Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३१

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३१

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
शिशुपालाचे वऱ्हाड हे गावाबाहेर एक विस्तीर्ण नगरी वसवून, त्यात ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे राहण्याची उत्तम व्यवस्था रायाने केली होती. मुळात जी कन्या श्रीकृष्णाला देण्याचा मूळ विचार होता , तो बदलून शिशुपालाला देण्याचा निर्णय झाल्यामुळे, श्रीकृष्णाचे विरोधक हे एकाएकी आनंदीत होऊन मोठया उत्साहाने या कार्यात आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. त्यांचा हर्षोल्हास हा अवर्णनीय होता.

यांमध्ये प्रामुख्याने , शाल्व , जरासंध, वक्रदंत, विदूरक, पौंड्रक आदी वीर आपापल्या सैन्यासह आपलं सामर्थ्य व त्यायोगे शिशुपालाच्या पाठीशी कितीजण आहेत व आमचं एकूण सैन्यबल किती आहे याचंही शक्तीप्रदर्शन करण्यास आले होते. यामध्ये अनेक हत्ती, अश्वदल, पायदल आणि अगणित सैनिक सहभागी होते. 

यथावकाश सर्व वऱ्हाड कौंडिण्यपुरच्या वेशीपर्यंत येऊन ठेपले आणि राया भीमकाला तसा संदेश गेला.  त्याप्रमाणे भीमक वऱ्हाडाला सामोरा गेला. प्रथा परंपरा कुलरीत धर्मनीती यानुसार यथासांग स्वागत समारोह झाला. मंडळींना त्यांच्या त्यांच्या मानानुसार त्यांच्या स्थानी राहण्याची विनंती करून , राया भीमक सीमांतपूजन करण्यासाठी शिशुपाला दिकांसह प्रस्थान करता झाला. 

इकडे द्वारकेत सूर्य उगवतात सुर्यकिरणांप्रमाणे वार्ता पसरली की, कौंडिण्यपुराला कृष्ण एकटाच अचानक निघून गेलाय. बलरामाच्या कानावर हा संदेश गेला की, राजकुमारी  रुक्मिणीने एका द्विजास पत्रिका देऊन धाडले होते, जो मात्र यदुनाथाना भेटून त्यांनाच गुप्तसंदेश देऊन, परस्पर कौंडिण्यपुरास घेऊन गेला. निश्चितच तो द्विज भीमकीचा अत्यंत विश्वासू दूत म्हणून आला आणि श्रीकृष्ण एकटा गाठून त्यांस घेऊन गेला.  

ज्या नगरामध्ये श्रीकृष्णास , रुक्मिणीने पत्र धाडून बोलावून घेतले आहे तिथे, वक्रदंत , जरासंध, शाल्व , पौंड्रक चेदिराज शिशुपाल आदी बलाढ्य शत्रू जमले आहेत. तिथे श्रीकृष्णाने एकटे जाऊन मोठाच घोर केला आहे. आता तिथे घनघोर युद्धप्रसंग उद्भवेल. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात येताच , श्रीबलरामाने त्वरित, चतुरंग यादवसेनेला प्रस्थान करण्याची आज्ञा केली. श्रीहलाधर स्वतः एका सुसज्जीत रथात जाऊन सेनेला घेऊन निघाला. अत्यंत वायूवेगे सर्व सैन्य , कौंडिण्य पूर नगरात येऊन कृष्णासमीप दाखल झाले. 
 
इकडे रुक्मिणी अत्यंत चिंतातुर अवस्थेत आहे. ती विचार करते आहे की, माझा संदेश श्रीकृष्णापर्यंत पोहोचवला गेला आहे का,  कृष्णाची यावर काय प्रतिक्रिया आहे, त्यावर त्याने विचार केला असेल का, तो ठरलेल्या वेळी येईल ना या सर्व प्रश्नांचं चक्र तिच्या मस्तिष्कात फिरत होतं.  ज्यायोगे तऱ्हेतऱ्हेचे विचार तिच्या मनात येऊ लागले. जसे, 

कृष्णाला या विषयात फार गोडी वा रस नसताना मी बळेच त्याला पत्र लिहून येथे बोलावले आहे, कारण त्याला मी आवडली आहे की नाही हे न जाणतच मी हे सर्व केले आहे. कदाचित ही धिटाई वा ढालगजपणा म्हणून अव्हेरलं असेल , की अश्या मुलीशी , जीला कुल शील यांचं काही नाही, काय म्हणून संबंध जोडावे, की द्विज द्वारकेची अवर्णनीय शोभा आणि श्रीकृष्णाचं तेज , प्रभा पाहून स्तंभित झाला असेल आणि त्या नादात माझं पत्र , कार्य  व विवंचना यांचा त्यास विसर पडला असेल , की

ही कन्या जी आतापासूनच मला आज्ञावजा संदेश  धाडत आहे, ती विवाहापश्चात मज पूर्ण वश करून मला मायेत गुंतवेल , की आताच जी स्वतःच्या घरातून गुप्त खल करून बाहेर पडू इच्छिते, अर्थात जिला स्वतःच्या बंधुप्रति प्रेम नाही ती उद्या माझ्या घरी येऊन घरभेद तर करणार नाही ना, हा देखील विचार त्याच्या मनात आला असेल का. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

३०/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...