Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर १९

श्रीरुक्मिणी स्वयंवर १९

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
 त्या द्विजवराला स्नानापश्चात पितांबर नेसवून प्रभूंनी स्वये द्विजासाठी मोगऱ्याची फुलं आणि कळ्या यांच्या आच्छादनाने शयन तयार करून दिले. त्यावर ब्राम्हणदेवतेस निजावयास सांगितले. भगवंताच्या इच्छेनुसार द्विजवर शय्येवर निजता जाहला आणि श्रीकृष्णांनी स्वये त्याचे चरण चुरण्यास सुरवात केली. या प्रकाराने द्विजवर लज्जित होऊन आपल्या शय्येवर उठून बसता झाला आणि त्याने भगवंताला हात जोडून विनवले

" हे प्रभू आपण आमच्या हृदयस्थानी विराजित आहात. आपली दिगंत कीर्ती ऐकून एकमात्र वेळा आपले दर्शन घडण्याचा योग यावा ही इच्छा मनात होतीच. परंतु आपण ती पुरवून माझ्या पूर्वपुण्याईला शतोगुणीत केलेत. माझे अवघे जीवन पुण्याईने भरून व भारून टाकलेत. आपले ब्रीद मी ऐकून आहे की आपण भक्तांना आपल्या हृदयमंदिरी स्थापित करता आणि सदैव भक्त तिथेच वास्तव्यात असतात.  

मग आता आपण माझे चरण चुरून मला या पापाचा धनी का बरं करत आहात. मी या लायक नाही भगवंता. आपण सर्व प्राण्यात सर्व हृदयात भगवतभाव जागावा व भूतदया अन्नदान यातच श्रेष्ठता माना , हा मूलमंत्र प्राणीमात्रांना दिलात. पण मी तो किती अंगिकरला आहे ही शंका आहे. म्हणून आपल्या या सेवेचा भार माझ्या आत्म्याला पेलवणार नाही.  

द्विजाच्या लोचनातून अश्रुधारा सुरू झाल्या. भगवंतानी त्याचे अश्रू पुसून त्यास धीर देण्यासाठी म्हटले.

" हे ब्राम्हणदेवता , मी वृत्तीचा दोष जाणतो. वृत्ती  ही सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे, माणूस ओळखण्याचे. ज्याला सतत चिंता सतावते आहे, त्या चित्ताला दुश्चित्त म्हणतात. परंतु ज्याच्या सर्व चिंता मिटल्या आहेत वा ज्याची चित्तवृत्ती स्थिर व शांत आहे त्याला सुचित्त म्हणतात. इंद्राघरचे वैभव असूनही जर समाधान नसेल तर त्या प्राण्याचे सर्व जीवन व्यर्थ आहे. परंतु ज्याला मिळेल त्यात समाधान आहे म्हणजेच जो आत्मसंतुष्ट आहे अश्या जीवाची मला ओढ असते. नव्हे असेच जीव मला आपल्या हृदयस्थानी विराजित करायला भाग पाडतात. असेच जीव मला कायमचे बंधनात बांधून ठेवतात. मी त्यांचा सदैव ऋणी असतो, द्विजवरा. 

जे सर्व भुतात भगवतभाव पाहतात व जे स्वधर्म श्रेष्ठ मानून त्याचे निष्ठेने पालन करतात , अश्या जीवांच्या पावलोपावली मी माझे सर्वांग आच्छादित असतो. अश्यांच्या चरणांवर मी सदैव माझे मस्तक लीन ठेवतो. त्यामुळे आपण कोणताही भार आपल्या आत्म्यावर घेऊ नये. त्याचा दोष मला लागेल. आपण निश्चिन्त होऊन मला आपली सेवा करण्याचा योग प्राप्त करून घ्यावा. 

श्रीकृष्णाच्या या बोलानी व मधुर वाणीने द्विजवर निरुत्तर झाला आणि हरीमुखाकडे एकचित्तपणे पहात राहिला. भगवंतानी हा भाव जाणून त्याला भानावर आणत प्रश्न केला. 

" हे स्वामी , आपण कोण , कुठून आलात, आपल्या घरी कशी स्थिती आहे. आपल्या देशाचा राजा स्वधर्म प्रजाहित यांचे पालन करतो आहे ना. खूप लांबचा मार्ग क्रमून , अनेक संकटांचा सामना करून आपण मजप्रत आला आहात. काय कार्य आहे ज्याहेतूने आपण मजपर्यंत आला आहात , ते निःसंकोचपणे सांगावे. आपण जे कार्य हाती घेऊन वा जी इच्छा मनी धरून येथे आला आहात ते कार्य सिद्ध झाले असेच जाणा" 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१७/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...