Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

भोग आणि ईश्वर २४३

भोग आणि ईश्वर  २४३ खरतर आपण ज्या गोष्टी करतो त्या प्रत्येकात अपेक्षा ठेवून करतो. ती अपेक्षा किंवा त्या कर्मात किंवा कर्माच्या फलात गुंतलेलं मन हा त्या कर्मामागील भाव आहे. ज्या प्रमाणे भाव असेल त्याप्रमाणे त्या त्या कर्माचं फल प्रत्येकाला प्राप्त होतं. म्हणजेच कर्मफल भावात्मक आहे.  जिथे जशी जितकी भावाची गुंतवणूक तितका व तसा कर्मफलाचा हिस्सा योग्यवेळी प्रत्येकाला मिळतो. असे भावबंध कर्मात असतात, त्यानुसार फलप्राप्ती, हे व्यावहारिक पातळीवर सत्य आहे.  पण अध्यात्मिक पातळीवर याचा उलट संबंध आहे. म्हणजेच भाव ठेवून साधना भक्ती वा नामस्मरण करत गेल्यास, मिळणारा लाभ हा क्षीण क्षीण होत जातो.  याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे व्यवहारात अपेक्षे प्रमाणे तरंगलहरी निर्माण होऊन, त्या कर्मफलाला तुमच्या पर्यंत पोचवायला मदत करतात. याचं एक सहज सोप्प तार्किक कारण म्हणजे भौतिक जगताचा मुख्य संबंध हा, पंचमहाभूतरुप तत्वांशी असल्यामुळे, त्यांना सर्व सर्व भौतिक नियम व गणितं लागू होतात आणि कार्य त्याप्रमाणे घडत जातं.  पण अध्यात्मिक बाबतीत मुळातच संबंध, अश्या ईश्वरी चैतन्य शक्तींशी आहे, की ज्या, प...

भोग आणि ईश्वर २४२

भोग आणि ईश्वर  २४२ नाम हे मुळात एकदा सुरू केलं की, ते खरतर आपोआप आपला कार्यभार साधत जातं. एखादा कर्मदरिद्रीच असेल, जो नाम घेऊन, नंतर  मायावश किंवा कुमतीने त्याचा त्याग करेल. इथे एक प्रश्न निर्माण होईल, जर नाम स्वयंसिद्ध आणि स्वप्रकाशीत आहे, तर मग अशी कुमती कशी होऊ शकते. शंका अत्यंत रास्त आहे आणि स्तुत्य आहे. कारण त्यामुळे आपल्या स्वतःच्या श्रद्धेलासुद्धा तपासता येईल.  याचं उत्तर श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दिलेलं आहे. त्याचा सारांशाने विचार करूया. सर्व प्राणीमात्रांना कर्म करणं क्रमप्राप्त आहे, हे नक्कीच. म्हणजे कर्म न करण्याचं स्वातंत्र्य कोणालाही नाही. कारण भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे आणि तर्कानेसुद्धा जाणता येईल की, काही न करणं हेसुद्धा एक कर्म आहे आणि त्याचं फळ सर्वनाश वा आत्मघात हा होऊ शकतं. हे झालं भौतिक जगतातील कर्माबद्दल. पण आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गातसुद्धा कर्मच श्रेष्ठ आहे. कारण काहीही न जमणाऱ्यालादेखील भगवंतांनी मामेकम शरणं व्रज हा एक कर्म करण्याचा सल्ला दिलाच आहे. बरं शरण आल्यानंतर काय करायचं तर, ज्या चरणांवर शरणा...

भोग आणि ईश्वर २४१

भोग आणि ईश्वर  २४१ नामाच्या सुक्ष्मरूपातून विशालरूप ईश्वराला प्राप्त करण्याच्या प्रयत्नात, सर्वात महत्वाचं साधन असलेलं नाम, घेत असताना, आपण त्यात हरवून जाणं महत्वाचं आहे. यात भाव असावा की नसावा हा मुद्दा इथे सध्या चर्चेत गौण ठरवू. कारण ते नाम इतकं सात्विक, शुद्ध आणि पवित्र आहे की, विरुद्ध भावाने जरी ते नाम घेतलं तरी, कर्मफल देऊनही, ते नाम उद्धार करतं याचं मोठं उदाहरण म्हणजे लंकापती रावण.  माता सीतेचं हरण केल्यानंतर, प्रत्यक्ष श्रीराम लंकेत दाखल झाल्यापासून, प्रत्येक क्षण श्रीरामाची भीती, छाया व त्याद्वारे माया रावणाच्या मनात आणि बुद्धीवर आरूढ झाली. मायेचा प्रभाव इतका विलक्षण असतो आणि कार्य बरोबर विपरीत घडतं वा घडवलं जातं. म्हणजे ती बुद्धीला उलट फिरवते, या तत्वानुसार, क्षणक्षण वाटणाऱ्या भीती, राग, द्वेष, दंभ, अहं या सर्व अवगुणांनी युक्त रावण, मनातच नव्हे तर जिव्हेने व सुप्तमनातूनसुद्धा श्रीरामांच्या नामाचा जाप करत असे.  कर्म अत्यंत हीन दर्जाची असल्यामुळे, त्याच्या प्रभावाने मृत्यूचं शासन मिळणं क्रमप्राप्त होतच. पण या नामाच्या विलक्षण प्रभावाने, मृत्यू साक्षात श्रीरामांच्या...

