Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

भोग आणि ईश्वर ३०५

भोग आणि ईश्वर  ३०५  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  चेंडूला दिलेल्या फिरकीप्रमाणेच, हवेतील इतर घटक जसं वातावरण, वारा, बाष्प इत्यादी,  चेंडू भिंतीकडे जाताना आणि भिंतीला आपटून परत मागे येताना, असं दोन्ही वेळा, त्याच्या गती व दिशेला मदत किंवा अडथळा करू शकतात, हे साधं विज्ञान आहे. ही सृष्टीतील सर्व गोष्टी घडवताना, विधात्याने, प्रत्येक गोष्ट, म्हणजे अणुरेणू, हे वैज्ञानिक आधारावर बनवले किंवा योजले आहेत. अर्थातच हा नियम, या सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक दृश्य आणि अदृश्य गोष्टीला लागू होतो.  या जगतात घडलेलं कर्मसुद्धा या नियमातून वाचू शकत नाही. म्हणजे कोणतंही कर्म घडल्यानंतर इष्ट शक्तीकडे जाताना आणि तिथून कर्मफलात परिवर्तित होऊन, पुन्हा कर्त्याकडे येताना, मार्गातील, त्या भावाचे अथवा विरुद्ध भावाचे कारक, सहाय्यक व रोधक त्या कर्माला जाताना आणि येताना, अस दोन्हीवेळेला, सहाय्य अथवा बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणातून त्या कर्माची आणि त्या कर्मफलाची तीव्रता, गती व दिशा यात बदल होईल.  आता हा बदल इष्ट की ...

भोग आणि ईश्वर ३००

भोग आणि ईश्वर  ३००  आज ३०० दिवस झाले. १, डिसेंबरला एक शीर्षक, एक विषय आणि त्या विषयासंदर्भात अनेक मुद्दे,गोष्टी,प्रश्न, समस्या,माहीती आणि ज्ञान यांचा संपूर्ण परामर्ष घेण्याच्या उद्देशाने लिहायला सुरुवात केली आहे. हे कधीपर्यंत चालेल आणि किती लेखात संपेल, हे माझे सदगुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जाणतात. पण त्यांची इच्छा आणि प्रेरणा आहे तोपर्यंत हे सुरू राहील, हे नक्की.  लेख क्रमांक २९८ मध्ये भीष्मांच्या मागील जन्मासंदर्भात आणि त्याचा, त्यांच्या या जन्मातील, शरपंजरी होण्याशी संबंध आपण पाहिला. खरतर भीष्मांना मागील सर्व जन्म लक्षात असूनसुद्धा, जी गोष्ट किंवा या जन्मातील फल व त्याचा शंभर जन्म मागे, त्यांच्या हातून चुकून  घडलेल्या, कर्माशी असलेला संदर्भ वास्तविकपणे श्रीकृष्णाच्या स्मरणातून प्रकट झाला किंवा समोर उघड झाला.  याचं मुख्य कारण म्हणजे श्रीकृष्ण परमज्ञानी असल्या मुळे आणि प्रत्यक्ष परम ईश्वर असल्याकारणाने, सर्व भूत वर्तमान व भविष्य जाणत होते. म्हणून कर्मफलांचं जे ज्ञान व समीकरण त्यांनी नुकतंच युद्धाच्या पहिल्या दिवशी प्रकट चिंतनातून, गीतेच्या स्वरूपात, ...

भोग आणि ईश्वर ३०२

भोग आणि ईश्वर  ३०२ - कर्मफलाचा नियम वा सिद्धांत भीष्मांच्या संदर्भात, त्यांनी ओढवून घेतलेली अगतिकता, मायेच्या प्रभावात त्यांनी घेतलेली भीष्मप्रतिज्ञा हे सर्व, त्यांना संचितातील त्या एका चुकीमुळे अकल्पनिय शेवटा कडे नेण्यासाठी घडत गेलं. पण यात त्यांच्या पुण्याईमुळे ते त्यांना जीवनाच्या आणि आत्मप्रवासाच्या अंतिम टप्प्यात भोगता आलं. हा पुण्याचा, सद्गुणांचा, उत्तम वागणुकीचा, सत्कर्माचा परिणाम होता.  म्हणजे हे कोणत्यातरी प्रभावाने शक्य होऊ शकतं का?. तर हो नक्कीच. सत्कर्म, सदवर्तन व सदाचार या सद्गुणांच्या बळावर आणि सद्गुरुकृपेने भोग टाळणं आणि कर्मफल नष्ट होणं शक्य नसलं तरी, सद्गुरुकृपा त्यांना तुमच्या सोयीने व योग्य काळात भोगण्याची संधी नक्कीच देऊ शकते. अंबिकेबाबत घडलेली घटना आणि त्यायोगे शिखंडीच्या माध्यमातून भीष्मांचा अस्त हा त्यांच्या कर्माने विधिलिखित केला गेला. परंतु त्याचा योग त्यांच्यामधील पुण्यप्रभावामुळे पुढे जात जात, अंतिम चरणांवर त्यांना भोगावा लागला किंवा भोगता आला.  श्रीकृष्णांच्या कथनातील दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कोणतंही कर्मफल नष्ट वा लुप्त होत नाही, तर ते आ...

भोग आणि ईश्वर ३०३ - कर्मफल बल दिशा

भोग आणि ईश्वर  ३०३ - कर्मफल बल दिशा  कालच्या विषयावर चिंतन पुढे सुरू करूया. कर्माच्या बाबतीत वेग म्हणजे काय किंवा कशाच्या आधारावर हा वेग ठरवायचा, ते पाहू.  हा वेग म्हणजे मनाने वाचेने, देहाने बुद्धीने त्या कर्माला लावलेले बल आणि ते बल म्हणजे ज्या भावाने, प्रभावाने, आपण ते कर्म केलं आहे, त्या भावाप्रमाणे त्या कर्माचा वेग ठरवता येईल. म्हणजेच जे भाव, भार, मनःस्थिती असेल त्यानुसारच ऊर्जा, चेतना, सामर्थ्य, दिशा हे सर्व त्या कर्माला प्राप्त होणार.  म्हणजे नकारात्मक वा सकारात्मकतेने केलेलं कर्म. म्हणजे जितक्या तीव्रतेने एखादं कर्म करू, तितक्याच तीव्रतेने व प्रभावाने ते या किंवा पुढील जन्मात भोगावं लागेल. म्हणजे एखाद्याला प्रेम, आदर मान सन्मान दिलात, तर तोच, पुढे या किंवा पुढच्या जन्मात, परत तुमच्याकडे येईल. याचा जास्त खोलात जाऊन विचार आणि विश्लेषण करणं गरजेचं आहे. का आणि कसं ते पाहूया.  यापूर्वीच्या अनेक लेखात मी मनःस्थिती, धनभार ऋणभार, नकारात्मक सकारात्मक, इष्ट अनिष्ट विचार या सर्वांवर विस्तृत विवेचन केलं आहे. त्यामुळे ते आता इथे पुनः देत नाही. पण ते डोक्यात ठेवा म्हणज...

भोग आणि ईश्वर ३०४ - कर्माचं वेष्टन

भोग आणि ईश्वर  ३०४ - कर्माचं  वेष्टन  कर्म आणि कर्मफल हा विषय, आपण, खोलात जाऊन बघत आहोत. आपण आयुष्यात केलेलं प्रत्येक कर्म हे, त्याच्या पाठी मागे लावलेले भावभावना, वासना, माया, षड्रिपु, धनभार ऋणभार या सर्वांचं बल, ऊर्जा, शक्ती, ओज घेऊन त्रिखंडातील त्या त्या भावाच्या कार्यशक्तीला स्पर्श करून, कर्त्याच्या दिशेने परत येतं. हे जाणणं हीच, आयुष्यातील खूप मोठी उपलब्धी आहे.  कारण एकदा हे जाणलं की, प्रत्येक कर्म करताना, त्याला कोणतं बल, ऊर्जा, वासना यांच्या वेष्टनातून पाठवायचं, हे ध्यानात राहील. म्हणजे आपण कर्माला बल, वेग, दिशा देतोच, पण त्याबरोबर त्याला वेष्टन किंवा पॅकिंग करून पाठवतो. हे पॅकिंग त्यामागे लावलेली सकारात्मक वा नकारात्मक भाव भावना, माया, मोह-लोभ, इत्यादींचं असतं. विधाता हा एक उत्तम प्राप्तकर्ता म्हणजेच receiver आहेच, पण तो एक उत्तम देता अर्थात sender सुदधा आहे.  तो परतावा देताना वेष्टनाची कोणतीही अदलाबदल न करता, कर्मफल, आपल्यापर्यंत त्याच वेष्टनातून पोचेल, याची उत्तम व्यवस्था करतो. यात दोन गोष्टी नवीन जाणल्या आपण. एक म्हणजे आपल्या कर्माला लावलेलं वेष्टन आण...

