ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ६४
"सयोग्य राज्य कारभार आणि एक प्रजाहितदक्ष राजा होण्याच्या दृष्टीने काही हितोपयोगी गोष्टी तुला सांगतो रामा "
निरोपासाठी आलेल्या कुलगुरु महर्षि वसिष्ठ यानी रामास म्हटले. आणि यावर रामाने त्याना आसन ग्रहण करण्यास सांगितले. तसेच भरताला त्यांच्यां प्रस्थानाच्या व्यवस्थेविषयी बघण्यास सांगून महर्षिना आज्ञा करण्याची विनंती केली.
" रामा तू आता एका वेगळ्या नात्यात बद्ध आहेस आणि त्यांमुळे काही गोष्टीन्ची काळजी घेण तसच काही गोष्टी ध्यानात ठेवण अत्यंत जरूरीच आहे."
" कोणत्या त्या महत्वाच्या गोष्टी आपण सांगाव मी नक्कीच त्यादृष्टीने यत्न करीन."
" रामा तू स्वतः ज्ञानी आहेस, सर्व जाणतोस. तसच तुझा वनवासाचा व लंकेपर्यंतचा अनुभव लक्षात घेता तू एक उत्तम राजा होशील यात मुळीच शंका नाही."
" गुरुदेव मानव बुद्धिने, देहाने कितीही मोठा झाला तरीही त्याने सतत शकत राहिलं पाहिजे. अस शास्त्रवचन आहे. तेंव्हा आपण सांगाव. माझ्यात जे कमी असेल ते आत्मसात करण्याचा नककीच यत्न करीन."
" ऐक तर मग
१. सर्वात प्रथम राजा हा प्रजेचा सेवक आहे हे मनात
ठेवलस तर कधीहि ते राज्यपद बुद्धिवर व आत्म्यावर
आरूढ़ होणार नाही.
२. कुटुंब आणि प्रजा यांच्या कर्तव्यात जऱ संघर्ष आला
तर प्रजा हित हेच प्रथम कर्तव्य. कुटुंब हेसुद्धा
प्रजेचाच एक भाग आहे हेच कायम ध्यानात असुदे.
३. राजा हा स्वतः नीतिमान असावा. अश्याच राजाचा
जनसामान्य मान ठेवतात व संकटसमयी त्याच्या
पाठीशी उभे राहतात.
४. उत्तम राजा हा उत्तम प्रशासक असावा,कारण
जीवनात तसच राज्य चालवाताना उत्तम प्रशासक
हाच योग्य मार्ग शोधू शकतो व इतराना दाखवू
शकतो.
५. राजाची इतिकर्तव्यता प्रजेच्या रक्षणाबरोबर पालनाची
सुद्धा आहे, हे सदैव ध्यानात असुदे. राजा हा उत्तम
सेनानायक असावाच पण उत्तम व्यक्तिसुद्धा असावा.
सम्पूर्ण राज्य हेच एक कुटुंब अस समजुन जो राज्य
करेल तोच उत्तम राजा व राज्यप्रमुख होऊ शकेल.
कारण शास्त्र वचनानुसार राजा हा ईश्वराचा अंश आहे
हे ध्यानात ठव.
६. राजाला आपल्या सैन्याची सुद्धा नीट निगा रखता
आली पाहिजे. कारण अस उत्तम मानसिक संतुलन
असलेल सैन्य संकट समयी धैर्याने शत्रुशी युद्ध करू
शकेल. सैन्याच उच्च मनोबल हे एका उत्तम राजाच
लक्षण आहे. त्याच प्रमाणे शांततेच्या काळातला
सैन्याचा वापर हे देखिल तितकेच महत्वाच आहे.
रिकाम सैन्य ही खुप मोठी जोखिम आहे राजासाठी
आणि प्रजेसाठी सुद्धा.
७. एका उत्तम राजाचा कारभार हा उत्तम गुप्तचर
व्यवस्थेवर चालतो, हेही ध्यानात असुदे. म्हणून
गुप्तचर व्यवस्था सक्षम आणि कार्य प्रवीण असण
गरजेच आहे. त्याचप्रमाणे आलेल्या गुप्तवार्तेची खात्री
करून घेण हे देखील तितकच महत्वाच आहे. यात
गुप्तचर विभागावर अविश्वास नाही पण समाचार येई
पर्यन्त त्याचे संदर्भ बदललेले असु शकतात.
८. राजा हा आपल्या मंत्रीगण व सहाय्यकांवर अवलंबून
असतो. म्हणून राज्य पूर्ण सक्षमतेने चालण्यासाठी
प्रामाणिक व नीतिमान मंत्रीगण व सेवक खुप
महत्वाचे आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर लक्ष ठेवून
असण गरजेच आहे. तरच तेही राज्यहितार्थ उत्तम
कार्य करू शकतील. त्यांच्याकडून वेळोवेळी कार्याचा
आढावा घेण अत्यंत आवश्यक आहे.
८. सरतेशेवटी राजाने कोणताही निर्णय त्याचे परिणाम ,
महत्व, आणि परिस्थिति यांचे व्यावधान ठेवून घेण
अत्यंत गरजेच आहे. तसेच निर्णय हा शान्तचित्ते व
पूर्ण ज्ञान प्राप्त करून मग घेण हे अपेक्षित आहे.
बाकीं रामा तू सुज्ञ, सर्वज्ञ, सुशील, विचारी, सत्चरित्र, सुजाण, क्षमाशील, धैर्यवान, धर्मपरायण, विवेकी, चिंतनशील, संयत, बुद्धिमान, चतुरस्र, शौर्यवान, ज्ञानी, कुलाचारांची जाण असलेला, असा मर्यादा पुरुषोत्तम आहेस. तू योग्य तेच करशील. तुझ्या राज्यात प्रजाजन हे अत्यंत सुखात राहतील व त्याना कोणत्याही गोष्टिंची कमतरता भासणार नाही याची मला खात्री आहे. बाकीं माझे आशीर्वाद सदैव तुझ्या व या राज्याच्या पाठीशी असतील हे जाणून अस."
अस म्हणून गुरुदेवानी प्रभुंकडे प्रस्थानाची अनुमति मागितली. प्रभुनी ती जड़ अन्तःकरणाने दिली. समस्त शिष्यवर्ग आधीच या अनुमतिच्या प्रतिक्षेत तयार होता. आणि भरताने देखील प्रस्थानाची व्यवस्था चोख केली होती.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment