Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८
llश्रीगणेशाय नमःll

    llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
अर्थातच जशी कनकासवे कांती आणि सुर्यासवे त्याची दीप्ती ही येतेच. तद्वत श्रीकृष्णांसमवेत त्यांची शक्ती अर्थात कृष्णशक्ती, देवी महालक्ष्मी भूलोकी प्रकटली. हे परीक्षित राजा, भूलोकी असलेल्या श्रद्धावान, विवेकी, अनुभवसंपन्न नितीवान व गुणवान असूनही निगर्वी राजांमध्ये राजा भीमकाची गणना त्याकाळी होत असे. त्याची भार्या अर्थात राणी श्रद्धा ही देखील शुद्धमती होती. दोघेही, राजा भीमक व राणी श्रद्धा, हे  सात्विक , सत्शील आणि सुजाण होते. 

राणी गर्भ धरिती जाहली. याच गर्भात कृष्णशक्ती अर्थात देवी रुक्मिणी उदरात प्रकट झाली. यथावकाश नऊ मास नऊ दिवस पूर्ण होताच एका रूपवान ओजयुक्त कन्येने राजाच्या गृही जन्म घेतला. हीच ती कृष्णाची चितशक्ती. पाच भावाच्या पाठीवर जन्मलेली कन्यका असल्यामुळे राजाची सर्वात लाडकी झाली. पाचही भावांपेक्षा अधिक स्नेह राजा भीमकीला करू लागला. पाचही भावांइतकंच , नव्हे तर काकणभर जास्त विद्या राजा रुक्मिणीला शिकवू लागला. 

बहू वर्षे झाली रुक्मिणी सुस्वरूपाच्या व्याख्येहून सुस्वरूप व  कल्पनातीत लावण्य प्राप्त करती झाली. तिच्या चर्येवरील प्रभा साक्षात सूर्यनारायणाच्या अग्निज्वालेशी स्पर्धा करत असे. नेत्रातील तेज ब्रह्मांडातील अगणित ताऱ्यांचे एकवटलेले तेजच जणू आहे असे भासमान होत असे. अश्या या साक्षात लक्ष्मी अवतारीत भीमकीला जन्म देऊन व लालन पालन करून राजा स्वतःला  कृतकृत्य जाणत असे. 

याच राजाच्या नगरीत किर्ती नावाचा विप्र कथाकीर्तनकार  राहात असे. एके दिनी राजाच्या सभेत येऊन या विप्रवराने कृष्णकीर्तन प्रस्तुत करण्याची मनीषा व्यक्त केली. अर्थातच राजाची अनुमती प्राप्त होताच ब्राम्हणाने कृष्णाचे कीर्तन सुरू केले. राजाच्या समीप बसलेल्या भीमकीस पाहून कृष्णरूपाचे 
वर्णन करू लागला, ते येणेप्रमाणे राजन.

जो निर्गुण आहे निर्विकार असून निष्कर्मी आणि निरुपचारी आहे. अर्थात जो सर्व आचार, विचार व उपचार यांच्या पलीकडे आहे. ज्याच्या योगाने प्रत्यक्ष जगतातील सर्व लीला घडतात असा तो लिलाविग्रही श्रीकृष्ण प्रत्यक्ष सगुण  स्वरूपात या भूलोकी प्रकट जाहला आहे. त्याच्या रूपाचं वर्णन करायला शब्दांची निर्मिती होणे महाकठीण आहे.  तरी मी यथामती ते करतो राजा भीमक. 

ज्याचे चरणतळ इतके सुंदर आणि रेखीव आहेत परंतु  त्यांना उपमा देणं अशक्य आहे.  सकाळच्या कोवळ्या रवि किरणांचा केशरी मधुरसासम अर्क काढून त्याचा रंग तयार करून त्या रंगात त्याचे तळवे व त्याच्या  टाचा रंगवल्या आहेत.  ध्वज वज्र व अंकुश यांच्या खुणा असलेल्या रेषा त्या चरणांवर असून त्यावरील  सामुद्रिकांचे वर्णन सहस्त्र मुखानाही अवर्णनीय आहे. अगदी ब्रम्हादीकाना सुद्धा त्याचे गुणवर्णन करणे अशक्य आहे. इंद्रनील रत्नांची निळाई पिळून काढली आणि त्यात घडवलेली ती कृष्णतनु निळ्या सावळ्या रंगाची जणू शाल पांघरल्यासम भासत आहे. 

ती पावलं इतकी नाजूक कोमल सुकुमार आहेत की कापसाचा पुंजक्यातून जणू त्याचे पद आणि चरण घडवले आहेत. त्या पायांचा रंग देखील निळाई ओतून घडवलेला आहे.  घननील नभाच्या रंगात घडवलेल्या कळ्या भासाव्यात तश्या सुबक डौलदार पायांच्या अंगुळी, त्या सुबक अंगुळींवरील नखे तर, जणू चंद्राचं तेज ल्यालेल्या रेषांसम भासत आहेत. त्या अंगुळीची शोभा पाहण्यास व त्या चरणांचे रस अर्थात पियुष सेवन करण्यास स्वये चंद्र लुब्ध होऊन उभा ठाकला आहे. 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

०४/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...