भोग आणि ईश्वर ३०१

भोग आणि ईश्वर  ३०१  कालच्या उदाहरणाला पुढे नेऊ आणि आपलं चिंतन पुढे सुरू करूया. मुळात त्या चेंडूला वेगवेगळ्या कोनातून समोर भिंतीवर फेकणे आणि त्या चेंडूचा वेगवेगळ्या कोनातून परतावा होणे, याचा अन्वयार्थ लावू. चेंडू सरळ फेकला की तो आपल्याकडे सरळ येणे, हे याच जन्मा तील कर्माचं फलित याच जन्मात मिळून, त्या कर्माचा हिशोब पूर्ण होणे. म्हणजे काही कर्मे निश्चितच याच जन्मात घडून, याच जन्मात आपलं फलित देऊन शांत होतात. याच चेंडूच्या उदाहरणावरील विवेचन पुढे सुरू ठेवू, पुढच्या भागात.  कारण भगवतदगीतेत सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक कर्म, आपलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय शांत होत नाही, किंवा मोक्षास जात नाही. म्हणजे कर्मालासुद्धा मोक्ष असतो तर. असा एक प्रश्न यातून डोकावेल. त्याचं उत्तर, हो असं देता येईल. कर्माचा मोक्ष म्हणजे कर्माचं फलित देऊन शांत होणं. नियम तोच for every action...... आता काही कर्म असतात जी त्वरित किंवा याच जन्मात जन्मून याच जन्मात मोक्षाप्रत जातात. पण त्याची प्रचिती कशी घ्यायची.  इथे  आपण व्यावहारिक कर्मांच्याबाबत विचार करूया. कारण त्यांचं फलित हे बहुदा त्वरित किंवा या...

भोग आणि ईश्वर २९९

भोग आणि ईश्वर  २९९ काळाच्या लेखातील भगवान श्रीकृष्णांच्या दोन मुद्द्यांवर पुढे चर्चा कारण्याधी आपण संघर्षाच्या, दुःखाच्या आणि भोगांच्या बाबतीत थोडं चिंतन करूया आणि त्यानंतर श्रीकृष्णांच्या मुद्द्याकडे वळूया.  स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवातून, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि, भोगाच्या किंवा दुःखाच्या काळात सर्वात प्रथम पडदा पडतो तो म्हणजे बुद्धीवर आणि संभ्रम निर्माण होतो तो मनात. म्हणून याच काळात सर्वात जास्त चुका किंवा अनिष्ट गोष्टी वा विचार किंवा लहरींचा प्रभाव पडून, चुकीचा मार्ग किंवा गोंधळ होऊन मनाची दुर्बलता वाढण्याचा संभव जास्त असतो. मनाने कणखर असणारी माणसंसुद्धा अश्या काळात थोडीफार दोलायमान होतात. अगदी कणखर, म्हणजे ज्यांना जन्मतः मनाची कणखरता प्राप्त आहे किंवा योगसाधनेने त्यांनी ती प्राप्त केली आहे, त्यांनाच  अश्या काळात अशी संभ्रमावस्था जाणवत नाही. अन्यथा सर्वसामान्य जनांना अश्या काळात नक्कीच तीव्र मानसिक आणि आत्मिक संघर्ष करावाच लागतो.  या समस्या सामाजिक, आर्थिक, सांसारिक अर्थात व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा सामूहिक पातळीवरील असतील. पण त्यातून प्रत्येकाला व्य...

भोग आणि ईश्वर २१३

भोग आणि ईश्वर  २१३ गेल्या तीन चार भागात आपण भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यावर विस्तृतपणे चर्चा करतो आहोत. आता या घडीला आपण भक्तीतील अनेक मुद्दे बघत आहोत. त्यामध्ये जेंव्हा भक्तिमार्गात येताना चित्त शुद्ध करून त्यामार्गाने भक्तीच्या पहिल्या पायरीवर जाताना,  क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावं लागेल यावर बोलत आहोत.  यासाठी अंतरात्मा आणि त्याचे संकेत जाणून आपण यात नियंत्रणाच्या मार्गावर जाताना किंवा त्याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आपण प्रतिक्रिये साठी अथवा क्रियेसाठी शांत राहून, त्यावेळची कटुता टाळली तर, आपण नवीन तयार होणाऱ्या ऋणातून मुक्त होतोच. पण ज्या व्यक्तिसंदर्भात हे ऋणातुन मुक्त होण्या साठी आपण हा पवित्रा स्वीकारला त्या व्यक्तीला याचा लाभ होणार का, किंवा त्या व्यक्तीची स्थिती काय असेल.  मुळात हा ऋणसाखळी तोडण्याचा निर्णय आपण घेतला. म्हणजेच आपण आपल्यावर त्याचे किंवा त्याच्यावर आपले ऋण सोडून दिले. म्हणजेच आपण ऋण सोडून दिलं. ऋणाचा नियम आहे की, जेंव्हा एखादी पतसंस्था एखाद्या ग्राहकाचं ऋण कमी अथवा माफ करते, तेंव्हा तशी फेररचना हिशोबात करून, हि...

