Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २३

श्रीरुक्मिणी स्वयंवर २३

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
पुरतेष्टदत्तनियमव्रतदेवविप्रगुरर्वर्चनादिभिरलं   भगवान  परेश: ll

आराधितो यदि गदाग्रज एत्य पणिं गुह्णातु मे न दमघोषसुतादयोsन्ये ll ४ ll
 
हे श्रीयदुनाथ , जर मी काही भगवंताचे भजन पूजा अर्चा आदी केले असेल, द्विजवर आणि विप्रवर पूजन इत्यादी माझ्या हातून घडले असेल, तर नक्कीच आपण मला स्वीकारालं. अनेक धार्मिक कार्य जस यज्ञयाग आदी , गोदान भूदान , रत्नादी धनाचं दान इत्यादी अनेक प्रकारची दान आणि या सर्वांहून श्रेष्ठ अन्नदान जर मी केलं असेल, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठतम एकादशीचं व्रत हे मी उपासतापास आणि जागरण करून द्वादशीला ब्राम्हण भोजन घालून यथासांग केलं असेल तर आणि 

इतकं सर्व धर्मकार्य जर तुजप्रत पोहोचलं असेल तर , हे गदाधारी बलरामाच्या कनिष्ठ भ्राता, तू नक्कीच येऊन माझा स्वीकार करून मला जन्मभरासाठी तुझ्या हृदयी स्थान देशील.  वैखरी , मध्यमा , पश्यंती आणि परा या चारही वाणींनी तू साध्य असल्यामुळे , त्याअर्थी तू परेश आहेस. मी रुक्मिणी तुज हृषीकेश या नामे संबोधून तुला या सर्व गोष्टींमध्ये तटस्थ राहू नयेस,  तर तू माझी शिशुपालापासून सुटका करावीस व हे करताना त्या सर्वांची पूर्ण त्रेधातिरपीट उडालेली पाहण्याचा योग  आपणा दोघांनाही यावा हीच माझी इच्छा आहे. कारण त्याची तशीच अवस्था व्हावी असेच त्याचे कर्म आहे. 

व्श्रोभाविनी तमजितोद्वहने विदर्भान गुप्त: सम्येत पृतनापतिभी:  परित: ll

निमर्थ्य चैद्यमगाधेन्द्रबलं प्रसह्य माम राक्षसेन विधिनोद्वह विर्यशुक्लाम ll ५ ll

हे नरश्रेष्ठा ही पत्रिका म्हणजे तुला तातडीचे लिखित पत्र आहे असे समजून व त्याचा पूर्ण मतितार्थ जाणून त्वरेने निघावे. विवाह मुहूर्त पहाटे लवकर आहे. त्यामुळे तुला त्याप्रमाणे यावे लागेल. नव्हे लगेचच निघावे लागेल. ह्या माझ्या पत्रिकेतील कथनाला जाणून तू विनाविलंब या कार्यात उडी घेऊन आलास तरच मला जीवित पाहशील. म्हणून यापुढील कथन नीट लक्षपूर्वक वाचून त्यानुसार कार्य करावे. 

हे यदुनाथ, तुझ्या स्वतःच्या मनाला जर हे मान्य झालं असेल, नव्हे तसं ते मान्य झालंच असेल, तर तू पूर्ण तयारीनिशी मला न्यायला ये. मी नयनात प्राण आणून तुझ्या येण्याची प्रतीक्षा करत असेन, हे जाणून अस. परंतु येताना तुला खूप सावधपणे यावं लागेल, हेही ध्यानात घे. ही सावधानता बाळगताना तुला तुझ्या आतापर्यंतच्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करावा लागेल. तसा तो तू करून मगच तशी सावधानता राखून ये. 

एखाद्या ताकदवान गजाप्रमाणे असलेले तुझे स्वरूप  तुला आठवावे लागेल, किंबहुना ते तू ध्यानात ठेवावेस. कारण तू त्या शक्तीचा आश्रयदाता आहेस नव्हे तर उद्गाता आहेस आणि तुझा सामना हा अनेक मस्तवाल शत्रूंशी आहे. म्हणून तुझे निजस्वरूप तू ओळखावेस. तुझ्या तपाचं, साधनेचं ओज व तेज हेही तू आठवून यावेस. कारण तूच या विश्वाचे तेज , ओज व प्रभा आहेस. तुझ्यातच ते सर्व समाविष्ट आहे. या सर्वांची तुला आठवण करून देण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुझ्या प्रत्येक क्षणांच्या कृतीवर कोणाचे तरी प्राण अवलंबून आहेत हे जाणून , तू तुझे अश्व विदर्भनगरीकडे दौडावेस. 

या मनाचा वारू ज्या वेगाने दौडत जाईल , त्याही पेक्षा अधिक गतीने तू येशील, नव्हे ये किंवा यावेस. हे श्रीकृष्णां तुझ्या रथांच्या चाकाने मार्गातील पर्वतांचे पीठ होऊ दे,  इतक्या वायूवेगात तू यावेस, असा आर्जव आहे माझा. तू स्वतः उत्तम योद्धा व युद्धकलेतील निपुण व जाणकार आहेस. त्याच प्रमाणे तुझ्या यादव सेनेतील , दैत्यांच्या मर्दनात व दैत्यांशी युद्ध व द्वंद्व करण्यात, जे निपुण आहेत , असे निवडक योद्धे पुढे घालून वा त्यांना संगे घेऊन तू पूर्ण तयारीनिशीच विदर्भाकडे निघावेस. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२१/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...