Skip to main content

ll श्रीमहाविष्णुस्तुती ll

🌷🌷🚩ll श्रीमहाविष्णूस्तुती ll 🚩🌷🌷

मकरंद जया रंध्रात पूर्ण, त्या कमळांचा तुज हार
पुष्पे, परिमळ दिव्य जयांचा, वाहियली चरणांवर

कल्पनातीत शक्ती अजोड ती गदा, एका हाती
एका नादाने विश्व हादरे तो पांचजन्य दुज हाती

रिपू खंड खंड उध्वस्त होय, ते सुदर्शन त्रिज हाती
त्या कमलनयन श्रीलक्ष्मीसम कमलपुष्प तव हाती

अशी चतुर्भुजा ही मूर्त साजिरी  तेज नेत्री अलोट
गंधर्व सर्व गाती भूपाळी प्रतिदिनी होऊनी भाट

सूर लक्ष लक्ष वाहती पखाली तव नामाच्या  देवा
क्षीरसागरात करी वास तरी जगत तुझ्या निजभावा

नभी कोटी कोटी तारका प्रकाशित तुझेच वाहती तेज
रवी चंद्र, जयाने दिवस रात्र, ते दिपतील पाहून ओज

अजानुबाहु मूर्त तुझी अन वर्ण निळसर नभ हे 
प्रतिबिंबित सारे संकल्पात प्रकटले क्षणात जग हे

मुख चंद्र तुझा पाहण्यास आतुर भक्त उभा हा द्वारी
सावली तुझ्या कृपेची असुदे प्रसन्न साधक हा वारी

©® कवी : प्रसन्न आठवले
१४/१२/२०१९
१०:०९


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...