भोग आणि ईश्वर २०२

भोग आणि ईश्वर  २०२   आत्मविश्वास आणि आत्मसंयम असलेल्या व्यक्तीचं मन शांत असतं वा होतं. कारण स्वतःच्या कर्मावर ठाम विश्वास आणि आपल्या ध्येयावर पूर्ण श्रद्धा असल्या कारणाने , किंतुपरंतु वा शंकाकुशंका यांना मनात कुठेही थारा नसतो. किंबहुना आलेले सर्व अनुभव, भेटलेल्या सर्व व्यक्ती व समोर आलेले सुखदुःखाचे प्रसंग आणि आयुष्यातील चढउतार हे आपल्या कर्मफलाची परिणती आहे आणि पुढील कर्म हे ईश्वरार्पण भावाने, पण ठामपणे केलं जात असल्यामुळे, सदर  व्यक्ती पुढील कर्मगती बाबत साशंकीत नसते.  म्हणूनच अशी व्यक्ती प्रत्येक कर्म आत्मविश्वास व आत्म संयमाने करत असल्याचे, मन पूर्णपणे कर्मात रत असतं. अश्या शांत मनात, फक्त सकारात्मक तरंग लहरी उत्पन्न होतात. त्या लहरी या, त्या व्यक्तीसह आजूबाजूचा परिसर, यांना व्यापून, सकारात्मकतेची लाट निर्माण करतात. या शिवाय स्थिर मनाला स्थिर बुद्धीचा आधार असतो. ज्यामुळे मन निर्विकार, बुद्धी स्थिर आणि व्यक्ती विचारी होतो.  मनाच्या शांततेमुळे वृत्ती निर्गुण निराकार होते. म्हणजेच, त्या व्यक्तीला सर्व ठिकाणी आपल्या ध्येयाचा व सद्गुरूंचाच वास दिसतो. यामुळे व्यक्...

भोग आणि ईश्वर १८९

भोग आणि ईश्वर  १८९ सद्गुरुसेवा, सद्गुरूचिंतन आणि सद्गुरूंनी दिलेला मंत्र, या त्रयीच्या आधारे,प्रत्येक जीव आपल्या आयुष्याची गाडी सुरळीत चालवून या जन्मी मुक्तीच्या वाटेवर बराच पुढे जाऊ शकतो. या तीन नियमांचं पालन केलं तर, आपण अनेक संकटं व भोग यातुन सुखरूप बाहेर पडू शकतो, संसारात अर्थात अधिभौतिकात, तरून जाऊ शकतो आणि  अध्यात्मिक मार्गावर उन्नत होऊ शकतो.  हे असं होण्यात कसलीही अडचण खरतर यायला नको. परंतु तरीही हे या सूत्रातील समीकरणानुरूप होत नाही. याचं महत्वाचं कारण या समीकरणात धरलेल्या सूत्रात दोन क्ष आहेत.  ते क्ष, जे आपल्याला गृहीत धरून, योजलेले आहेत, ते व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे, गणिता तील सुत्रांप्रमाणे, हे समीकरण कार्य करत नाही. अर्थातच प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्व, स्वभाव, गुणविशेष, प्रारब्ध, संचित यानुसार सदर सूत्रातील क्ष ची किंमत,प्रभाव आणि शक्ती बदलत जाते. या सूत्राला चालवायला जरुरी ऊर्जा ही आत्मयज्ञातून प्राप्त होणार असल्यामुळे, वाफेवर वा विजेवर चालणाऱ्या इंजिनाप्रमाणे कार्यरत असतं. म्हणजेच जसा इंजिनाचा वेग हा उपलब्ध वाफेच्या वा विजेच्या प्रमाणाशी समान असल्य...

भोग आणि ईश्वर २९७

भोग आणि ईश्वर  २९७  वास्तविक अर्थाने व दृष्टीने पाहिलं आणि सांसारिक दृष्टी बाजूला ठेवली तर, एक नक्की जाणवतं, की जितका मळ वा मैला जास्त, तितकी शुद्धीकरणप्रक्रिया जास्त जरुरी असते. म्हणजेच एक अर्थ यातून , जो निघतो, तो सर्व अर्थाने कर्मसिद्धांतज्ञान याच्याशी सहज जुळतो. कसा ते पाहू. ज्याला आयुष्यात जास्त त्रास, भोग, दुःख भोगावं लागतं, त्यांचं पूर्वकर्म अत्यंत घोर असतं, त्या कर्मफलांचा परिणाम म्हणून हे असं खडतर आयुष्य वाट्याला येतं.  आता शुद्धीकरणाच्या दृष्टीतून विचार केला, तर हे जाणवेल की, भोगप्रद, अनिष्ट कर्मामुळे त्यांच्या आत्म्यावर मागील जन्मातील कर्माची जी पुटं वा काजळी जमली आहे किंवा असेल, ती या जन्मातील फक्त सत्कर्मानी धुतली जाणार नाही. म्हणून ते भोग, दुःख हे सर्व भोगूनच, त्यांना ती शुद्धीप्रक्रिया पूर्ण करत करत पुढे जाणं गरजेचं आहे. अर्थात सत्कर्म दान आदी पुण्यकारक गोष्टी गरजेच्या आहेतच, पण पुरेश्या नाहीत.   म्हणजेच जेंव्हा या सर्वांतून ते या जन्मात जातील आणि या जन्मात पुनः अनिष्ट कर्मांचा पसारा उभा केला नाही, तर पुढील जन्मात आत्मोन्नती व आत्मउद्गार हा नक्कीच...

