ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ५८
माता कौसल्येला नमन करून प्रभु माता सुमित्रकडे वळले. मातेला प्रणाम करून म्हणाले
" माते तुझेही आशीर्वाद नेहमी माझ्या मस्तकी असुदेत. एक राजा म्हणून राज्य करताना या सर्वांची गरज आहे."
"रामा तुझ्या जन्माने उपकृत झालेले आम्ही सारे, नेहमीच तुझ्या भल्यासाठी आणि त्यायोगे राज्याच्या आणि प्रजेच्या हितासाठी मनोभावे तुझ्या पाठीशी आशीष रुपात आहोतच. परन्तु तू स्वतः एक परिपूर्ण व असाधारण मानव देही असल्यामुळे या सर्वांच्या पार आहेस. तद्वत तू या सर्वात अड़कावस अस वाटत नाही."
"माते हा पंचमहाभूतांचा मानवी देह आहेच मुळात माया बंधनात अडकवणारा. म्हणून त्याच मायेत अडकाव ज्यातुन जन्माच सार्थक होईल. मातेच प्रेम हे निश्चित कोणत्याही पुत्राला, जन्म दिलेल्या वा मानलेल्या, नेहमी पुण्य प्रदायी असतेच. म्हणून मला या बंधनात जन्मोजन्मी राहायची इच्छा आहे. तद्वत या प्रेमाचा भुकेला मी तुझ्याकडे या मातृप्रेमाची याचना नेहमीच करीन , नव्हे तो माझा लक्ष्मण व शत्रुघ्नाइतकाच अधिकार आहे. आहे ना माते? "
"तुझ्यासारख्या पुत्रावर कोणती माता स्नेह करणार नाही?. माझ मातृप्रेम तुझ्या मागे सदैव असेल. "
या मातेच्या वाचनानी प्रफुल्लित झालेले पुरुषोत्तम सद्गतित झाले आणि पुन्हा प्रणिपात करते झाले. माता सुमित्रेशेजारी उभ्या असलेल्या माता कैकईकड़े प्रभु वळले, सपत्नीक प्राणिपातासाठी झुकले आणि माता कैकईला अश्रु रोखण अशक्य झाल. माता प्रभु व राज्ञी देवी जानकी याना आशीर्वाद देऊनि वदली.
"रामा खरच मी आशीष देण्या व अभीष्ट चिंतण्या लायक आहे का रे ?. "
यावर माता कौसल्या व माता सुमित्रा यानी माता कैकईला जवळ घेतल आणि पाठीवरुन मायेने हात फिरवला. मातेला प्रभु म्हणाले
" माते तुझ माझ्यावर प्रेम आहे ना?."
" पुत्रा "
"माते या दोन अक्षरात जी ताकद आहे , तेच तुझ माझ्यावरच प्रेम , ममत्व आहे जन्मापासुन .पण क्षणिक मायेचा खेळ घडला, त्यांमुळे कोणताही संदेह माझ्या मनात नाही आणि तू ही कोणताही किंतु मनी ठेवू नयेस. तुझाही आशीर्वाद भगवंतांच्या कृपाप्रसादाप्रमाणेच माझ्या पाठी सदैव राहुदे. हिच तुझ्या चरणी प्रार्थना. आज मला वचन दे कि यापुढे या गोष्टीचा उल्लेख तुझ्याकडून कधीही होणार नाही. "
मातेने साश्रु नयनानी होकारार्थी मान हलवली आणि भगवंत म्हणाले
" आज मला हे वचन देऊन तू कृतार्थ केलस"
भगवंत पुढे गेले आणि त्यापुढे प्रमुख मंत्री आर्य सुमंत उभे होते. त्याना प्रभुनी हात जोडून प्रणाम केला. आर्य सुमंत म्हणाले
" प्रभु हे क़ाय करत आहात आपण. आपल्यासारखे सयोग्य व्यक्तित्व अयोध्येच्या राज्यावर पदारूढ़ झाल, हाच खरा आमचा गौरव आहे. प्रणाम आमचा तुम्हाला. तो आम्ही करायचा."
" आर्य सुमंत आपण निष्ठेचे स्वामित्वाचे एक उत्तम उदाहरण म्हणून गणले जाता. पिताश्रींच्या पश्चात भरत नन्दीग्रामातुन राज्य कार्यभार पाहात असताना आपण सर्व जबाबदाऱ्या पूर्ण सक्षमतेने ,निष्ठापूर्वक व प्राणपणाने सांभाळल्या. म्हणूनच भरताचा निश्चय पुर्णत्वाकडे जाऊ शकला. त्याबद्दल आम्ही नेहमी ऋणी राहु"
" स्वामी आपण आज्ञा करावी आणि आम्ही ती सुहास्य वेदने पूर्ण करावी हेच फक्त आम्ही जाणतो आणि रघुकुलाला प्रत्येक पीढ़ित उत्तमोत्तम राज्यकर्ते लाभले, हे खरतर आमच सदभाग्य आहे. म्हणून आपली कृपा अशीच असुद्यावी, हिच नम्र विनंती आहे"
प्रभुनी या प्रणामाचा स्वीकार केला आणि ते पुढे गेले, जिथे राजा सुग्रीव उभे होते.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment