Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २६

श्रीरुक्मिणी स्वयंवर २६

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
परंतु याचाही उपाय मी योजलाय तो तू ध्यानपूर्वक ऐक. हे यादवराया , भीमक रायाच्या म्हणजेच आमच्या घराण्यात ही एक परंपरा वा रीत आहे ज्याप्रमाणे , नववधूला साज शुंगार झाल्यानंतर , विवाहविधीपूर्व , नगराच्या बाहेर असलेल्या , ग्रामदेवतेच्या , अर्थात अंबामातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येणे अनिवार्य आहे. 

याच प्रथेनुसार मीही नववधूरुपात सजल्यानंतर नगराबाहेरील मातेच्या मंदिरात जाईन. हीच संधी साधून तू मला तेथून पळवून ने. हा योग साधण्यासाठी , तू योग्य वेळी आधी पासूनच त्या स्थानाजवळ कोणासही कळणार नाही अश्या रीतीने उपस्थित रहा. मी नववधूच्या पारंपरिक साजशृंगारात असल्यामुळे तुला ओळखणे शक्य होईल. अर्थातच मयूरपुच्छमुकुटधारी कमलनयन त्रिभुवनसुंदर तुला ओळखणे मला फार कठीण नसेलच. यात एक महत्वाची गोष्ट की हे सर्व प्रातःसमयी होणार असल्यामुळे तुला योग्य ती काळजी घ्यायला फार त्रास होईल असं वाटत  नाही. 

यस्यांघ्रिपंकजरज:स्नपनं महांतो वांछंत्युमापतिरिवात्मतमोपहत्यै ll

यह्रंबुजाक्ष न लभेय भवतप्रसादं जह्रामसुंव्रतक्रुशांशतजन्मभि: स्यात ll ७ ll

हे नाथा , तुझा असाही विचार असेल, की ही रुपसुंदरा, साक्षात मदन वा चंद्रही जीला वरण्यास स्वखुशीने अवनीवर येतील, जिच्या घरचं ऐश्वर्य, साक्षात इंद्रालाही कमीपणा आणेल असं, त्रिभुवनांतरी अलौकिक आहे, अशी अद्वितीय स्त्री मला का वरण्यास तयार आहे. पण तू असाही विचार करू नयेस. 

कारण तू माझा  केवळ पतीच नाहीस तर जन्मोद्धारक आहेस. तुझ्याशी होणाऱ्या माझ्या संबंधांमुळे माझा अनेक जन्मांचा उद्धार होऊन मी कृतकृत्य होणार आहे. तू ऐसें न मानण्याचे कारण म्हणजे तुझ्या चरणींची मृत्तिका ही साक्षात ब्रम्हादिदेवानाही अप्राप्य आहे.  प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव हे देखील तुझ्या चरणरज प्राप्त व्हावे यांसाठी युगेयुगे ध्यान लावून आपल्या अंगावर ती रज शिंपडून घेण्यासाठी प्रतीक्षा करत असतात. 

याचे कारण की महादेवांना तमोगुण असल्यामुळे आणि त्यावरील उपाय आपल्या चरणींची माती अर्थात रज हेच असल्यामुळे त्यांना ती रज प्राप्त व्हावी याची अनन्य इच्छा असते. तुझ्या चरणांची मृत्तिका प्राप्त व्हावी या एकाच उद्देशाने प्रत्यक्ष ब्रम्हदेव आपल्या पोटी पुत्र म्हणून येण्यास सिद्ध झाले. 

परंतु त्यांचेही भाग्य इतके दुष्कर की तू त्यांना नाभीस्थानातून कमळाच्या मध्यात धारण केल्याकारणे चरणरज अप्राप्त राहिले. त्यावरी उपाय म्हणून हे देवा, ब्रम्हदेव आपल्या या अवतारात चरणरज प्राप्तीस्तव गोकुळींदेखील पातले. परंतु तू त्याही वेळी , गायीचे रूप धारण करून ठकवलेस आणि चरणरज काही प्राप्त होऊ दिले नाहीस. ही ब्रम्हदेवांची झालेली गत जाणूनच सदाशिवांनी ध्यान लावून तुझी आराधना चालू ठेवली आहे. अश्या अप्राप्य चरणांची प्राप्ती मला होणं हा मी अमृतमय दैवी योग आहे, असेच मानेन. 

योगयाग , जपतप , ध्यान , अष्टांगसाधन करूनही जे असाध्य आहे वा राहते ते मी तुझ्याकडे मागते आहे अर्थातच तुझे अर्धांग प्राप्तीची कामना , कांक्षा ,इच्छा मी धरली आहे. म्हणून ही पत्रिका वाचताच त्वरा करून तू मला पर्णावयास आला नाहीस आणि मी कांक्षीत असलेल्या माझ्या आराध्याची  मज प्राप्ती करून दिली नाहीस तर, मला अतीव दुःख होईल. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२५/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...