Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ११

श्रीरुक्मिणी स्वयंवर ११

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
उपासक देवाचं यंत्र म्हणून ज्याची पूजा करतात अश्या त्रिकोणी व षटकोनी कोंदणात सजवलेल्या माणिक जडलेल्या मुद्रिका कृष्णाच्या चारही हाताच्या प्रत्येकी चार चार अंगुळीयांवर शोभून दिसत आहेत.  पूर्व आणि उत्तर या दोन दिशांची कुंडले कृष्णाच्या कानात सुशोभित जाहली आहेत आणि त्यांच्यातुन उपनिषदांचा प्रकाश परावर्तित होतो आहे, अर्थात त्यांच्या प्रकाशातूनच उपनिषदे प्रकट होताना दिसत आहेत. या दोन्ही कुंडलांपैकी एक उपनिषद अंग सांगत आहे की हरी सगुण साकार आहे तर दुसऱ्या कुंडलातून येणारा उपनिषद प्रकाश दर्शवत आहे की हरी निर्गुण निराकार आहे. अर्थात दोघांपैकी काहीही वा कुणाचेही ऐका श्रवण भक्तीचा आनंदही मिळेल.

मोक्षसुखाचे सार गाळून घेऊन त्याचा सुमधुर असा रसपाक तयार करून त्यातून श्रीकृष्णाचे मुख घडवलेले आहे असाच भास होतो आहे. अर्थात ज्याच्या मुखचंद्राकडे पाहून मोक्षसुखाची प्राप्ती फक्त दर्शनमात्रे होते. ज्याच्या मूर्तरुप दर्शनाने जन्मोजन्मीची अनंत राशींची पापे क्षणात नामशेष होऊन हरीच्या कायमस्वरूपी सान्निध्याचा मोक्षरुप आनंद चिरंतन व नित्य प्राप्त होतो त्या मुखाचे खरतर वर्णन हे अखिल ब्रह्मांडात कोणत्याही शब्दांना , वाचनांना, सुभाषितांना, प्रमेयाना अशक्य आहे असे ते श्रीकृष्ण मुख आहे. चंद्रकलेची उपमा खरतर देऊ शकत नाही श्रीकृष्णाच्या मुखमंडलाला कारण चंद्रकला पौर्णिमेला तेजोमय असते पण कृष्णपक्षी क्षीण होत जाते. परंतु ह्या मुखावरील तेज अलौकिक अंतर्यामी सुखमय व अक्षय असे तेज आहे आणि म्हणून ते अनुपमेय आहे. 

ज्या हनुवटीला पाहताच वा तिचे सौन्दर्य देखताच उदरी प्रेमाचे अलौकिक भरते यावे अशी तू हनुवटी एकमेवाद्वितीय अशीच आहे. तिला पाहताच समस्त सूर त्या हनुवटीच्या सौन्दर्याने मोहित होतात आकृष्ट होतात. जीव आणि शिव जे या सृष्टीचे आधार आहेत त्या दोन्हीचे मिळून हरीचे  दोन अधर घडले आहेत. त्यामध्ये आत सुरेख अश्या तेजाकार अश्या दंतपंक्ती चिद , शाश्वत, स्थायी अश्या आनंदाची झळाळी प्रकाशित करत आहेत. नास्तिकांना आपले नास्तिकत्व विसरावयास लावणाऱ्या त्या नासिका ज्यातून उच्छवासावाटे बाहेर पडणारा पवन हरीच्या विरहाचं दुःख व्यक्त करत आहे तर श्वासावाटे आत जाणारा पवन अत्यंत सुखाची अनुभूती प्राप्त करत आहे. 

आत आणि बाहेर, अंतरात आणि बहिर्मनात सर्वत्र समत्व दृष्टीने पाहणारे ते विशाल नेत्र , ज्यांच्या तेजाची व त्यातील चैतन्याची महती अवर्णनीय आहे. त्या नेत्रात दृष्टीला , पाहण्याला , देखण्याला, नजरेला अद्वैत विसावा प्राप्त होतो. जेथे नजर स्थिर होऊन समत्वता येते अर्थात आपण आपल्या लाच पाहतो आहोत असे जाणवते वा घडते असे चैतन्यमयी नेत्र हरीचे आहेत. ज्ञान आणि अज्ञान यांच्या दोन पापण्या मिथ्याभास दर्शवत लवत होत्या. पण त्याही पार गेलेली हरीची नजर सहजस्थितीचाच अनुभव पाहणाऱ्यास अनुभव प्राप्ती करून देत आहेत. अक्षय सुखाचं अधिष्ठान देणारा विशाल भालप्रदेश आणि त्यावर सद् चिद आणि आनंद यांची त्रिपुट ललाटी मायमोचन घडवणारी आहे. 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

०७/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...