भोग आणि ईश्वर ३०५ माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. चेंडूला दिलेल्या फिरकीप्रमाणेच, हवेतील इतर घटक जसं वातावरण, वारा, बाष्प इत्यादी, चेंडू भिंतीकडे जाताना आणि भिंतीला आपटून परत मागे येताना, असं दोन्ही वेळा, त्याच्या गती व दिशेला मदत किंवा अडथळा करू शकतात, हे साधं विज्ञान आहे. ही सृष्टीतील सर्व गोष्टी घडवताना, विधात्याने, प्रत्येक गोष्ट, म्हणजे अणुरेणू, हे वैज्ञानिक आधारावर बनवले किंवा योजले आहेत. अर्थातच हा नियम, या सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक दृश्य आणि अदृश्य गोष्टीला लागू होतो. या जगतात घडलेलं कर्मसुद्धा या नियमातून वाचू शकत नाही. म्हणजे कोणतंही कर्म घडल्यानंतर इष्ट शक्तीकडे जाताना आणि तिथून कर्मफलात परिवर्तित होऊन, पुन्हा कर्त्याकडे येताना, मार्गातील, त्या भावाचे अथवा विरुद्ध भावाचे कारक, सहाय्यक व रोधक त्या कर्माला जाताना आणि येताना, अस दोन्हीवेळेला, सहाय्य अथवा बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणातून त्या कर्माची आणि त्या कर्मफलाची तीव्रता, गती व दिशा यात बदल होईल. आता हा बदल इष्ट की ...