Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३२

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
 हिच्याशी सोयरीक केल्यास लोक मला नावं ठेवतील , माझं तोंडदेखील बघणार नाहीत, असा विचार तर त्याने केला नसेल ना , कदाचित मी पत्र लिहिलं तेच चुकलं की काय, की त्या पत्रात मी शतजन्म तुझीच आहे असं न घाबरता मागणं केलं, त्यामुळे तर कृष्ण येण्याचा मानस बदलून दुसरा विचार करता झाला नसेल ना , की शिवादी देव तुझे चरणरज घेण्यास उत्सुक असतात असं लिहून मला तिकडे येण्यास सांगते आहे, पण स्वतः आळसाने काही कृती न करता तिथे बसून अश्व दौडते , असाही विचार केला असेल का, 

लिहिण्यासाठी हिला मीच सापडलो आणि मला काय कमी साधक आहेत का कुणा कुणाला मी स्वये जाऊन साहाय्य करू शकेन, खरच भीमकी वेडी आहे असाही विचार करू शकेल तो ,  कदाचित असंही झालं असेल की, द्विजास कृष्णमोह होऊन, त्याने तिथेच राहण्याचा निश्चय केला असेल कारण कृष्णरुप आहेच मनमोहक म्हणूनच नावही आहे मनमोहन , त्याकडे जो जो गेला तो परतून कधीच नाही आला, कारण ते सर्व धामांचे निजधाम आहे, की हिच्या या कृतीमुळे हिच्या मायबापांची नालस्ती होईल, मग मी न गेलेले बरे, असे वाटूनही तो वाटेतून परत गेला असेल, 
 
विवाहाला आता एकच रात्र बाकी आहे आणि या मनःस्थिती मध्ये असलेली रुक्मिणी विचार करते की आता कृष्ण येण्याची शक्यता नाहीच,  मी मात्र वृथा कृष्णाच्या येण्याचा विचार करत बसले आहे. असा विचार करून हताश चेहऱ्याने आपल्या भविष्याचा विचार तिच्या मनाला कंटकाप्रमाणे सलतो आहे. कृष्ण येणे नाही मी उगाच उपऱ्यासारखी वाट पहात उभी आहे. आता तर अन्नपाणी देखील तिला गोड लागत नाहीये, निद्रा येण्याचा प्रश्नच नाही, अखंड मनात, आत्म्यात आणि चक्षूंपुढे फक्त कृष्ण, कृष्ण आणि कृष्णच दिसत आहे, जागृती सुप्ती आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेत फक्त कृष्णध्यान चालू आहे. 

जीवाला फक्त अनंताचं वेड लागलंय.  त्यामुळे जीवाला अन्य काही भावत नाही अश्या भावावस्थेत रुक्मिणी गेली आहे. आता कृष्णानाथाशिवाय अन्य कोणाचाच विचार तिच्या मनाला शिवत नाही. प्रत्येक श्वासावाटे फक्त कृष्णनामाचा जप , जळी स्थळी फक्त कृष्ण कृष्ण हा घोष होत होता, काही अन्य सुचत नव्हतं अश्या स्थितीप्रत रुक्मिणी पोहोचली होती. 
अन्न खाऊ जाता दात अन्न चावेचनात , घास मुखात तसाच आणि नजर दृष्टीपार , लोचनात फक्त कृष्णछबी जी न देखीली पण आत्म्याने जाणली. विषयाची आजूबाजूची कसलीच चिंता उरली नाही अशी विलक्षण अवस्था रुक्मिणीची झाली आहे. 

कानामध्ये फक्त कृष्णघोष, मनात कृष्णाचं धोसरा, अन्य दुजा न चेहरा, कृष्णमयी जाहली  रुक्मिणी. कुणी हात लावून , हलवून , थापटून पाहिले तरी तिला त्याचे भान राहिले नाही. 
धरणीवर प्रत्येक पावलागणिक कृष्ण कृष्ण दिसू लागला , कृष्णाचं नाव घेताच सर्वांग थरथरू लागे, रोमांच उठू लागे, 
कमळाचं पुष्प पाहताच कृष्णचरण आठवू लागले , कृष्ण आठवतात लोचनी अश्रू दाटून येऊ लागले, कृष्णप्राप्तीसाठी वेडीपिशी झाली रुक्मिणी. तिला कृष्ण बाधेने बद्ध केले. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

३१/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...