भोग आणि ईश्वर २४०

भोग आणि ईश्वर  २४० काल आपण पाहिलं की, विशाल विश्वरूप ईश्वराच्या सुक्ष्मरूपातील नामाच्या द्वारे,  त्या विशाल ईश्वराला  प्राप्त करताना, सतत, एकाग्रतेने, एकतानतेने, त्याच्या नामाचा उच्चार करत गेल्यास, विशालरूप ईश्वराची प्राप्ती, अर्थात त्या विशाल ईश्वराची फाईल उघडू शकतो, ज्याप्रमाणें झिप फाईल अनझीप करू शकतो त्याप्रमाणे. आता यात एकच प्रश्न येतो की सतत व एकाग्रतेने का नाम घ्यायचं. मुळात एक लक्षात घ्या की कोणताही प्रोग्रॅम वा सॉफ्ट वेअर संगणकावर सुरू असताना, विजेचा पुरवठा अर्थात ऊर्जा, तो प्रोग्रॅम सुरू असेपर्यंत असणं गरजेच असतं. त्याचप्रमाणे जर ते सॉफ्टवेअर सुरू असताना इतर फाईल्स उघडलेल्या असतील तर, त्या सॉफ्टवेअरच्या कार्याला मर्यादा येतात. त्याशिवाय जर त्या सॉफ्टवेअर चालवायला जास्त स्पेस अर्थात रॅम किंवा कार्यपटल म्हणूया, लागणार असेल तर, इतर प्रोग्रॅम्स वा आज्ञावली या तात्पुरते बंद ठेवावे लागतात.  म्हणजेच जर एखादा प्रोग्रॅम अतिविशाल व जास्त वेळ घेणारा असेल तर, संगणकतज्ञसुदधा इतर फाईल्स उघडायला मज्जाव करतो किंवा तसे केल्यास अकार्यक्षम होतो किंवा वेगावर मर्यादा येतात. मग ...

भोग आणि ईश्वर २३९

भोग आणि ईश्वर  २३९  वास्तविक नामावर म्हणजेच नामाच्या महतीवर, गुणांवर बोलणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराबद्दल बोलण्यासारखच आहे. आता संगणकयुगात, आपल्याला, सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम्स माहीत आहेत किंवा संगणकातील मोठ्या फाईल्स, छोट्या करून, अर्थात झिप करून, ई-मेल मधून किंवा पेनड्राईव्ह मधून पाठवणं, माहिती असेल. एखादी मोठी फाईल, फोल्डर किंवा एखादा प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर झिप करून पाठवलं जातं. नन्तर ते ज्या संगणकात कार्यरत  करायचं असेल, त्या संगणकात, तो प्रोग्रॅम अथवा ती फाईल सेव्ह करून, नन्तर ती अनझीप करून, मग त्यातील माहिती, प्रोग्रॅम वा फाईल्स, त्या संगणकात योग्य त्या ठिकाणी सेव्ह करून, सॉफ्टवेअर सुरू केलं जातं किंवा फाईलमध्ये काम सुरू केलं जातं. म्हणजेच ती झिप केलेली फाईल, त्या मुख्य विशाल प्रोग्रॅम वा फाईलचंच, सूक्ष्म रूप असतं.  म्हणजे त्या सूक्ष्म फाईलमध्ये, त्या विशाल फाईलचे सर्व गुणधर्म व कार्यक्रम आणि कार्यक्षमता असतेच असते. मात्र ती सूक्ष्म फाईल, आहे त्या सूक्ष्म स्वरूपात, आपण कार्यार्थ  वापरू शकत नाही. पण ती अर्थहीन नसते, तर त्यातील गुण, कार्यक्रम व कार्यक्षमता ह...

भोग आणि ईश्वर २३८

भोग आणि ईश्वर  २३८ खरतर नाम या सार्वसामान्यांना सहजसाध्य उपायाची ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. पण मागील दोन लेखांमध्ये दिलेल्या शास्त्रीय माहितीच्या आधारावर आपण नामाचा पुनः विचार करू. एक गोष्ट नक्की, की  आत्मउन्नती व आत्मउद्धारासाठी ज्या इंधनाची व ऊर्जेची आवश्यकता असते, ते इंधन म्हणजेच नाम आहे.  नामाच्या दीर्घ, सतत, निश्चित स्मरणाने, उच्चारणाने आवश्यक बल, ऊर्जा व तेज, बुद्धी व मन याद्वारे, आत्म्या पर्यंत पोचून, त्या आंचेने आत्मतेज उजळून निघते. आत्म्यावर जमा झालेली, जन्मानुजन्मांची कर्म, विकार, वासना व माया यांच्या प्रभावाने तयार झालेली काजळी, जोपर्यंत पूर्ण जात नाही, तोपर्यंत उन्नती व उद्धार शक्य नाही. त्यासाठी चित्तशुद्धीची नितांत आवश्यकता आहे. ती चित्तशुद्धी, अनेक कर्ममार्गानी प्राप्त होऊ शकते. अष्टांग योग, यज्ञादी कर्मकांड, तपसाधना, दानधर्म इत्यादी अनेक मार्गांनी आवश्यक चित्तशुद्धी प्राप्त करता येते. पण हे सर्व मार्ग सद्यस्थितीत आणि सांप्रत काळात सर्वांना प्रत्यक्षात शक्य होतील असं नाही. मग यासाठी, पूर्ण शरणागत भावाने घेतलेले, प्रभूंचे नाम व त्या नामाचे सतत उच्चारण व...

भोग आणि ईश्वर २३७

भोग आणि ईश्वर  २३७ क्षेपणास्त्र, यान, अवकाश आणि त्याची कक्षा याबद्दल विचार करून झाल्यानंतर आता आपण आत्मरुप तेजाला या अवकाशात भ्रमंती करण्याच्या तंत्राचा विचार करूया. यानाच्या उड्डाणासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करून, गुरुत्वाकर्षणाच्या कित्येक पटीचं बल वापरून, यान प्रचंड वेग निर्माण करून , त्याला पृथ्वी वरून अवकाशाच्या दिशेने, प्रक्षेपित केलं जातं.  यात ऊर्जा, वेग, बल, यांचा वापर करून, कार्य साधलं जातं. हे तिन्ही घटक किती प्रमाणात व कसे निर्माण करायचे हे, यानाचं वजन, वातावरण आणि ज्या ठिकाणा हून हे यान प्रक्षेपित करायचं आहे, त्याचं भौगोलिक स्थान, यावर अवलंबून आहे. गुरुत्वाकर्षण किती प्रमाणात कार्य करत आहे, त्यावर या तिन्ही घटकांच्या निर्मितीचं कोष्टक अवलंबून आहे.  देह हा त्याच पंचमहाभूतरुप तत्वांचा तयार झालेला आहे. यानाचा उपयोग,  पृथ्वीच्या कक्षेबाहेर उपग्रह वा जे अंतरिक्षात पाठवायचं आहे त्याला, कक्षेबाहेर अंतरिक्षात पोचवण्यासाठी आहे वा असतो. म्हणजेच यान हे माध्यम आहे. त्यातून साध्य, तो उपग्रह कक्षेत गेला की, तेच यान नष्ट होऊन जातं, आपोआप.  आता इथे देहाचा उ...

भोग आणि ईश्वर २३६

भोग आणि ईश्वर  २३६ २३४ व्या भागात सुरू असलेला विषय पुढे नेऊया. पंच महाभूते आणि त्यांची निर्मिती, हे मुळात एक गणित आहे. कारण जी पंचमहाभूते आपल्या आजूबाजूला या पृथ्वीवर आणि आसमंतात, अर्थात ब्रह्मांडात आहेत, त्याच तत्वांना घेऊन, नियंत्याने हा देह निर्माण केला. म्हणजेच देहाबाहेरसुद्धा जी तत्वे तीच देहाच्या आतमध्ये अस्तित्वात आहेत.  म्हणजेच या देहातून, या देहातील चैतन्याला, विश्व चैतन्यात समाविष्ट करून मोक्ष वा मुक्ती प्राप्तीसाठी याच मृत्यूलोकातील पाच तत्त्वांनी तयार झालेल्या देहाची जरुरी आहे, हे तर नक्की.  म्हणजेच त्याच साधनांना आधारभूत घेऊन, त्याच जगताच्या पार जाण्याची किमया साधता आली की झालं, अस सोप्प तत्व या मागे आहे.  आपण क्षेपणास्त्र निर्माण करून, तयार  केलेल्या तंत्र ज्ञानाचा वापर करून, यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर अंतराळात सोडून, अनेक ग्रह, आपली सूर्यमाला, इतर अस्तित्वातील सूर्यमालेतील ग्रह, तारे या सर्वांचा अभ्यास केला व करत आहोत. त्यासाठी अग्नीतत्वाचा वापर करून, जल तत्वाच्या विरुद्ध दिशेने, वायू तत्वाला कापत कापत, आकाश या तत्वाला भेदून, यान व उपग्रह अंतर...

भोग आणि ईश्वर २३५

भोग आणि ईश्वर  २३५  आषाढ पौर्णिमा अर्थात श्रीव्यासपौर्णिमा म्हणजेच श्रीगुरुपौर्णिमा !!!  प्रथम सद्गुरू वंदन ll देहासाठी मातृपितृजन ll ईश्वर न सद्गुरुहून भिन्न ll जाण चिरस्मरणी ll खरतर २३४ व्या लेखाचा विषय आज पुढे न्यायचा आहे. पण सद्गुरू महती न सांगता पुढे जाणं हे न जाण्या सारखं आहे. म्हणून २३४ चा विषय उद्या पुढे नेऊ. या चरा चराची निर्मिती केल्यानंतर, जगताचा निर्माता, जो नवनीत म्हणजेच लोण्यासम मृदू हृदयाचा आहे, त्याला, आपणच स्वसंकल्पे निर्मिलेल्या जगतातील, आपल्याच अंशरूपाचा विरह जाणवू लागला.  पापपुण्याच्या, कर्म गतीच्या फेऱ्यात अडकलेल्या आणि त्यातून सुटकेसाठी अजाण, मार्गभ्रष्ट, मायेच्या फेऱ्यात अडकलेल्या, मनुष्यादी सजीवांना संसार चक्राच्या भोवऱ्यात जन्मोजन्मी फिरताना , त्याच त्याच चुका, प्रमाद करताना ,  निसरड्या आध्यात्म वाटेवर चालताना पाहून, विश्वनिर्माता अत्यंत व्याकुळ होत असे.  या कठीण परीक्षेतून पार होणं म्हटलं तर सहज पण म्हटलं तर अत्यंत दुर्लभ व दुरापास्त आहे, याची जाणीव एक माता आणि पिता या रुपात प्रकटलेल्या परम शक्तीला होती. प्रश्न तर आहेत, त्यांची उत्...