भोग आणि ईश्वर २९८

भोग आणि ईश्वर  २९८  कालच्या चिंतनातून हे लक्षात आलं असेल की, भोग आणि उपभोग ही साखळी म्हणजे आयुष्यात आपल्या प्रारब्धातून, बाहेर पडण्यासाठी, आपल्याच कर्मफलाची एक मालिका आहे. आता टीव्हीवरील मालिकांच्या सारखीच हीसुद्धा घटनांची मालिका असते किंवा आहे. सुख त्यामागून दुःख, भोग येणारच आणि दुःख वा भोग असतील तर, तर त्यामागून सुख येणार.  पण एक प्रश्न मनात येतो की, एखाद्याच्या वाट्याला सुखच सुख आणि एखाद्याच्या वाट्याला दैन्य, दारिद्र्य, दुःख व भोगच येतात, ते का. वास्तविक कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर, हे नक्की लक्षात येईल की, हे कोणत्या ना कोणत्यातरी कर्माचे भोग आहेत. आपण जन्मजन्मांतरीचं कर्म, प्रारब्ध आणि संचित जाणत नसल्यामुळे, आपण फक्त या जन्मातील दृश्य घटनांवर आधारित मत बनवतो किंवा शंका उत्पन्न करतो.  इथे भीष्मांची गोष्ट आठवते, ज्यावेळी ते शरपंजरी होऊन, युद्ध समाप्तीपर्यंत मृत्यूची इच्छा निर्माण होईपर्यंत पडले होते. त्यावेळी आपल्या आत्मचिंतनातून त्यांनी आपल्या, मागील शंभर जन्मांचा आढावा घेतला,कारण त्यांच्या पुण्याईने त्यांना ती सिद्धी प्राप्त झालेली होती. ते सर्व जन्म आठवून आण...

भोग आणि ईश्वर २९५

भोग आणि ईश्वर  २९५  जागृत जाणिवांची जाण असणं, अर्थात समजणं, हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे.कारण आपण काय जाणावं आणि काय जाणू नये, यापेक्षा काय जाणत आहोत आणि जाणत आहोत, ते योग्य की अयोग्य, हे जाणवणं अर्थात समजणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच देहाकडे व त्याद्वारे मनाकडे, आलेल्या सर्व संदेशावरून वा लहरींवरून, आपल्या मनाने काय प्रेरणा आपल्याला दिली किंवा त्या लहरींनी, काय जाणीवा जागृत केल्यात, हे त्या क्षणाला मनात आलेल्या विचारातून लक्षात येतं.  उदाहरणार्थ एखादी सुंदर दिसणारी स्त्री, जर काही बोधप्रद व संस्कारमय गोष्टी सांगत असेल किंवा ज्ञान देत असेल तर, बघणाऱ्यांमध्ये, स्त्री व पुरुष दोघांमध्येही, त्यांच्या जागृत जणीवा नुसार विचार येतील. म्हणजे काही जण सर्वप्रथम व सकृत दर्शनी दिसणारं सौंदर्य पाहून मुग्ध होतील, तर काही त्याची मात्र नोंद घेऊन, पुढे ऐकायला सुरवात करतील आणि काही त्याकडे लक्षही न देता फक्त ऐकण्याकडे म्हणजे श्रवणा कडे ध्यान देतील.  यातील तीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद आपण पाहिला.  ही प्रतिक्रिया प्रत्येकाच्या जागृत जणीवानुसार प्रत्येकाने प्रक्...

भोग आणि ईश्वर २९६

भोग आणि ईश्वर  २९६  वास्तविक ज्ञान येणं किंवा ज्ञानी होणं हे लौकिकार्थाने वेगळं आणि आध्यात्मिक अर्थाने वेगळं आहे. व्यावहारिक किंवा सांसारिक अर्थाने ज्ञानी म्हणजे लिहिता, वाचता व नोकरी धंदा करून पोट भरू शकणारा. पण अध्यात्मिक वा पारमार्थिक अर्थाने ज्ञान म्हणजे आत्म्याबद्दलचं, आत्मोन्नती व आत्मउद्धारा साठी प्राप्त झालेलं ज्ञान. मग हे ज्ञान येतं वा मिळतं कुठून, हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे, त्याचा जरा परामर्ष घेऊया.  वास्तविक अर्थाने हे ज्ञान आतच अंतरात्म्यात वास करून असतं. जीवात्मा ज्यावेळी मूळ ईश्वरापासून विलग होऊन, जडदेह धारण करण्यासाठी ब्रह्मांडात दाखल होतो, त्यावेळी तो चैतन्य रूपात किंवा अवस्थेत असतो. जोपर्यंत तो जडदेही दाखल होत नाही, तोपर्यंत तो हे जाणत असतो की,मी कुठून आलो आणि मला कुठे परत जायचं. पण जडदेह धारण करून, उदरातून या जगतात दाखल होताच, त्या सर्व ज्ञानाचं हळूहळू विस्मरण होऊन जीव या जगतात आणि जगताच्या व्यवस्थेत गुंतला जातो.  मूळ चैतन्यस्वरूपात प्राप्त झालेलं किंवा ईश्वराकडून  विभक्त होताना असलेलं ज्ञान लुप्त होतं का आणि होतं तर कुठे जातं, हा एक प्रश्न ...

