारण ज्या प्रकारच्या समस्या, त्याच प्रकारचा मार्ग निवडला जातो. म्हणून असे जीव, महाराज, स्वामी, सिद्धपुरुष यांना, याच सांसारिक व व्यावहारिक चिंता व समस्यांचा मार्ग विचारतात. यामध्ये साधनेचा जसा जोर असेल आणि ज्याप्रकारे नाम स्मरणाचा नित्य अभ्यास असेल त्यानुसार थोड्याफार प्रमाणात, याचा उपयोग, या समस्येवर उपाय वा औषध म्हणून होतो. पूर्णतः रोग समूळ नष्ट व्हावा यासाठी असलेलं पारंपरिक औषधी शास्त्र, आयुर्वेद, या तत्वानुसार, रोग हा पूर्ण नष्ट होणं, हा त्या शास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि असतो. पण सांसारिक रोग,चिंता व समस्या, यांवर अश्या सिद्ध पुरुषांकडून प्रार्थनारूप आर्जव केल्यानंतर, नक्कीच थोड्याफार प्रमाणात उपाय वा उपयोग होतो, हे नक्कीच. परंतु त्यातून बरेचवेळा, मूळ समस्या या कायमस्वरूपी सुटत नाहीत. कारण जोपर्यंत आसक्ती आणि ओढ शिल्लक ...