भोग आणि ईश्वर २३४

भोग आणि ईश्वर  २३४ आज एक पोस्ट वाचली आणि त्यावर कोणीतरी केलेली टिप्पणी वाचली, म्हणून त्यावर लिहावंसं वाटलं. मुद्दा असा होता, आज बऱ्याच भागात आलेल्या पूरपरिस्थिती बाबत एक , दोन पोस्ट्स वाचल्या, ज्यात पोस्टकर्त्याने उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून त्यात अडकलेल्या लोकांचं देव रक्षण करो, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. यावर खूप जणांनी अनुमोदन देऊन, आपलीही सदिच्छा त्यामध्ये व्यक्त केली होती. यात काहीही आक्षेपार्ह असण्याचं कारण नाही. संवेदनशील मानवी मनाची ती सहज प्रतिक्रिया व तशाच स्वभावाच्या अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला होता. मुळात दुसऱ्याच्या संकटांना संवेदन शील राहून, मदत करता येत नसेल तर दुरून निदान त्यांच्या सुरक्षेची, स्वास्थ्याची कामना करणं, हा सहज मानवी स्वभाव आहे.  एखादया घटनेला वा प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ ज्यांच्यावर येते, त्यांची मनःस्थिती ही, त्या परिस्थितीतून गेलेल्या व्यक्तींनाच समजू वा जाणवू शकते. किंवा ज्या व्यक्ती ती स्थिती पाहून सद्गतीत होतात, त्यांनाच ते समजू शकतं. मग संवेदनशील मन, त्या भावना व्यक्त करून, त्या परिस्थितीत सापडलेल्या वा अडकलेल्या व्...

भोग आणि ईश्वर २३३

भोग आणि ईश्वर २३३ या करोनाच्या काळात मला, एक सर्वोच्च सकारात्मक बाब, जी आज दोन वर्षे जाणवली आणि खरच डोळे भरून आले. कारण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे खूप गोष्टी मूलतः बदलल्या आहेत. सर्वच क्षेत्रात, परीक्षेच्या काळाला, जवळजवळ सर्वजणच सामोरे जात आहेत. त्यामुळे जणू स्थित्यंतराची स्थिती आहे. अनेक क्षेत्रात गोष्टी बदलत आहे. सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय, व्यक्तिगत पातळीवर वर्षानुवर्षाच्या पद्धती, बदलल्या. त्या बदलांना काही जणांनी सहज तर काही जणांनी नाईलाजाने का होईना स्वीकारलं. स्वीकारार्ह होतं ते स्वीकारून पुढे नेल्या. पण नवीन स्थितीनुसार त्याज्य वा बदलण्यास तयार नसलेल्या गोष्टी, वृत्ती, स्थिती, या टिकणार नाहीत. ही सर्व स्थिती असताना, भारतीय सांस्कृतिक वारसा असलेल्या, अनेक गोष्टींचा कस हा या काळात लागला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्यात मोठ्या गोष्टींपर्यंत सर्वच धार्मिक, अध्यात्मिक चालीरीती, पूजा, देवदर्शन इत्यादी सर्वच बाबतीत हा कस लागलाच. पण त्यामुळे भारतीय सनातन सांस्कृतिक चालीरीती, रिवाज, प्रथा, परंपरा या किती लवचिक आहेत आणि आपल्या सर्व धार्मिक प्रथा त...

भोग आणि ईश्वर २३२

भोग आणि ईश्वर  २३२ चातुर्मासारंभ म्हणजे दृढ संकल्पाचा, पवित्रतेचा मांगल्याचा आरंभ. कारण शास्त्रीय दृष्टीने हा काळ पावसाळी हवा, खराब हवामान यामुळे पसरणाऱ्या रोगराईचा काळ. पारमार्थिक अर्थाने  असुरी शक्ती, दानवी कामना या सर्वांना पोषक काळ. या खरतर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  म्हणजे आध्यात्म, संस्कृती याकाळाकडे एका दूषित व नकारात्मक शक्तींचा उदयकाळ म्हणून पाहतं. तर वैज्ञानिक दृष्टी या काळाकडे खराब हवामान, त्यामुळे बिघडणारं शरीर व मनस्वास्थ्य या दृष्टीने पाहतं. वातावरणातील बदलाची शास्त्रीय कारणमीमांसा ही भौतिक कारणांवर अवलंबून आहे. ज्याचं पृथक्करण करता येतं आणि त्यासाठी निश्चित कार्यवाहि प्रतिबंधक उपाय व इलाज या स्वरूपात मांडता येते.  मानव हा मन बुद्धी देह व या सर्वांना चालवणारी आत्म शक्ती म्हणजे या देहात स्थित आत्मा यासर्वांचा संयोग आहे. यातील प्रत्येक घटकाला स्वतःची तहान व भूक आहे. जोपर्यंत यातील प्रत्येक घटक आपली भूक मर्यादित ठेवून वाटचाल करतो, त्यावेळी वा तोपर्यंत सर्व गोष्टी नियंत्रणात राहतात व नियंत्रित करता येतात.  प्रत्येक घटकाला वास्तविक एक ज्ञानेंद्रिय ...