भोग आणि ईश्वर २९४

भोग आणि ईश्वर  २९४  मनःपटलावर एखादी अस्फुट किंवा अगदी सुप्त टिचकी जरी मारली गेली, तरी ती मनातील ज्ञानेंद्रियांच्या अग्रावर स्पर्श करून, त्या विचारांची जाणीव जागृत करते. म्हणजे येणारी वा पाहिलेली अथवा ऐकलेली अर्थात काया, श्रवणेंद्रिय,  दृष्टी, घ्राणेंद्रिय व त्वचा यांसह कोणत्याही ज्ञानमार्गाने आत आलेल्या लहरी, मेंदुसह मनाच्या पटलावर स्पर्श ते आघात करून, आतील जाणिवांची केंद्रे जागृत करतात. पुन्हा स्पर्श की आघात हे मनाच्या अवस्थे वर अवलंबून आहे.  त्या त्या व्यक्तीच्या मनाच्या स्थितीनुसार ती ती जाणिवांची केंद्रे जागृत होऊन, मनाला त्या त्या गोष्टीचे आकलन होते. त्यानुसार त्या त्या जाणिवांच्या केंद्रातून त्या त्या शक्तिकेंद्रांना चालना मिळते आणि त्या क्षणी जागृत झालेल्या शक्तिकेंद्रातून,ते ते भाव प्रकट होऊन, मनःपटलावर आणि तद्नंतर देहाच्या ज्ञानेंद्रियां द्वारे प्रतिक्रिया वा प्रतिसाद दिला जातो.  म्हणजे एकाच घटनेचे व्यक्तिपरत्वे वेगवेगळे भाव प्रकट होतात. म्हणजे वीज चमकून प्रकाश व तद्नंतर आवाज आल्यानंतर, एखादी व्यक्ती भीती व्यक्त करेल किंवा एखादी व्यक्ती आश्चर्य किंवा अद...

भोग आणि ईश्वर २९२

भोग आणि ईश्वर  २९२  मुळात कोणताही काळ वा कोणतीही स्थिती किंवा परिस्थिती असो. मन सर्व स्वीकारायला किंवा त्याप्रमाणे बदलून वागायला तयार असणं, हीच एक पुण्यकारक गोष्ट आहे, असं माझं मत आहे. कारण आयुष्य हे बदलांचं आणि स्थित्यंतरांचं आहे किंवा सर्वसामान्यपणे असतं. पण आपली मनःस्थिती व मनःस्वास्थ्य हे अनेक गोष्टींचा परिपाक असतो. किंबहुना मनःस्थिती  ही एखाद्या अन्नपदार्थाप्रमाणे असते.  म्हणजे त्यात मुख्य घटक जो असतो, त्याच्या स्वतःच्या चवीला अनेक इतर उपघटक व तेल मसाले यांच्या प्रमाणानुसार चव येते. जो उपघटक किंवा मसाला तीव्र असतो आणि  या जंजाळात आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी होतो, त्याच्या प्रभावानुसार पदार्थाला चव येत जाते. कधीकधी एखादा उपघटक आपला प्रभाव, पदार्थ मुरल्यावर दाखवतो वा चाखायला देतो. म्हणजे सरते शेवटी पदार्थ तयार करणारी व्यक्ती, अर्थात सुगरण म्हणूया,  त्यातील घटकांचं प्रमाण, अपेक्षित चवीनुसार ठरवते आणि त्यानुसार घटकांचं व मसाल्याचं मिश्रण करते.  यातील मुख्य घटक म्हणजे मन, अन्नपदार्थ म्हणजे मनःस्थिती, उपघटक आणि मसाले म्हणजे घडणाऱ्या घटना, कर्मफल इत्यादी...

भोग आणि ईश्वर २९३

भोग आणि ईश्वर  २९३  मनाचा समतोल राखणं आणि त्या स्थितीपर्यंत पोहोचणं ही खरतर एक मोठीच तपश्चर्या असते. किंबहुना तीच फार मोठी साधना असते. ती प्राप्त झाली की, इतर कोणतीही साधना विनासायास, कोणतीही व्यक्ती करू शकेल. कारण मनाचा समतोल राखणं यात कोणत्याही साधनेचं निम्मं यश सामावलेलं आहे. काहींना ते जन्मतः प्राप्त झालेलं असतं. म्हणजे कितीही मोठी घडामोड वा उलथापालथ होऊ दे, यांच्या विचारांच्या प्रवाहात, त्या गतीत आणि त्याद्वारे प्रत्यक्ष कृतीत काहीही फरक पडत नाही वा बदल होत नाही.  एखाद्या प्रचंड जलप्रवाहामध्ये अनेक गोष्टी उलटसुलट होतात, जागा, मार्ग वा जगही बदलतात. पण अश्या संतुलित लोकांना वादळातसुद्धा मार्ग सापडतात आणि आपल्या विचारांचं संतुलन व मनाचा समतोल हे यांच्या आत्म्यातून जन्मतः, यांना मिळालेलं असतं. पण यातसुद्धा कर्मसिद्धांताप्रमाणे यांच्या मागील जन्मातील तप वा साधनेचा परिणाम स्वरूप अश्या प्रकारची समतोल व विवेकी मानसिकता त्यांना प्राप्त झालेली असते. पण ज्यांच्याकडे नाही त्यांनाही ते प्राप्त करता येऊ शकतं.  अश्या प्रकारची मानसिकता ज्ञानानेसुद्धा प्राप्त होते. एक उदाहरण घेऊ...

भोग आणि ईश्वर २९०

भोग आणि ईश्वर  २९०  मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास खरतर मुद्दामहून करावा लागणं, यातच आपला मनावर नियंत्रण नाही,हे सिद्ध करतं. तरीही त्यात काही गैर न मानता,आपण हा अभ्यास आणि सराव सुरू करावा यातच हित आहे. कारण मन शांत, उल्हसित आणि प्रफुल्लित ठेवणं हे आपल्यासाठी लाभकारी आहे. कारण बरेचसे दोष, दुर्गुण वा काही काही आजार जसं रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग इत्यादी,  अशांत मनामुळे होतात आणि त्यामुळे चुकीची संप्रेरके अर्थात हार्मोन्स पाझरून, त्यामुळे शरीराची अंतर्गत हानी हळूहळू होत जाते.  या हानीबद्दलची जाणीव, एखादा गंभीर आजार उद्भवला की मग लक्षात येतं वा आणून दिलं जातं. माणसाचं आयुष्य खरतर दोन प्रकारांनी पुढे पुढे जातं. एक म्हणजे प्रारब्धातील पुढे आलेले भोग आणि उपभोग अर्थात दुःख आणि सुख. दुसरं म्हणजे निहित किंवा अपेक्षित कर्म. या दुसऱ्या भागाबद्दल आपण फार गंभीर नसतो. आपण जास्त महत्व प्रारब्धातील दुःख आणि सुख यांना देतो किंवा त्याबद्दलची आपल्या मनातील जाणीव जास्त जागृत असते.  याचं कारणसुद्धा तसंच आहे. मुळात आपलं भविष्य आपण जास्त महत्वाचं मानतो. किंबहुना आर्थिक दृष्टीने स्थैर्य, पुरेश...

भोग आणि ईश्वर २९१

भोग आणि ईश्वर  २९१  भोगाच्या किंवा दुःखाच्या काळात, आपण आणि आपलं मन हे कमजोर वा अशक्त असतं.  हे नैसर्गिक आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण त्या भोगांचा किंवा दुःखांचा विचार जास्त करतो आणि मनाला अशक्त करतो. साधं उदाहरण घ्या की, शरीर अशक्त असतानाच्या काळात, आपण शरीराला अजून त्रास होईल असं न करता, आराम मिळेल या दृष्टीने विचार आणि कृती करतो. ज्यामुळे शरीर लवकर तंदुरुस्त व्हायला मदत मिळते.  पण मनाचा आपण असा कधीच विचार करत नाही. कारण त्यावर आपण फार लक्ष देत नाही. कदाचित सर्वसामान्य परिस्थितीत हे योग्य असेलही. जसं देह स्वस्थ आणि तंदुरुस्त असताना आपण फार काळजी घेण्याची गरज नसते, तर त्यावेळी हे शरीरस्वास्थ्य टिकून राहील किंवा त्यात वाढ होईल, हे पाहतो किंवा पाहिलं पाहिजे. पण मनाच्या बाबत इतका खोलवर विचार करत नाही. कारण मुळातच ते दिसत नाही. पण ते दिसत नाही म्हणूनच त्याची जास्त काळजी आणि चिंता केली पाहिजे.  कारण निर्गुण निराकार जे आहे, त्याची प्रत्यक्ष स्थिती ही आजू बाजूची परिस्थिती व इतर लक्षणं यावरून ताडली किंवा जाणली पाहिजे. म्हणूनच यासाठी दोन गोष्टी करायच्या. एक म्हणजे...

भोग आणि ईश्वर २८९

भोग आणि ईश्वर  २८९  आपण एकग्रतेच्या मार्गावरील तीन पायऱ्या पाहिल्या. त्यांचा अभ्यास तसा, म्हटलं तर सोप्पा आणि म्हटलं तर कठीण आहे. सोप्पा किंवा कठीण या व्यक्तिपरत्वे बदलणाऱ्या संज्ञा आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ते सहजसाध्य होईल, तर एखादी व्यक्ती हे खूप कठीण आहे म्हणेल. कदाचित काहीजण हा प्रयत्न करून सोडूनसुद्धा देतील.  हे पुन्हा मनावर अवलंबून आहे. हे कसं. तर हे मनाच्या लवचिकतेवर वा कठोरतेवर किंवा काठीण्यावर अवलंबून आहे. म्हणजे काहींचं मन हे लवचिक अर्थात कोणत्याही गोष्टीला सहज स्वीकारून पुढे जात असतं. अर्थात प्रवाही मन ज्याला म्हणूया. कारण आपण पाहिलं असेल तर प्रवाही जल हे जास्त स्वच्छ असतं. याचं मुख्य कारण म्हणजे ते प्राप्त भौगोलिक परिस्थितीला स्वीकारत पुढे जातं. त्याचा मुख्य उद्देश पुढे जाणं हा असतो.  काही मनं ही कठोर किंवा कठीण असतात. बदल किंवा नवीन गोष्ट स्वीकारणं त्यांना कठीण जातं. साधारण साठलेल्या जला सारखं. प्रवाही नसल्यामुळे अश्या जलाशयाला शेवाळं आणि इतर अस्वच्छता लवकर ग्रासते. म्हणजे कठीण किंवा कठोर मनाची माणसं, कोणतेही बदल सहजासहजी स्वीकारत नाहीत. जीवनात दोन...

भोग आणि ईश्वर २८८

भोग आणि ईश्वर  २८८  मनाला शांत करून एकाग्र करण्याच्या प्रयोगात आधी आपण शांत बसून, मनाला व मनातील विचारांना मुक्त पणे वावरू दिलं. नन्तर आपण श्वासांवर लक्ष केंद्रित करून काही दिवस त्याचा अभ्यास केला. नन्तर पुढे आपण एखाद्या बिंदूवर वा लक्षावर मनाला एकाग्र करण्याचा प्रयोग करत आहोत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. वास्तविक अर्थाने मनाला स्वतःचे अवयव वा इंद्रिय नाही.  म्हणून ते नेहमी देहातील इतर अवयव व इंद्रिय याद्वारे प्रकट होऊन, आपला कार्यभाग साधतं. म्हणजेच ज्या वेळी त्याला पाहण्याची इच्छा होते, त्यावेळी ते मन मान, डोळे यांना आज्ञा देऊन आणि प्रसंगी संपूर्ण देहाला कामाला लावून कार्यभाग साधून घेतं. एखादा आवाज आल्यावर, श्रवणेंद्रिय, मान, शरीर व मुख्य चक्षु ह्यांना मन कार्यास जुंपतं. ज्यावेळी एखादा प्रश्न ऐकू येतो किंवा डोळ्यांनी वाचला जातो, त्यावेळी मन मेंदूला विचार करायला प्रवृत्त करतं.  म्हणजे मुख्यतः मन देहातील इंद्रिय व अवयव यांच्या सहाय्याने सर्व कार्यभाग साधून, आपली इच्छा तृप्त करून घेण्याचा प्रयत्न करतं. एखादी इच्छा तृप्त झाली की, काही काळासाठी शांत झालेलं मन, पुन्...

भोग आणि ईश्वर २८७

भोग आणि ईश्वर  २८७ खरतर मन शांत होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मनातील विचारांना मिळालेली चालना. थोडं कठीण वाटेल पण, हे खरं आहे. एखादा प्रवाह अडवला कि, त्यात अजून जोराने वाहण्याची वृत्ती निर्माण होते. याला एक शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे पुढचा प्रवाह अडला तरी मागून प्रवाह येत असतो, त्या मागच्या प्रवाहाला, पूढील अडलेला प्रवाह, मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो.  ज्यामुळे मागून येणारा प्रवाह अजून जोरात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यात एक घर्षण निर्माण होतं. ज्यामुळे एक तणाव निर्माण होतो. म्हणूनच मनाला शांत न करता, ज्यावेळी त्याला वळवण्याचा प्रयत्न केला जातो, तेंव्हा वृत्ती जास्त जोमाने उफाळून येतात आणि केल्या जाणाऱ्या क्रियेला विरुध्द आणि जास्त वेगात दबाव येतो. मग प्रक्रिया थांबते किंवा थांबवावी लागते आणि आपण सांगतो की, मी प्रयत्न केले पण एकाग्रता येतच नाही. याला हेच कारण आहे. शास्त्रीय दृष्टीने न केलेले प्रयोग, म्हणूनच फसू शकतात.  एक गोष्ट ध्यानात ठेवा की, या ब्रह्मांडातील, विधात्याच्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय आधार आहेच. म्हणून कोणतीही नवीन गोष्ट करताना, शास्त्रीय दृष्टीनेच ...