Skip to main content

जानकी पुनःवनवास ४७

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ४७

कारण    "अतिथि देवो भव"  चा सुवर्ण काळ होता तो.

महर्षि वशिष्ठ ध्यानातून बाहेर आले आणि प्रमुख शिष्यानी भ्राता भरताला तसा निरोप दिला. भरत इतका वेळ प्रतीक्षा करता करता अतिथि व्यवस्थे विषयी विशेष आस्थेने विचारपूस करीत होता. निरोप येताच लगबगिने तयाने महर्षिच्या समोर येऊन तितक्याच त्वरेने त्याना चरणावर शीश ठेवून प्रणिपात केला. आणि प्रश्न केला

" गुरुदेव इथपर्यंत यात्रा आणि येथील वास्तव्य कुशल आहे ना?  आपणास प्रतीक्षा जास्त करावी लागली असल्यास आम्हाला क्षमा करावी. येणे त्वरेने करणार होतो पण ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्याकडून काही उपयुक्त आणि जरूरीच्या सूचनां घेऊन निघण्यास विलंब झाला."

"भरता तुजप्रत कल्याण होवो. सर्वप्रथम आम्ही सर्व कुशल आहोत. यात्रा उत्तम झाली आणि निवास व्यवस्थेत अयोध्येत काही  उणे संभवत नाही. येण्याची व्यवस्था रामदूत हनुमंताने सुरेख केली. कार्यकुशल ,आज्ञाधारक व शिस्तशीर आहे, आणि बोलायला अत्यंत लाघवी.

तुझ्या चौदा वर्षाच्या व्यवस्थेकाळात काहीही चूक घडली नाही. त्यांमुळे आता श्रीरामाच्या उपस्थितीत ती अशक्य आहे. तसच तुमची रघुकुलाची रीतही सर्वांच्या प्राणाहून सर्वानाच प्रिय आहे.  असो. तर आम्हास बोलावण्याचे प्रयोजन सांगून पुढील चर्चा करुयात. बाकीचे भ्राता  आणि माता सकुशल असणार हे नककीच"

" होय गुरुदेव बाकीं सर्व भ्राता ज्येष्ठ भ्राता आणि सर्व माता सकुशल आहेत. श्रीराम, देवी जानकी आणि भ्राता लक्ष्मण यांच्या आगमनामुळे अयोध्या एका वेगळ्याच आनंद पर्वाचा अनुभव घेत आहे. "

" होय वत्सा त्याविषयी सर्व सविस्तर हनुमंताने आम्हाला मार्गात सांगितल आहेच. ऐकून खुप आनंद झाला."

"आपल्याला बोलावण्याचें प्रयोजन व त्यावर विचार विनिमय,  यावर माझ अस मत होत की ज्येष्ठ भ्राता आणि इतर भ्राता येतील, तत्पश्चात आपण, चर्चा करू. आता आपल्या फलाहाराची व्यवस्था करून येतो तोपर्यंत आपण विश्राम करावा. ज्येष्ठ भ्राता एखाद प्रहरात येतील असा माझा कयास आहे. किंबहुना तसा निरोप त्यानी आपल्याला देण्यास सांगितले आहे. आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे पुढील व्यवस्था करीन"

गुरु वशिष्ठ यानी आपल्या प्रमुख शिष्यासोबत चर्चा केली आणि भरतास वदले

" वत्सा राम येईपर्यन्त आम्ही ध्यानधारणेस पुनः प्रारंभ करतो. इतर शिष्यगणास त्यांच्यां त्यांच्यां दिनचर्येनूसार कार्य करुदे. आता रामासोबत तुम्ही चारही बन्धु एकत्र या,  अनेक वर्षानची इच्छा पूर्ण होईल. "

"हो गुरुदेव आम्ही सर्व ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्यासह येतो. तोपर्यंत अनुमति द्यावी. मी बाकीची व्यवस्था पाहून येतो. काहीही जरूर असल्यास आपण विनासंकोच सांगाव गुरुदेव, सम्पूर्ण अयोध्या आपलीच आहे आणि आम्ही सदैव आपले शिष्य ."

" सध्या तरी काहीही नको आहे. काही जरूर भासलच  तर नक्कीच निरोप पाठवीन. तू ये तुझ्या व्यस्ततेनूसार"

भरत विनम्रपणे सादर प्रणाम करतो . प्रमुख शिष्यानसोबत जरूरी चर्चा करून, पुन्हा आपला रथ घेऊन राजप्रासादाकडे निघतो. वाटेत अतिथि गृहाच्या मुख्य द्वारापाशी अतिथि व्यवस्थेचें मंत्री भेटतात. भ्राता भरताला पाहताच आपल्या रथातून उतरून नमस्कार करतात. भरत त्या नमस्काराचा स्वीकार करून त्याना भरत सांगतो

" मंत्रिमहोदय आपण जाणता की, महर्षि वशिष्ठ कुलगुरु आणि आमचे गुरुदेव आहेत. तस्मात त्यांच्यां व्यवस्थेत कोणतीही गैरव्यवस्था होणार नाही हे स्वये पहा. यात कोणतीही चूक ज्येष्ठ भ्राता सहन करणार नाहीत."

" भ्राता भरत आपण व्यर्थ चिंता करू नये. आम्ही स्वतः यावर देखरेख ठेवून आहोत. "

" ठीक तर. येतो " 

अस म्हणून भरत आपला रथ पुन्हा राजप्रासादाच्या दिशेने नेण्यास सांगतो

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...