भोग आणि ईश्वर २३१

भोग आणि ईश्वर  २३१ आज चातुर्मासाच्या पूर्वसंध्येला खरतर अनेक व्रत वैकल्य यावर लिहून मांडता येईल. पण एकतर त्याबद्दल खूप विस्ताराने अनेकांनी लिहिलंय आणि त्याबद्दल परत लिहायची गरज आहे, असं मला वाटत नाही. त्याऐवजी आपण त्याच्या तत्वाबद्दल बोलूया. आपण चार महिनेच का करायचं किंवा हे करून काय साध्य होईल किंवा होणार आहे, याचा जरा विस्ताराने विचार करूया.  मुळात मनाचा ओढा, मनाची आस, आसक्ती, बुद्धी, वैचारिक बैठक, यावर सर्वकाही अवलंबून आहे. भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही मार्गांवर मन, बुद्धी यांच्यावरच कर्म आणि त्या कर्माची गति म्हणजेच पुढचा सर्व फेरा, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू , ही सर्व साखळी अवलंबून आहे.  म्हणजे मन व बुद्धी या देहामुळे प्राप्त दोन निर्गुण गोष्टी सगुणरूप देहासाठी व त्यायोगे आत्मसिद्धीसाठी किती महत्वाच्या आहेत, याचा विचार करा. म्हणजेच जर देहाला कार्याला लावायचं असेल तर, प्रथम मन व बुद्धी या दोन अश्वांना नियंत्रित करणं किंवा त्यांना काही सवयीत बांधणं हे गरजेचं आहे. त्यामुळे देहाच्या सवयी दुरुस्त होऊन, कर्म सुधारायला मदत होईल. मनाला नियंत्रित करण्यासाठी काही नियम निती यांच्...

भोग आणि ईश्वर २२९

भोग आणि ईश्वर  २२९ एका अर्थाने निष्ठा व समर्पण वा शरणागत असणं, हा भक्तीचा एक उत्तम पाया आहे. आता पाया म्हटलं की, पहिली गोष्ट तो सुरवातीलाच बांधला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जितका मजबूत, तितकीच त्यावर उभी राहिलेली इमारत, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असते. म्हणून इमारतीचा  पाया  बांधताना विशेष काळजी घेतली जाते आणि पुरेसा वेळ व उत्तम साहित्य वापरलं जातं.  याच नियमाने आपल्या आध्यात्मिक, आत्मिक उन्नती साठी निष्ठा आणि शरणागती या दोन पायांना पूर्ण सक्षम व मजबूती यावी यासाठी, आपण स्वतः विशेष काळजी घेतली पाहिजे. आपली साधनेतील निष्ठा ही किती दृढ आहे, याची परीक्षा , ही भोगांचा व दुःखांच्या काळात होते.  कारण कर्माने आलेले भोग भोगताना व दुःख सहन करताना, आपण त्यात ईश्वराला वा सद्गुरूंना किती दोषी मानतो अथवा मनाने कणखर व खंबीर राहून, सर्व भोग दुःख हे आपलंच कर्मफल आहे हे जाणून, त्याही परिस्थितीत आपली साधना, त्याच दृढतेने पुढे नेतो, यावर आपल्या निष्ठेची पातळी पारखली जाते. मुळातच आपल्या कर्मातील दोष, साधना करत असताना जास्त प्रकर्षाने पुढे येत असतील, तर ते वास्तविकपणे,  उत्...

भोग आणि ईश्वर २३०

भोग आणि ईश्वर  २३०  जन्मोजन्मी अनेक देहातून फिरत असलेला आत्मा आणि कर्माच्या, वासनेच्या, मायेच्या सापळ्यात अडकून, देह हेच  सर्वकाही आणि देह हेच साध्य मानणारा मी, यांच्या बेडीत जखडलेला अशुद्ध स्वरूपातील आत्मा शुद्ध व पवित्र करण्याचं एकमेव तंत्र व मंत्र म्हणजे आध्यात्म. म्हणजेच आत्मशुद्धी साधून आत्मउन्नती व आत्मउद्धार साधणं म्हणजे या देहात आल्याचं सार्थक करून घेणं. जन्मोजन्मीच्या गतीत, देहाच्या व्यापारात, सर्व साधून, वृद्धपणी देवाचं नाव घेऊन, वेळ असेल तर काही चार पुण्य जोडण्याच्या गोष्टी आपण करतो. सर्वसाधारणपणे हीच प्रक्रिया प्रत्येक मानवी जन्मात व देहात करून, सरते शेवटी देह सोडून, पुढील जन्माकडे जाणारे आपण, कितीशी आत्मशुद्धी साधत असू, विचार करा.  आपण घरातील पिण्याच्या पाण्यासह सर्व प्रकारची भांडी ठराविक दिवसांनी स्वच्छ करुन पुन्हा भरतो. कदाचित प्यायच्या पाण्याची भांडी रोजसुद्धा धुवून भरत असू. का तर दूषित पाण्याने शरीराला काही अपाय होऊ नये, म्हणून. पण त्याचवेळी मायेचे मोहाचे, लोभाचे संस्कार पोसणारे आपणच असतो.  मग विचार करा, की नश्वर देहाची, तो देह असेपर्यंत इतकी चि...

