ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ३९
हनुमंत पुढे बोलणार इतक्यात भरत प्रश्न विचारतो.
"पण मग जऱ संकल्प ईश्वराचा आणि माया, भौतिक जगत हेही त्यानेच निर्मिले हे का. म्हणजे यांची सांगड कशी घालायची. बुद्धिपलिकडी या गोष्टी विस्ताराने सांग , जेणेकरून त्यांचे आकलन होईल. "
हनुमंत पुढे बोलतात.
"इथे माया आणि तिचा प्रभाव हा सर्वत्र आहे, अगदी सम्पूर्ण विश्वात. या भौतिक जगात आणि या जगापलिकडील सप्त लोक, स्वर्ग पाताळ पूर्ण ब्रम्हांडात. कारण ती जगदीश्वराची सावली आहे आणि म्हणून जिथे भगवंत तिथे तीचं अस्तित्व आहेच. प्रत्येक सजीव अंशरूपाने ईश्वराकडून येताना मूळ रूपाकडे परत जाण्याचा ईश्वरी संकेत पँचमहाभूतरूप देहात आल्यावर विसरतो. आणि मग जन्ममृत्युच्या सापळयात आपसुक अडकतो अगदी कायमचा "
"पण यातून सुटका कशी व्हावी तेही सांगाव हनुमंता" भरताने पृच्छा केली.
" कर्मगति सुधारण, पुण्यकर्म वाढवण जेणेकरून प्रारब्धगति सुधारेल आणि नन्तर भगवंतांकडे जाण्यासाठी साधनेची कास धरावी. ती साधना ज्याच्या त्याच्या प्रकृतिधर्मानुसार अवलंबून अमलात आणावी. पुढे या कार्यात भगवंत स्वतः साक्षीरूपाने मदत करतात पण त्याचवेळी माया जीवाला मागे खेचण्याचा यत्न करेल हे सतत ध्यानात ठेवावे. यावर आपण विस्तृत चर्चा करू पुन्हा. मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचय की आपण इथे काही कामनिमित्त पाचारण केल आहे. तेंव्हा आपण त्याबद्दल आज्ञा करावी"
भानावर आलेला भरत लगेच हनुमंताला म्हणतो.
"हनुमंता बर झाल मला भानावर आणलस ते. अन्यथा इतक्या सुंदर विवेचनात किती काळ गेला असता ईश्वरच जाणे. तुला पाचारण करण्याचा मुख्य उद्देश्य ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांचा राज्याभिषेक सोहळा संकल्प पूर्वक आणि मोठ्या दिमाखात सर्व धार्मिक विधिंसह यशस्वी करायचा आहे. त्यांमुळे खुप कार्य , शीघ्रतेने आणि कमी कालावधीत व नियोजनबद्ध करण्याचे आहे"
ही वार्ता ऐकून हनुमंत रोमांचित होऊन हर्षाने जागच्या जागी नाचवायास लागले. आणि प्रभुनामाचा जयघोष करू लागले. हे अनपेक्षित चित्र पाहून भरत काही पळे विस्मयकारकपणे हनुमंताकडे पाहात राहिला. ख़र तर असाच किंवा याहूंन अधिक हर्ष, भरताला सुद्धा झाला होता. पण तो प्रकट करण्याची ही रीत थोड़ी विचित्र वाटून भरत हनुमंतास शांत करण्याच्या उद्देशाने म्हणाले
" हनुमंता अरे इतका हर्ष झाला तुला"
" प्रभुना सिंहासनावर बसलेल बघण्यास ही लोचनं अत्यंत आतुर आहेत , त्यामुळेच निव्वळ वार्ता ऐकून झालेला आनंद प्रकट करण्यापलिकडील होता. म्हणून मी थोडासा अव्यवहारिक वागलो. क्षमा असावी"
" अरे हनुमंता क्षमा कसली मागतोस. अरे या हृदयी देखील तितकाच हर्ष झालेला आहे, जितका तुला झालाय. पण राजवंशीय असल्यामुळे तो तुझ्यासारखा प्रकट करण जमणार नाही"
" मग तुमच्या हिश्याचसुद्धा मीच नाचुन घेतो"
अस म्हणुन हनुमंताने अजून हर्षोल्हास प्रकट करत श्रीराम जयजयकार करून समस्त ब्रम्हांड हादरवून सोडल. भरताने शान्त करताच भानावर आलेला हनुमान हात जोडून पुन्हा भरतास म्हणाला
"मग या कार्याच्या शीघ्र पुर्ततेसाठी आपण मला फक्त आज्ञा द्यावी, समस्त विश्व आपल्यासमोर आणून उभ करतो."
ज्यावर भरत स्मितवदन म्हणाला.
"हनुमंता यासाठी ब्रम्हांडाची आवश्यकता नाही. पण सर्व प्रथम कुलगुरु वसिष्ठ यासह सर्व ब्राम्हणकुलाला बोलावण्याची गरज आहे. म्हणजे त्यांच्याशी वार्तालाप करून राज्याभिषेकाच्या दिन , प्रहर व मुहूर्त यासम्बन्धी ठरवाव लागेल"
इतके एकताच हनुमंत एका क्षणात ll जय श्रीराम ll असा घोष करत तिथुन निघणार इतक्यात भरत विचारतो
" अरे त्यांचे स्थान आणि कस जायच यासम्बन्धी काही ऐकून जाशील तरी."
हे एकताच हनुमंत म्हणतो
" स्वामीभ्राता जेंव्हा लंकेबद्दल काहीही माहित नसताना लंका आणि माता सीतेला शोधून काढल, त्यापुढे हे खुप कठीण कार्य नाही. तद्वत आज्ञा असावी".
अस म्हणून हनुमान भरताच्या मुखावर आज्ञाकारी सूचक अनुमोदन पाहून तिथून अंतर्धान पावतो. त्याच वेळी निरोप देऊन पाचारण केलेले शत्रुघ्न आणि लक्ष्मण तिथे पोहोचतात.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment