Skip to main content

जानकी पुनःवनवास ६३

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ६३

आणि अतिथींच्या गमनाचा दिवस आला .

राज्याभिषेकाचा सर्व सोहळा मोठा दिमाखदार आणि दृष्ट लागण्यासारखा झाला. ज्याचं गुणगान अयोध्यावासी कितीतरी दिवस गात होते, साजरा करत होते. इतकं की अस वाटाव दीपावलीचाच सण चैत्रात आला आहे. सोहळयासाठी
आलेले सर्व अतिथि अयोध्याच अतिथ्य घेऊन आणि आता अंगावर लेऊन तृप्त झाले होते. प्रत्येकाला आता गमनाचे वेध लागले होते आणि त्यात तथ्य सुद्धा होते. कारण त्याना घर सोडून बरेच दिवस झाले होते. किंबहुना महीने म्हटल्यास योग्य ठरेल. 

म्हणून प्रभुजवळ राजा सुग्रीव यानी विषय काढला की आता आम्हाला परत जाण्यास अनुमति द्यावी. प्रभु सर्वांची मानसिक स्थिति जाणत होते. म्हणून ते म्हणाले आपल्या निघण्याची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा मी देतो आपण आपल्याकडून तयारी सुरु करावी. अस म्हणून त्यानी सेवकाना तशी व्यवस्था करण्यास सांगितल. जाण्याचा दिवस आला. प्रभु सर्वाना व्यक्तिगत भेटले. सुग्रीवाला म्हणाले

" सुग्रीवा तुझ अनमोल योगदान आहे या सर्वात,  त्यातही अजून एक जबाबदारी दिली तुझ्याकडे, जी खरतर वालीने माझ्यावर सोपवली होती. ती सुग्रीवा मी तुझ्यावर सोपवत आहे. अंगदा तुझ हित अहित सर्व तुझे चुलते या नात्यान आणि किश्किन्धानरेश या नात्यान देखील ते पूर्णपणे निभावतील यात मला कोणतीही शंका नाही. "

" विभिषणा तुही एक उत्तम प्रशासक व राजा म्हणून नककीच नाव मिळवशील यात मला साशंकता नाही. "

"सर्वाना पुन्हा एकदा विनंती की जेंव्हा जेंव्हा अयोध्येवरुंन निमंत्रण असेल।आपण नक्की उपस्थित असाल हा विश्वास आहे."

सर्वांस पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आणि बहुमूल्य भेटि सोन चांदी देऊन निरोप दिला. सर्व अतिथि, निघताना अत्यंत भावुक झाले. प्रभुंचे लोचन सुद्धा भरुन आले.  या सर्वांच्या पोचण्याची व्यवस्था भरत शत्रुघ्न याना करायला सांगून प्रभु अन्तःपुरात गुरुदेव वसिष्ठ यांच्याशी राजकीय चर्चा करण्यास गेले.

अन्तःपुरातील खाजगी कक्षात गुरुदेव महर्षि वसिष्ठ स्वतः श्रीराम आणि भ्राता लक्ष्मण सद्य स्थिति, आयोध्येची राजकीय  व भौगोलिक परिस्थिती यावर चर्चा करण्यात मग्न झाले. त्यात पुढील राजकीय हालचाली , सैन्याची माहिती, आवश्यक खर्च , सैन्यासाठी आवश्यक शस्त्रे अस्र यांचे व्यवस्थापन व नवीन उत्पादन याचा देखिल उहापोह करण्यात आला.  अर्थातच या वेळी ज्येष्ठ मंत्री सुमंत सुद्धा उपस्थित होते.

यावेळी सर्वानाच प्रभुंचे राजकीय, सामाजिक व आर्थिक बाबीनवरिल प्रभुत्व लक्षात आले. गुरुदेव खुप प्रसन्न झाले आणि मनोमन म्हणाले की आता अयोध्येत पुन्हा सुगिचे व वैभवाचे दिवस सुरु झाले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...