भोग आणि ईश्वर २२८

भोग आणि ईश्वर  २२८  निष्ठा काय हे समजलं आणि ती निष्ठा ईश्वर वा गुरुचरणी अर्पण केली की, साधकाने खरतर पूर्ण निश्चिन्त व निरपेक्ष झालं पाहिजे. कारण निष्ठा वाहणं वा अर्पण करणं म्हणजे सर्वस्व अर्पण करण्यासारखं आहे. एकदा का सर्वस्व अर्पण केलं की, माझं काहीच उरत नाही. फक्त माझं आराध्य, माझं साधन आणि त्या आराध्यासाठी प्रत्येक क्षणक्षण अर्पण, इतकंच शिल्लक राहतं. पूर्वीच्या काळात खानदानी व शेठ सावकार यांच्या घरी पिढ्यानपिढ्या निष्ठा वाहिलेली नोकरमाणसं कामाला असायची. त्या नोकरमंडळींचा सर्व जिम्मा हा त्या खान दानाच्या शिरावर असायचा. अगदी पूर्ण कुटुंबच्या कुटुंब त्या घरात कार्यार्थ सिद्ध असायचं. त्या नोकरदार कुटुंबाला आपली, आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या भवितव्याची आणि त्यांच्या घरातील कार्याची काहीही चिंता नसायची.  कारण ज्या घरात ते नोकरदार म्हणून पिढ्यान्पिढ्या राबत असत, त्या घराने त्यांच्या कार्याचा सुदधा भार उचलणं अपेक्षित असायचं, नव्हे तर तसा तो उचलला जात असे. अडीअडचणीला, कार्याला, औषधपाण्याला लागणारा खर्च व सर्व तरतूद त्या घरातूनच होत असे. तशी खानदानी परंपरा वा रीतिरिवाजच अस...

भोग आणि ईश्वर २२७

भोग आणि ईश्वर  २२७ जिथे मन व बुद्धी यांसह देह गुंतवल्यानंतर आत्म्याला बळ व संयम प्राप्त होतो आणि आत्मा निश्चिन्त होतो, त्या स्थितीला निष्ठा म्हणतात. जिथे एकवार लक्ष केंद्रित केल्यानंतर दुसरीकडे लक्ष द्यायची इच्छा आणि गरज उरत नाही, तेंव्हा आपली त्या स्थानी निष्ठा बसली असं समजावं.  याव्यतिरिक्त कोणतीही स्थिती असेल, म्हणजे अंशात्मक जरी साशंकता असेल, तरी त्या स्थितीला निष्ठा म्हणता येणार नाही. म्हणजेच निष्ठा आपल्यासोबत श्रद्धा व विश्वास घेऊनच येते. एखाद्यावर जेंव्हा आपली निष्ठा असते, तेंव्हा त्या व्यक्ती वा देवतेच्या मर्जीप्राप्तीसाठी प्रसंगी काहीही करण्याची तयारी असते.  मावळ्यांची छत्रपतींवर असलेली स्वामिनिष्ठा व देश सेवकांची स्वातंत्र्यप्राप्तीकरता असलेली राष्ट्रनिष्ठा ही त्यापैकीच निष्ठेची उदाहरणं आहेत. आपल्या साधनेवर अशीच जेंव्हा निष्ठा दृढ होते, त्यावेळी त्यात गोडी, एकाग्रता, प्रगती या सर्व गोष्टी आपोआप साध्य होतात. जसं शालेय जीवनात आपल्या आवडीच्या विषयांसाठी मुद्दाम आपण जास्त जोमाने अभ्यास करायचो, त्याप्रमाणे एकदा नामावर निष्ठा बसली की, माणूस सहजी त्यात एकचित्त होतो. अन...

भोग आणि ईश्वर २२६

भोग आणि ईश्वर  २२६ चित्त एकाग्र करून , त्या चित्ताला आपण आपल्या इप्सिताच्या पूर्ततेसाठी, कार्यार्थ सिद्ध करू शकतो, हे अभ्यासातून सिद्ध करणारे ते ज्ञानी अर्थात मुमुक्षु. या सर्व प्रक्रियेची सिद्धता, त्याचा मार्ग, ते साध्य करण्याच्या मार्गातील अडीअडचणी, त्यांना पार करण्याचे वा टाळण्याचे मार्ग हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचलं तेच मुळात या सुरवातीच्या साधक वा संशोधक सिद्धपुरुषांमुळे. या चित्त स्थिर ठेवून, त्यातून निर्माण होणाऱ्या लहरीं मार्फत आपल्या इप्सितातील इष्ट ध्येयापर्यंत पोचण्या साठी हे चंचल मन कुठेतरी एखाद्या लक्षावर वा ध्येयावर किंवा एखाद्या निश्चित स्वरूपावर केंद्रित करून, त्यामार्गे चंचल मनाला कार्यप्रवृत्त करणं हा एक मोठा योग आहे. तो साधण्यासाठी काही क्रिया व प्रक्रिया शोधण्यात आल्या. त्या क्रिया व प्रक्रिया सहजभाषेत लिहून त्यांना यौगिक क्रिया असं नाम देण्यात आलं.  अश्या या यौगिक क्रियांनी, अस्थिर मनाला आधी स्थिर करून, त्यानंतर त्याला एका स्वरूपावर केंद्रित करून, त्या एकाग्रतेतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा, चैतन्याचा उपयोग या जगतापार असलेल्या आणि मानवी देहासह, संपूर्ण सृष्टी...

भोग आणि ईश्वर २२५

भोग आणि ईश्वर  २२५ नामाकरता मनाची तयारी कशी असावी, म्हणजे मूळ माती कशी असावी जेणेकरून, येणारं नामाचं पीक उत्तम येईल. कारण जितकी  कसदार जमीन, तितकंच कसदार पीक, हा तर निसर्गनियम आहे. त्यासाठी सर्वात प्रथम आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निष्ठा. खरतर निष्ठा हा शब्द नितिष्ठते अर्थात स्थापित होते या शब्दावरून आला असावा असा माझा अंदाज आहे. नितिष्ठते हा शब्द ष्ठा या धातूवरून आला आहे. ष्ठा चा अर्थ स्थिर होणे हालचालरहित स्थिती येणे. तिष्ठते हे त्याचं रूप आणि  त्यावरून आलेला शब्द नितिष्ठते. स्थापित होणे. पुन्हा त्यात नीती हा शब्दही आला आहेच. म्हणजे नीतीची ज्या ठिकाणी स्थापना झाली किंवा नीती जिथे स्थिर झाली, तिथे निष्ठा आली वा बसली किंवा प्राप्त झाली, असा त्याचा एक अर्थ होतो.  त्याव्यतिरिक्त निष्ठा याचा एक अर्थ आसक्ती किंवा ओढ हादेखील आहे. म्हणजेच जिथे नीती, आसक्ती वा ओढ स्थिर झाली तिथे निष्ठा स्थापित झाली. आता या सर्व विस्तृत विवेचनातून आपण नामासाठी निष्ठेचा अर्थ काय होतो ते पाहू. मुळात माणूस हा समस्या आल्यावर हाल चाल व मुख्यतः विचार करणारा प्राणी असल्यामुळे, ज्यावेळी आयुष्यात, अडचण...

भोग आणि ईश्वर २२४

भोग आणि ईश्वर  २२४ खर पाहिलं तर श्रीमद्भागवद्गीता, उपनिषदं, पुराणं, संत वचनं यातून जे सार पुढे येतं, त्यातून काही निष्कर्ष जरूर काढता येतात. मुळात या भूतलावर येणं, त्यात हा मानवी जन्म मिळणं आणि त्यातही, संचितातील ठेवी वा कर्ज, पुढच्या जन्मासाठीच्या कर्मांची मशागत इत्यादी सर्व करण्याची वा निदान समजण्याची उर्मी वा जाणीव जागृत होणं, हीच मुळात खूप मोठी गोष्ट आहे, मानवी जीवनात.  त्यामुळे ज्यांची जाणीव झाली, त्याबद्दल विचार करू लागणं वा करू शकणं ही त्याहून उत्तम स्थिती आहे. आता विचार केल्यानंतर काही गोष्टी मनात नोंदल्या जातात की, सर्वांना काहिनाकाही समस्या आहेतच, तरीही आपल्याला आपलं दुःख हे पर्वतासमान वाटतं आणि परदुःख हे नेहमी काकणभर उणं वाटतं, हे बर्याच प्रमाणात सत्य आहे.   जाणीवा ज्यावेळी इतरांच्याही दुःखाकडे, भोगांकडे सजगपणे पाहतील आणि त्याबद्दल निदान आत्मीयता बाळगतील, त्यावेळी,  पुढील पायरी गाठली जाईल.  त्यानंतर  सुख आणि दुःखाच्या या चक्रातून बाहेर पडण्याचा विचार येणं ही पुढील पायरी. इथे एक सूक्ष्म घातक वाट आहे. ती म्हणजे वाट्याला आलेले किंवा पूर्वकर्मां...

भोग आणि ईश्वर २२३

भोग आणि ईश्वर  २२३ सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज, अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।। ह्या श्लोकात इतक्या स्पष्टपणे वचन दिल्यानंतर, त्या वचनाच्या पूर्ततेसाठी पूर्ण हमी देताना, प्रभू स्वतः शेवटी सांगतात की, मा, शुच:. एखादी वडीलधारी व्यक्ती एखाद्या लहान वा कमी वयाच्या मुलाला, एखाद्या अपरिचित कर्माबद्दल वा मार्गाबद्दल सांगत असताना, त्या लहान वयाच्या मुलाच्या किंवा व्यक्तीच्या डोळ्यात साशंकता, भीती पहात असेल तर सर्व सांगून झाल्यावर , त्याच्या डोळ्यात पहात, पाठीवर हात थोपटत ती व्यक्ती सर्वात शेवटी एक आत्म्यातून आत्म्याला, नजरेतून नजरेला , एक आश्वासन देते.  ते आश्वासन म्हणजे, तू घाबरू नकोस, चिंता करू नकोस, या सर्व मार्गात मी आहे तुझ्या सोबत, तू फक्त, मी सांगितलं त्याप्रमाणे, चालायला सुरवात तर कर. इतका आश्वस्त हात आपल्याला मार्ग सांगून, आपल्या पाठीवर थाप मारून सांगतो, तो फक्त आणि फक्त एका प्रेमळ मातेसमान किंवा पित्यासमान व्यक्ती वा व्यक्ती समान असलेल्या एखाद्याचाच असू शकतो. जगतपिता, जगतपालक या नात्याने विश्वाच्या पालनाची, पूर्ण जबाबदारी, त्रिद...

भोग आणि ईश्वर २२२

भोग आणि ईश्वर  २२२ सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज, अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।। सर्व कर्मातील सर्व मोह, माया लोभ आणि सर्व भोगातील व दुःखातील शोकभावाचा त्याग करून मला एकट्याला, एकात्म भावाने, शरण जा. त्यामुळे आणि त्यानंतर काय होईल याची शाश्वती वा खात्री किंवा वचन श्लोकांच्या पुढील ओळीत भगवंत स्वतः देत आहेत.  म्हणजे जो साधक, भक्त आपला भोळा भाव एकवटून माझ्या चिंतनात, स्मरणात, रममाण होईल आणि सर्व त्यागून माझ्या चरणी समर्पित भाव ठेवेल, अश्या भक्ताला  ही  शाश्वती देऊन ईश्वर सांगतो की, त्याला सर्व पापातून मुक्त करून, त्याला मोक्षाप्रत नेईन, माझ्या धामाला तो प्राप्त करेल.  पहिल्या ओळीचा विस्तारपूर्वक अर्थ पाहिल्यानंतर आणि शरणागती अर्थात समर्पण म्हणजे काय, हे जाणून घेतल्यानंतर या दुसऱ्या ओळीतील वचनाकडे बघण्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की, गीतेत श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे इंद्रियांमध्ये ते मन आहेत. याच मनाला जडलेले विकार, विचार,  अनेक विकल्प गैरमार्ग, माया, मोह सहा असुररूप शत्रू यांमुळे या मनातून, ईश्वरी अंशाचं...

