हनूमंताआधी श्रीरामांचे नाव घेतात त्याची एक वाचलेली कथा अशी आहे
अवतार समाप्तीच्या समयी हनूमंत भावूक झाले तेंव्हा प्रभू त्यांचे मन राखण्यासाठी इच्छापूर्ती माग असे सांगतात. हनूमंत म्हणतात मला तर सर्वत्र तूम्ही हवे आहात म्हणून सर्वांनी फक्त आपले नाम घ्यावे आणि जो घेणार नाही तो प्राणी घोर नरकात जाईल. अशी काही तरतूद करा. प्रभू म्हणाले त्यामुळे लोकांचा नामावरचा विश्वास द्रूढ होण्याऐवजी ढळेल. नाम केंव्हाही ऐच्छिक असावे. त्यामूळे हे सोडून काहाही माग.
हनूमंत म्हणाले देवा मला सर्व स्थळी काळी फक्त तूमचे नाम ऐकू यावे म्हणून आज पासून माझ्या आधी जो प्रभू आपले नाम घेइल त्याचे पूण्य द्विगूणीत व्हावे हि माझी इच्छा पूर्ण करा.
त्यावर प्रभू स्मितहास्य करून म्हणाले “तथास्तू”
Comments
Post a Comment