भोग आणि ईश्वर २२१

भोग आणि ईश्वर  २२१ सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज, अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।। आपण धर्म, परित्यज्य, माम एकम आणि व्रज या शब्दांचं दीर्घ चिंतन केलं. पण हे सर्व शब्द एका शब्दा शिवाय व्यर्थ आहेत. हे सर्व शब्द समजले तरीही ते आत्मसात करून, त्याच्या पुढील, महत्वाची कृती, केल्या शिवाय, आधीचं सर्व फलहीन आहे, किंवा गौण आहे. हा कोणता शब्द किंवा कृती आहे, ज्यामुळे बाकीच्या सर्व संज्ञा अर्थपूर्ण होतात. वरील सर्व शब्दातून अपेक्षित भाव या एका शब्दाने व्यक्त होतो. तो म्हणजे शरणम्. शरण या शब्दात अनेक भाव व कृती अपेक्षित आहेत आणि गीताकाराला, त्याच अपेक्षित असाव्यात. शरण जाणे म्हणजे समर्पण करणे. समर्पण म्हणजे नक्की काय. तर समर्पण शब्द वास्तविक दोन शब्दांची संधी आहे. सम् म्हणजे एक समान आणि अर्पण म्हणजे अर्पित करणे, वाहणे. हे देह आणि मन याद्वारे आत्म्यातून प्रकट झालेली कृती आहे  ज्यावेळी इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यातील उर्जा प्रवाह एकसमान असतो, ज्यावेळी उजव्या व डाव्या दोन्ही आज्ञाचक्राची गती एकसमान व स्थिर असते आणि ज्यावेळी दोन्ही श्वासांमध्ये एक...

भोग आणि ईश्वर २१९

भोग आणि ईश्वर  २१९ सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज, अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।। परित्यज्य या शब्दाचा वास्तविक अर्थ त्यागणे, सोडून देणे किंवा abandoned ज्याला आपण म्हणतो तो आहे. म्हणजेच शब्दशः याचा अर्थ, सर्व धर्मांचा त्याग करून. सनातन शब्द संकल्पनेत धर्म या शब्दाचा अर्थ, कर्तव्य वा अपेक्षित कर्म असा आहे.  त्यामुळे परित्यज्य याचा अर्थ कर्तव्याचा, अपेक्षित कर्मांचा त्याग कर. म्हणजे काहीही न करता, सर्व इतिकर्तव्यता त्याग.  पण इतका सोपा अर्थ, तोसुद्धा सर्व कर्तव्याचा त्याग करण्याचा पळपुटा मार्ग, भगवंत सांगतील हे संभवत नाही. मग याचा गहन वा गुह्य अर्थ काय असावा. माझ्या मतानुसार याचा गुह्यार्थ हाच आहे की, तुझ्या कर्तव्यातील तुझं मन वा त्या मनातील आसक्ती , वासना यांचा त्याग करून, निरिच्छ मनाने, निरपेक्ष भावाने तू तुझं कर्तव्य वा अपेक्षित कर्म कर.  कारण जे केशव अर्जुनाला, त्याच गीतेत शस्त्र हाती घेऊन, युद्धाचं कर्तव्य पार पाडायला विनवून सांगत आहेत, तेच गीतेच्या शेवटी, सर्व कर्तव्य अर्थात सर्व धर्म त्याग असं कसं काय सांगतील, हे अस...

भोग आणि ईश्वर २१९

भोग आणि ईश्वर  २१९ सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज, अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।। परित्यज्य या शब्दाचा वास्तविक अर्थ त्यागणे, सोडून देणे किंवा abandoned ज्याला आपण म्हणतो तो आहे. म्हणजेच शब्दशः याचा अर्थ, सर्व धर्मांचा त्याग करून. सनातन शब्द संकल्पनेत धर्म या शब्दाचा अर्थ, कर्तव्य वा अपेक्षित कर्म असा आहे.  त्यामुळे परित्यज्य याचा अर्थ कर्तव्याचा, अपेक्षित कर्मांचा त्याग कर. म्हणजे काहीही न करता, सर्व इतिकर्तव्यता त्याग.  पण इतका सोपा अर्थ, तोसुद्धा सर्व कर्तव्याचा त्याग करण्याचा पळपुटा मार्ग, भगवंत सांगतील हे संभवत नाही. मग याचा गहन वा गुह्य अर्थ काय असावा. माझ्या मतानुसार याचा गुह्यार्थ हाच आहे की, तुझ्या कर्तव्यातील तुझं मन वा त्या मनातील आसक्ती , वासना यांचा त्याग करून, निरिच्छ मनाने, निरपेक्ष भावाने तू तुझं कर्तव्य वा अपेक्षित कर्म कर.  कारण जे केशव अर्जुनाला, त्याच गीतेत शस्त्र हाती घेऊन, युद्धाचं कर्तव्य पार पाडायला विनवून सांगत आहेत, तेच गीतेच्या शेवटी, सर्व कर्तव्य अर्थात सर्व धर्म त्याग असं कसं काय सांगतील, हे अस...